विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात कोल्हापूर संस्थानात वेदोक्त प्रकरणामुळे ब्राम्हण विरुध्द इतर जाती असे वातावरण निर्माण झाले होते. शाहू महाराज व लोकमान्य टिळक असे पक्ष पडले होते. तशातच शाहू महाराजांनी ब्राम्हणेतर जातींना संस्थानामध्ये नोकऱ्या देणे, त्यांच्यासाठी वसतिगृहे उघडणे, त्यांच्या शिक्षणासाठी मदत करणे हे धोरण आखले व त्याची अंमलबजावणी केली. याच पार्श्वभूमीवर सत्यशोधक समाजाच्या कार्यासही १९१० नंतर चालना मिळाली. १९११ पासून सत्यशोधक समाजाच्या परिषदा महाराष्ट्रातील वेगवेगळ्या लहान-मोठ्या शहरात घेण्यात आल्या. तसेच ब्राम्हणेतर जातींमध्ये जो सुशिक्षितांचा वर्ग तयार होत होता त्यांनी जातिनिहाय परिषदा घेण्यास याच सुमारास सुरवात केली होती. ब्राम्हणेतरांमध्ये या प्रकारची जागृती होत असताना १९१५ साली मद्रास प्रांतात अँनी बेझंट यांनी व महाराष्ट्रात लो. टिळकांनी होमरूलची चळवळ सुरू केली. ही चळवळ ब्राम्हणांचे प्राबल्य कायम ठेवण्यासाठीच सुरू करण्यात आली आहे, असे ब्राम्हणेतरांच्या नेत्यांना वाटू लागले. समाजसुधारणेस विरोध करणाऱ्या टिळकपक्षाबद्दल ब्राम्हणेतर नेत्यांच्या मनात पूर्वीपासूनच अढी होती. या सर्वाचा परिणाम म्हणून १९१६ साली महाराष्ट्रात ब्राम्हणेतरांची राजकीय चळवळ सुरू झाली. या चळवळीत सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते व ब्रांम्हणेतर जातींमधील नेते सामील झाले.
ब्राम्हणेतर चळवळीची मुहूर्तमेढ रोवण्याच्या कामी ज्यांनी पुढाकार घेतला त्यामध्ये वा. रा. कोठारींचा समावेश होतो. कोल्हापूर संस्थान व सत्यशोधक समाज या दोन्ही वर्तुळाबाहेरचे कोठारी या चळवळीत आले, ते त्यांच्या वैचारिक भूमिकेमुळे. त्यांच्या विचाराची जडणघडण मुंबईतील बहुढंगी वातावरणात, महाविद्यालयात असताना झाली होती. महाराष्ट्रातील सामाजिक व राजकीय सुधारणेच्या चळवळीवरील लेखन वाचल्याने झाली होती. १९१५ साली पुण्यात आल्यानंतर ते न. चिं. केळकर यांच्या संपर्कात आले. त्यांच्याशी झालेल्या चर्चाचाही कोठारींवर परिणाम झाला होता. या चर्चेतून त्यांची सुधारणावादी भूमिका बनत गेली. पण त्यांच्यावर सर्वात जास्त प्रभाव पडला तो फर्गसन महाविद्यालयातील प्राध्यापक वा. गो. काळे, हरिभाऊ लिमये, वासुदेवराव पटवर्धन यांच्या उदारमतवादी विचारांचा. प्रा. काळे व त्यांच्या सहकार्यांनी कोठारींना सतत मदत केली. गोपाळ कृष्ण गोखले यांच्या विचारांचाही परिणाम कोठारी यांच्या मतावर झाला होता. गोखलेव त्यांच्या नंतरचे नेमस्त यांच्यातील फरक त्यांच्या लक्षात आला होता. विठ्ठल रामजी शिंदे यांच्या अस्पृश्यांसंबंधीच्या कार्याचाही प्रभाव कोठारींवर पडला होता. शिंदे यांच्या कार्याची ओळख १९ १४ पासूनच कोठारी यांना झाली होती. कोठारी सोलापूर जिल्ह्यातील एका खेड्यात वाढले होते. तेंही जैन जमीनदार कुटुंबात. खेड्यातील मोकळ्या-खुल्या वातावरणाचा परिणाम त्यांच्यावर झाला असावा. ब्राम्हणेतर जातींशी संबंध आला असावा. तसेच अस्पृश्यताही जवळून पाहायला मिळाली असणार. दक्षिण महाराष्ट्रातील एतदेशीय जैन समाजातील कुटुंबात कोठारींचा जन्म झालेला नव्हता. (लठ्ठे मात्र एतद्देशीय जैन जातीतील होते) त्यांचे कुटुंब काही पिढ्यांपूर्वी गुजरातहून स्थलांतर करून महाराष्ट्रातील लहान खेड्यात स्थायिक झालेले होते. त्यांचा जैन दिगंबर-दशा-गुजराती समाज महाराष्ट्रात अल्पसंख्य व सर्वत्र विखुरलेला होता. पंचम, चतुर्थ जैनांप्रमाणे दक्षिण महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकातील काही खेड्यात बहुसंख्य नव्हता. अवलंबून राहता येईल, असा त्यांचा मतदार संघ नव्हता, (लट्ठ्यांप्रमाणे.) मुंबई व पुण्यात राहिल्यामुळे संस्थानांकडे ते आधुनिक भूमिकेतून पाहू शकत होते.
लट्ट्यांप्रमाणे कोल्हापूर संस्थानाच्या राजकारणात अडकून पडण्याची शक्यता त्यांच्याबाबत नव्हती. तरुणपणी शहरी वातावरणात राहिल्यामुळे अस्पृश्यतेबाबत त्यांचा दृष्टिकोन जास्त उदार झाला होता. या सर्व घटकांच्या एकत्रित परिणामामुळे कोठारी राजकारणात व समाजकारणात स्वायत्त भूमिका घेऊ शकत होते. अन्यथा ते सुरवातीच्या काळात एकतर पूर्णपणे नेमस्तवादी झाले असते, अथवा ब्राम्हणेतर पक्षाशी जखडले गेले असते. तसे न होता समाजसुधारणा व राजकीय चळवळ या दोन्ही क्षेत्रात कोठारींनी १९१६ ते १९२२ या कालखंडात नेमस्त व ब्राम्हणेतर या दोन्ही पक्षाच्या भूमिकेपलीकडे जाण्याचा प्रयत्न केला.
