संघ परिवाराने गुजराथमध्ये जो धार्मिक नरसंहार घडवून आणला तो अपघात नव्हे. अचानक घडून आलेली ती उस्फूर्त प्रतिक्रिया नव्हती किंवा विश्व हिंदू परिषदेने स्वयंप्रेरेने केलेले कृत्य नव्हते. अत्यंत पद्धतशीरपणे घडवून आणलेली ती पूर्वनियोजित कत्तल होती. मुस्लिमांची घरे, वस्त्या, दुकाने, कारखाने, मशिदी, दर्गे, पीर नेमके टिपून ती नष्ट करण्यात आली व अक्षरश: हजारो मुस्लिम स्री-पुरुष व मुलामुलींना अत्यंत क्रूरपणे जाळण्यात आले. या कत्तलीला राज्यसंस्थेचा उघड पाठिंबा होता. पोलिस करशहा, मंत्री या सर्वांनी मुस्लिमांच्या संहारास प्रत्यक्षपणे मदत 'केली किंवा त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले. दोन महिने चालु असलेल्या हिंसाचारामुळे लाखो अल्पसंख्यांक बेघर झाले आहेत त्यांना मदत देण्याची सरकारची अजिबात तयारी नाही. हत्याकांड विरोधी आवाज दाबून टाकण्यात येत आहे. दहशतीचे वातावरण 'तयार करण्यात आले आहे. लोकशाही संस्था व संकेत गुंडाळून ठेवण्यात गुजराथंची राजवट यशस्वी ज्ञाली आहे. प्रसिद्धी माध्यमांवर हल्ले होत आहेत. जातीय दंगल ओसरल्यानंतर शांतता प्रस्थापित होते व्र वातावरण निवळते हे माहित असल्याने तस्ते अजिबांत होऊ नये अशी खबरदारी घेण्यात आलेली आहे. हिंसाचार चालू राहील व मुस्लिमांना व विरोधकांना दहशत. बसेल अशी परिस्थिती बराच काळ राहील याची काळजी संघ परिवार घेत आहे. . हत्याकांडाबद्दल खेद प्रदर्शित करण्याऐवजी त्याचे स्पष्ट भाषेत समर्थन करणारा व अल्पसंख्यांकांना जरब बसेल असा ठराव संघाच्या प्रतिनिधी सभेने बंगलोर बैठकीत संमत केला व गोव्यातील आतल्या कार्यकारिणीच्या बैठकीत भारतीय जनता पक्षानेही गुजराथच्या - मुख्यमंत्रांना पाठिंबा व्यक्त केला. तसेच संसदेत हत्याकांडावर चर्चा करण्यास नकार दिला.
नवनाझीवाद
या सर्वाचा अर्थ फक्त एकच होतो. संघ परिवाराने आपण नवनाझीवादी आहोत हे पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे आणि आपण प्रसंगी कोणत्या थराला जाऊ शकतो हे दाखवून दिले. आहे. मोदी राजवटीत राज्ययंत्रणेने जसा स्वत:चा नाकर्तेपणा 'स्वतःहून सिद्ध केला व स्वत:चीच मानखंडना करून घेतली तसा प्रकार हिटलरच्या राजवटीतही कधी झाला नव्हता. आज गुजराथमध्ये जे घडले ते इतरही घडू शकते. संघ परिवाराच्या हातांत सत्ता पूर्णत: गेली तर देशाचे काय होऊ शकेल याची कल्पना मुस्लिमांच्या या हत्याकांडावरून येते. मार्च एप्रिल २००२ मध्ये गुजराथ मध्ये. नवनाझी राजवटीने मुस्लिमांना लक्ष्य केले. परंतु हे उद्या इतर दुसऱ्या जमातीबाबत होऊ शकते. खिश्चन, बौद्ध, पारशी, जैन, दलित, आदिवासी, कामगार यापैकी कोणावरही असे संकट संघ परिवाराकडून येऊ शकते. हिंदुत्व या विषारी व. राष्ट्रविघातक विचारास विरोध करणाऱ्याच्या पदरी मुस्कटदाबी व दडपशाही सोडून दुसरे काही येऊ शकणार नाही हेही संघाने उघड केले आहे.
परंतु संघ परिवार गुजराथेत हत्याकांडाचा कार्यक्रम यशस्वीपणे राबवू शकतो आहे याचे एक महत्त्वाचे कारण आहे अक्षरश: लाखो लोकांचा त्या कार्यक्रमाला असलेला पाठिंबा. गुजराथी मध्यमवर्गाने व सुशिक्षितांनी हत्याकांडाचे नेतृत्व केले. सामान्य जमांना हिंदु धर्माच्या गाभ्याला हरताळ कसा फासायचा हे दाखवण्याचे दुष्कृत्य केले ते अभिजनांनी. उच्च पोलिस व सरकारी अधिकारी यांनी या प्रसंगी त्यांना सहाय्य केलें. गुजराथमध्ये गेल्या दोन. दशकात वाढलेली पिढी विषमतेच्या अमानुष विचारांच्या नादी कशी लागेल याचा प्रयत्न संघ परिवाराने फार पद्धतशीरपणे केला व त्याचे फळ म्हणजे मुस्लिमांचे आजचे हत्याकांड मुस्लिमांमधील काही जणांनी व्यवसायात, धंद्यात जो जम बसवलेला होता तो डोळ्यात खुपणाऱ्या उच्च वर्गीय हिंदुकडून संघाच्या हिंसावादास आधार मिळाला आहे. बेरोजगाराला आर्थिक परिस्थिती नाडते व तो हिंसेच्या विषारी तत्त्वज्ञानाच्या आहारी जातो तसेच भ्रष्ट भांडवलशाहीतील स्पर्धक प्रसंगी विशिष्ट जमातीस लक्ष्य करून . स्वत:चा स्वार्थ साधतो हे या निमित्ताने. लक्षात आले. दुकाने, घरे, . मशिदी जाळणे व वस्तूंची लूट करणे यांत पुढाकार घेऊन गुजराथी मध्यम वर्गाने आपल्या हिंसक संस्कृतीचे निर्लज्ज प्रदर्शन केले आहे. मुंबईतील १९९२-९३ च्या दंगलीत मध्यंम वर्गाने बऱ्यापैकी भाग घेतला होता. मुस्लिमांना धडा शिकवायलाच हवा होता हे त्यातील बऱ्याच जणांना वाटत होते. हा वर्ग जमातवादी वृत्तपत्रे मिटक्या मारीत कसा वांचत होता हे आपण अनुभवले आहेच. स्त्रियांमध्ये जमातवाटी हिंसाचाराचा प्रसार करण्याचे महान 'राष्ट्र कार्य' संघ परिवाराने व शिवसेनेने त्यावेळी केले होते. पण गुजराथी मध्यम वर्गाने त्यापुढे पाऊल टाकले आहे. अप्रत्यक्ष सहभाग व बाहेरून पाठिंबा याऐवजी प्रत्यक्ष सहभाग व हत्यांकांडाचे नेतृत्व हे प्रकार करून त्याने भारतातील इतर राज्यांमधील त्यांच्या वर्गांधवापुढे 'आदर्श' घालून दिला आहे. आदिवासींनाही स्वतःच्या दुष्ट जाळ्यात अडकवण्यात संघ परिवार काही प्रमाणात यशस्वी झाला आहे. गेल्या दोन वर्षांपासून गुजराथ मधील आदिवासी भागात ख्रिश्चनांवर हल्ले करून आदिवासींना आपलेसे करणे. ही 'कृती संघाने केली आहे व आत्ताच्या मुस्लिमांच्या हत्याकांडात त्यांना. बळेच ओढले आहे.
भाजप. सत्तेवर आल्यापासुन गुजराथ मधील सरकारी यंत्रणेत व पोलिस दलात संघ परिवाराने हळूहळू. पण पद्धतशीरपणे शिरकाव करून त्यावर आपले नियंत्रण प्रस्थापित करण्यात बरेंच यश मिळविले आहे. गुजराथला बळजबरी व दडपशाही तसेच हिंसाचार तसा नवा नाही. राखीव जागा विरोधी आंदोलन असो वा हिंदू-मुस्लिम दंगली असोत, गुजराथी उच्च व मध्यंम जातींनी नेहमीच अत्यंत प्रतिगामी भूमिका बजावली आहे. नर्मदा बचाव आंदोलना विरोधी वातावरण इतके तापवलें गेले होते की त्यांचा कोणताही महत्त्वाचा कार्यक्रम किंवा मेळावा मेधा पाटकर ह्यांना गुजराथ मधे घेता आला नाही. संघटना स्वातंत्र्य व भाषण स्वातंत्र्य या गोष्टी या संदर्भात गुजराथेत फक्त कागदावर होत्या. गांधीवादी संस्थाही गेल्या दोन दशकात अत्यंत प्रभावहीन व दीनदुबळ्या झाल्या आहेत याउलट हिंदुत्ववाद्यांचा जोर शहरी, निमशहरी, व ग्रामीण अशा. सर्व भागांत वाढतो आहे, आणि विश्व हिंदू परिषद व बजरंग दल या दोन संघटनांच्या हिंसक कारवायाही अखंडपणे चालू आहेत. अशा परिस्थितीत गोधरामधील हिंदूंची हत्या हे संघ परिवारला आयतेच कारण मिळाले. सर्व काही तयारी होतीच. संधीचीच वाट ही मंडळी पाहातं होती असे वाटते. गोधरा घटनेनंतर कायदा हातात घेऊन राज्ययंत्रणेला दावणीस बांधून - मुस्लिमांचे शिरकाण करण्यात यश मिळाल्यामुळे खरेतर ज्यांनी कोणी डब्याला आग लावली त्यांचे संघ परिवार आभारच मानत असेल.
