फॅसिझम हा शब्द बऱ्याच वेळा अगदी ढोबळ अर्थाने वापरला जातो. आपल्या विरोधकांना फॅसिस्ट म्हटले जाते. सारखा वापरल्यामुळे फॅसिझम हा शब्द थोडा गुळगुळीतही झाला नाहे. स्वतचा खरा अथंच तो गमावून बसला आहे. यामुळे खरे फॅसिस्ट कोण, खरी फॅसिस्ट चळवळ कोणती हे - नीट कळत ताही. आणि फेॅसिझमचा मुकाबला कसा करायचा याबाबतही निश्चित कार्यक्रम ठरविता येत नाही. संद्धांतिकड दृष्ट्या पाहिले तर फॅसिझमची काटेकोर व्याख्या करणे तसे अवघडच आहे. फॅसीज 135065 या लॅटीन शब्दावरून फॅसिझम हा शब्द .तयार झाला आहे. फेंसिज म्हणजे मध्ये कुऱ्हाड असलेली काठ्यांची जडी. प्राचीन रोममध्ये हे अधिकाराचे चिन्ह झाले होते. मुसोलिंनीने शिस्त, एकता, सामथ्ये व. नेतृत्व याचे द्योतक म्हणून या शब्दाचा उपयोग आपल्या पक्षासाठी केला (१९१९). जमंनीत हिटलरच्या नेतत्वाखाली ज्या नाझी पक्षाची स्थापना करण्यात आली (१९२१) त्यांच्या विचार< . प्रणालीला नाझीझम असे म्हटले जाते. हा फॅसिझमचाच एक जास्त अतिरेकी व सर्वकष प्रकार आहे. मख्य वशिष्व्ये फंसिझम म्हणजे ताकिकदृष्ट्या सुस्पष्ट व सुबद्ध विचार« सरणी नव्हे. एखाद्या देशातील परिस्यितोप्रमाणे तिथे फॅसिस्ट चळवळ निर्माण होईल को नाहो आणि निर्माण झाली तर तिचे स्वरूप कसे असेल हे ठरते. तरीही फेसिझमची काही प्रमुख वशिष्ट्ये सांगता येतात व त्यायोगे त्याचा अर्थ समजून घेता येतो. लोकज्ञाहीविरोध, आक्रमक राष्ट्रवाद, व्यक्ति स्वातंत्र्वविरोध, समतावादास व समाजवादास विरोध, प्रस्थारू पितं राजकोय्र पक्षांवर टोका, एकाधिकारशाहोवर आधार- लेल्या पक्षाची सत्तेतील मक्तेदारी, एका अलौकिक नेत्यावर विश्वास, पक्षाचे निमलष्करी स्वरूप, जनतेच्या चळवळो उभ्या करण्यासाठी खोट्या प्रचाराचा अवलंब, दहशतवादी मार्गाचा वापर, हिंसेचे उदात्तीकरण, अविवेकंवाद, विशिष्ट सामाजिक गटाबद्दल शत्रुत्व आणि सत्ताधारी वर्गाच्या हित संबंधांचे रक्षण अशी फॅसिझमची काही वशिष्ट्ये म्हणून सोंगता येतोल. _ फंसिझमचा सिद्धान्त आपल्याला असे सांगतो की, फसि- झमचा उदय सवंसाधारणत: प्रगत भोद्योगिक देशात होतो. ज्या देशात ताकदवान भांडवलदारवगं व संघटित कामगारवगे व . त्यांची राजकीय चळवळ असते अश्या देशात सामाजिक प्ररनांना तोंड .न देऊ शकणारा मोठा मध्यमवगे असेल, सामाजिक व आथिक पेचप्रसंगामुळे अनिश्चितता निर्माण झाली असेल आणि लोकांचा राजकीय व्यवस्थेवरोल विश्वास उडाला असेल तर फेसिझमची निर्मिती शक्य असते. समाज- वादो व कामगार चळवळीचा पराभव झाला असेल, त्यांचे नीतिधयं खच्ची झाले असेल तर फॅसिस्ट पक्षाचे फावते. या पक्षाकडे राजकोयदृष्ट्या जागृत, भीतिग्रस्त मध्यमवगे आक षित होतो. छोटे व्यापारी, लहान भांडवलदार, शेतकरी पांढरपेशे व कनिष्ठ कमचारी फॅसिस्टांच्या प्रचाराला भलतात. आथिक पेचप्रसंगावर मात करण्यासाठी भांडवलदारव्ग फॅसिझमचा भाश्रय घेतो व स्वत:चे व्चंस्व पुन्हा प्रस्थापित करतो.