स्वराज्य व सुराज्य
कोठारींचे समाजसुधारणा व राजकीय सुधारणांबाबत काय विचार होते हे आपल्याला 'भारतसेवक' या नियतकालिकाच्या फेब्रुवारी १९१६ ते जुले १९१६ मधील अंकांतून कळतात. फेब्रुवारीच्या अंकात संपादक रामचंद्र गणेश प्रधान यांनी भारतीय समाज स्वराज्यास पात्र आहे आणि स्वराज्यातील प्रतिनिधी सामाजिक सुधारणेस विरोध करतील असे नाही, असा पक्ष मांडला होता. त्याचे खंडन कोठारींती पुढील अंकात केले. काही विशिष्ट वर्ग स्वराज्याचे हक्क उपभोगण्यास समर्थ झाले म्हणजे राष्ट्राची स्वराज्यास पात्रता सिध्द होते काय असा सवाल करून राजकीय परतंत्रतेच्या दुःखापेक्षा सामाजिक नीचत्वाचे दुःख जबर आहे, असे प्रतिपादन केले. सामाजिक अन्यायाची चीड न येणारे बहुसंख्य लोक (अस्पृश्य वर्ग आणि शेतकरी वर्ग) जोपर्यंत या देशात आहेत तोपर्यंत राजकीय पारतंत्र्याची चीड येणार नाही असे त्यांना वाटत होते. याचा प्रतिवाद वामन मल्हार जोशींनी पुढच्या अंकात केला. त्याला उत्तर देताना कोठारींनी पुढील युक्तिवाद केला होता. इंग्लंडला आजची सामाजिक स्थिती प्राप्त करून घेण्यास अनेक शतके लागली. ती स्थिती ब्रिटिशांच्या अनुभवाच्या व सत्तेच्या मदतीने हिंदुस्थानला अल्प काळात प्राप्त करून घेता यावी हा तर इंग्लिश सत्तेचा मुख्य फायदा आहे. राज्यकारभारात लोकमताला मान मिळणेही इष्ट आहे. पण हे ध्येय सर्व जातीविषयी सहातुभूती दाखवून, त्यांच्यावरील अन्याय दूर करून व त्यांचे योग्य सहकार्य मिळवूनच साध्य होणार आहे. सुराज्य हेच स्वराज्याचे ध्येय असले पाहिजे.
सत्यशोधक समाज
स्वराज्याच्या चळवळीबाबत त्यांचे असे विचार असल्यामुळे कोठारी व त्यांचे सहकारी जहालांच्या राजकारणाला विरोध करीत असत. टिळकांच्या नेतृत्वाखाली एप्रिल, १९१६ मध्ये बेळगावात भरलेल्या प्रांतिक परिषदेस कोठारी व अण्णासाहेब लठ्ठे यांचा विरोध होता. महात्मा गांधी या परिषदेस हजर होते. त्या संधीचा फायदा घेऊन त्यांची एक वेगळी सभा लठ्ठे व कोठारींनी आयोजित केली व त्या सभेत प्रांतिक परिषदेवर टीका केली. अशी भूमिका असल्यामुळे कोठारींना सत्यशोधक समाज जवळचा वाटला यात आश्चर्य नव्हते. समाजाच्या वार्षिक परिषदांना कोठारी हजर राहू लागले. तसेच समाजाचे खरे ध्येय व स्वरूप काय आहे याची मांडणी करून समाजाबाबतचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. जातीजातीत व्देष माजविण्यास सत्यशोधक कारणीभूत होतात असा ग्रह त्याकाळी ब्राम्हणवर्गाचा व जहालांचाच नव्हे तर नेमस्तांचाही झाला होता. याबाबत समाजाची बाजू कोठारींनी पुढील प्रमाणे स्पष्ट केली : मानवी हक्कांच्या दृष्टीने मानवजात सारखी आहे. व्यक्तिमत्त्वाची किंमत त्याच्या गुणांनी ठरावी. त्याच्या जातीशी तिचा संबंध नसावा. बहुजनसमूहात स्वातंत्र्यप्रेम निर्माण व्हावे, गुलामगिरीबाबत चीड उत्पन्न व्हावी, त्यांच्यामध्ये . शिक्षणाची रुची वाढावी व ते सन्माननीय नागरिक बनावेत हा सत्यशोधक समाजाचा हेतू आहे. वरिष्ठांविषयी निष्कारण मत्सर पसरविणे हे त्याचे उदिष्ट नसून अन्यायपीडितांना अन्यायाची जाणीव करून देऊन त्यांच्या करवी तो दूर करणे हे त्याचे पवित्र ध्येय आहे. (कोठारी, सत्यशोधक समाज, 'भारतसेवक , मे १९१७, पा. २०५- २०८) (प्रभात, ५ मार्च १९७४).
डेक्कन रयत समाज
परंतु सत्यशोधक समाज ही सानाजिक संघटना होती. ब्राम्हणेतर जातींना आता राजकीय चळवळीची गरजं जाणवू लागली होती व या चळवळीसाठी योग्य ते हत्यार त्यांना निर्माण करायचे होते. कोठारी, लठ्ठे, 'दीनमित्र कार मुकुंदराव पाटील, सी. के. बोले, ना. वा. टिळक यांनी या हेतूने प्रेरित होऊत १९ १६ च्या ऑगस्ट महिन्यात डेक्कन रयत समाज" ही ब्राम्हणेतरांची पहिली राजकीय संघटना स्थापन केली. तसेच पुढे या समाजाचे डेक्कन रयत” नावाचे इंग्रजी साप्ताहिकही सुरू केले. (ऑक्टो. १९१८) (लेले: १९८४: ५६३). ब्राम्हणेतर राजकीय दृष्ट्या असे संघटित होत असतानाच मॉटेग्यूची भारतमंत्री म्हणून नेमणूक झाली (जुलै, १९१७) व भारतात टप्याटप्प्याने जबाबदार शासनपध्दती आणण्याचे धोरण सरकारने जाहीर केले. यामुळे ब्राम्हणेतरांच्या राजकीय हालचालींना वेग आला. मागासलेल्या वर्गानी राजसत्तेमध्ये वाटा मागावा, त्यांना प्रतिनिधित्व मिळावे यासाठी ब्राम्हणेतर नेत्यांचे प्रयत्न सुरू झाले. डेक्कन रयत समाजाचे सहचिटणीस म्हणून कोठारींनी जातवार निवडणुकीवरील एक निवेदन सप्टेंबर १९१७ मध्ये प्रसिध्द केले. मुंबई प्रांतातील मध्यभागाचा विचार त्यांनी उदाहरण म्हणून या निवेदनात केला व म्हटले की, मध्यविभागाची (सोलापूर, नाशिक सातारा, नगर, खानदेश) लोकसंख्या मुसलमान वगळता साठ लक्ष आहे. तेव्हा त्यास २० प्रतिनिधी मिळतील. या साठ लाखातील अस्पृश्य व आदिवासींची संख्या दहा लाख आहे. त्याशिवाय शिक्षणाच्या अभावी ज्यांना प्रतिनिधित्व देणे शक्य नाही अशा कोळी, धनगर, रामोशी, वंजारी, अहीर वगैरेंची संख्या सुमारे दहा लाख आहे. या वीस लाखातून विशेषत: अस्पृश्यातून एक किंवा दोन प्रतिनिधी नेमावेत. शिक्षणाचा प्रसार होऊन या वर्गामध्ये स्वत:च्या हक्काची जाणीव होऊ लागेल तसे त्यांना स्वतंत्र प्रतिनिधी निवडण्याचे हक्क देण्यात यावे. उरलेल्या चाळीस लाखातून ७ते ८ लाखात अशा बर्याच जाती आहेत की त्यांची संख्या फार अल्प व शिक्षणाचा प्रसारही नाही, त्यामुळे त्यांना (जोशी जोगी, लक्ष्मण भोई, बारी, बेलदार, सनगर, रावळ, कलाल, कैकाडी वगैरे) स्वतंत्र प्रतिनिधी देणे शक्य होणार नाही.