या घटनेमुळे आपण किती मुस्लिमांची हत्या करू शकतो, किती संपत्तीची नासधूस करू शकतो, क्रिया-प्रतिक्रिया सारख्या - किती गहन प्रमेयांचा शोध लावू शकतो हे हिंदुत्ववाद्यांना कळू शकले. अमेरिकेत ११ सप्टेंबरला दोन-तीन हजार लोक मुस्लिम मूलतत्ववाद्यांच्या हल्ल्यात बळी पडले त्यावरील. अमेरिकेत जी प्रतिक्रिया उमटली त्यात फक्त दोन जण मृत्यूमुखी पंडले : भारतासारख्या हजारो वर्षांची परंपरा असलेल्या समाजात गोभ्राच्या ५०-६० जणांच्या हत्येचा वचपा काढण्यासाठी जवळजवळ एक - हजार मुस्लिमांची हत्या करण्यात आली. ही गोष्ट लांछनास्पद व आपल्याला जगात मान खाली घालायला लावणारी आहे आणि . याला जबाबदार राष्ट्रप्रेमाचा मकता घेतलेला संघ परिवार आहे. अमेरिकेत रेड इंडियन समाजाची हत्या होण्याला, काळ्यांच्या गुलामगिरीला कित्येक वर्षे लोटली. गेल्या अंदाजे शंभर वर्षांमध्ये गुजराथमधे घडली तशी घटना अमेरिकेत घडलेली नाही. अमेरिकेने युद्धात दुसऱ्या देशातील हजारो नागरिक मारले असतील पण स्वत:च्या देशातील नागरिकांची निर्घृण हत्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर अमेरिकेतील समाजाने अलिकडच्या काळात. केलेली नाही. तो समाज काय वं युरोपातील समाज काय आजं प्रौढ अवस्थेत येऊन पोहोचले आहेत. त्यांनी रनटीपणावरं विजय मिळविला आहे. आपणही परवा-परवापर्यंत आपल्या संस्कृतीचे व . धर्माचे अभिमानपूर्वक गोडवे गात होतो व ते रास्तही होतं पण संघपरिवाराने आपल्या समाजाला, संस्कृतीला पुन्हा एकदा रानटी व आमनुष पातळीवर नेले आहे. संघ परिवाराला त्याचे काही वाटण्याची शक्यताही नाही कारण त्यांनी हिटलर पासून स्फूर्ती घेतली आहे. गोळवलकर. गुरूजींच्या लेखनात युरोपात त्या . काळात जो नाझीवादाचा नंगानाच चालू होता. त्याचे प्रतिबिंब पडले आहे. संघातील गोळवलकर गुरूजींच्या पिढीचे जे स्वप्न होते ते मार्च-एप्रिल २००२ मध्ये एका अर्थी थोड्या अंशाने का होईना पुरे झाले. हजारभर मुस्लिमांना मारण्यात संघ परिवाराला व त्याच्या मागे जाणाऱ्या लोकांना शक्य झाले. १९४८ साली गांधीजींचा खून, १९९२ मध्ये बाबरी मशीद पाडण्यातील यश, व आज गुजराथेत मुस्लिमांचे हत्याकांड. हिंदुत्वाच्या प्रगतीतील हे तीन टप्पे आहेत व त्याचा हिटलरी वृत्तीच्या नेत्यांना अभिमान वाटतो. आता पुढचा टप्पा कोणता याकडे भीतियुक््त नजरेने. भारतीय समाज पाहतो आहे. अनेक वर्षांच्या प्रयत्नाने आणि लाखो लोकांच्या त्यागाने उभ्या राहिलेल्या राष्ट्राचे तुकडे करण्याकडे वाटचाल हिंदुत्ववादातून व त्यांना. सहाय्य करणाऱ्या मुस्लिमांच्या. मूलतत्त्ववादातून होणार आहे. युरोपात युगोस्लाव्हियाचे तुकडे वांशिक व धार्मिक वादातून परवा परवा झाले. तसा काहीसा प्रकार जर आपल्या देशात संघ परिवाराने व मुस्लिम मूलतत्त्ववाद्यांच्या अनुयायांनी करायचा ठरवला तंर देशाचे किती. तुकडे होतील हे सांगता येत नाही. म्हणून वेळीच त्यांच्या राष्ट्रविधातक कारवायांना पायबंद घातला पाहिजे नवनाझीवाद युरोपातील अनेक देशात डोके वर काढीत आहे. नवनाझीवादी संघटनांच्या हिंसक व अतिरेकी कारवाया : सतत चालू असतात. वंशवाद, परकीयांना विरोध, समतावादी धोरणास विरोध, धार्मिक मूलतत्त्ववाद, या मुद्यांवर त्यांच्या मागण्या आधारलेल्या असतात. अमेरिकेतीले खिश्चन मूलतत्त्ववादी नवनाझीवादी रूपाने काही वेळा पुढे येतो. स्वतःच्या देशातील सरकारांच्या धोरणावर प्रभाव टाकण्याच्या उद्देशाने या संघटना प्रेरित झालेल्या असतात. त्यांच्याशी तुलना करता भारतातील संघ परिवाराची ताकद प्रचंड आहे. तिकडे नवमाझीवादी सत्तेवर येण्याची शक्यता नसते. प्रस्थापित स्थित्तिवादी व उजव्या पक्षांना आणखी स्थितिवादी धारणांकडे ढकलण्यातच ते धन्यता मानतात त्यांना स्थितिवादी व उजव्या विचारांच्या लोकांचा पाठिंबा असला तरी त्यांचे अनुयायित्व ते स्वीकारतात असे नव्हे. भारतातील संघ परिवाराच्या व शिवसेनेसारख्या पक्षांच्या रूपाने वावरणारा नवनाझीवाद हा जास्त भयंकर व धोकादायक आहे. कारण त्याची मजल हजारो लोकांना जाळण्यापर्यंत जाऊ शकते. कोणत्याही नवनाझी गटाने युरोपात वा अमेरिकेत इतकी मोठी हिंसात्मक कारवाई केलेली नाही. तसेच कोणतीही नवनाझी संघटना सत्तेवरही आलेली नाही. आपल्याकडे भारतीय जनता पक्ष केंद्रात सत्तेत भागिदारी करत. आहे व गुजराथ सारख्या काही राज्यात सत्तेवर आहे. परवा परवा पर्यंत इतरही काही राज्यात सत्तेबर होता. मुस्लिमांचे हत्याकांड गुजराथेत घडले कारण भाजपचे तेथे सरकार आहे व केंद्रातील सरकार त्याच्या पाठीशी आहे .
युरोप अमेरिकेतील मवनाझी संघटमांपेक्षा संघपरिवारातील संघटनांची सभासद संख्या मोठी आहे व त्यांना मिळणारा विशेषत: मध्यम वर्गाकडून मिळणारा पाठिंबाही मोठा आहे. पश्चिम आशियातील मुस्लिम देशातील मूलतत्त्ववादी संघटनांशी संघपरिवाराची थोड्याबहुत प्रमाणात तुलना होऊ शकते. पण आजची त्या देशातील राजकीय परिस्थिती पाहिल्यास असे दिसते की तेथील मूलतत्त्ववादी राज्यसत्ता काबीज करण्याइतके ताकदवान नाहीत. ते फ़क्त प्रस्थापित राजवटींवर जरब बसवू शकतात. आयातुल्ला खोमेनींच्या इराणमधील राजकारणाचे स्वरूप बर्याच अंशी संघपरिवारांशी जुळणारे होते. तरीही निरपराध नागरिकांची कत्तल करण्याची संघपरिवाराची कृती अनन्यसाधारण म्हणता येईल. १९८४ साली झालेल्या दिल्लीतील शीखांवरील हल्ल्याची आठवण होणे याठिकाणी साहजिक आहे. काँग्रेसच्या दिल्लीतील काही नेत्यांनी शीखांविरुद्ध दंगल घडवून आणली होती. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर ही दंगल उसळली होती. त्याचा-विसर शीखांना आजही पडलेला नाही इतके त्याचे स्वरूप भयंकर होते; परंतु काँग्रेसची ताकद या संदर्भात फारच मर्यादित आहे. तो पक्ष संघ परिवारासारखा एकचालकानुवर्ती नाही. त्याच्याकडे स्वयंसेवकांची संघटना नाही. तसेच शिट्टी मारल्यास अल्पसंख्यांकांवर वा विरोधकांवर तुटून पडणाऱ्या कार्यकर्त्यांचा संच नाही. काँग्रेसची परंपरा सर्व समाजघटकांना बरोबर घेऊन जाण्याची आहे. १९७७ सारखा अपवाद वगळता अल्पसंख्यांकांनी काँग्रेस पक्षाकडे आशेने पाहिलेले आहे. आणीबाणीतही गुजराथ सारखा हिंसाचार झाला नव्हता. काँग्रेसचे मूळ रूप लोकमान्यांच्या व गांधी-नेहरूंच्या राजकारणात तयार झालेले आहे.
