वसाहतवादामुळे महाराष्ट्रात आमूलाग्र बदल घडून आले. ज्या काळात महाराष्ट्राचा व युरोपचा संबंध आला तेव्हा युरोपात औद्योगिक क्रांती झाली होती. भांडवलशाही अर्थकारण उभे राहिले होते. पुनरुज्जीवन, धर्मसुधारणा आणि प्रबोधन या प्रक्रियांचा अनुभव युरोपच्या गाठीशी होता. राष्ट्र-राज्य ही संकल्पना तेथे प्रत्यक्षात आली होती. आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानामुळे युरोपीय समाजांनी इतर देशांना मागे टाकले होते. भांडवलशाहीच्या विकासासाठी युरोपीय देश वसाहतीवर अत्यंत आत्मविश्वासपूर्वक नियंत्रण मिळवू इच्छित होते. यापूर्वी आपल्याकडे जे परकीय आक्रमक आले त्यांच्यात व या वसाहतवादात जमीन-अस्मानाचा फरक होता. एखाद्या महत्वाकांक्षी योद्ध्याने मध्ययुगीन भारतात येऊन येथील राजांचा पराभव करून स्वतःचा अंमल स्थापन करणे व इंग्लंडसारख्या युरोपातील सर्वात प्रगत राष्ट्राने भांडवलशाही अर्थकारणाचा भाग म्हणून भारतासारख्या देशाचे वसाहतीत रूपांतर करणे यातील तो फरक होता.
उत्पादनाची नवी पद्धत अवतरली ती प्रथमतः मुंबईत. पेशवाई १८१८ मध्ये संपुष्टात आल्यावर मुंबई ही राजधानी बनली आणि तेव्हापासून त्या परिवर्तनास खरा प्रारंभ झाला. व्यापार, उद्योगधंदे आणि कापडगिरण्या यांचे मुंबई हे केंद्र म्हणून उदयास आले. पारशी, गुजराथी व मुस्लीम व्यापाऱ्यांनी मुंबईत स्थायिक होण्यास सुरुवात केली. कापडगिरण्यांमधून जो रोजगार उपलब्ध झाला त्यामुळे कोकणातून व देशावरून मराठी मंडळी मुंबईकडे स्थलांतर करू लागली. याचा परिणाम म्हणून दोन नवे वर्ग तयार झाले. व्यापाऱ्यांचा व कारखानदारांचा वर्ग उदयास आला. तसेच एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी कामगारांचा वर्ग आकार घेऊ लागला.
मुंबईत १८२० पासून इंग्रजी शिक्षणाची पद्धत सुरु झाली. पारशी, ब्राह्मण, प्रभू , सारस्वत या जाती जमातींनी या शिक्षणाचा लाभ उठवायला सुरुवात केली. पुणे ही पेशव्यांची राजधानी होती. तेथे एकदम बदल करण्याऐवजी धीमेपणाचे धोरण इंग्रज अधिकाऱ्यांनी अवलंबिले. ब्राह्मणांचे वर्चस्व ध्यानात घेऊन प्रथम संस्कृत पाठशाळा नंतर इंग्रजी शिक्षणाचा प्रारंभ करण्यात आला. व्यापार व गिरण्या याऐवजी पुणे शहर शिक्षणाचे केंद्र बनले. पेशवाई पासून पुण्यात ब्राह्मणांचे वर्चस्व होते. इंग्रजी शिक्षण घेण्यात त्यांनी पुढाकार घेतल्याने त्यांचे वर्चस्व नव्या राज वटीतही कायम राहिले. एकूणच महाराष्ट्रातील उच्चभ्रू व शिक्षणाशी संबंधित असलेल्या जातींनी इंग्रजी शिक्षणाकडे नवी संधी म्हणून पहायला सुरुवात केली. वासाहतिक राजवटीस इंग्रजी शिक्षण घेतलेले लोक प्रशासनात सामावून घेण्यासाठी आवश्यक होते. मिशनऱ्यानींही शैक्षणिक संस्था स्थापन करून आपले बस्तान बसवायला सुरुवात केली होती. इंग्रजी शिक्षणाच्या या प्रसारामुळे एकोणिसाव्या शतकांत बुद्धिजीवी वर्गाची निर्मिती झाली. ब्राह्मण, प्रभू, पारशी इत्यादी जाती व गटांचा या वर्गात समावेश झाला होता. अर्थात उच्चशिक्षण घेतलेल्या लोकांची संख्या मर्यादितच होती. ब्राह्मणेतरांमध्येही शिक्षणाचा प्रसार थोड्या प्रमाणात का होईना होऊ लागला.
ग्रामीण भागात रयतवारी पद्धत व नगदी पिके यामुळे सावकार, व्यापारी व बऱ्या स्थितीतील शेतकरी या गटांची निर्मिती झाली. सावकारी, कोर्टबाजी, खेड्यातील बदलता सत्ता-समतोल यामुळे ब्राह्मणांचे प्रस्थ वाढले. इनामदार, वतनदारांचे स्थान तसे कायम राहिले. महाराष्ट्रातील शेती, नगदी अर्थकारणाची भाग बनली व भांडवलशाहीशी जोडली गेली. बहुसंख्य शेतकरी कर्जबाजारीपणामुळे नाडला गेला.
भांडवलशाहीचे अर्थकारण आपल्याकडे येऊन पोहोचले तसेच युरोपातील विचार व मूल्य व्यवस्थाही आली. भूप्रदेश पादाक्रांत करणे व आर्थिक शोषण करणे या बरोबरीने येथील संस्कृती, लोकमानस व विचाराचे क्षेत्रही पादाक्रांत करण्याचा प्रयत्न वसाहतवादाने केला. इंग्रजी शिक्षणामार्फत आधुनिक विचाराचे प्रभुत्व येथे प्रस्थापित झाले. नव्या बुद्धिजीवी वर्गाने या आधुनिकतेचे वाहक बनण्याचे कार्य करावे असा राज्यकर्त्यांचा हेतू होता. जे काही पश्चिमेकडून आले आहे ते आधुनिक असा समज निर्माण होऊ लागला. आपला समाज, संस्कृती व धर्म मागासलेला, असंस्कृत आहे व पश्चिमेकडून आलेली आधुनिकता आपण स्वीकारल्याशिवाय आपली प्रगती होणार नाही अशी भावना सुशिक्षितांमध्ये उत्पन्न करण्यात राज्यकर्ते गुंतले होते. आणि त्यामध्ये त्यांना बऱ्यापैकी यशही मिळाले.
विवेक बुद्धीच्या आधारे व्यक्तिगत व सामाजिक व्यवहार करणे, परंपरा, धर्म, चालीरीती व रूढी यांची चिकित्सा करणे, मानवाच्या बुद्धी व त्याच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवणे, बौद्धिक निकषावर उतरेल तेच खरे .... आपल्या नैतिक मूल्यांची चिकित्सा करणे, सामाजिक संस्थांची पुनर्रचना करण्यात येते, समाजाची प्रगती होत असते व त्यासाठी मानवी समूहाने जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत असे मानणे, ऐतिहासिक दृष्टीचा अंगीकार, ऐतिहासिक जाणिवेचा विकास, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा स्वीकार करून अविवेकी शक्तीवर मात करण्याचा प्रयत्न, हेतुगर्भ कृती करण्यावर जोर देणे, विज्ञान आणि अनुभवजन्य ज्ञानावर विश्वास अशा सर्व घटकांचा या आधुनिकतेत समावेश होत होता. पुनरुजज्जीवन, ..... सुधारणा, प्रबोधन व ओद्योगिक क्रांती या प्रक्रियांचा परिपाक म्हणजे ही आधुनिकता होती. गिरण्या, धरणे, आगगाड्या, उंच इमारती व यंत्रे यातून त्यातील विज्ञान व तंत्रज्ञानाचे दर्शन होत होते तर इंग्रजी शाळा, महाविद्यालये, पुस्तके, न्यायालयीन कायदे, नोकरशाही, प्रशासन यातून बदल कसा घडवून आणता येतो हे लक्षात येत होते. थोडक्यात सांगायचे तर आधुनिकता सर्वत्र प्रतीत होत होती, जाण ..... होती, आक्रमकरीत्या प्रभुत्व प्रस्थापित करीत होती.