उरलेल्या ३२-३४ लाख लोकसंख्येत मराठे (२५ लाख), ब्राम्हण (२ लाख ३५ हजार) , माळी (२ लाख ५० हजार), लिंगायत (१ लाख १२ हजार) या जाती प्रमुख आहेत. याशिवाय इंडियन खिश्चन, जैन, शिंपी, सोनार आणि साळी यांची लोकसंख्या सुमारे तीन लाख आहे. या सर्वामध्ये २० प्रतिनिधींची वाटणी करणे अशक्य नाही. लहान लहान जातींना प्रत्येकी एक प्रतिनिधी देता येईल व शिक्षणाच्या दृष्टीने . पुढारलेल्या ब्राम्हणात व लोकसंख्येत जास्त असलेल्या मराठ्यांमध्ये बाकीचे प्रतिनिधी विभागता येतील. ज्या जातींना स्वतंत्र मतदार संघ दिले जातील त्या वगळून इतर सर्वातील सुशिक्षित व संपन्न लोकांचा एक मतदार संघ (यात उदाहरणार्थ पारशी, गुजराती, बनिया, मारवाडी येतील व प्रतिनिधी मिळण्यास नालायक वर्गातही जे काही सुशिक्षित व संपन्न असतील त्यांचा समावेश होईल) करून त्यांना एक प्रतिनिधी देता येईल.
म्हणजेच जातवार निवडणुकीचा जो मोठा बाऊ करण्यात येतो त्यात कांही अर्थ नाही असे कोठारींचे म्हणणे होते.. (कोठारी, जातवार निवडणूक, 'भारतसेवक'”, सप्टे. १९१७ पा. ४३६-४३८) जातवार निवडणुकीच्या तत्त्वाविरुध्द जे आक्षेप घेण्यात येत होते त्याचा प्रतिवादही कोठारींनी केला होता. वरच्या वर्गाचे व मागासलेल्या वर्गाचे हितसंबंध कसे वेगवेगळे आहेत हे त्यांनी दाखवून दिले. वरच्या वर्गातील प्रतिनिधी स्वत:च्या वर्गाच्या हिताकडेच अधिक पाहतील म्हणून मागासलेल्या वर्गांना निराळे प्रतिनिधी दिले पाहिजेत. प्रतिनिधींची लायकी केवळ बुध्दी, विव्दत्ता या गुणावरून ठरत नसते. भिन्न भिन्न वर्गाच्या हितसंबंधांशी त्यांच्या आतड्याचा व कळकळीचा संबंध किती आहे यावरूनही ठरते. स्वराज्याची सर तुराज्याला कधीही येणे शक्य नाही. जातवार निवडणुकीमुळे जातीजातीत वैमनस्य माजेल हा आरोपही कोठारींनी नाकारला होता. त्यांच्या मते जातींचे प्रतिनिधी सरकारात न आल्याने मात्र काही वर्गावर अन्याय होऊन त्यात असंतोष माजेल. मुसलमानांना स्वतंत्र प्रतिनिधी दिल्याने हिंदु-मुसलमानात दुही माजली असा अनुभव नाही. (कोठारी, स्वराज्याची योजना व मागासलेले वर्ग, “'भारतसेवक,, सप्टेंबर, १९१७. पा. ४१४-४१६).
जागरूक साप्ताहिक
आपली भूमिका मांडण्यासाठी या काळात ब्राम्हणेतरांनी आपली वृत्तपत्रे सुरू केली होती. या वृत्तपत्रातून त्यांनी जातवार निवडणुकीच्या तत्त्वाचा पुरस्कार केला. कोठारींनीही ब्राम्हणेतर चळवळीच्या प्रचारासाठी 'जागरूक' साप्ताहिक १९ जुळै, १९१७ रोजी सुरू केले. या कामी त्यांनी भास्करराव जाधव, रावबहादूर डोंगरे व अण्णासाहेब लठ्ठे या ब्राम्हणेतर नेत्यांचा पाठिंबा घेतला. तसेच कोठारींच्या सर्वच कार्यात ज्यांनी प्रथमपासून सहानुभूती दाखविली अशा प्रा. वा. गो. काळे, कानिटकर, हरिभाऊ लिमये, काकासाहेब लिमये, बापूराव आंबेकर, एस. जी. वझे या नेमस्तांचाही पाठिंबा घेतला. जागरूकमधून कोठारींनी शिक्षणात मागासलेल्या जातींना स्वतंत्र मतदार संघातून आपले प्रतिनिधी निवडण्याचा हक्क असावा या गताचा जोरदार पुरस्कार केला. तसेच महाराष्ट्रात व वऱ्हाडातील ब्राम्हणेतर जातीमध्ये जागृती व्हावी म्हणून व्याख्याने दिली. पुण्यात जाहीर सभा घेतल्या. पुण्यातील प्रचारासाठी कोठारींना बाबूराव जेधे, अँडव्होकेट नाईक व मालुरकर यांचे सहकार्य लाभले होते. पुण्याबाहेरील व्याख्यानांसाठी शाहू महाराजांनी रावबहादूर डोंगरे यांना कोठारींच्या मदतीसाठी पाठविले होते. केसरीकडून ब्राम्हणेतर चळवळ जैन, लिंगायतांची असून मराठा समाज' त्यापासून दूर आहे अशी टीका करण्यात आली. शिवाय बेळगावला भरलेल्या मराठा परिषदेने टिळक पक्षाच्या राजकारणाला पाठिंबा दिला होता. याला उत्तर म्हणून बाबूराव जेधे, केशवराव ढेरे व कोठारी या मंडळींनी पुण्यात देवासचे राजे खासेसाहेब पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई इलाखा मराठा परिषद घेतली व ब्राम्हणेतर चळवळ मराठ्यांचेही प्रतिनिधित्व करते हे दाखवून दिले. (१५ डिसेंबर, १९१७) , हप्त्याहप्त्याने स्वराज्य देण्याची थोजेना आखण्यासाठी भारतमंत्री भारतात नोव्हेंबर-डिसेंबर, १९१७ मध्ये आले तेव्हा डेक्कन रयत समाजाच्या वतीने कोठारी, लठ्ठे, भास्करराव जाधव, रावबहादूर बोले असे चौघे नेते मॉटेग्यू व व्हॉईसरॉय चेम्सफर्डयांना भेटण्यास मुंबईस गेले होते. प्रांताचा कारभार लोकप्रतिनिधींच्या हाती असावा व मागासलेल्या वर्गाना स्वतंत्र प्रतिनिधी द्यावेत, असे निवेदन त्यांनी सादर केले. मागासलेपणा ठरविण्याचा निकष शिक्षण असावा असे कोठारी व इतर ब्राम्हणेतर नेत्यांचे म्हणणे होते.