भाजपाची वाढ
परंतु संघ परिवार आजच्या घडीला इतका आक्रमक. व हिंसक कसा होऊ शकला हे पाहिले पाहिजे. आणीबाणी विरोधी आंदोलनात संघ परिवार मुख्य प्रवाहात उतरला व आणीबाणीला विरोध करणारा म्हणून डावपेचात्मक कारणासाठी किंवा संघाच्या स्वरूपाचा अंदाज नीट, न आल्यामुळे विरोधी पक्षांनी त्याला बरोबर घेतले. लोकसभेच्या १९७७ च्या निवडणुकीनंतर संघ परिवाराला. प्रथमच केंद्रात सत्तेत भागीदारी करता आली. परंतु लवकरच. रा. स्व.संघाच्या सभासदत्वाच्या मुद्यावरून वाट झाला व संघ परिवाराने १९८० मध्ये भारतीय जनता पक्ष नावाने स्वतंत्रपणे राजकारण सुरू केले. मध्यमार्गी राजकारणाची चलती आहे असे समजून ढोंगीपणाने गांधीवादी-समाजवादाचा अंगीकार केला व हिंदुत्ववाद बाजूला टाकण्याचे नाटक केले. लोकसभेच्या १९८४ च्या निवडणुकीत २ जागा व ७.५ टक्के मते मिळून तो प्रयल साफ़ फसल्यानंतर संघ परिवार आपल्या मूळ भूमिकेकडे वळला.
विश्व हिंटू परिषदेने १९८३ ला एकात्मता यात्रा काढून त्याचा आरंभ केला. शाहबानो निकाल १९८५ मध्ये आला. राजीव गांधींनी मुस्लिमांमधील मूलतत्त्ववादी नेत्यांच्या आहारी जाऊन १९८६ मध्ये मुस्लिम स्त्रियांवर पोटगीबाबत अन्याय करणारा कायदा करून हिंदुत्ववादाला अप्रत्यक्षपणे. प्रोत्साहन दिले. त्याच काळात अयोध्या प्रकरणात जिल्हा व सत्र-न्यायाधीशाने उप्र.सरकारला वादग्रस्त वास्तूचे दरवाजे उघडायला सांगितले. त्यावर केंद्र किंवा उप्र. सरकारने काही केले नाही. त्यामुळे ' हिंदुत्ववाद्यांना आणखी जोर चढला व संघ परिवाराने शीलान्यास, रथयात्रा, संत संमेलन, साधूंचा मेळावा या सारखे कार्यक्रम राबवून आसले राजकारण पुढे रेटले. काँग्रेसने अप्रत्यक्षपणे मदत केल्यामुळे - संघ परिवाराचा फायदा झाला. होता. तो जणू काही कमी होता म्हणून व्ही.पी सिंग यांनी १९८९ मध्ये भाजप बरोबर समझोता केला. अयोध्या प्रकरण व या समझोत्याचा फायदा होऊन भाजपला ८५ जागा मिळाल्या (११.५ टक्के मते). सत्तेवर आल्यावर सिंग यांनी मंडल आयोगाच्या शिफारशी मान्य करून मंडल विरुद्ध मंदिर असा वाद निर्माण करण्यास भाजपला संधी दिली. राखीव जागांना असलेला मध्यम वर्गाचा विरोध भाजपच्या फायद्यात पडला. लोकसभेच्या १९९१ सालच्या निवडणुकीत भाजपला १२० जागा (२० टक्के मते) मिळाल्या. मात्र राजीव. गांधींच्या हत्येमुळे सहानुभूतीची लाट आली व त्याचा लाभ होऊन कॉँग्रेस पक्ष सत्तेवर आला. त्यावेळी दोन-तीन टक्के मते भाजपला जास्त मिळाली असती तर १५० पर्यंत जागा मिळाल्या असत्या पण ते होऊ शकले नाही. उत्तरप्रदेशात मात्र भाजपला सरकार स्थापता आले. त्याचा फायदा घेऊन संघ परिवाराने १९९२ च्या डिसेंबरमध्ये बाबरी मशीद पाडली. रथयात्रा व॑ मशीद पाडणे या काळात मोठ्या दंगली घडवून आणून हिंसाचाराचा आपला कार्यक्रम राबवला. हिंदू-मुस्लिम दुही माजवून आपले फूटपाडे राजकारण पुढच्या टप्प्यावर नेले मात्र मशीद पाडण्याचा म्हणावा तसा फायदा संघ परिवाराला निवडणुकीत झाला नाही. १९९३ च्या निवडणुकीत तर उत्तरेतील तीनही राज्यात पराभव झाला. उत्तरप्रदेशात जातवादी बनाव यशस्वी झाला. अयोध्या प्रकरणात मागास जातींना कृतीशील करण्यात संघ परिवारास बरे साधले होते पण राखीव जागा विरोध व मूळचा विषमतावादी चेहरा यामुळे भाजपला उत्तरेत अपयशाला सामोरे जावे लागले. त्यातून धडा शिकून संघ परिवाराने उत्तरेत मागास जातींना पक्षात महत्त्वाचे स्थान देण्यास सुरूवात केली व आपला राजकीय पाया विस्तृत केला. त्याचा परिणाम म्हणून १९९६ च्या निवडणुकीत भाजपला सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून येता आले. त्याला १६९ जागा मिळांल्या. काँग्रेसचा ऱ्हास व भाजपाचा उदय या प्रकाराची खरी सुरूवात तेव्हा झाली भाजपाने १३ दिवस केंद्रात सत्ता उपभोगली पण गैरभाजपवादाच्या परिणामामुळे भाजपला इतरांची साथ मिळाली नाही व राष्ट्रीय व डाव्या आघाडीचे सरकार सत्तेवर आलें. यातून भाजपला कळून चुकले की आपल्याला एकट्याच्या ताकदीवर सरकार स्थापन करता येणार नाही व इतर पक्षांशी आघाडी करण्यात पुढाकार घेतला पाहिजे. त्याप्रमाणे १९९८ च्या निवडणुकीत भाजप व त्याच्या मित्रपक्षाचे सरकार सत्तेवर आले: भाजपाला फक्त १८२ जाग मिळाल्या होत्या. पुढे जयललितांच्या बंडामुळे वाजपेयी सरकार पडले. लोकसभेच्या १९९९ च्या निवडणुकीत भाजपाने आघाडी करताना फार काळजी घेतली. स्वत:च्या कार्यक्रम पत्रिकेवरील काश्मीर (३७० कलम), अयोध्या, व समान नागरी कायद्याची कलमे बाजूंला ठेवून राष्ट्रीय लोकशाही आघाडीची कार्यक्रम पत्रिका मान्य केली. भाजपाला स्वत:च्या जागा (१८२) अजिबात वाढवता आल्या नाहीत आणि २३ पक्षांच्या पाठिंब्यामुळे भाजपाची आघाडी सत्तेवर आली. गैरभाजपवादाच्या कचाट्यातून भाजपाची सुटका झाली ती जॉर्ज फर्नांडिस यांच्या समता पक्षामुळे. नंतर जनता दल (संयुक्त), लोकटल, तेलगू देसम, द्रमुक, बिजू जनता दल, तृणमूल काँग्रेस या व इतर पक्षांनी आघाडीत सामील होण्याचा निर्णय घेतला.