अशी आधुनिकता समोर उभी ठाकलेली असताना महाराष्ट्रीय समाजातील जाणत्या वर्गाची द्विधा मनस्थिती होणे साहजिक होते. आपली परंपरा व आधुनिक मूल्यव्यवस्था यांच्या कात्रीत हा वर्ग सापडला. आपले स्वत्व कोणते याबाबत त्याच्या मनात पेच निर्माण झाला. राजा राममोहन राय यांची दोन घरे होती. ... एकात त्यांचे कुटुंब रहात असे तर दुसऱ्या घराचा वापर युरोपियन मित्रांचे स्वागत करण्यासाठी होत असे. पहिल्या घरात राममोहन सोडून सर्व काही भारतीय होते तर दुसऱ्या घरात राममोहन वगळता सर्व काही युरोपियन होते असे म्हणतात. राजा राममोहन राय याना पडलेला प्रश्न थोड्या बहुत फरकाने महाराष्ट्रीय समाजातील अभिजनांनाही पडला होता. आपल्या पारंपरिक संस्कृतीमधील मागास घटकांविरुद्ध संघर्ष करून आधुनिकीकरणाची कास धरण्याचा प्रयत्न काहींनी योग्य मानला तर काहींनी परंपरेच्या आधारे पुनर्रचनेचा आग्रह धरला. आपल्या सांस्कृतिक स्वत्वाची पुनस्थापना करण्याचा ध्यास काहींनी घेतला. त्यांनी युरोपीय संस्कृतीची महता नाकारली. एतद्देशीय परंपरेस हीन मानण्याच्या प्रवृत्तीस अटकाव करण्याच्या दृष्टीने काहींनी एतद्देशीय संस्कृती व मूल्य कल्पनांची महती सांगण्यास सुरुवात केली. पुरातन व प्राचीन परंपरांचे पुनरुज्जीवन करण्याकडे त्यांचा काळ होता. काहींचा प्रयास परंपरेतच आधुनिकता शोधण्याचा होता. एकूण आधुनिकतेच्या प्रकाशात परंपरेचा शोध घेणे, ती तपासून घेणे, त्या परंपरेची व्याख्या करणे, तिचे स्वरूप समजावून घेणे हा प्रकार सुरु झाला. भारतीय परंपरेशी नाते जोडताना आधुनिक संस्कृतीचा हस्तक्षेप होत होता. परंपरेला नवे परिणाम मिळाले होते. भारताचा प्राचीन इतिहासच युरोपियनांनी रचला होता. स्वदेशाला इतिहास देण्यातूनच त्या देशाची ओळख स्वत्वाची जाणीव तयार होते. स्वदेशाला इतिहास देण्यातूनच त्या देशाची ओळख स्वत्वाची जाणीव तयार होते. पण येथे मामला वेगळाच होता. परकीयांनीच आपला भूतकाळ आपल्यासमोर आणला होता. ग्रँट डफने मराठ्यांचा इतिहास हे पुस्तक १८२६ साली प्रसिद्ध केले आणि महाराष्ट्राला नव्या पद्धतीने लिहिलेला इतिहास मिळाला आणि त्यास आपली ओळख रचण्यास सहाय्य झाले. पार्थ चटर्जींनी परंपरा व आधुनिकता यांचा तिढा कसा सोडविला गेला हे भौतिक आणि आध्यात्मिक असा फरक करून स्पष्ट केले आहे. त्यांच्या मते भारतीयांनी अर्थकारण, राज्यप्रशासन, विज्ञान, तंत्रज्ञान या भौतिक क्षेत्रात पश्चिमेचे वर्चस्व मान्य केले, पण संस्कृती, धर्म, रूढी, कुटुंबसंस्था या पारंपरिक व अध्यात्मिक क्षेत्रातील स्वकीयांचे सार्वभौमत्व टिकविण्याचे ठरविले. भारतीयांचा राष्ट्रवाद पराभूत होता. 'भारतासारख्या समाजात राष्ट्र ही संकल्पना उत्पन्नच होऊ शकत नव्हती.' या विधानाचा प्रतिवाद करताना चटर्जींनी भौतिक व आधिभौतिक अशी विभागणी केली आहे; पण या ठिकाणी हे लक्षात घेतले पाहिजे कि अशी विभागणी हेच मुळी पौर्वात्यवादाचे एक प्रमुख वैशिष्ट्य होते. त्याच सापळ्यात चटर्जी सापडताना दिसतात. असो.
ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या टीकेमुळे हिंदूंच्या धार्मिक परंपरेतील विसंगती लक्षात आल्या, तर जातीसंस्थेवरील टीकेमुळे परंपरेतील अंगभूत विषमता स्पष्ट झाली. परिणामतः हिंदुधर्म व जातीससंस्थेचा आधुनिक मूल्यांच्या प्रकाशात पुनर्विचार सुरु होणे क्रमप्राप्त झाले. बंगालशी तुलना केल्या नंतर महाराष्ट्राने परंपरा व आधुनिकता यांचा मेळ कसा घातला हे नीट लक्षात येते. महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाची जिवंत परंपरा होती. त्या परंपरेतील पुरोगामी अंश अधोरेखित करून परंपरा व आधुनिकतेचा समन्वय साधने येथे शक्य होऊ शकले, परंतु बंगालात अशी पुरोगामी गाभा असलेली आणि आधुनिक काळापर्यंत चालत असलेली कोणतीही प्रबळ परंपरा नव्हती. त्यामुळे त्यांना हिंदू या व्यापक परंपरेशी या व्यापक जुळवून घ्यावे लागले. तसेच राष्ट्र म्हणूनही बंगाल आपल्या इतिहासाकडे अभिमानाने पाहू शकत नव्हता. परकीयांच्या विरोधात सशस्त्र बंड करून उभे राहण्याची उदाहरणे बंगालच्या इतिहासात सापडत नव्हती. त्यामुळे बंगालला भारतीय या व्यापक कोटीतच राष्ट्रवादाची मांडणी करून मराठा, राजपूत व शिखांच्या इतिहासाशी स्वःताला जोडून घ्यावे लागेल असे सुदिप्त कविराज यांनी दाखवून दिले आहे. महाराष्ट्राला शिवाजी व मराठ्यांच्या साम्राज्याचा इतिहास उपलब्ध होता. त्यामुळे राष्ट्र म्हणून स्वतःची ओळख तयार होणे महाराष्ट्राला सोपे गेले. तसेच वारकरी संप्रदायामुळे परंपरा व आधुनिकतेचा संबंध जोडणेही सुकर झाले, असे म्हणता येईल.
ग्रामीण भागात रयतवारी पद्धत व नगदी पिके यामुळे सावकार, व्यापारी व बऱ्या स्थितीतील शेतकरी या गटांची निर्मिती झाली. सावकारी, कोर्टबाजी, खेड्यातील बदलता सत्ता-समतोल यामुळे ब्राह्मणांचे प्रस्थ वाढले. इनामदार, वतनदारांचे स्थान तसे कायम राहिले. महाराष्ट्रातील शेती, नगदी अर्थकारणाची भाग बनली व भांडवलशाहीशी जोडली गेली. बहुसंख्य शेतकरी कर्जबाजारीपणामुळे नाडला गेला.