सरकारवर टीका
ब्राम्हणेतरांच्या संघटनांची स्वतंत्र मतदार संघाची मागणी माटेग्यू- चेम्सफर्ड अहवालाने फेटाळली, (जुलै, १९१८). मतदार संघ कसे असावेत व प्रतिनिधित्व कसे द्यावे यासाठी सरकारने साऊथबरो समिती नेमली होती. तिने 'मराठा व तत्सम जाती” असा मागासलेल्या वर्गाचा एक गट करण्याची शिफारस केली. या जातींसाठी सात जागा राखून ठेवाव्यात असे सुचविले. स्थानिक प्रशासनाला कोणती जात किंवा जमात या गटात घ्यावी याचा अधिकार दिला. लडठे-कोठारींच्या डेक्कन रयत समाजास अर्थातच हे मान्य नव्हते, व म्हणूनच त्यांनी सरकारकडे अर्ज केला. त्यामध्ये शेती करणाऱ्या व मागासलेल्या सर्वच जातींचा समावेश मराठा व तत्सम जातींमध्ये करावा असे सुचविले. व्हॉईसरॉयने मद्रास व मुंबई प्रांतातील ब्राम्हणेतरांच्या राखीव जागांबद्दल योग्य काळजी घेतली जाईल असे आश्वासन दिले. तेव्हा कोठारींनी 'जागरूक' मधून सरका- रला असे सुनावले की, डेक्कन रयत समाजाच्या अर्जाचा सरकारने अजूनही विचार केलेला नाही. मद्रास सरकारने कोणत्या जातींचा समावेश राखीव जागांसाठी करायचा हे ठरविण्याची प्रक्रिया सुरू केली होती. त्याचे उदाहरण मुंबई प्रांतिक सरकारने आपल्या पुढे ठेवावे व मराठा या गटात कोणकोणत्या जातींचा समावेश करायचा याचा निर्णय लवकर घ्यावा. ( जागरूक”, ७फेब्रु. १९२०) मराठ्यांसाठी सात जागा ठेवण्याचा निर्णय जेव्हा मुंबई सरकारने जाहीर केला तेव्हा कोठारींनी विचारले होते की, हा निर्णय सरकारने नेमलेल्या समितीच्या निवाड्याप्रमाणे घेतला होता की, ती एक तात्पुरती सोय होती.'*नेमस्त पक्षाच्या ब्राम्हण नेत्यांनीही सुचविले होते की, मागासलेल्या वर्गासाठी १० जागा ठेवाव्यात. तरीही सरकाराने फक्त सातच जागा राखीव म्हणून जाहीर केल्या होत्या. अशी टीका कोठारींच्या 'जागरूक' ने केली होती. (जागरूक, १५ मे, १९२०)
ब्राम्हणेतरांच्या टीकेचा सरकारवर परिणाम झाला नाही व नव्या सुधारणांप्रमाणे १९२० साली मुंबई प्रांतिक कायदेमंडळासाठी निवडणुका झाल्या. राखीव जागांप्रमाणेच मिश्र मतदार संघातूनही निवडणुका लढवाव्यात असे धोरण ब्राम्हणेतरांनी स्वीकारले. त्यास अनुसरून पुणे शहरासाठी असलेल्या मिश्र मतदार संघातील जागेसाठी वि. रा. शिंदे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यास खासेराव जाधव, पा. चि. पाटील, गं. मु. काळभोर, बाबुराव जेधे वगैरे ब्राम्हणेतरांनी पाठिबा दिला. तसेच विजयी मराठाकार श्रीपतराव शिंदेनीही दिला. 'जागरूक” कार कोठारींनी मात्र त्यांच्या उमेदवारी विरुध्द मोहीम उघडली. डोंगरे (कायस्थ) , मुकुंदराव पाटील (माळी), बागडे (शिंपी) , बोले (भंडारी) यांनी कोठारींना साथ दिली. वि. रा. शिंदे मराठा आहेत म्हणून ब्राम्हणेतरांतील मराठे त्यांना पाठिंबा देत होते, असा त्यांचा आरोप होता. वि. रा. शिंदे राष्ट्रीय मताचे होते म्हणून भास्करराव जाधवांसारख्या सरकारधार्जिण्या मराठा नेत्याचाही त्यांच्या उमेदवारीस विरोध होता (फडके : १९८६: २७९). कोठारींनी जागरूकचा एक अंकच शिंदेंवर टीकास्त्र सोडण्यासाठी काढला होता. शाहू महाराज सुरवातीस शिंद्यांच्या बाजूस होते. पुढे त्यांनी आपला पाठिंबा काढून घेतला. कोठारींनी वि. रा. शिंदे यांच्या उमेदवारीस तीव्र विरोध करण्याची काही कारणे आपल्याला देता येतील. एकतर वि. रा. शिंदे यांच्या उमेदवारीचा पुरस्कार श्रीपतराव शिंदे यांनी केला होता. त्यांचे व कोठारींचे मवाळांशी सहकार्य करावे की करू नये यावरून मतभेद होते. या मतभेदाचे प्रतिबिंब निवडणुकीत बाजू घेण्यात पडले असावे. वि. रा. शिंदे मराठा आहेत म्हणून त्यांना मराठे पाठिंबा देत होते, असा कोठारी या जैन नेत्याचा कयास असावा. वि. रा. शिंदेंच्या विरुध्द न. चिं. केळकर उभे होते. केळकरांचा व कोठारींचा १९१५ पासूनचा स्नेह होता.