सहमती
गेल्या तीन वर्षातल्या भाजपाच्या नेतृत्वाखालीलं रालोआची कारकीर्द पाहता तीन गोष्टी नजरेस येतात. त्यातील सर्वात ठळक आहे सहमती. भारतीय राजकारणात सध्या सहमतीचे युग आले आहे. खाजगीकरण, जागतिकीकरण, उदारीकरण हा मंत्र जवळजवळ सर्वच पक्ष उच्चारताना दिसत आहेत. भाजपाच्या आघाडीतील पक्ष, व काँग्रेस यांचे त्यावर एकमत आहे. तसे पाहिले तर -१९९१ पासून या धोरणाचीच चलती आहे. सत्ताधारी वर्गातही सहमती निर्माण झाली आहे. पूर्वीच्या काळात कधी मोठे भांडवलदार व छोटे भांडवलदार यांच्यात विरोध असे तर कधी भांडवलदार वर्ग व श्रीमंत शेतकरी यांच्यात विरोध असे. तर कधी उच्च वर्गाचे अर्थकारण मध्यम वर्गाला रूचत नसे. पण गेल्या काही वर्षात हे विरोध बोथट झाले. आहेत. सत्ताधारी वर्ग व सत्ताधारी जातीमधील सर्व गटांची आर्थिक धोरणावर सहमती. झाली आहे. त्यामुळे आघाडी सरकारे सत्तेवर येऊनही स्थिरता स्थापन झाली आहे. या सहमतीमुळे भाजपाचे व संघपरिवाराचे फावले आहे. आघाडीतील पक्ष ज्याप्रकारे गुजराथच्या हत्याकांडाबाबत भूमिका घेत आहेत. त्यावरून सत्तेवर राहण्याच्या निर्णयाबाबतचे त्यांच्यातीलं एकमत लक्षात येते. आज त्यांच्यातील कोणत्याही पक्षाला निवडणुका नको आहेत व केंद्रातील सत्ता सोडायची नाही. स्वत:च्या राज्यात सत्तेवर राहण्यासाठीही त्यांना सध्याचे राजकीय वातावरण उपयोगी पडते आहे. त्यांच्या राज्यात काँग्रेस बरोबर त्यांची स्पर्धा आहे. शिवाय केंद्रातील सत्तेचे फायदे फारच मोठे आहेत हे त्यांना कधी नव्हे ते लक्षात आले आहे. घटक राज्य पातळीवरील पक्षांना राष्ट्रीय गजकारणात सहभागाची संधी मिळाल्यामुळे त्यांनी गण . रहण्याचे ठविले आहे.
रालोआच्या तीन वर्षांच्या राजवटीतील दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे संघ परिवाराने राबविलेला हिंदुत्वाचा कार्यक्रम भाजपाने आपली कार्यक्रम पत्रिका बाजूला ठेवून रालोआची कार्यक्रम पत्रिका मान्य केली आहे अशी समजूत करूंन घेऊन मित्रपक्ष सत्तेत सहभागी झाले. पण भाजपाने आपली कार्यक्रम पत्रिका कधीही बाजूला ठेवली नव्हती. संघ परिवाराने हे नक्की ठरविले आहे की कोणत्याही परिस्थितीत सत्ता हस्तगत करायची व ताब्यात ठेवायची. सत्तेवर आल्यावर त्याने आपल नवनाद्लीवादी धोरण राबवायला अत्यंत पद्धतशीरपणे सुरूवात केली. अगदी १९९८ च्या आघाडीपासूनच हे स्पष्टपणे दिसते. तेव्हा त्यांनी ओरिसातं व गुजराथेत खिश्चनांवर हल्ले सुरू केले व आपण कोण आहेत हे आघाडीतील पक्षांना सांगितले पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. नंतर जेव्हा १९९९ ला सत्ता हाती आली तेव्हा एकेक करून आपले हेतू साध्य करण्यास प्रारंभ केला. गुजराथ सरकारच्या सरकारी नोकरांना संघाचे सभासदत्व घेण्यास मुभा देण्याच्या धोरणास मान्यता दिली. लोकसभेतील चर्चेच्या वेळी राज्य सरकारच्या कारभारात हस्तक्षेप करू नये अशी मामभावीपणाची भूमिका भाजपने घेतली. त्यावेळी मित्रपक्षांनी त्यास पाठिंबा दिला. भाजप पक्ष म्हणून स्वत: काही गोष्टी करीत नाही. त्याऐवजी परिवारातील इतर घटक त्यास सहाय्य करतात. अमेरिकेतील विहिंपच्या मेळाव्यात मी प्रथम स्वयंसेवक आहे व नंतर पंतप्रधान असे वाजपेयी म्हणाले ते खरेच आहे. पण ते कळत नसल्याचा बहाणा मित्रपक्ष करीत आहेत. संघ परिवाराचा विचार प्रभुत्वशाली विचार व्हावा, तो सर्वत्र झिरपावा असा प्रयत भाजप सत्तेवर असल्यानेच करता येतो आहे. त्याची मुख्य जबाबदारी मानव' साधन संपत्ती मंत्री मुरलीमनोहर जोशींनी उचलली आहे. शालेय शिक्षणापासून ते विद्यापीठीय शिक्षण क्रमापर्यंत जोशी महाशयांनी स्वतःच्या परिवाराची हिंदुत्ववादी भूमिका कशी संक्रमित होईल याचा जोरकस व ठाम प्रयल चालू केला आहे इतिहास, सामाजिक शास्त्रे, पुरातत्त्वशास्र इत्यादी विषयातील संस्थांमध्ये स्वत:च्या विषयात फारशी कामगिरी न केलेल्या पण संघीय चौकटीतील लोकांच्या नेमणुका केल्या आहेत. विद्यापीठ अमुदान मंडळ, किंवा शालेय शिक्षणासंबंधीच्या मंडळावर संघवाद्यांना नेमले आहे व त्यांच्याकडून भारतीय समाजात दुहीं माजवणारे विचार प्रसृत करणारे शिक्षण देण्याचा प्रयल चालू केला आहे. भारतीय समाज व संस्कृतीचा जो ढाचा आजवर चालत आला आहे त्यामध्ये हिंदुत्व या नवनाझीवादाचे मिश्रण करण्याचे हे प्रयल सर्वात धोकादायक आहेत कारण त्यांचा: दूरगामी परिणाम होणार आहे. या त्यांच्या हिंसावादामुळे हिंदू धर्माचे स्वरूपही बदलले जाणारे आहे. भारतातील नव्या पिढीचे विचार त्यातून तयार होणार आहेत इ. कला, साहित्य, शिक्षण, तत्त्वज्ञान, सामाजिक शास्त्रे, विज्ञानाचे तत्त्वज्ञान या सर्वच क्षेत्रात हिंदुत्ववादाचा प्रभाव वाढून वैचारिक व सांस्कृतिक क्षेत्रावर प्रभुत्व प्रस्थापित करण्याच्या संघ परिवाराच्या कार्यक्रमाकडे मित्रपक्षांनी काणाडोळा करण्याचे ठरविलेले आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली म्हणजे त्यांचे डोळे उघडतील. अल्पकाळाचा स्वार्थी विचार करून ते गणप राहात आहेत पण जेव्हा भाजप स्वत:च्या ताकदीवर सत्तेवर येईल तेव्हा त्यांचे काय हाल होतील हे सांगणे फार कठीण-नाही. अयोध्येचा प्रश्न संघ परिवाराने अजिबात बाजूला काढून - टाकलेला नव्हता हे गेल्या काही महिन्यांतील घटनाक्रमावरून लक्षात येते. काश्मीरबाबतचे कलम ३७० रद्द करण्याइतकी ताकद भाजपाची आज नाही. एकूणच काश्मीरबाबत त्याचे धोरण फसले आहे. अब्दुल्लांची मदत त्यांना घ्यावी लागत आहे त्यामुळे तो विषय बाजूला टाकण्याशिवाय त्यांना तरूणोपायच नव्हता. अनुयायांना सांगण्यासाठी हे ठीक आहे की आपण आघाडीशी समझौता केला आहे पण प्रत्यक्षातील परिस्थिती वेगळी आहे. तोच प्रकार समान नागरी कायद्याबद्दलचा आहे. आवश्यक ती ताकद त्यांच्याकडे नसल्यामुळे हा कायदा होणे नाही हे ते समजून आहेत. राहता राहिला अयोध्या प्रश्न. त्यात त्यांचा जीव गुंतला आहे असे नव्हे: एक डावपेचाचा भाग म्हणून मशीद-मंदिर हा प्रश्न ते वापरत आहेत व त्याला हवे तसे वळण देत आहेत. संघ परिवाराने हा प्रश्न ज्याप्रकारे हाताळला व केंद्र सरकारने त्याला ज्याप्रकारे प्रतिसाद दिला त्यावरून हे स्पष्ट होते की अयोध्या प्रश्न पुढे रेटण्याचा भाजपाने निश्चित प्रयत्न केला व रालोआ मधील घटक पक्षांनी बघ्याची भूमिका घेतली. त्याचेच पर्यवसान गोधरा व गुजराध हत्याकांडात झाले.