भांडवलशाहीचे अर्थकारण आपल्याकडे येऊन पोहोचले तसेच युरोपातील विचार व मूल्य व्यवस्थाही आली. भूप्रदेश पादाक्रांत करणे व आर्थिक शोषण करणे या बरोबरीने येथील संस्कृती, लोकमानस व विचाराचे क्षेत्रही पादाक्रांत करण्याचा प्रयत्न वसाहतवादाने केला. इंग्रजी शिक्षणामार्फत आधुनिक विचाराचे प्रभुत्व येथे प्रस्थापित झाले. नव्या बुद्धिजीवी वर्गाने या आधुनिकतेचे वाहक बनण्याचे कार्य करावे असा राज्यकर्त्यांचा हेतू होता. जे काही पश्चिमेकडून आले आहे ते आधुनिक असा समज निर्माण होऊ लागला. आपला समाज, संस्कृती व धर्म मागासलेला, असंस्कृत आहे व पश्चिमेकडून आलेली आधुनिकता आपण स्वीकारल्याशिवाय आपली प्रगती होणार नाही अशी भावना सुशिक्षितांमध्ये उत्पन्न करण्यात राज्यकर्ते गुंतले होते. आणि त्यामध्ये त्यांना बऱ्यापैकी यशही मिळाले.
विवेक बुद्धीच्या आधारे व्यक्तिगत व सामाजिक व्यवहार करणे, परंपरा, धर्म, चालीरीती व रूढी यांची चिकित्सा करणे, मानवाच्या बुद्धी व त्याच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवणे, बौद्धिक निकषावर उतरेल तेच खरे .... आपल्या नैतिक मूल्यांची चिकित्सा करणे, सामाजिक संस्थांची पुनर्रचना करण्यात येते, समाजाची प्रगती होत असते व त्यासाठी मानवी समूहाने जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत असे मानणे, ऐतिहासिक दृष्टीचा अंगीकार, ऐतिहासिक जाणिवेचा विकास, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा स्वीकार करून अविवेकी शक्तीवर मात करण्याचा प्रयत्न, हेतुगर्भ कृती करण्यावर जोर देणे, विज्ञान आणि अनुभवजन्य ज्ञानावर विश्वास अशा सर्व घटकांचा या आधुनिकतेत समावेश होत होता. पुनरुजज्जीवन, ..... सुधारणा, प्रबोधन व ओद्योगिक क्रांती या प्रक्रियांचा परिपाक म्हणजे ही आधुनिकता होती. गिरण्या, धरणे, आगगाड्या, उंच इमारती व यंत्रे यातून त्यातील विज्ञान व तंत्रज्ञानाचे दर्शन होत होते तर इंग्रजी शाळा, महाविद्यालये, पुस्तके, न्यायालयीन कायदे, नोकरशाही, प्रशासन यातून बदल कसा घडवून आणता येतो हे लक्षात येत होते. थोडक्यात सांगायचे तर आधुनिकता सर्वत्र प्रतीत होत होती, जाण ..... होती, आक्रमकरीत्या प्रभुत्व प्रस्थापित करीत होती.
अशी आधुनिकता समोर उभी ठाकलेली असताना महाराष्ट्रीय समाजातील जाणत्या वर्गाची द्विधा मनस्थिती होणे साहजिक होते. आपली परंपरा व आधुनिक मूल्यव्यवस्था यांच्या कात्रीत हा वर्ग सापडला. आपले स्वत्व कोणते याबाबत त्याच्या मनात पेच निर्माण झाला. राजा राममोहन राय यांची दोन घरे होती. ... एकात त्यांचे कुटुंब रहात असे तर दुसऱ्या घराचा वापर युरोपियन मित्रांचे स्वागत करण्यासाठी होत असे. पहिल्या घरात राममोहन सोडून सर्व काही भारतीय होते तर दुसऱ्या घरात राममोहन वगळता सर्व काही युरोपियन होते असे म्हणतात. राजा राममोहन राय याना पडलेला प्रश्न थोड्या बहुत फरकाने महाराष्ट्रीय समाजातील अभिजनांनाही पडला होता. आपल्या पारंपरिक संस्कृतीमधील मागास घटकांविरुद्ध संघर्ष करून आधुनिकीकरणाची कास धरण्याचा प्रयत्न काहींनी योग्य मानला तर काहींनी परंपरेच्या आधारे पुनर्रचनेचा आग्रह धरला. आपल्या सांस्कृतिक स्वत्वाची पुनस्थापना करण्याचा ध्यास काहींनी घेतला. त्यांनी युरोपीय संस्कृतीची महता नाकारली. एतद्देशीय परंपरेस हीन मानण्याच्या प्रवृत्तीस अटकाव करण्याच्या दृष्टीने काहींनी एतद्देशीय संस्कृती व मूल्य कल्पनांची महती सांगण्यास सुरुवात केली. पुरातन व प्राचीन परंपरांचे पुनरुज्जीवन करण्याकडे त्यांचा काळ होता. काहींचा प्रयास परंपरेतच आधुनिकता शोधण्याचा होता. एकूण आधुनिकतेच्या प्रकाशात परंपरेचा शोध घेणे, ती तपासून घेणे, त्या परंपरेची व्याख्या करणे, तिचे स्वरूप समजावून घेणे हा प्रकार सुरु झाला. भारतीय परंपरेशी नाते जोडताना आधुनिक संस्कृतीचा हस्तक्षेप होत होता. परंपरेला नवे परिणाम मिळाले होते. भारताचा प्राचीन इतिहासच युरोपियनांनी रचला होता. स्वदेशाला इतिहास देण्यातूनच त्या देशाची ओळख स्वत्वाची जाणीव तयार होते. स्वदेशाला इतिहास देण्यातूनच त्या देशाची ओळख स्वत्वाची जाणीव तयार होते. पण येथे मामला वेगळाच होता. परकीयांनीच आपला भूतकाळ आपल्यासमोर आणला होता. ग्रँट डफने मराठ्यांचा इतिहास हे पुस्तक १८२६ साली प्रसिद्ध केले आणि महाराष्ट्राला नव्या पद्धतीने लिहिलेला इतिहास मिळाला आणि त्यास आपली ओळख रचण्यास सहाय्य झाले. पार्थ चटर्जींनी परंपरा व आधुनिकता यांचा तिढा कसा सोडविला गेला हे भौतिक आणि आध्यात्मिक असा फरक करून स्पष्ट केले आहे. त्यांच्या मते भारतीयांनी अर्थकारण, राज्यप्रशासन, विज्ञान, तंत्रज्ञान या भौतिक क्षेत्रात पश्चिमेचे वर्चस्व मान्य केले, पण संस्कृती, धर्म, रूढी, कुटुंबसंस्था या पारंपरिक व अध्यात्मिक क्षेत्रातील स्वकीयांचे सार्वभौमत्व टिकविण्याचे ठरविले. भारतीयांचा राष्ट्रवाद पराभूत होता. 'भारतासारख्या समाजात राष्ट्र ही संकल्पना उत्पन्नच होऊ शकत नव्हती.' या विधानाचा प्रतिवाद करताना चटर्जींनी भौतिक व आधिभौतिक अशी विभागणी केली आहे; पण या ठिकाणी हे लक्षात घेतले पाहिजे कि अशी विभागणी हेच मुळी पौर्वात्यवादाचे एक प्रमुख वैशिष्ट्य होते. त्याच सापळ्यात चटर्जी सापडताना दिसतात. असो.
ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या टीकेमुळे हिंदूंच्या धार्मिक परंपरेतील विसंगती लक्षात आल्या, तर जातीसंस्थेवरील टीकेमुळे परंपरेतील अंगभूत विषमता स्पष्ट झाली. परिणामतः हिंदुधर्म व जातीससंस्थेचा आधुनिक मूल्यांच्या प्रकाशात पुनर्विचार सुरु होणे क्रमप्राप्त झाले. बंगालशी तुलना केल्या नंतर महाराष्ट्राने परंपरा व आधुनिकता यांचा मेळ कसा घातला हे नीट लक्षात येते. महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाची जिवंत परंपरा होती. त्या परंपरेतील पुरोगामी अंश अधोरेखित करून परंपरा व आधुनिकतेचा समन्वय साधने येथे शक्य होऊ शकले, परंतु बंगालात अशी पुरोगामी गाभा असलेली आणि आधुनिक काळापर्यंत चालत असलेली कोणतीही प्रबळ परंपरा नव्हती. त्यामुळे त्यांना हिंदू या व्यापक परंपरेशी या व्यापक जुळवून घ्यावे लागले. तसेच राष्ट्र म्हणूनही बंगाल आपल्या इतिहासाकडे अभिमानाने पाहू शकत नव्हता. परकीयांच्या विरोधात सशस्त्र बंड करून उभे राहण्याची उदाहरणे बंगालच्या इतिहासात सापडत नव्हती. त्यामुळे बंगालला भारतीय या व्यापक कोटीतच राष्ट्रवादाची मांडणी करून मराठा, राजपूत व शिखांच्या इतिहासाशी स्वःताला जोडून घ्यावे लागेल असे सुदिप्त कविराज यांनी दाखवून दिले आहे. महाराष्ट्राला शिवाजी व मराठ्यांच्या साम्राज्याचा इतिहास उपलब्ध होता. त्यामुळे राष्ट्र म्हणून स्वतःची ओळख तयार होणे महाराष्ट्राला सोपे गेले. तसेच वारकरी संप्रदायामुळे परंपरा व आधुनिकतेचा संबंध जोडणेही सुकर झाले, असे म्हणता येईल.
रानडे प्राचीन भारताचा गौरव करताना दिसतात. भारत ही आर्यांची पवित्र भूमी आहे असे ते म्हणत. ब्राह्मण, बनिया, वतनदार व बुद्धिजीवी यांच्या नेतृत्वावर त्यांची भिस्त होती. हिंदुधर्मातील अनेक चालीरीती त्यांना त्याज्य वाटत होत्या, पण त्या धर्मापासून तोडून घेणे त्यांना पसंत नव्हते. त्या धर्मपरंपरेतील वारकरी संप्रदाय त्यांना त्यांच्या आधुनिक मूल्य कल्पनांच्या जवळ जाणारा वाटला. प्रार्थना समाजाला त्यांनी त्याची नवी आवृत्ती मानले. सर्व जाती-जमातींना सामावून घेणारी वारकरी परंपरा त्यांना महत्वाची वाटत होती. शिवाजीने सर्वांना सामावून घेऊन राज्यकारभार केला. आधुनिक राष्ट्रवादाचे म्हणूनच शिवाजी हे चिन्ह होऊ शकते असे त्यांचे मत होत. त्यांच्यापेक्षा १५ वर्षांनी मोठे असलेले महात्मा फुले वरील सर्वच बाबतीत रानडेंच्या बरोबर विरुद्ध भूमिका घेत होते. आर्यांनी बाहेरून येऊन येथील शूद्र-अतिशुद्रांवर वर्ण-जाति-व्यवस्था व वेड-पुराणे यांच्या आधारे वर्चस्व निर्माण केले असे त्यांचे प्राचीन इतिहासाचे विश्लेषण होते. लोकसंस्कृतीतील चिन्हे त्यांनी वापरली व उच्चभ्रूंची संस्कृती झिडकारली. त्यांच्या मते हिंदू परंपरेत कधीच एकोपा नव्हता उलट भटशाहीने केलेला अन्याय असे त्याचे रूप होते. फुल्यांनी रानड्यांच्या मराठ्यांच्या इतिहासावरील पुस्तकाच्या ३१ वर्ष आधी शिवाजीवरील पोवाडा प्रसिद्ध केला होता. त्यात त्यांनी शिवाजीला ' कुळवाडी भूषण ' असे संबोधले होते. रानडे भक्तिमार्ग हा प्रेममार्ग आहे, सर्व मानवात विवेकबुद्धीच्या स्वरूपात परमेश्वर वसत असतो असे सांगून वैश्विकतेकडे जाण्याचा प्रयत्न करतात. तर फुले सार्वजनिक सत्यधर्मामार्फत वैश्विकतेकडे जातात. रानड्यांच्या तत्वज्ञानाला अभिजानांच्या नेतृत्वाच्या संकल्पनेची मर्यादा पडली होती.
एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्रीय समाजाचा अभ्यास अलीकडे मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. परदेशी अभ्यासकही या विषयाकडे वळले आहेत. सद्य:कालीन समाजकारण व राजकारणाची पूर्वपीठिका म्हणूनही एकोणिसाव्या शतकाकडे पहिले जात आहे. समतावादी चळवळीमधील लोक महात्मा फुले व त्यांच्या सहकाऱ्यांच्या कार्याचा अभ्यास करताना दिसत आहेत, तर हिंदुत्ववादी मंडळी चिपळूणकरांकडे अजूनही आकर्षित होत आहेत. इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, स्त्री-अभ्यास, मराठी साहित्य या विषयांचे विद्यार्थी एकोणिसाव्या शतकावर संशोधन करीत आहेत. वसाहतवाद व उत्तरवसाहतवाद हे अभ्यासाचे नवेच क्षेत्र गेल्या काही वर्षात उदयाला आले आहे. त्यातील अभ्यासकांनी स्वातंत्र्यपूर्व कालखंडाच्या अभ्यासाची पद्धत विकसित केली आहे तसेच त्या अभ्यास क्षेत्राचे सिद्धान्त रचण्यास सुरुवात केली आहे. इंग्रजी साहित्याचे अभ्यासक या बाबतीत पुढे आहेत. ' कनिष्ठ स्तरांच्या समूहांचे अभ्यासकांनीही त्यात भर घातली आहे. बंगाली अभ्यासकांनी आधुनिक इतिहासाच्या लेखनात आघाडी घेतली आहे. महाराष्ट्रातही गेल्या काही वर्षात एकोणिसाव्या शतकाचा अभ्यास करण्यास जोमाने सुरुवात झाली आहे. प्रस्तुत ग्रंथात त्यातील काही अभ्यास संकलित केलेले आहेत. एकूण चौदा लेखातील काही लेख मूळ इंग्रजीमध्ये लिहिले गेले होते त्यांचे भाषांतर /रूपांतर करून घेतलेले आहेत. बहुतेक लेख या ग्रंथासाठीच लिहिलेले आहेत. "मराठी ज्ञान प्रसारक व स्त्रीप्रश्न " हा लेख लेखिकेच्या आगामी पुस्तकातून घेतलेला आहे तर " आगरकर प्रणित धर्मचिकित्सेचा आशय " हा लेख 'आजचा सुधारक ' मध्ये पूर्वी प्रसिद्ध आहे.
एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्रीय समाजाचा अभ्यास अलीकडे मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. परदेशी अभ्यासकही या विषयाकडे वळले आहेत. सद्य:कालीन समाजकारण व राजकारणाची पूर्वपीठिका म्हणूनही एकोणिसाव्या शतकाकडे पहिले जात आहे. समतावादी चळवळीमधील लोक महात्मा फुले व त्यांच्या सहकाऱ्यांच्या कार्याचा अभ्यास करताना दिसत आहेत, तर हिंदुत्ववादी मंडळी चिपळूणकरांकडे अजूनही आकर्षित होत आहेत. इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, स्त्री-अभ्यास, मराठी साहित्य या विषयांचे विद्यार्थी एकोणिसाव्या शतकावर संशोधन करीत आहेत. वसाहतवाद व उत्तरवसाहतवाद हे अभ्यासाचे नवेच क्षेत्र गेल्या काही वर्षात उदयाला आले आहे. त्यातील अभ्यासकांनी स्वातंत्र्यपूर्व कालखंडाच्या अभ्यासाची पद्धत विकसित केली आहे तसेच त्या अभ्यास क्षेत्राचे सिद्धान्त रचण्यास सुरुवात केली आहे. इंग्रजी साहित्याचे अभ्यासक या बाबतीत पुढे आहेत. ' कनिष्ठ स्तरांच्या समूहांचे अभ्यासकांनीही त्यात भर घातली आहे. बंगाली अभ्यासकांनी आधुनिक इतिहासाच्या लेखनात आघाडी घेतली आहे. महाराष्ट्रातही गेल्या काही वर्षात एकोणिसाव्या शतकाचा अभ्यास करण्यास जोमाने सुरुवात झाली आहे. प्रस्तुत ग्रंथात त्यातील काही अभ्यास संकलित केलेले आहेत. एकूण चौदा लेखातील काही लेख मूळ इंग्रजीमध्ये लिहिले गेले होते त्यांचे भाषांतर /रूपांतर करून घेतलेले आहेत. बहुतेक लेख या ग्रंथासाठीच लिहिलेले आहेत. "मराठी ज्ञान प्रसारक व स्त्रीप्रश्न " हा लेख लेखिकेच्या आगामी पुस्तकातून घेतलेला आहे तर " आगरकर प्रणित धर्मचिकित्सेचा आशय " हा लेख 'आजचा सुधारक ' मध्ये पूर्वी प्रसिद्ध आहे.
एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्रीय समाजाने त्यातील बुद्धिजीवी वर्गाच्या प्रतिनिधींनी आधुनिकतेचा कसा स्वीकार केला आणि परंपरेचा अर्थ कसा जाणून घेतला, वसाहतवादाला त्यांनी कसा प्रतिसाद दिला याचा अभ्यास या लेखामध्ये केलेला दिसून येईल. एकोणिसाव्या शतकात कोणती द्वंद्वे उभी राहिली त्याची सोडवणूक कशी होऊ शकली, कोणते सामाजिक व वैचारिक अंतर्विरोध उपस्थित झाले, आधुनिकतेस स्वीकारताना परंपरेची कास न सोडण्याच्या निश्चयामुळे कोणते पेचप्रसंग पुढे आले यांचा अभ्यास या लेखांमध्ये केलेला आढळून येईल.
एकूण चौदा लेखांचे चार विभाग पाडले आहेत. पहिला विभाग आहे धर्मकारणाचा. वसाहतवादाबरोबर आलेल्या आधुनिकतेने पहिला जोरदार धक्का दिला तो येथील धर्मसंस्थेला. मिशनऱ्यांनी हिंदुधर्मातील विसंगती व विषमतेवर बोट ठेवले. धर्मांतराच्या प्रयत्नांनाही थोडे बहुत यश आले. त्यामुळे धर्मसुधारणेची चळवळ सुरु झाली. हिंदुधर्मातील पुरोगामी व तत्कालीन मूल्यांना जवळची वाटेल अशी परंपरा म्हणून वारकरी संप्रदायाकडे पहिले गेले. सदानंद मोरेंनी एकोणिसाव्या शतकात वारकरी संप्रदायाचा अन्वयार्थ कसा लावला गेला, धर्मसुधारकांनी संतांना आपले पूर्वसुरी कसे मानले, जांभेकरांपासून, रामशास्त्री भागवतापर्यंत सर्वांनी संतवाङ्मयाचे महत्व कसे ओळखले होते. म. फुले किंवा कृष्णराव भालेकर या सत्यशोधकी सुधारकांपासून ते न्या. रानडे किंवा लोकमान्य टिळकांपर्यंत सर्वांवर या संप्रदायाचा कसा प्रभाव पडला होता याचे सविस्तर विश्लेषण केले आहे. चिपळूणकर मात्र तुकारामाच्या अभंगाच्या प्रकाशनासाठी सरकारने दिलेल्या अनुदानाबद्दल नाराजी का व्यक्त करीत होते याचीही कारणमीमांसा मोरे देतात. वारकरी संप्रदायाच्या अंतर्गत ज्या हालचाली चालू होत्या त्याचीही नोंद ह्या लेखात घेण्यात आलेली आहे. एकोणिसाव्या शतकात महाराष्ट्र वारकरी परंपरेचे कोणते स्थान होते याचे विश्लेषण करणारा बहुधा हा पहिलाच लेख असावा.
एकोणिसाव्या शतकात यापूर्वी उल्लेख केल्याप्रमाणे बरीच द्वंद्वे उभी राहिली. त्यातील वेदान्त विरुद्ध धादान्त आणि ब्राह्मणी विरुद्ध अब्राह्मणी या दोन द्वंद्वाचे रूप प्रदीप गोखले यांनी त्यांच्या लेखात मांडले आहे. पहिले द्वंद्व लोकहितवादींच्या लेखनात आढळते. लोकहितवादींनी वेदान्त म्हणजे निवृत्ती व धादान्त म्हणजे प्रवृत्तीवाद असे सांगून वेदान्तावर टीका केली होती. आणि धादान्त विचार स्वीकारला होता. त्यात त्यांनी श्रीकृष्ण, रामदास, तुकाराम यांचा समावेश केला होता. पुढे आर्यसमाजाच्या प्रभावाखाली आल्यावर लोकहितवादींनी आपल्या मांडणीत कसा फरक केला हेही गोखले आपल्याला दाखवितात. ब्राह्मणी-अब्राह्मणी हे द्वंद्व गोखलेंनी म. फुल्यांच्या लेखनाआधारे मांडले आहे. चार्वाक, गौतमबुद्ध, येशूख्रिस्त यांना अब्राह्मणी परंपरेतील मानून ब्राह्मणी मतावर फुल्यांनी कसा हल्ला चढविला होता हे या लेखात आपल्याला कळते. ब्राह्मणी-अब्राह्मणी या द्वंद्वाला फुल्यांनी अप्रत्यक्षरीत्या अभिजन-बहुजन हे परिमाण कसे दिले होते हेही गोखले यांच्या लेखात सांगतात. या विश्लेषणामुळे आपल्याला चार कोटी उपलब्ध होतात व कोणता विचारवंत कोठे उभा होता हे लक्षात येते. वेदान्ती-धादांती, ब्राह्मणी-अब्राह्मणी यापैकी परंपरेच्या कोणत्या धारेला तुम्ही महत्व देता यावरून तुमची भूमिका कळते म्हणून हा लेख महत्वाचा ठरतो.
धर्मकारण विभागातील तिसऱ्या लेखात भास्कर भोळे आपल्याला पुन्हा लोकहितवादींकडे घेऊन जातात. येथे लोकहितवादींच्या धर्मविचारातील विकासक्रम आपल्यासमोर उलगडला जातो. आर्यसमाजाच्या प्रभावाला बळी पडून लोकहितवादींनी विवेकवाद सोडला, ते जीर्णमतवादी झाले या आरोपाचा भोळे स्पष्ट भाषेत प्रतिवाद करतात. उत्तर आयुष्यात त्यांच्या भूमिकेत लक्षणीय संयतपणा, परिपक्वता आणि आस्थेवाईकपणा आला ही वस्तुस्थिती मान्य करून भोळे सांगतात की, लोकहितवादींचे मौलिक भूमिकांतर झाले असे म्हणता येणार नाही. झाला तो बदल वय व व्यासंगपरत्वे झाला असून त्याचे स्वरूप विकासप्रक्रियेशी अधिक जुळणारे आहे. लोकहितवादींच्या धर्मविषयक विचारात भोळ्यांना एक समाजसापेक्ष दृष्टीकोन दिसतो. त्यांची धर्मश्रद्धा समाजशास्त्रीय विचारातून व बुद्धिप्रामाण्यातून परिणत झालेली होती. भोळेंच्या मते लोकहितवादींच्या धर्मचिंतनाची वाटचाल ही स्वप्नरंजनातून वास्तुनिष्ठतेकडे, अपक्वतेकडून परिपक्वतेकडे आणि उथळतेकडून सखोलपणाकडे झाली होती. लोकहितवादींच्या सामाजिक विचारांवर व तेही मुख्यत्त्वेकरून शतपत्राच्या आधारे लेखन होत असते. भोळेंच्या लेखनात आपल्याला प्रथमच लोकहितवादींच्या धर्मविचारातील विकासक्रम त्यांच्या समग्र साहित्याच्या आधारे मांडलेला आढळतो.