ब्राम्हणेतरांशी मतभेद
ब्राम्हणेतरांमधील या फाटाफुटीचा परिणाम म्हणून वि. रा. शिंदे निवडणूक हरले. कोठारी व ब्राम्हणेतर नेत्यांमधील मतभेद या निवडणुकीच्या निमित्ताने उघड झाले. परंतु कोठारी व ब्राम्हणेतरांच्या भूमिकेत १९१९ सालापासूनच तफावत पडत चालली होती. मतभेदास सुरवात झाली- ब्राम्हणेतरांनी नेमस्तांशी सहकार्य करावे की करूनये या मुद्यावरून. राजकीय कार्यास सुरवात करण्यापासूनच कोठारींचे पुण्यातील नेमस्तांशी मैत्रीचे संबंध होते. वा. गो. काळे वगैरेंवा त्यांना सक्रिय पाठिंबा होता. ब्राम्हणेतर व नेमस्तांनी एकमेकांशी सहकार्य करावे असे कोठारी व काळे यांचे मत होते. टिळक इंग्लंडहून परतल्यानंतर सर्व पुणेकरांच्या वतीने त्यांचा सत्कार ७ डिसेंबर १९१९ रोजी करण्यात आला. या वेळी टिळकांना पुण्याच्या सर्व नागरिकांतर्फे. मानपत्र देण्यास रॅ. परांजपे, वा. गो. काळे या नेमस्तांचा, तसेच कोठारी, जेधे बंधू, जवळकर या ब्राम्हणेतर नेत्यांचा विरोध होता (फडके : १९८६ : २५६) . जहाल पक्षाशी स्पर्धा करण्याच्या प्रश्नावर हे दोन्ही पक्ष एकत्र आले होते. याच वर्षाच्या शेवटी प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्याच्या धोरणावरही या दोन्ही पक्षांचे एकमत झाले होते व त्यांनी जहालांना विरोध केला होता. पुण्याच्या नगरपालिकेत त्यावर्षी जहालांचे बहुमत होते, पण ते दोन तृतीयांश इतके नव्हते. जहालांचे मत होते की सध्या फक्त मुलांना प्राथमिक शिक्षण सक्तीचे करावे तर नेमस्त व ब्राम्हणेतरांचे म्हणणे होते की, मुलांना व मुलींना दोघांनाही ते सक्तीचे असावे. म्हणून त्यांनी जहालांशी या प्रश्नावरून दोन हात करण्याचे ठरविले व एकत्र येऊन प्रचारार्थ सभा घेतल्या. कोठारींनी १९१९ च्या डिसेंबरात सोलापूर येथे ब्राम्हणेतर परिषद घेतली. त्या वेळी वा. गो. काळे , वि. के. जोग इत्यादी नेमस्त मुद्दाम हजर राहिले. परंतु या दोन पक्षांतील वाढत्या सहकार्याला आता ब्राम्हणेतरांकडून जोराचा विरोध होऊ लागला. लठ्ठे परिषदेस आलेच नाहीत तर भाऊराव पाटलां- सारंख्या इतर ब्राम्हणेतर नेत्यांनी परिषदेतील आपल्या भाषणात कोठारींवर सहकार्याच्या धोरणावरून टीका केली. सोलापूरलाच १९२० च्या एप्रिलमध्ये काँग्रेसची प्रांतिक परिषद भरली होती. परिषदेवर जहालांचे वर्चस्व होते. ही परिषद कोठारी व रॅ. परांजपे या ब्राम्हणेतर व नेमस्त पक्षाच्या संगनमताने उधळून लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. याच काळात भरलेल्या कऱ्हाडमधील ब्राम्हणेतर परिषदेस कोठारींच्या बरोबर केशवराव कातिटकर हे नेमस्त नेते हजर राहिले. परंतु ब्राम्हणेतरांना कोठारींचे हे सहकार्याचे धोरण पसंत नव्हते. ब्राम्हणेतर चळवळीत ब्राम्हणांचा ते नेमस्त / प्रागतिक असले तरी सहभाग नसावा असे या मंडळींचे मत होते (फडके : १९८९ : ५३)
टिळकांचे मुल्यमापन
या मतभेदात भर पडली कोठारींच्या लोकमान्य टिळकांवरील मृत्युलेखाने. सामाजिक सुधारणेच्या प्रश्नावर पटले नसले तरी ते एक मोठे नेते होते व त्यांनी देशासाठी मोठा त्याग केला होता व धैर्य दाखविले होते. समाजसुधारणेला त्यांनी जो विरोध केला तो हिंदुसमाज विघटित होऊ नये म्हणून, असे टिळकांच्या कार्याचे मूल्यमापन कोठारींनी त्या लेखात केले. त्याचा परिणाम म्हणून ब्राम्हणेतरांनी कोठारींवर टीका करण्यास सुरवात केली. त्यात पुढाकार घेतला 'विजयी मराठा' कार श्रीपतराव शिंदे यांनी. कोठारींची बाजू उचलून धरली 'दीनमित्र' कार मुकुंदराव पाटील यांनी. हा वाद चळवळीस हानिकारक आहे, असे वाटून लठ्ठ्यांनी दोन्ही बाजूत समझोता घडवून आणण्याचा प्रयत्न केला. शाहू महाराजांनीही वाद थांबवण्याची कोठारींना विनंती केली व अखेर हा जाहीर वाद थांबला. तरीही कोठारींनी आपले म्हणणे पुढे रेटणे चाळूच ठेवले. लठ्ठ्यांनी आपल्या बाजूस यावे, असे कोठारींना वाटत होते. शाहू महाराजांनी ब्राम्हणेतर चळवळीवर पूर्ण नियंत्रण मिळविणे त्यांना रुचले नव्हते. लड्ट्यांनी जाहीर भूमिका घेऊन विजयीमराठ्याच्या टीकेची दखल घ्यावी, अशी कोठारींची अपेक्षा होती. परंतु लडडेंनी त्यास नकार दिला. सुरवातीला जे ब्राम्हणेतर नेते (डॉ. खेडकर, बागडे, भास्करराव जाधव, द. भि. रणदिवे) नेमस्तांशी सहकार्य करण्याच्या बाजूने होते तेही पुढे बदलले असे कोठारींचे म्हणणे होते. विजयी मराठा हे महाराजांच्या हातातील खेळणे होले, असे त्यांचे मत होते (फडके: १९८९ : १४-५६) नव्या सुधारणांप्रमाणे निवडणुका होऊन १९२० च्या शेवटी नवे प्रतिनिधी निवडून आले. नव्या कायदेमंडळात नेमस्त व ब्राम्हणेतरांनी एकत्र काम करावे, असे कोठारींना वाटत होते. परंतु असे सहकार्य होऊ शकले नाही. एक तर बहुसंख्य ब्राम्हणेतरांचा अशा सहकार्याला तत्त्वतःच विरोध होता. त्यात रॅ. परांजपे यांनी मुंबई मंत्रिमंडळात शिक्षणमंत्री झाल्यावर प्राथमिक शिक्षणाच्या आपल्या पूर्वीच्या भूमिकेत फरक करून बोटचेपी भूमिका घेतली. कोठारी व लठ्ठे यांनी याबाबत परांजपे यांच्यावर खरमरीत टीका केली. कोठारींनाही नेमस्तांशी कितपत सहकार्य होऊ शकते याच्या मर्यादा लक्षात आल्या व नेमस्त आणि ब्राम्हणेतरांची युती होण्याची शक्यता पूर्णपणे दुरावली. (फडके : १९८९ : १९)