अपयश व पराभव
रालोआच्या तीन वर्षांच्या कालखंडातील नोंद घेण्यासारखी तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सरकारला आलेले सर्व आघाड्यांवरील अपयश व भाजपचे एकामागून एक झालेले पराभव. भाजपकडे परराष्ट्र धोरणाचा स्वत:चा काही वेगळा विचार आहे अशी त्यांची समजूत होती. प्रत्यक्ष सत्तेवर आल्यावर त्यांचा या बाबतीतील पोकळपणा लक्षात आला. जम्मू-काश्मीरबाबत त्यांची भूमिका अत्यंत कचखावू व टुटणीपणाची ठरली. कारगीलमध्ये आक्रमण झाले होते तेव्हा ते झाकून ठेवून रालोआ सरकारने लाहोरची अयशस्वी बसयात्रा घडवून आणली. पोखरणमध्ये परत स्फोट करून पाकिस्तानला आपली बरोबरी करण्याची संधी दिली व त्यामुळे पारंपरिक युद्धही टाळता आले नाही. कारगीलचे युद्ध झालेच. आग्रा परिषदेचा डांगोरा पिटला पण तेथे मुशर्रफ यांनीच बाजी मारली. चीन-हा आपला क्रमांक एकचा शत्रू आहे असली बेजबाबदार वक्तव्ये संरक्षणमंत्री फर्नाडिस यांनी विनाकारण केली. आपली स्वायत्तता नष्ट करून संतत आंतरराष्ट्रीय व विशेषत: अमेरिकेच्या दडपणाला भिवून राहण्याची भूमिका घेतली. वकिलातींमध्येही संघ परिवारातील व्यक्तींच्या नेमणुका केल्या व तेथील अधिकाऱ्यांच्या नीतिथैर्याचे खच्चीकरण केले. आंतरराष्ट्रीय व अमेरिकेच्या दबावाला बळी पडून, आपली अर्थव्यवस्था त्यांच्या . हुकूमानुसार चालविण्याचे धोरण अंगीकारले. स्वत:चा स्वदेशीचा विचार किती दिखावू व तकलादू होता हे स्वतःच दाखविले भाजप प्रणित आघाडीच्या या प्रकारच्या आर्थिक धोरणामुळे देशातील श्रीमंत-गरीब दरी वाढली. बेरोजगारीचे प्रमाण वाढले. कारखाने बंद पडले. दारिद्र्यरेषेखालील लोकांची संख्या तशीच राहिली. मध्यम वर्गाच्या ग्राहकवादाचा विजय झाला. पण अर्थकारणात उपटसुंभ मंडळींचा जोर वाढला. भ्रष्टता व भणंगपणा वाढला. पांढरपेशी गुन्हेगारी वाढली. अनधान्याचे साठे पडून राहिले व स्वस्त धान्य दुकानाचा पुरवठा मात्र कमी झाला व धान्याच्या किंमती वाढल्या. या सर्व गोष्टींमुळे अर्थव्यवस्थेचे एकूण रूप एका बाजूने अत्यंत आक्रमक व भ्रष्ट व॒ दुसर्या बाजूने केविलवाणे व अगतिकपणाचे झाले.
रालोआ सरकारला असे अपयश येत असताना भाजपाचा गेल्या तीन वर्षांच्या काळात झालेल्या निवडणुकांत सतत पराभव होत गेला. आज १४ राज्यांत काँग्रेस सत्तेवर आहे. सर्वत्र तिने भाजपचा पराभव करून सत्ता हस्तगत केली आहे. उत्तर प्रदेश, पंजाब येथे फेब्रुवारी २००२ मध्ये झालेल्या निवडणुकात भाजप व त्याच्या मित्रपक्षांचा पराभव झाला.. त्यापूर्वी द्रमुक-भाजपचा पराभव करून. अण्णाद्रमुक तमिळनाडूत सत्तेवर आला. हिंदी भाषिक पट्ट्यातून भाजप जवळजवळ अस्तंगत झाला आहे गुजराथ, हिमाचल पएदेश,. झारखंड वगोव्यात भाजप. कसातरी सत्तेवर टिकून आहे. त्याचे मित्रपक्ष हरयाना, आंध्र प्रदेश, जम्मू व काश्मीर आणि ओरिसा राज्यात सत्तेवर अहित. एकामागून एक होणाऱ्या पराभवाने खचून गेलेल्या संघ परिवाराने गुजराथमध्ये सत्तेवर राहण्याचा प्रयत्ल चालविला आहे. हे एकच महत्त्वाचे राज्य आज परिवाराच्या अधिपत्याखाली आहे. ते हातचे जाऊन चालणार नाही. भूकंपानंतर केशूभाई पटेलच्या नेतृत्वाखाली भाजप पुन्हा निवडणूक जिंकेल असे वाटत नव्हते. म्हणून परिवाराने आपला निष्ठावंत स्वयंसेवक मुख्यमंत्रिपदी नेमला व त्याच्याकरवी मुस्लिमांचे हत्याकांड घडवून आणले जेणेकरून सत्ता पुन्हा भाजपलाच मिळेल. मोदी आज परिवारात हिरो झाले आहेत आणि हे साहजिकच आहे. नवनाझीवादाचा खरा पाईक म्हणून इतिहासात मोदींची नोंद होईल पण त्यांच्या मागे सर्व संघ परिवार उभा आहे हे विसरून चालणार नाही. एका अर्थी सध्या भाजपाला ज्या पराभवाला द अपयशाला तोंड द्यावे लागत आहे त्यावर एक उपाय म्हणूनही गुजराथच्या घटनेकडे पाहता येईल. पराभवाने खचून गेलेल्या संघ परिवाराला हत्याकांडामुळे संजीवनी मिळाली आहे असे म्हणता येईल.
पोषक परिस्थिती
संघ परिवार एवढे धाडस करायला कसा धजावला किंवा २००२ सालीच लोकशाहीला, हिंदुधर्माला व भारतीय संस्कृतीला काळीमा फासणारी गुजराथ सारखी घटना का घडू शकली याचे उत्तर शोधले पाहिजे. संघाची स्थापना झाली त्यावेळच्या पिढीचे स्वप्न इतके वर्ष पुर्ण होऊ शकले नाही ते आज पूर्ण होऊ शकले याचे कारण परिस्थिती. स्वप्नपूर्तीस पोषक अशी तयार झाली आहे. भारतीय राजकारणाकडे. व अर्थव्यवस्थेकडे पाहिले तर आपल्याला परिस्थिती नवनाझ्ीवादाला कशी सहाय्यकारक बनली आहे हे कळेल. गेल्या दोन दशकात वर्ग हा घटक राजकारणासाठी देश पातळीवर उपलब्ध नव्हता. मात्र जात हा घटक राजकीय संघटनासाठी पुढे येत होता. मागास जातीचे व दलित जातींचे राजकारण उत्तरेत उभे राहात होते. त्यामध्ये जहाल अंश होता. लोकशाही दृष्टीने पाहता बहुसंख्यांक हे मागासचं होते. त्यातून बहुजनवाद उभा राहिला पण जितक्या जोराने तो लोकरंजनवादी पद्धतीने उभा राहिला तितक्याच वेगाने तो कोसळलाही. त्याने स्वत:ची स्वायत्तता गमावली. व्ही.पी सिंग यांचा मंडलवाद, कांशीरामाचा बहुंजनवाद, मुलायमसिंग व लालूप्रसादांचा मागासवाद . मागे पडला. थोडक्यात जात ही गतप्रभ शक्ती (स्ेन्र-फोर्स) - बनली. त्याची क्रांतिकारक ताकद लयास गेली. अशा पोकळीत हिंदुत्ववादी पुढे सरसांवले यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. जेव्हा जहाल राजकारण गतप्रभ होते तेव्हा नवनाझीवादी . राजकारणाला ताकद प्राप्त होते. आणि नेमक्या याच कालखंडात . काँग्रेसची घसरण होत गेली. राजीव गांधींच्या हत्येनंतर नशीबाने काँग्रेस सत्तेवर आली, नाही तर तेव्हाच आघाडीचा गोंधळ सुरू झाला असता. पण तो पाच वर्षांचा काळ संपल्यावर मात्रे भाजपने - काँग्रेसची जागा घेण्याचा चंगःबांधला व स्वत:चा सामाजिक पाया विस्तृत केला. भारतभर स्वत:चे अस्तित्व निर्माण केले. छोट्यामोठ्या पक्षांबरोबर आंघाड्या केल्या व येनकेनप्रकारे सत्तेवर जाण्याचा कधी यशस्वी, कधी अयशस्वी प्रयत केला. काँग्रेसच्या धसरणी . नंतरच्या गोंधळाचा, विखुरलेपणाचा, राजकीय पोकळीचा फायदा नवनाझीवादाला झाला. तिसरी शक्ती उभी राहिली व आपटलीही. तिला एकत्र बांधणार धागा कोणताच नव्हता. त्यातील पक्षांना भाजपाच्या नवनाझी रूपाचा अंदाज आला होता की नव्हता अशी शंका येते. तिसरी शक्ती दोन राहुट्यात विभागली गेली व संघ . परिवाराला ताकद मिळांली. बरेच जण त्यांना जाऊन मिळाले. सोनिया गांधी परकीय आहेत असे म्हणून काहींनी स्वार्थ साधला तर काहींनी आंबेडकरांचा वारसा सोडला, दक्षिणेतील मंडळींनी उत्तरेचा व आर्यसंस्कृतीचा विरोध सोडून दिला. साम्यवादी आपल्या शगूंचे क्रमांक ठरविण्यात गर्क असतात. वास्तविक पाहता, संघ परिवार नवनाझीवादी आहे. त्यामुळे काँग्रेसबरोबर जाणे डाव्या : राजकारणासांठी डावपेचात्मक व व्यूहरचनात्मक दृष्टीने आवश्यक आहे. पंतप्रधानपद मिळण्याची शक्यता असताना घाबरून दूर राहणे त्यांनी पसंत केले आणि आपली स्वतःची सुरक्षितता महत्त्वाची मानली. बंगालात जागतिकीकरणाशी समझोता केला पण काँग्रेसशी तो करणे म्हणजे साम्यवादाशी प्रतारणा मानले. बंगाल व केरळ मधील आघाड्यांत गुंतलेले राजकारण किंवो दिल्लीतील दरबारी राजकारण य़ा पलिकडे जर लक्ष. दिले तर काँग्रेसचे महत्त्व त्यांना कळेल.