धर्माशी संबंधित चौथा व शेवटचा लेख आहे, यशवंत सुमंत यांचा समाजसुधारक म्हणून आगरकरांचा विचार करण्याची प्रथा पडली आहे. सुमंत मात्र आगरकरांच्या धर्मविचाराकडे आपल्याला घेऊन जातात. अज्ञेयवादी, बुद्धिप्रामाण्यवादी आणि उपयुक्ततावादी आगरकरांच्या धर्मचिकित्सेकडे गांभीर्याने पहिले जात नाही. पण आगरकर स्वतः धर्मसंस्थेकडे अत्यंत गंभीरपूर्वक पहात होते. धार्मिकतेची त्यांनी टिंगलटवाळी कधीही केली नाही असे दाखवून देऊन सुमंत त्यांच्या धर्मचिकित्सेचा आशय स्पष्ट करतात. रानड्यांचा ईश्वरवाद, फुल्यांचा निर्मिकवाद व टिळकांचा अद्वैतपर अध्यात्मवाद नाकारून आगरकर विवेकनिष्ठ अज्ञेयवादी भूमिका कशी घेतात हे या लेखात मांडलेले आहे. सुमंतांच्या मते माणसाबद्दल केवळ माणूस म्हणून गाढ श्रद्धा बाळगणारा एक धर्ममुक्त उन्नत माणूस आगरकरांना अभिप्रेत होता.मानवतेबद्दलच्या या प्रगाढ श्रद्धेच्या आधारे त्यांनी धर्माची चिकित्सा केली होती. त्यांचा हा हेतू व झेप ज्यांना उमजली नाही त्यांनी आगरकरांना धर्मद्वेष्टे म्हटले. आगरकर व्यक्तिवादी होते पण तरीही परहिताकडे दुर्लक्ष करीत नाहीत आणि अज्ञेयवादी असतानाही श्रद्धाहीन बनत नाहीत हे सुमंतांनी सप्रमाण स्पष्ट केले आहे.
आधुनिकता आणि परंपरेचा सामना समाजकारणातही दृष्टीस पडत होता व तो धर्मकारणाशी जोडला गेला होता. येथे जे विभाग पाडले आहेत त्यांच्याकडे फार काटेकोरपणे पाहून चालणार नाही. एकोणिसाव्या शतकातील विचार व कृती समाजाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारी असे. विश्लेषणाच्या सोयीसाठी आपण त्यांचे विभाग पाडत असतो. समाजकारण या विभागात एकूण पाच लेख समाविष्ट झालेले आहेत. पहिला लेख आहे राजेश्वरी देशपांडे यांचा बाळशास्त्री जांभेकरांवरील. ' दर्पण ' या स्वतःच्या वृत्तपत्रात जांभेकर विधवा विवाह, धर्म, जात यासारख्या कळीच्या प्रश्नावरील चर्चेत हस्तक्षेप करताना दिसत नाहीत. उलट ते मौन पाळणे कसे पसंत करिन होते हे सांगून देशपांडे बाळशास्त्रींच्या मर्यादा दाखवून देतात. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे बाळशास्त्री सर्वसाधारणतः पारं पारंपरिक मूल्यचौकट कायम ठेवण्याच्या बाजूचे तर होतेच पण त्या चौकटीतील ब्राह्मणांचे नेतृत्वही त्यांना मान्य होते. श्रीपत शेषाद्रीच्या धर्मांतर प्रकरणात बाळशास्त्री तटस्थता सोडतात व धर्मांतराला विरोध करून सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या जडणघडणीस हातभार लावतात. कर्मठ भूमिका घेणाऱ्या सनातन्यांपासून ते दूर जातात पण धर्मरक्षणाची भूमिका सोडीत नाहीत. धर्मातरितांस पुन्हा धर्मात घेण्याच्या मुद्द्यावर सुधारकी भूमिका घेतात. बाळ शास्त्रींच्या कार्याच्या आजवरच्या मूल्यमापनापेक्षा देशपांडे यांचे हे मूलमापन वेगळे आहे. बाळशास्त्रींना फार चांगले विद्यार्थी लाभले. ते पुढे नावारूपाला आले. सामाजिक कार्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. त्यातील एक होते नवरोजी फर्दूनजी. टिकेकरांनी आपल्या यंग बॉम्बे पार्टीवरील लेखात नवरोजी फर्दूनजींच्या असाधारण कार्याचे विश्लेषण केले आहे. नवरोजींचे चरित्र व त्यांचे यान बॉम्बे पार्टी या गटातील कार्य प्रथमतःच या लेखाद्वारे सलगपणे वाचकांसमोर येत आहे. पारशी समाजातील सुधारणेच्या चळवळीबद्दल फारशी माहिती मराठीमध्ये उपलब्ध होत नाही. नवरोजींनी केलेल्या त्या समाजातील सुधारणेच्या प्रयत्नांची नोंद टिकेकरांनी त्यांच्या लेखात घेतली आहे. नवरोजींच्या राजकीय व इंग्लंडमध्ये केलेल्या कार्याचीही ओळख या लेखाने आपल्याला होते. पहिली वादविवाद सभा, पहिली राजकीय संघटना, स्त्री-सुधारणेसाठीची पहिली संस्था, पहिली धार्मिक संघटना , पहिले शैक्षणिक नियतकालिक सुरु करण्याचे श्रेय नवरोजी फर्दूनजींना दिले पाहिजे, हे टिकेकर सप्रमाण दाखवून देतात. मुंबई शहरात एकोणिसाव्या शतकात बुद्धिजीवी वर्गाकडून सर्वांगीण सुधारणेचे जे प्रयत्न झाले त्यामध्ये काही पारशी नेत्यांनी अत्यंत महत्वाची कामगिरी बजावली. आधुनिकतेचा स्वीकार कारण्यामध्ये पारशी समाज अग्रेसर होता. अशा या समाजाचे एक प्रतिनिधी म्हणून नवरोजी फर्दूनजींच्या कार्याकडे पाहिले पाहिजे. टिकेकरांचा लेख याच दृष्टिकोनातून लिहिलेला आहे. नवरोजींना केंद्रस्थानी ठेऊन टिकेकर आपल्याला मुंबईत त्या काळात चालू असलेल्या समाजकारणाचे दर्शन घडवितात. तसेच मुंबई शहराच्या संमिश्र समाजात कोणत्या प्रकारचे नेतृत्व उदयाला येत होते व कोणते मागे पडत होते याची स्पष्ट कल्पना टिकेकरांच्या लेखामुळे येते. युरोपीय लोक महाराष्ट्रात प्रथम मुंबईत आले त्यामुळे तेथे पश्चिमेकडून येणाऱ्या सर्व गोष्टीही आधी पोहोचल्या. त्यात प्रामुख्याने होते ख्रिस्ती मिशनरी. मिशनऱ्यांनी हिंदुधर्माची निर्भत्सना करून ख्रिस्ती धर्माचे पोवाडे गायले. तसेच काही जणांना धर्मांतर करण्यास प्रवृत्तही केले. धर्मावरील या हल्ल्याला तोंड देण्यास जे पुढे आले त्यामध्ये विष्णुबुवा ब्रह्माचारींचे नाव घ्यावे लागेल.