नोकरशाहीवर टीका
निवडून आलेल्या ब्राम्हणेतर प्रतिनिधींचे ब्रिटिश नोकरशाहीबाबत काय धोरण असावे यावरूनही कोठारींचे व इतर ब्राम्हणेतरांचे बिनसले. कोठारींचे म्हणणे असे होते की, ब्राम्हणेतर प्रतिनिधी नोकरशाहीच्या कच्छपी लागण्यात धन्यता मानीत होते. सरकारकडून काय फायदा मिळविता येईल यावर त्यांची नजर असेः गव्हर्नर वगैरेंची खुशामत करण्यावर त्यांचा भर असे. ब्राम्हणेतरांच्या या लोचटपणावर कोठारींनी कडाडूंन हल्ला चढविला. नोकरशाहीस श्रिरोध करण्याचे धाडस ब्राम्हणेतरांनी दाखवावे, असे कोठारींती त्यांना ऐकवले. एकूणच सरकारला विरोध करण्याच्या प्रश्नावर कोठारींचे म्हणणे व ब्राम्हणेतर पक्षाचे धोरण यात फार तफावत होती, असे दिसते. आपल्या 'आठवणी' मध्ये कोठारींनी विजापूरला भरलेल्या शेतकरी मेळाव्यात त्यांनी, 'गांधीजीच जनतेचे शत्रू आहेत', अशी टीका करणारा सरकारधार्जिणा ठराव अमान्य कसा केला याचे वर्णन केलेले आहे. ब्राम्हणेतरांचे गांधीजींच्या चळवळीस पूर्णपणे विरोध करण्याचे धोरण होते. ते कोठारींना अमान्य होते. दुसराही एक प्रसंग कोठारींनी 'आठवणी”*त वर्णन केला आहे. निपाणीच्या मारुती जोती रावण यांनी राष्ट्रीय वृत्तीच्या ब्राम्हणेतरांची परिषद घेण्याचे ठरविले (नोव्हे. १९२१) व त्याचे अध्यक्षस्थान कोठारींना घेण्याची विनंती केली. ती कोठारींनी मान्य केली परंतु लठ्ठे यांनी दिल्लीहून रावण यांना ही परिषद घेऊ नये म्हणून कळविले व शेवटी परिषद झाली नाही. लठ्ठे व कोठारी यांच्यात एवढा उघड तंटा नोव्हेंबर, १९२१ मध्ये 'होताना दिसला तरी. त्याची सुरवात ऑगस्टपासूनच झाली होती. निमित्त होते, कोठारींचा टिळक पुण्यतिथीप्रसंगी लिहिलेला लेख. (ऑगस्ट, १९२१). त्यापूर्वी 'स्वराज्यद्रोही छत्रपती” हा अग्रलेख . केसरीने प्रसिध्द केला होता व त्यावरून 'केसरी' व ब्राम्हणेतरांच्यातील वितुष्ट विकोपाला गेले होते. अशा वातावरणात कोठारींचा टिळकांची प्रशंसा करणारा लेख 'जागखर्क'मध्ये प्रसिध्द झाला. (फडके : १९८६ : २९२)
मागील वर्षी कोठारींनी टिळकांवरील आपल्या मृत्युलेखात अशीच प्रशंसा केली होती. हे दोन्ही लेख त इतर मतभेदामुळे 'जागरूक? च्या समितीतील लडडे, चिकोडी, चौगुले व रा. जो. शिंदे यांनी राजीनामे दिले. बेळगावहून प्रसिध्द होणार्या राष्ट्रवीर' मध्ये (१८ सप्टे. १९२१) कोठारींनी पत्र लिहून स्वत:ची भूमिका स्पष्ट केली होती. त्यांच्या मते मतभेद टिळकांवरील लेखामुळे नसून अस्पृश्यता व नोकरशाहीबाबत काय धोरण स्वीकारायचे यावरून होते. अस्पृश्यतेविरुध्द हालचाल करण्यासाठी सहभोजनासाखेबे उपक्रम घ्यावेत, असे कोठारींना वाटत होते तर लडठेंची त्यास माद्मता नव्हती. नोकरशाहीवर प्रसंगी टीका करावी, तिच्या कच्छपी "लागू नये, असे क्रोठारींचे मत होते. तर ब्राम्हणेतर प्रतिनिधींना ते मान्य नव्हते. ' 'जंहालांची असहकारिता व नेमस्तांचा नोकरशाहीत झालेला विलय या दोहोपासून ब्राम्हणेतरांची चळवळ अलग ठेवली पाहिजे”' असे कोठारींचे मत होते. छत्रपतींशी मतभेद सरकारवर टीका करण्याचे धोरण जागरूक “ने अवलंबले होते ते ब्राम्हणेतरांना मान्य होणारे नव्हते. शाहू महाराज यांनी १९२१ च्या उत्तरार्धात एकदा कोठारींना प्रत्यक्ष भेटीत सांगितले की, तुमच्या पत्रातून सरकारवर तुम्ही टीका करता ते बरे ताही. ब्राम्हणेतर मागासलेले आहेत. सरकारशी भांडणे त्यांता परवडणारे नाही. कोठारींनी त्यावर उत्तर दिले की, त्यांच्या टीकेमुळे सरकारचा रोष त्यांच्यावर होईल, ब्राम्हणेतर जनतेवर नव्हे व ते ब्राम्हणेतरांच्या भल्यासाठीच टीका करीत होते. शाहू महाराज व कोठारी यांच्यातील मतभेद नवे नव्हतें, क्षात्र जगद्गुरू नेमण्यावरून कोठारींनी जागख्क' मधून महाराजांवर टीका केली होती. ब्राम्हण जगद्गुरू ऐवजी ब्राम्हणेतर जगद्गुरू नेमण्याचे शाहू महाराजांनी ठरविले होते (१९२०). कोठारींच्या मते ब्राम्हणांना स्थानभ्रष्ट करून त्यांच्या जागी ब्राम्हणेतरांना नेमणे एवढेच सत्यशोधक समाजाचे ध्येय नव्हते. ब्राम्हण भटजी नाहीसे होऊन त्याऐवजी ब्राम्हणेतर भटजी छळू व नाडू लागले म्हणजे ब्राम्हणेतरांची धार्मिक गुलामगिरीतून सुटका