आजच्या राजकारणात जनआंदोलनांचा रेटा म्हणावा तसा नाही. त्यामुळे आयतेच नवनाझींचे फावते. जनआंदोलनांचा बंदोबस्त करण्यात नव्या आर्थिक धोरणाचे सर्वच समर्थक पुढे आहेत. राज्यसंस्था अंग काढून घेत असताना एक दमन यंत्रणा म्हणून तिचे अस्तित्व उघडपणे जाणवते. पर्यायी राजकारणाचा रेटा असता तर गुजराथचे हत्याकांड करण्यास संघ परिवार धजावला न सता. पक्षबाह्य राजकारणाचा अवकाश आता स्वयंसेवी संस्थांनी व्यापला आहे. एका अर्थाने जागतिकीकरणाच्या युगाचा हा एक परिणाम आहे. पण एकेक तुकडा, एकेक क्षेत्र. निवडून कार्य करणाऱ्या या संस्थांच्या जाळ्यामुळे व्यापक जनशक्ती उभारण्याच्या कामाला मर्यादा पडतात व ती जागा नवनाझी बळकावतात हे ध्यानात घेतले पाहिजे. राजकारणाचे तुकडे होणे, कणे होणे, ते विखुरले जाणे हे सत्ताधारी वर्गाला हवेच असते. त्याच्यात जर नवनाह्लीवादाचे समर्थक असतील तर त्यांच्या राजकारणाचे फावते तसे आज झाले आहे. भारतीय समाजातील अंतर्विरोधामुळे स्वयंसेवीकरण होणे हे एंका दृष्टीने साहजिक वाटते व दुसऱ्या बाजूने पाहता स्वयंसेवीकरण (NGOnisation) झाल्याने नवनाझीवादाचे फावते असेही लक्षात येते. आजच्या राजकारणातील सर्वात महत्त्वाचा व कळीचा मुद्दा आहे विरोधाचा अभाव. विरोधाविना लोकशाही ही हुकूमंशाहीपेंक्षा . भयंकर व धोकादायक असते. कारण सामान्य जनता देशात लोकशाही आहे असे गृहीत धरून चालते व निवडून आंलेल्यांचे जनविरोधी राजकारण चालू देते. आपल्या नशीबाला दोष देते. पण प्रत्यक्षात लोकशाहीचा प्राण जो संघटित विरोध तोच नसेलं तर राज्यकर्त्यावर वचक बसणे अशक्य होऊन बसते. आणीबाणीतही विरोध झाला. सत्याग्रह झाला व शेवटी इंदिरा गांधींचा परभवही झाला पण आज विरोधी आघाडीवर तसे पाहिले तर सामसूम दिसते. काँग्रेसकडे तशी ताकद, कल्पनाशक्ती, विचारप्रणाली किंवा नेतृत्व नाही. संघटना नाही, दृष्टी नाही. सोनिया गांधींकडे पर्यायी आघाडी निर्माण करण्याची क्षमता नाही. काँग्रेसचा डोलारा आतून पोकळच आहे. राज्याराज्यात ती सत्तेवर आहे ती स्थानिक कारणांमुळे व भाजपवरील रागामुळे. तेवीस पक्ष तर भाजपाबरोबर आहेत. उरलेले आपापल्या राज्यातील राजकारणात डुबले आहेत. अशावेळी देशपातळीवर विरोध संघटित करेल, मूक जनतेस नेतृत्व पुरवेल व जनविरोधी नवनाज्ञीवादास आव्हान देईल असे काहीच होताना दिसत नाही. सहमतीच्या राजकारणाचा थंडपणा तो हाच की जेथे जनतेचा मूक विरोध धारदार.बनत॒ नाही. नवनाझीवादास खरा आधार मिळाला आहे तो आपल्या देशातील अर्थकारणाचा. जेव्हा आर्थिक पेचप्रसंग तीव्र बनतात. तेव्हा जसे कष्टकऱ्यांच्या जहाल राजकारणास प्रोत्साहन. मिळते तसेच उजव्या राजकीय चळवळींचीही वेगाने वाढ होते. हे . ध्यानांत घेतले तर नेमका आजच्या घडीला नवनाझीवाद का आक्रमक बनतो आहे हे कळेल. अशा परिस्थितीत वर्गीय समझोते होतात व ते प्रभुत्वशाली गटांच्या बाजूने झुकतात. कमकुवत गटांच्या हिताची किंमत देऊन हे समझोते प्रत्यक्षात येतात आपल्या संमाजात हेच घडताना दृष्टीस पडते आहे. जेव्हा दिशाहीन परिवर्तन होते आणि अगम्य व अनिश्चित अर्थकारणाचा डोलारा उभा. राहतो तेव्हा नवस्थितिवादाचे, नवउजव्या विचाराचे आकर्षण. वाढते. हे निरीक्षण आपल्या स्थितीस लागू पडताना दिसते आहे. कमालीची विषमता, भणंगपणात वेगाने होणारी वाढ, बेकारी, अस्थिर अर्थकारण, उपटसुंभ भांडवलाचा प्रभाव, वित्तीय भांडवलाची चलती, भाववाढ, भ्रष्ट. व्यवहारांचे प्राबल्य, गुन्हेगारीवर आधारित अर्थकारण, पांढरपेशीय गुन्हेगारीत होणारी वाढ, भ्रष्टाचारी प्रशासन या सर्व घटकांमुळे आपली अर्थव्यवस्था अशा अवस्थेला येऊन पोहोचलेली आहे की नवनाझीवादाचे हिंसा, द्वेष, उन्माद, शपुत्व, अतिरेकी अभिमान, 'विवेकशून्यता यावर आधारलेले राजकारण उभे राहणे सोपे जाते. गेल्या दोन दशकाहून जास्त काळातील अर्थकारणातून वाढलेला व गबर झालेला नवा मध्यम -वर्ग या राजकारणाचे समर्थन करण्यास व नेतृत्व करण्यास पुढे सरसावला आहे. त्याला समतावादाचा, कष्टकरी लोकांच्या चळवळीचा, व राखीव जागांचा तसेच सरकारी मदतीचा भयानक राग आहे. तो स्वत: भ्रष्ट अर्थकारणात बुडालेला आहे पण दुसर्यांना नैतिकतेचे धडे देण्यास कचरत नाही. जीवघेण्या स्पर्धेत उतरलेला हा वर्ग आधारासाठी तकलाटू व बेगडी धर्माच्या आहारी जातो आहे. सामाजिक गटात वैमनस्य पसरविणे म्हणजे राष्ट्द्रोह हे त्याला उमजत नाही. व तो सरळ संघपरिवाराच्या खोट्या प्रचाराला दाद देतो. स्वतः तोच विचार पसरवितो. स्वत: फसतो व इतरांना फसवितो. नवनाझीवादाला या नवमध्यमवर्गाचा पाठिंबा उपयोगी पडला आहे.