नव-फॅसिझम
महायुद्धपूंव इटली (१९२८-४५) व जमंनी(१९३३-४५) मर्धांल राजवटोंमध्ये वरील लक्षणे स्पष्टपणे दिसून आलो होती व त्यावरूनच मुख्यत: फॅसिझमचा सिद्धांत तयार झाला आहे. परंतु या दोन राजवटीपुरतीच फॅसिझमची चर्चा मर्यादित केलो तर फॅसिझमचा अथे संकुचित होईल व दुसर्या महायुद्धापूर्वी युरोपातील इतर देशांमध्ये ज्या फॅसिस्ट स्वरूपाच्या राजवटी सत्तवर आल्या होत्या किंवा महायद्धा- नंतर स्वतंत्र झालेल्या द. अमेरिका, आफ्रिका व आशिया खंडातील देशात ज्या हुकुमशाही व लष्करी राजवटी उदयाला आल्या त्यांचे विश्लेषण आपल्याला करता येणार नाही. फॅसिझमच्या जास्त जवळ जाणाऱ्या राजवटींमध्ये फ्रेकोचा स्पेन व सालाझारच्या पोतुंगालचा उल्लेख होतो. पण स्पेन मधील फॅसिस्ट पक्षास. इटली किवा जर्मनीतील जनतेचा पाठिबा असणाऱ्या पक्षासारखे निर्णय स्वातंत्र्य नव्हते. त्याच्यावर लष्कराचे नियंत्रण होते. फ़ेकोच्या राजवटीस पक्षापेक्षा लष्कर, पोलिस व नोकरश्याहीचा आधार होता. विचारसरणीच्या प्रांतात चचंत्ते वर्चस्व होते, प्रभत्वश्ाली वग होता सरंजामदारांचा तेथील भांडवलशाहीचा विकास मर्यादित होता. पोर्तुगाल मध्ये या प्रकारच्या स्थितिवादी शक्तींचाच प्रभाव जास्त होता. दुसऱ्या महायुद्धापूर्वी पोलंड, रुमानिया, ग्रीस व य॒गोस्लाव्हीया या देशात लष्करी हुकुमशाहीचे वेगवेगळे प्रकार अस्तित्वात होते. ते स्थितोवादोच होते. जमंनोतले फॅसिझम सारखी सर्वकष व्यवस्था त्या ठिकाणी नव्हती. दुसर्या महायुद्धानंतर दक्षिण आफ्रिका व आशिया खंडातील औद्योगिकदृष्ट्या अ्धविकसित देशांमध्ये लष्करी हुकुमशाही शासनसंस्था उदयास आल्या. या हुकुमशाही शासनास जनतेचा मोठा पाठिंबा असतोच असे नाही. विस्तारवादी धोरण हे देश स्विकारू शकत नाहीत कारण ते स्वतःच बड्या साम्राज्यवादी सत्तांवर अवलंबून असतात. या राजवटींना विचारप्रणालींची. साथही नसते. त्यामुळे त्या अस्थिर असतात व सत्ताधारी वर्गाला आवश्यक ते स्थंयं त्या प्राप्त करून देऊ शकत नाहीत. ' पाशवी बळाचा वापर करून सत्ता टिकवून धरणे हाच त्यांचा माग असतो. यातील काही देशात नेत्यांचेअलौकिकत्व मात्र उपर योगी पडते. अलोकिक नेतृत्त्व आणि विचारप्रणाली तसेच जनतेचा मोठा पाठिंबा या तिन्ही घटकांचा मिलाप आपल्याला दिसतो खोमेनीच्या हुकुमशाही राजवटोत. परिचम आशियातील देशात गेल्या काही वर्षात मुस्लीम मूलतत्त्ववादाचा उदय होऊन राजेशाही व हुकुमशाही स्वख्पाच्या ज्या राजवटी सत्तेवर आल्या त्यामध्ये फॅसिझमचो वरोच लक्षणे आढळतात. या राजवटींनी लष्करीकरण, य॒द्धखोरौी व आक्रमक राष्ट्रवाद याही गोष्टींचा अवलंब केला होता.