होणार नव्हती. या मुद्यावरून त्यांचे व 'ददीनमित्र कार मुकुंदराव पाटील यांचे एकमत होते. परंतु हा तत्त्वनिष्ठ सत्यशोधकी विचार शाहू महाराजांना मान्य नव्हता. ('सुंबोध पत्रिके' मध्ये जागरूकमधील 'जगदगुरूचे लोढणे” हा लेख पुनर्मुद्रित केला होता). (फडके : १९८६ : २८०-८३) प्रजा परिषदेतील कार्यावरूनही कोठारी व महाराजांचे मतभेद झाले होते. पुणे येथे दक्षिणी संस्थान प्रजापरिषद १९२१ च्या जूनमध्ये स्थापन करण्यात आली. त्यामध्ये केळकरांच्या बरोबरीने कोठारींनी पुढाकार घेतला होता. तो महाराजांना रुचल! नाही. पण कोठारींनी आपले कार्य चाळूच ठेवले. महाराजांना आवडणार नाही, असे काही करायचे नाही, असे जे काही ब्राम्हणेतर नेत्यांचे धोरण होते ते कोठारींना मान्य नव्हते.
कोठारी व ब्राम्हणेतरांत मतभेद होण्याचे आणखी एक कारण म्हणजे ब्राम्हणांवर केलेल्या अत्याचारावरील कोठारींची टीका. सातारा जिल्ह्यातील खेड्यापाड्यात स्वत:ला सत्यशोधकी म्हणविणाऱ्या काही गुंडांनी ब्राम्हणांना व विशेषतः त्यांच्या स्त्रियांना उपद्रव देण्याचा प्रयत्न - केला (१९२१). यावर कोठारींनी कडक टीका केली. स्वतःला सत्यशोधक म्हणविणाऱ्यांनी, असे हीन कृत्य करू नये, असे सांगितले. _ जागरूक मधून लेख लिहूनच ते थांबले नाहीत तर त्यांती काही गावात सभा घेऊनया प्रकारावर टीका केली. लडयांसारख्या ब्राम्हणेतर नेत्यांना कोठारींची टीका' पटली नाही. तसेच शाहू महाराजांनाही कोठारींची भूमिका अयोग्य वाटली.
अशा प्रकारे ब्राम्हणेतर चळवळ, त्यातील प्रमुख नेते मंडळी व कोठारी यांच्यातील मतभेदास १९१९ पासून सुरवात होऊन १९२र पर्यंत ते विकोपाला गेले. सुरवातीस त्यांची बाजू घेणारे काही ब्राम्हणेतर नेतेही पुढे पुढे त्यांच्या विरोधात गेळे. मराठ्यांच्यावर ते टीका करीत होते तोपर्यंत इतर मराठेतर जातीचे नेते त्यांना साथ देत होते. पण कोठारींचा कल जसजसा टिळक पक्षाकडे झुकू लागला तसतशी त्यांनीही कोठारींची साथ सोडून दिली. 'ब्राम्हणेतर” पासून राष्ट्रीय ब्राम्हणेतर” पर्यंत कोठारींनी वाटचाल केली पण पुढे मात्र राष्ट्रीय ब्राम्हणेतर भूमिकाही ओलांडून त्यांनी केळकर पक्षास जाऊन मिळण्याचा निर्णय घेतला. गांधीजींच्या असहकारितेस त्यांचा विरोध होता तसेच ब्राम्हणेतरांच्या वनेमस्तांच्या नोकरशाही व सरकारधार्जिण्या धोरणासही त्यांचा विरोधं होता. त्यामुळे त्यांना मध्यममार्गी स्वराज्य पक्ष जवळचा वाटला यात नवल नव्हते. लठ्ठे या जैन नेत्याशी जुळवून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण त्यांच्याशीही त्यांचे जमले नाही. जैन मतदारसंघावर कोठारी तसे अवलंबून नव्हते जसे लठ्ठे होते. त्यामुळे लठ्ठ्यांपासून दूर जाणे त्यांनी पसंत केले. सत्यशोधकी भूमिका घेऊन त्यांनी ब्राम्हणेतरांवर टीका केली. अशीच भूमिका बऱ्याच अंशी 'दीनमित्र कार मुकुंदरावांनीही घेतली होती. त्यामुळे हे दोघे ब्राम्हणेतरांमधील वादांमध्ये बऱ्याच वेळा एका बाजूला राहिले. तत्त्वनिष्ठ सत्यशोधकी विचारामुळेच त्यांनी जगद्गुरू नेमण्याच्या धोरणावर कडक टीका केली व अस्पृश्यांच्या संदर्भात कृतिशील व सहानुभूतीपर भूमिका घेतली. (संदर्भ क्र. ६ पहा) म्हणजेच १९१६ ते १९२२ या कालखंडात वा. रा. कोठारी जरी ब्राम्हणेतर चळवळीत सहभागी झाले; सुरवातीच्या काळात त्यांनी ब्राम्हणेतरांच्या राजकीय संघटना स्थापन करण्यात पुढाकार घेतला किंवा ब्राम्हणेतरांसाठी प्रतिनिधित्व मिळावे यासाठी प्रचार केला तरी त्यांनी स्वत:च्या स्वायत्ततेचा त्या चळवळीत विलय होऊ दिला नाही. 'ब्राम्हणांशी, नेमस्तांशी सहकार्य करण्याच्या, नोकरशाहीवर टीका करण्याच्या, अस्पृश्यांमध्ये जागृती करण्याच्या व शाहू महाराजांच्या प्रभावाखाली न येण्याच्या आपल्या धोरणास मुरड. घातली नाही. त्याचप्रमाणे जैन असूनही फक्त जैनांची भूमिका उचलून धरली नाही. ब्राम्हणेतर चळवळीत सतत सत्यशोधकी विचार मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र १९२० मध्ये राष्ट्रीय ब्राम्हणेतरांना विरोध करणारे कोठारी दोन वर्षातच स्वत: जवळजवळ तशीच भूमिका घेऊ लागले. १९३० च्या आसपास जेधे-जवळकरांनी काँग्रेसमध्ये विलीन होण्याचे जे धोरण स्वीकारले होते ते कोठारींनाही जर ते. तोपर्यंत ब्राम्हणेतर चळवळीत राहिले असते तर स्वीकारता आले असते. परंतु त्यापूर्वीच कोठारींनी केळकर पक्षाच्या मध्यमवर्गास आपलेसे केले. त्यामुळे सर्व जाती-वर्गाना बरोबर घेऊन जाणाऱ्या जनतेच्या खऱ्या चळवळी (काँग्रेस) पासून कोठारी दूर राहिले आणि केळकर, सावरकर, मुंजे यांच्या ब्राम्हणी, वर्णवर्चस्ववादी, मध्यमवर्गीय राजकारणात अडकले. तसेच सत्यशोधकी विचारांपासूनही दूर गेले.