मध्यमवर्गातील फूट
परंतु हे जरी खरे असले तरी एक गोष्ट स्पष्टपणे दिसते आहे. मध्यमवर्गात आज उभी फूट पडली आहे. ही फूट आपण इंग्रजी वृत्तपत्रांच्या गुजराथमधील नरसंहारावरील प्रतिक्रियेतून समजून घेऊ शकतो. वर म्हटल्याप्रमाणे व बऱ्याच निरैक्षकांनी सांगितल्याप्रमाणे गुजराथेत मध्यमवर्ग जाळपोळीत, लूटमारीत आघाडीवर होता. पण देशातील मध्यमवर्गातील एका फळीत गुजरथेतील हिंसांचाराबद्दल कमालीची नाराजी आहे. भाजपची भलावण करणारी इंडिया टुडे सारखी साप्ताहिके व टाईम्स ऑफ इंडिया सारखी वृत्तपत्रे गेल्या दोन महिन्यांत भाजपावर अत्यंत कडक शब्दात टीका करीत आहेत. भाजपा हा शिणलेला, परिस्थितीच्या अधीन झालेला, गोंधळलेला, नीतिधैर्य खचलेला, वृद्ध नेतृत्व व मोडकळीला आलेली संघटना असलेला, विहिंप व बजरंग दलासारख्यां हिंदुत्ववादी राक्षसांच्या प्रभावाखाली गेलेला पक्ष आहे अशी शिव्यांची लाखोली इंडिया टुडेने वाहिली आहे. गुजराथमधील हिंसाचाराने भाजपाची विश्वासार्हता संपुष्टात आली आहे. आत्मविधासापासून भाजपाची वाटचाल नाउमेद, हिम्मत खचलेल्या अवस्थेपर्यंत झाली आहे. जेव्हा हा पक्ष सत्तेवर आला तेव्हा तो एक पारंपारिक चौकटीतील उजवा पक्ष म्हणून वावरेल आणि इंग्लंडमधील हुजूरपक्षाप्रमाणे किंवा जर्मनीतील खिश्चन डेमॉक्रेटिक पक्षाप्रमाणे वागेल अशी अपेक्षा होती. राष्ट्रवाद, सांस्कृतिक परंपरा आणि खुले आर्थिक धोरण याचा अर्थ उजवे धोरण. पण भाजपाने हिंदुत्वाचा अतिरेक करून या आदर्शापासून ढळल्याचे पातक केले. हिंदुत्व ही त्याची ताकद राहिलेली नसून ते आज पक्षाला नष्ट करायला निघाले आहे. कोणत्याही पाश्चिमात्य गोष्टीपासून दूर् पळू इच्छिणाऱ्या भगव्या संघटनेमुळे भाजपचा मुख्य प्रवाहातील उजवा. पक्ष म्हणून पुढे येण्याची क्षमता संपली आहे. भाजपाच्या खऱ्या पाठीराख्यांना ग्राहकवाद, सुबत्ता, आणि हिंदू असण्याचा थोडा अभिमान याची गरज होती. भाजपाच्या सुशिक्षित पाठीराख्यास साधुंचे जथे व बजरंगदलाचे अतिरेकी कार्यकर्ते आवडले नाहीत. दूरदर्शनवर परमहंस सारख्यांच्या मुलाखतीही रूचलेल्या नाहीत. रामाचे मंदिर ठीक आहे पण त्याने तालिबानच्या हिंदू आवृत्तीस अधिमान्यता मिळवून दिली ती योग्य नव्हती. भाजपा हा हिंदू पूर्वग्रहाचा पक्ष होता. जेव्हा या पूर्वग्रहाचे अतिरेकीपणात रूपांतर झाले तेव्हा मध्यमुवर्गाला राग आला व त्याला हिंदुत्वाचा कंटाळाही आला. भाजपाने भारत बदलला पण त्यास स्वत: बदलता आले नाही. तो थिजलेला, गोंधळलेला, व दुसऱ्यांना गोंधळात टाकणार, कल्पनादाख्िय असलेला व योग्य कृती करण्याची क्षमता नसलेला पक्ष झाला आहे. खरे तर भारतीय राजकारणातील पोकळी भरून काढण्याची एक स्थितिवादी (कॉन्झर्वेटिव्हो उजवा पक्ष म्हणून - राजकारण करण्याची सुवर्णसंधी भाजपाने गमावली आहे. इंडिया टुडेमधील भाजपाचे हे वर्णन वाचल्यानंतर आपल्या. लक्षात येते की मध्यमवर्गातील एक मोठ्या गटाला संघ परिवांराचे हिंसाचाराचे राजकारण अमान्य आहे. एका मर्यादेत राहून भाजपाने आपले हिंदुत्वाचे विचार राबवावेत असे मत त्याचे आहे. पण गमतीचा भाग असा आहे की स्वपन दासगुप्ता, अरुण पुरी, प्रसन्नराजन या इंडिया टुडेच्या संपादकांना संघपरिवार नीटसा कळलेला नाही किंवा कळूनही त्यांनी आजवर त्याची भलावण केली. पण गुजराथेतील हिंसाचार पाहून त्यांनी भाजपावर टीका करण्यास सुरूवात केली. त्यांचा अपेक्षाभंग झाला म्हणून जे दु:ख झाले त्यातून त्यांनी भाजपावर आगपाखड केली आहे. एका अर्थाने त्यांनी भाजपांला इशारा दिला आहे की, त्याने अतिरिकीपणा करू नयें. एकतर भाजपा हा स्वायत्त पक्ष नाही. तो संघाने स्थापन केलेला पक्ष असून संघ परिवारातील संघटनांप्रमाणे एंक संघटना आहे की ज्याचे काम सत्ता संपादन करणे हे आहे. रा स्व.संघाने जी श्रमविभागणी केली आहे त्यास तोड नाही. परिवारातील सर्व घटकांची कामे ठरलेली आहेत.. स्वदेशीवाल्यांनी स्वदेशीचे दळण सतत दळायचे हे ठरलेले आहे. तसे विहिंप व बजरंग दलाने अतिरेकी कार्यक्रम राबवायचे, हिंसक कारवाया पार पाडायच्या, शत्रू व विरोधकांच्यावर तुटून पडायचे हेही ठरलेले आहे. संघपरिवारापासून भाजपाला वेगळे काढण्याचा भोळेपणा निदान इंडिया टुडे सारख्याकडून अपेक्षित नव्हता. संघपरिवाराने आपला चेहरा कधीच लपविला नाही. त्याचे नवनाझीवादी तत्त्वज्ञान एकदम उपटलेलेही नाही. गुरूजींच्या लेखनापासून ते पांचजन्यमधील संपादकीयापर्यत त्याचे लेखी पुरावे हजारो पानात सर्व भाषात उपलब्ध आहेत व हे लेखन सांगते की संघपरिवाराची भूमिका स्थितिवादी उजव्या पक्षाची नाही तर ती आहे नवनाझीवादी पक्षाची. भले काही वेळा नवनाझीवाद सुप्त अवस्थेत असेल. नवनाझीवाद नावाच्या बकासुराचे संघपरिवारातील सर्व संघटना म्हणजे अवयव आहेत. भाजप हा स्थितिवादी पक्ष म्हणून काही काळ वावरला असेल. तसे पाहिले तर वर म्हटल्याप्रमाणे त्याने गांधीवादी समाजवादी बुरखा घेऊन नवनाझीवाद लपवला होता. पण तों बुरखा त्याने लौकरच टाकून दिला व स्वत:चे खरे रूप भारतीयांना दाखविले. मध्यमवर्ग त्याने चकीत होऊन त्याच्याकडे आकृष्ठ झाला. त्याच्या मताचे एतिनिधित्व करणारा पक्ष म्हणून त्याने भाजपाकडे पाहिले. आपल्या हिंसक - संस्कृतीचा प्रतिनिधी म्हणून भाजपाकडे त्याने पाहिले. इंग्लंडमध्ये किंवा जर्मनीत स्थितिवादी किंवा उजवे पक्ष आहेत व ते सत्तेवरही येतात पण संघपरिवाराचा अविभाज्य भाग असलेला सध्या मोठ्या . भावाची भूमिका बजावीत असलेला भाजण हा नवनाझीवादापासून दूर जाणार नाही हे त्यांनां समजायला हवे होते. मवाळ हिंदुत्व नावाचा काही प्रकार अस्तित्वातच नाही. काहीजण तसा आव आणतात. पण प्रत्यक्षात हिंदुत्ववाद हा नवमाझीवादापासून ढळला तर तो हिंदुत्ववादच उरत नाही हें लक्षात ठेवले पाहिजे. मशीद पडली, गुजराथेत हत्याकांडाचा कार्यक्रम राबविला तर हे उजवे विचारवंत भाजपावर टीका करणार व पुन्हं जेव्हा भाजपचा राक्षस शांत होतो तेव्हा त्याची भलावण दरणार व म्हणणार की आता. कसा नीट वागतो आहेस. भाजपाच्या पंतप्रधानांना दुतोंडी म्हणणाऱ्या या संपादकमंडळींना हे सांगायला. हवे की तेही भाजपाबाबत. दुटणी भूमिकाच घेत आहेत. तुम्हाला भाजप पाहिजे व संघ परिवाराचे लटांबर नको, नग्न साधू नकोत व त्रिशूळ उंचावणारे भगवे कार्यकर्ते नकोत ही शकय होणारी गोष्ट नाही..भाजपा हे नवनाझीवादाचे एक पॅकेज आहे त्यांत थोडी स्वदेशी, उजवे आर्थिक धोरण, हिंसक हिंदुत्व व अल्पसंख्यांकांबद्दल कमालीचे शत्रूत्व या गोष्टी येणारच. भोळेपणाचा आव आणणे स्वपन दासगुप्ता व अरुण पुरी यांनी सोडावे व सरळ, स्वच्छ भूमिका घ्यावी. आणि त्यांना असा कोणता विचार मान्य आहे? त्यांची. विचारसरणी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे उजवी व स्थितिवादी आहे. उजवी विचारसरणी म्हणजे सोप्या भाषेत विषमतावाद व स्थितीवाद म्हणजे हिंदुधर्मातील जातिसंस्थेचे व स्त्रीच्या दुय्यम स्थानाचे जतन करणे भारतासारख्या गरीब देशात खुल्या बाजारपेठीय अर्थकारणाचा पुरस्कार करणे अवघड असते. विषमतावादाची भलावण उघडपणे करणे धोक्याचे असते. राजीव गांधींनी सत्तेवर आल्यावर प्रथम जेव्हा खुल्या अर्थकारणाचा पुरस्कार केला तेव्हाही त्यांनी हाय-टेक या विचारप्रणालीचा आधार घेतला होता. काँग्रेसकडे आज त्याच्या बाजारपेठीय अर्थकारणास खपवू शकेल अशी विचारप्रणाली नाही म्हणून तो पक्ष मागे पडतो आहे. पण भाजपाकडे विषमतावांदी बाजारपेठीय अर्थकारण खपविण्याचा सोपा मार्ग आहे. त्याचे नाव आहे हिंदुत्ववाद. गरीब देशात . सत्ताधारी गट उंजवे धोरण आखताना विपर्यस्त जाणीवांचा आधारं घेतात व आपले वर्चस्व टिकवून धरतात. स्वपन दासगुप्ता यांना व त्यांच्यासारख्या इतर पत्रकारांना जर भाजपा हा एक उजवा पक्ष म्हणून पुढे यावा असे वाटत असेल तर त्यांना त्याचे हिंदुत्वही घ्यावे लागणार. नाहीतरी या मंडळींचा स्थितीवाद काय सांगतो? 'स्थितीवाद अर्थातच - प्रस्थापित कायद्याच्या चौकटीत गहण्याचा प्रयल करतो. व राजकारणावर मर्यादा घालावी, बहुजनांनी राजकारणात येऊ नये अशा मताचा असतो. भाजंपाने असला विचार केव्हाच सोडून दिला आहे. सामान्य जनांना कृतिशील बनवत त्यांना राजकारणात आणायचे, - त्यांच्या सहाय्यानेच सत्ता काबीज करायची व सर्वच क्षेत्रात हिंदुत्ववादी राजकारणाने हस्तक्षेप करायचा.असे धोरण भाजपाने स्वीकारलेले आहे. कायदा, राज्यघटना, परंपरा, धर्म, संस्कृती या गोष्टी गुंडाळून ठेवून आपले राजकारण पुढे रेटायचे हे ध्येय त्याने आपल्या समोर ठेवले आहे. त्यांना सबुरीचा सल्ला देण्याचा ओळेपणा इंडिया टुडेने करू नये कारण त्यात ते स्वतःला तर फसवतातच पण त्यांच्या वाचक वर्गालाही गोंधळात टाकतात.