बाळशास्त्रींनी धर्मांतराबाबत जी धर्मरक्षणाची भूमिका घेतली होती तशीच भूमिका विष्णूशास्त्रींनी घेतली होती. पण त्यांच्या कार्याचे व विचाराचे स्वरूप बालशास्त्रींपेक्षा वेगळे होते. सुहास पळशीकरांनी त्यांच्या लेखात बिष्णुबावांच्या कार्याचा आजवर जो अन्वयार्थ लावण्यात आला आहे त्यातील अपुरेपणा व कच्चेपणा दाखवून त्यांच्या भूमिकेचे नव्याने मूल्यमापन केले आहे. विष्णुबावा हे समाज किंवा धर्मसुधारक नव्हते. सनातन धर्म सोप्या भाषेत सांगणे, वेदोक्त धर्माचा प्रचार करणे, चातुर्वण्य, मूर्तिपूजा व कर्मकांडाचे समर्थन करणे व ख्रिस्ती धर्माचा प्रतिवाद करणे हे त्यांचे अंगीकृत कार्य होते. वेदोक्त धर्माचा प्रचार करताना विविध धर्म व पंथोपपंथ हे वेदोक्त धर्मातून निघाले आहेत त्यामुळे त्यांना सहजपणे वेदोक्त धर्मात परत येतायेईल येतायेईल असे प्रतिपादन विष्णुबावा करीत असत. त्यामुळे पुढे उदयाला आलेल्या हिंदुत्ववादाचे ते पूर्वसूरी ठरतात. परमताची हेटाळणी, संस्कृतचा पराकोटीचा अभिमान आणि विज्ञान हा वेदांचा आणि योगाचा पाया आहे असा दावा करणे ही आधुनिक हिंदुत्वाची वैशिष्ट्ये विष्णुबावांमध्ये दिसतात, असे पळशीकरांनी संदर्भासह दाखविले आहे. सुखदायक राज्यप्रकरणी निबंधातील विष्णुबावांच्या स्वप्नाळू विचाराच्या मर्यादाही पळशीकर स्पष्ट करतात.
विष्णुबावा व विष्णुशास्री चिपळूणकरांच्या विचारात काही बाबतीत साम्य आढळते. विसाव्या शतकातील हिंदुत्व विचारधारेची पार्श्वभूमी तयार करण्याचे काम या दोघांनी केले होते असे दिसते. विष्णूशास्त्रींनवरील लेखात राजेंद्र व्होरा विष्णुशास्त्री वरील पॊर्वात्यवादाच्या प्रभावाचे विश्लेषण करतात. इंग्रजी ज्ञान, विज्ञान व समाजाची भारावून जाऊन स्तुती विष्णूशास्त्री कशी करतात त्यांनी स्वदेशाची प्रतिमा व सामाजिक स्थित्यंतराची कल्पना तसेच त्यांचा राष्ट्रवादही पॊर्वात्यवादाने कसा प्रभावित झाला होता याची चर्चा त्यांच्या लेखात येते . विष्णूशास्त्री आर्यश्रेष्ठत्वाचा सिद्धांत स्वीकारून ब्राह्मणांचे व हिंदूसमाजातील विषमतेचे समर्थ करतात असे सांगून त्यांचे बरेच विचार पुढे येणाऱ्या स्वातंत्रवीर सावरकरांच्या तत्त्वज्ञानाच्या जावळ जातात असा दावा व्होरा यांनी केला आहे.
या पुढील लेख आहे बेहरामजी मलबारी वरील मनीषा टिकेकरांचा. त्यामुळे आपण पुन्हा मुंबईतील सुधारणेच्या चळवलीकडे व पारशी सुधारकाच्या कार्याकडे जातो. नवरोजी फर्दूनजी सुधारकाची भूमिका मुख्यतः पारशी समाजापुरती मर्यादित ठेवतात व राजकीय व आर्थिक प्रश्नाबाबत व्यापक भूमिका घेऊन इतर समाज गटांबरोबर कार्य करतात. मलबारींचे वैशिष्ट्य हे कि त्यांनी प्रामुख्याने हिंदू स्त्रियांच्या प्रश्नांचा आयुष्यभर पाठपुरावा केला. महाराष्ट्रातील समाजसुधारणेच्या चळवळीचे अभ्यासक सामान्यतः फक्त हिंदू सुधारकांच्या कार्याचा अभ्यास करतात. मनीषा टिटेकारांनी प्रथमतःच मलबारी या पारशी सुधारकाने हिंदू समाजातील सुधारणेसाठी कसे प्रयत्न केले याचे विश्लेषण केले आहे व त्यांच्या भूमिकेची तुलना रानडे व तेलंग या सारख्या सुधारकांच्या कार्याशी केली आहे. इंडियन स्पेक्टेटर हे मलबारीचे पत्र हिंदुसमाज सुधारणेचा पुरस्कार करीत होते. टिळक मलबारींना बाहेरचा मानीत असत, पण मलबारींनी मात्र स्वतःला कधीही बाहेरचे मानले नाही. त्यांनी निधर्मी सुधारणेचा आग्रह धरला होता. मनीषा टिटेकरांच्या मते मलबारी इतर कोणापेक्षाही आगरकरांच्या भूमिकेच्या जवळ जातात.
या पुढील विभाग स्त्री प्रश्नांवरील तीन लेखांचा आहे. मॉबरींनी स्त्री प्रश्नात लक्ष घालण्यापूर्वी मुंबईत मराठी ज्ञानप्रसारक या नियतकालिकाने या प्रश्नावर अनेक लेख प्रसिद्ध केले होते. लता प्र. म. यांच्या या नियतकालिकावरील लेखात त्यांचा आढावा घेतला आहे. दादोबा पांडुरंग व त्यांच्या एल्फिस्टन कॉलेजमधील सहकाऱ्यांनी १८४८ मध्य मराठी ज्ञानप्रसारक सभा स्थापना केली होती त्या सभेचे मराठी ज्ञान प्रसारक हे मुखपत्र होते. सामाजिक सुधारणेला वाहून घेतलेल्या या पत्राने स्त्री प्रश्नावर १८५० ते १८६५ या काळात जे प्रसिद्ध केले त्याचा परामर्श घेताना लेखिकेने हे दाखवून दिले आहे की, या लेखात जास्त लेख हे स्त्री शिक्षणावर लिहिले गेलेले होते. स्त्री शिक्षणावर त्या काळात जे आक्षेप घेतले जात होते त्यांना उत्तरे देण्यात हे लेख यशस्वी झाले होते. तसेच विधवा विवाह, बाल विवाह या प्रश्नावर चर्चा करणारे लेखी या नियतकालिकात प्रसिद्ध झालेले होते. पुण्यामध्ये पुढच्या काळात ज्या प्रश्नांवर खडाजंगी झाली त्यांची सुरुवात या लेखात द्रुष्टीस पडले. फुल्यांच्या कनिष्ठ जातीतील स्त्रियांच्या शिक्षण संबंधिच्या कार्याशी तुलना करून लता प्र. म. असे म्हणतात की, मराठी ज्ञान प्रसरकाने या स्त्रियांकडे दुर्लक्ष्य केले होते.