संदर्भ :
१) य. दि. फडके- अण्णासाहेब लड़े, श्रीविद्या प्रकाशन, पुणे. १९८९
२) य. दि. फडके - 'शाहू छत्रपती आणि लोकमान्य श्रीविद्या प्रकाशन, पुणे. १९८६
३) वा. रा. कोठारी- जुन्या आठवणी, , संकल्प प्रकाशन, पुणे. १९७३
४) रा. के. लेले- 'मराठी वृत्तपत्रांचा इतिहास, कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे. १९८४
५) 'दीनमित्र'चे अंक रुत्यशोधक, 'दीनमित्र कार मुकुंदराव पाटील प्रतिष्ठान या संस्थेने उपलब्ध करून दिले. सिया
६) ग्राम्हणेतरांप्रमाणेच अस्पृश्यांनीही जागृत होऊन संघटित झाले पाहिजे, असे त्यांना वाटत होते. तसेच अस्पृश्यता नष्ट होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असेही त्यांचे मत होते. एकूणच जातिभेद समूळ नष्ट होणे देशाच्या उन्नतीस कसे गरजेचे आहे हे त्यांनी आपल्या वेगवेगळ्या लेखांतून स्पष्ट केले होते. (जातिभेद व राष्ट्रीयत्व, भारतसेवक, जाने. १९१७) याच भूमिकेतून त्यांनी इतर ब्राम्हणेतरांप्रमाणे आंतरजातीय विवाह कायदेशीर करणाऱ्या पटेल विधेयकाला (१९१८) पाठिंबा दिला होता. सहभोजनाच्या कार्यक्रमात ते सहभागी होत. असत. शाहू महाराजांच्या प्रेरणेने ज्या अस्पृश्यांच्या परिषदा होत त्यास ते हजर राहत असत. वि. रा. शिंदे यांच्या डिप्रेसड् क्लासेस मिशनला त्यांनी सोलापूर जिल्ह्यातून फिरून पैसे मिळवून दिले होते. स्वत:च्या गावी त्यांनी अस्पृश्यता निवारणाचे प्रयोग केले. त्यात गावच्या विहिरीवर
अस्पृश्यांना पाणी भरून देण्याचा तसेच अस्पृश्य विद्यार्थ्यासाठी वसतिग्रृह सुरू करण्याचा समावेश होता. वि. रा. शिंदे त्यांना म्हणत की, अस्पुश्यां- बद्दलची त्यांची आत्मीयता खरी नव्हती. ते राजकारणी होते.या टीकेला उत्तर देण्यासाठी कोठारींनी १९२३ साली (दीनमित्र, १४ मार्च १९२३) स्वत:च्या गावी अस्पृश्य विद्यार्थ्यासाठी वसतिगृह सुरू केले. त्याचे उद्घाटन बॅ. मुकुंदराव जयकर यांच्या हस्ते झाले होते. गांधीजींना या वसतिगृहाच्या कामाबाबत कळले तेव्हा त्यांनी जमनालाल बजाज यांना भेट देण्यास पाठविले व त्यांच्याकडून देणगीही देवविली. अस्पृश्य विद्यार्थ्याच्या शिक्षणाबाबत साहाय्य करण्यासाठी कोठारींच्या प्रयत्नातून १९२१ साली डिप्रेस्ड क्लासेस कमिटी सुरू करण्यात आली . होती. त्याचे अध्यक्ष होते इंग्रज अधिकारी शेतीतज्ज्ञ डॉ. हॅरोल्ड एच. मॅन. या समितीवर केशवराव कानिटकरांसारखे नेमस्त होते, तसेच शिवराम जानबा कांबळे यासारखे अस्पृश्य नेतेही होते. अस्पृश्यांसाठी सामाजिक सुधारणांसाठी प्रयत्न करून कोठारी थांबले नाहीत तर त्यांनी अस्पृश्यांना कायदेमंडळात प्रतिनिधित्व देण्याची मागणी केली. सरकारने अस्पृश्यांचा प्रतिनिधी मुंबई कायदेमंडळांवर का नेमला नाही, असे 'जागरूक* मधून विचारून त्यांनी सांगितले की, या समाजात आता सुशिक्षित नेते उपलब्ध होते. पुणे नगरपालिकेवर जेव्हा ह. ना. आपटे यांच्या मृत्युमुळे जागा रिकामी झाली तेव्हा त्याजागी कलेकक््टरांनी अस्पृश्यास नेमावे अशी विनंती कोठारींनी केली. (जागरूक, १५ मार्च१९१९).
--------------------------------------------------
'प्रभात'कार वा. रा. कोठारी : विचार आणि कार्य ( ) मध्ये प्रकाशित