मुकाबला
म्हणून मध्यमवर्गातील उभी फूट फार गंभीरपणे घेता येणार नाही. तरीही हेही खरेच की भाजपाचे हिंसक व रानटी रूप न आवडणारे बरेच लोक मध्यमवर्गात आहेत व त्यामुळे आशेला. जागा आहे. मध्यमवर्गातील या अंतर्विरोधाचा नवनाझीवादाचा प्रतिकार करताना उपयोग होण्याची शक्यता आहे. भाजपाचा जो , एकामागून एका राज्यात गेल्या तीन वर्षात पराभव झाला आहे त्यावरूनही भाजपाच्या मर्यादा लक्षात येत आहेत. सहमतीच्या काळात सब घोडे बारा टक्के होतात. अशावेळी गर्दीपांसून वेगळे दिसण्याचा प्रयत्न करणारा पक्ष म्हणून भाजणा पुढे येतो आहे. पण हे वेगळे दिसण्यासाठी जे त्याने सोंग घेतले आहे ते भारतीय राष्ट्रवादाच्या व हिंदुधर्माच्या मुळावरच घाला घालणारे आहे व लोकशाहीस तिलांजली देणारे आहे म्हणून त्याचा मुकाबला करणे. गरजेचे आहे | पण हा मुकाबला कसा करयचा ? काहीजण सुचवतील की हिंसावादाला, विहिंप व बजरंग दलाला प्रत्युत्तर त्यांच्याच भाषेत द्यावे. पण ही घोडचूक करू नये. एकतर त्यामुळे ज्या लोकशाहीच्या रक्षणासाठी. सर्व खटाटोप करायचा तो हेतू मागे पडेल व आपणही लोकशाहीच्या जीवावर उठू. संघपरिवाराला तेच हवे आहे. शिवाय हिंसा ही मनुष्यमात्राला न शोभणारी गोष्ट आहे. सत्याग्रही चळवळीद्वारे जनशक्ती प्रचंड प्रमाणावर उभी करणे - याला पर्याय नाही. जवळचे रस्ते शोधणाऱ्यांनी, जनशक्ती उभी करण्यास असंमर्थ असणाऱ्यांनी हिंसेची भाषा करणे हे नेहमीचेच आहे. पण त्यातच आत्मघातकीपणा दडलेला आहे हे विसरता. कामा नये. हांतात बंदूक घेतलेला माणूस समोरच्या माणसाला . मारण्याशिवाय दुसरे फारसे काही करू शकत नाही. जनशक््तीचा पाठिंबा असेल तर हिंसेची गरज राहत नाही. नक्पलवादी गेली. तीस वर्षे हिंसाचार करीत आहेत. कारण त्यांच्यामागे लोक नाहीत. पंजाबातील अतिरेकी कारवाया थांबल्या कारण त्यांच्या मागे लोक नव्हते.
मुस्लिमांनी चांगले वागावे असेही सांगितले. जाते. संघपरिवाराच्या मते चांगले म्हणजे काय ते आपल्याला ठाऊक. आहे. थोडक्यात सांगायचे तर मुस्लिमांनी मुस्लिम अशी ओळख ठेवू नये असा त्याचा अर्थ होतो. हे मात्र खरे आहे की त्यांनी मूलतत्त्ववाद्यांच्या आहारी जाऊ नये. हिंदुत्ववाद्यांनी त्यांना हिंसेस प्रवृत्त केले तरी त्यांनी मात्र मूलतत्त्ववादी न होता. किंवा उलट हिंसा न करता सत्याग्रही मार्गाने हिंदुत्ववाद व मूलतत्त्वंवादाचा प्रतिकार केला पाहिजे. दुसरी एक. गोष्ट नमूद केली पाहिजे. हिंदुत्व हा बकासूर आहे. त्याची भूक भागत नाही. त्याला रोज एक बळी लागतो. आज मुस्लिम उद्या दुसरे कोणीतरी. परवा खिश्चन होते. पारशी, दलित, आदिवासी, जैन, शीख कोणीही चालेल. बकासूर कोणातही फरक करीत नाही. त्याची एक मागणी मान्य केली की दुसरी मागणी येणार. ती मान्य केली की तिसरी येणार. राममंदिर बांधणे ही गोष्ट प्रासंगिक आहे व आत्ता उपयोगी पडणारी आहे. उद्या दुसरी गोष्ट पुढे येऊ शकते.
नवनाझीवादाचा प्रतिकार करण्याचा ताबडतोबीचा मार्ग म्हणजे आणीबाणीविरुद्ध जसे आंदोलन झाले तसे आंदोलन छेडणे. भाजपाचा पराभव सर्वत्र होत आहे त्याला या आंदोलनाने हातभार लागेल. टुसरा एक तातडीचा मार्ग म्हणजे लोकशाहीवाद्यांनी एकत्र येणे व संघटितपणे नवनाझीवादाचा लोकशाही मार्गाने प्रतिकार करणे. राजकीय डावपेचाचा व निवडणुकीच्या आगामी फेरीच्या दृष्टीने विचार करता काँग्रेस व इतर भाजप विरोधकांनी म्हणजे लालूप्रसांदांचा रा.ज.द. मुलायमसिंग यांचा सपा, डावा व उजवा कम्युनिस्ट पक्ष इत्यादी पक्षांनी एकत्र येऊन भाजपाविरोधी आघाडी उभी करून या राक्षसाचा पराभव करणे हा उपाय होऊ शकतो. ही सर्व आंदोलने. करताना किंवा आघाड्या करताना मुस्लिम मूलतत्त्ववाद्यांना, त्यांच्या नेत्यांना पूर्णपणे दूर ठेवणे, प्रस्थापित मध्यममार्गी पक्षात (जनता दल किंवा. समाजवादी पक्ष) किंवा काँग्रेस पक्षातही जर मूलतत्त्ववादी नेते असतील तर त्यांनाही दूर ठेवणे आवश्यक आहे. हिंदुत्ववाद व मूलतत्त्ववाद याचा मुकाबला एकाचवेळी व तोही लोकशाही मार्गनि करण्यास पर्याय नाही. हे दोघे म्हणजे एकमेका सहाय्य करू, अवघे धरू कुपंथ या आदर्शाप्रमाणे वागणारे आहेत. भारतीय जनतेला कुपथावर घेऊन जाणाऱ्या शक्तींचा सत्याग्रही लोकशाहीवादी जनआंदोलनाने पराभव करणे हे आज अनिवार्य झाले आहे.
--------------------------------------------------
समाज प्रबोधन पत्रिका ( ) मध्ये प्रकाशित