एकोणिसाव्या शतकातील स्त्री प्रश्नांची चर्चा करताना मराठी लेखन साधारणतः इतरत्र काय घडत होते याचा विचार करीत नाहीत. वर्ष शिरंगावकर यांच्या नेटिव मॅरेज बिलावरील लेखात आपल्याला बंगाल व महाराष्ट्र या प्रांतात या बिलावर काय प्रतिक्रिया व्यक्त झाल्या याची तुलना मिळते. तुलना केल्याने महाराष्ट्राचे वैशिष्ट्य नीट लक्षात येते. आधुनिकता व परंपरा यांचा सामना या दोन प्रांतात कसा झाला हेही कळते. केशवचंद्र सेन यांनी कन्यादान हा विधी काढून टाकून एकनिष्ठ राहण्याची शपथ घेण्याचा प्रकार विवाह पद्धतीने सुरु केला त्याला ब्राह्मो समाजातील देवेंद्रनाथ टागोरांच्या गटाने विरोध केला. कारण हि पद्धती परंपरेला धरून नव्हती म्हणून सेन यांनी सरकारच्या सहकार्याने त्यांच्या नव्या पद्धतीला कायदेशीर रूप देण्यासाठी विधेयक आणले त्याचे १८७२ साली कायद्यात रूपांतर झाले पण विधेयकात बदल करून आपण हिंदू नाही असे म्हणणाऱ्यांनाच म्हणणाऱ्यांनाच हा कायदा लागू करण्यात आला. मुंबईतील पारशी समाज, बाँम्बे असोसिएशन आणि प्रार्थना सामाज यांनी या विधेकावर कडक टीका केली. इंदुप्रकाश या प्रार्थना समाजी व सुधारक पत्राने नोंदणी ही पाश्चिमात्य संकल्पना मागे पडेल असे म्हणून विधेयक मागे घेण्याचा आग्रह धरला. हा वाद व महाराष्ट्र बंगाल मधील फरक लेखरूपाने प्रथमच मांडला जातो आहे.
पंडित रमाबाईंचे शारदा सदन हे एकोणिसाव्या शतकातील एक फार गाजलेले प्रकरण होते. सुधारक वस्थितिवादी यांच्यातील वाद या प्रकरणात विकोपाला गेला होता. रमाबाईंच्या लोकविलक्षण व्यक्तिमत्वाचा प्रभाव त्या काळात महाराष्ट्रातील बुद्धिजीवी वर्गावर पडला होता. त्यांच्या बाबत हेवा, तिरस्कार, कौतुक आश्चर्य याभावनाव्यक्त होत होत्या. सुधारकांनी शारदा सदनास पाठींबा दिला, परंतु धर्मांतराच्या प्रश्नावरून वाद उपस्थित झाला तेव्हा माघार घेतली. लोकमान्य प्रथम पासूनच विरोधात होते, आगरकरांनी मात्र शारदा सदनाचे शेवटपर्यंत समर्थन करण्याचा प्रयत्न केला, पण सदनात झालेल्या धर्मांतरामुळे आगरकरांना धक्का बसला. त्यांच्यापुढे मोठा पेच उभा राहिला. हिंदु शारदा सदन स्थापन करावे अशी सूचना तेव्हा त्यांनी केली. अरविंद गणाचारी यांचा लेख आगरकरांचे प्रकाशित वाङ्मय, त्या काळातील वृत्तपत्रे यांचा आधार घेऊन लिहिलेल्या आहेच, पण आगरकरांचा पत्र व्यवहारही त्यांनी या संदर्भात वापरला आहे. यामुळे आजवर अज्ञात असलेले तपशील अभ्यासकांसमोर येत आहेत. आगरकरांना जो नैतिक पेच पडला होता त्याची सप्रमाण चर्चा गणचारींनी आपल्या लेखात केली आहे.
या ग्रंथातील शेवटचा विभाग आर्थिक विषयाला वाहिलेला आहे. त्यात ऐकू दोनच लेख आहेत, पण एकोणिसाव्या शतकामध्ये अर्थकारणावरील चर्चा ज्या प्रकारे विकसित झाली त्याचा नेमका अंदाज या लेखामधून आपल्याला येतो. पहिला लेख आहे अगदी सुरवातीच्या कालावरील तर दुसरा आहे एकोणिसाव्या शतकातून विसाव्या शतकात प्रवेश करण्याचा कालखंडावरील. दादाभाईंचे पूर्वसुरी या लेखात भास्कर तर्खडकर, भाऊ महाराज आणि रामकृष्ण विश्वनाथ यांनी दादाभाईंच्या पूर्वी १८४० च्या दरम्यान भारताचे आर्थिक शोषण कसे होत आहे व भारताच्या दारिद्रयाला इंग्लंडचे धोरण कसे जबाबदार आहे हे सिद्ध करण्याचा जो प्रयत्न केला, याची चर्चा ज. वि. नाईक यांनी केली आहे. चिपळूणकरांनी १८७४ मध्ये निबंधमाला सुरू केल्यानंतर महाराष्ट्रात राष्ट्रवादी विचार खऱ्या अर्थाने मांडला गेला असा सर्वत्र समज आहे पण निबंधमालेपुर्वी जवळ जवळ तीस मुंबईतील तिघे तरुण जहाल राष्ट्रवादी विचारांचा पुरस्कार करीत होते व त्यासाठी आर्थिक शोधण्याच्या वस्तुस्थितीचा आधार घेत होते हे नाईकांनी साधार दाखविले आहे. फक्त भावनिक व धार्मिक आवाहनाच्या जोरावर राष्ट्रवादी मांडणी न करता अर्थकारणातील प्रत्यक्ष परीस्ठीच्या आधारे करण्याचे श्रेय तर्खडकर व त्यांच्या सहकाऱ्यांना का दिले पाहिजे हे नाईक वाचकांना सविस्तर पटवून देतात.
न्या. रानडेंनी मात्र आर्थिक शोषणाचा मुद्दा फार लावून धरला नव्हता. त्यांना भारतीय अर्थशास्त्राचे जनक असे म्हटले जाते. गणेश व्यंकटेश जोशी हे रानड्यांचे जवळचे सहकारी होते. अरुण पेंडसे यांनी जोशींच्या आर्थिक विचारांचा उहापोह करणारा लेख लिहिला आहे. विशेषतः जोशींनी शेतीच्या दुरवस्थेची केलेली कारणमीमांसा स्पष्ट करून सांगितली आहे. जोशींचे या संदर्भातील योगदान महत्वाचे असूनही त्याबाबत मराठीत फारसे काही लिहिले गेलेले नाही. पेंडसे यांचा लेख त्या द्रुष्टिये लक्षणीय आहे. न्या. रानडेंच्या जोशींवर प्रभाव असूनही त्यांनी स्वतःचे विचार निर्धारपूर्वक मांडले होते. रानडे व जोशी दोघेही शेतीच्या भांडवली विकासाचा आग्रहपूर्वक पुरस्कार करतात परंतु रानडेंच्या जमीनदार वर्षविषयी अभिजनवादी द्रुष्टीकोन मात्र विश्लेषणात दिसत नाही. या संदर्भात रानडे व त्यांचे राजकीय विरोधक टिळक यांच्यात साम्यआढळते तर जोशी शेतीप्रश्नावरील विचाराबाबत म. फुल्यांच्या अधिक जवळ जातात असे निरीक्षण पेंडसे यांनी नोंदले आहे आणि म्हणून त्यांचा लेख एकोणिसाव्या शतकातील शेतीप्रश्नाबाबतच्या विचाराचा अभ्यास करणाऱ्यांना महत्वाचा वाटेल.
असा हा चौदा लेखांचा संग्रह, एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्रात आधुनिकता व परंपरा यांचा मेळ कसा घातला गेला यावर वेगवेगळ्या बाजूंनी प्रकाश टाकणारा आहे, म्हणून त्याचे स्वागत होईल अशी आशा आहे. न्यायमूर्ती रानडे यांनी आधुनिकता व परंपरा यामुळे पडलेला पेच अगदी बरोबर ओळखला होता, ते म्हणाले होते - " दोन संस्कृती, दोन प्रकारच्या श्रद्धा आणि दोन पद्धतीच्या जीवसारणीमध्ये आपण सापडलो आहोत. त्यामुळे आपल्याला दुहेरी व परस्पर विरोधाने भरलेले जीवन जगावे लागते आहे. "
----------------------------------------------------------------------------------------------------------
आधुनिकता आणि परंपरा : एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र (वर्ष) मध्ये प्रकाशित