प्रगत ओद्योगिक देशांनी आथिक पेचप्रसंगावर मात करण्याचे तंत्र विकसित केले आहे. कामगारवर्गाला प्रस्थापित व्यवस्थेत स्वारस्य निर्माण केळे आहे, तसेच कल्याणकारी कायंक्रमांद्वारे आथिकदृष्ट्या कमकुवत गटांचा विरोध बोथट केला आहे, अशा देशात फॅसिस्ट राजवटीची गरज भासत नाही. सामाजिक नियंत्रणाचे इतके सुप्त मार्ग उपलब्ध झाले आहेत को मोठ्या सामाजिक संवर्षाची शक्यताही टाळता येते. या देशांत प्रस्थापित उजवे पक्षच प्रसंगी काहीसे फॅसिस्ट स्वरूप धारण करतात. रेगन, बुश, थॅचर यांची उदाहरणे या संदर्भात घेता येतील. सामाजिक व आर्थिक अंतविरोंधाचे प्रतिबिब अतिउजव्या, वंशवादी व एत्हेशीयवादो संघटनांच्या चळवळोंमध्ये पडते. अमेरिका, इंग्लंड व जमंनी या प्रगत देशांत अक्ञा प्रकारच्या फॅसिस्ट चळवळी व संघटना कार्यरत आहेत. या संघटनांना लोकांचा नेहमीच कृतिशील पाठिबा असतोच असे नव्हे. पण सुप्त पाठिवा असू शकतो. या संघटना हिंसा, परकियांचा किवा विशिष्ट वंशांच्या लोकांचा दृष आणि आक्रमक राष्ट्रवाद यांचा आधार घतात. यांच्या चळवळीचा उद्देश सवंकष फॅसिस्ट राजवट प्रस्थापित करणं हा नसतो. पण सत्ताधारी पक्षाला उजवीकडे ढकलण्याचे व वंशवादी धोरण स्विकारायला लावण्याचे कार्य त्या करतात. दुसऱ्या महायुद्धानंतर मागासलेल्या देशांमध्ये लष्करी हुकुमज्ञाही, राजेशाही, मलतत्त्ववादावर आधारलेली हुकुमशाही यासारखे राजवटीचे जे प्रकार उदयाला आले किवा प्रगत देशातील स्थितीवादी व उजव्या पक्षांनी जे अतिउजवे किवा फॅसिस्ट स्वरूप घेतले आणि तेथे ज्या वंशवादी व एतहदेशीय- वादी संघटना स्थापन झाल्या त्या सर्वांचा एकत्रित. विचार करता असे म्हणावे लागते को, फॅसिझम या संज्ञेचा या सर्वाच्या संदर्भात काटेकोरपणे वापर करता येईलच असे नव्हे. त्याऐवजी या चळवळींना व राजवटींता नव-फंसिझम असे संबोधले पाहिजे. नव फॅसिझममध्ये महायुद्धपूव फॅसिझम- मधील काही महत्त्वाची वेशिष्टले असतीलच पण बदललेल्या सामाजिक वास्तवाप्रमाणे या फॅसिझमने काहो नव्या मार्गांचा व प्रकारांचा अवलंब केलेला असेल. नवफॅसिझम स्वतःच्या पक्षाची राजवट आणेलच असे नाहो. राजवट आली तरी ती सवंकष सवंस्पर्ी असेलच असे नाही. नवफेसिझम पाशवी बळाचा, हिंसेचा व दहशतीचा वापर करेल पण देशकाल- परिस्थितीप्रमाणे त्याचा कमोअधिक वापर होईल. विचारप्रणा- ठीचे वचंस्व नवफेसिझम महत्त्वाचे मानेल, सत्ताधारी पक्षाला उजवीकडे, वंशवादाकडे ढकलेल. दबाव तंत्राचा वापर करेल. मागासलेल्या देशातही असा नवफॅसिझम येऊ शकतो. धर्म संस्थेचा व मलतत्त्ववादाचा प्रभाव त्यात जास्त असेल. ख्िरचन.' मस्लोम मलतत्त्ववादाचे रूप नवफंसिस्ट असेल.' स्थितीवादी पक्ष फॅसिस्ट मार्गांचा प्रसंगी वापर करेल. प्रचार राच्या व सामाजिक नियंत्रणाच्या तव्या मार्गांचा वापर करण्यात येईल. सत्ताधारी वर्गातोल अंर्तावरोधाचा फायदा त्याला मिळेल. प्रवंगोरववादी भूमिका घेऊन स्थितीवादी शक्तीला तो आपल्या ताब्यात ओढेल. सत्तेवर आलाच तर लोकशांहीचा देखावा चाल ठेवून आतून हुकुमशाहीचा तमाशा कायम ठेवेल. आंतरराष्ट्रीय साम्राज्यवादाशो जुळवून घेऊन आपले प्राबल्य कायम ठेवेल.
हिदुत्ववाद
या चचेच्या पाश्वंभमोवर आपल्याला भारताच्या सद्य- स्थितीतील राजकारणाकडे वळायचे आहे आणि त्यातील हिंदुत्ववादाचे स्वरूप समजून घ्यायचे आहे तसेच या हिंदुत्व- वादाचा प्रभाव वाढण्याची कारणमीमांसा करायची आहे. आजपयंत रा. स्व. संघ, विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, .. शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष या रांघटनांना व पक्षांना जातीयवादी-जमातवादी म्हणन ओळखले जायचे, भाजपला स्थितीवादी पक्ष म्हटले जायचे. रामशीलापूजन-रथयात्रा व मशिद पाडणे या घटनाक्रमाचा विचार करता, त्याप्रसंगी हिंसक मार्गाचा झालेला वावर पाहता आणि भाजप सरकारचे उत्तरेतील चार राज्यातील वतंन लक्षात घेता असे म्हणावे लागते की हिंदुत्ववादो संघटनांनी व पक्षांनी जमातवादाची व स्थितिवादाचो मर्यादा ओलांडली आहे. म्हणजे आता त्यांनी नवफॅसिझमचे रूप धारण केले आहे का? या प्रश्ताचे उत्तर आपल्याला द्यावे लागणार आहे. फॅसिझमची कोणती लक्षणे हिदुत्ववादात भाढळतात, हे पाहावे लागणार आहे. फॅसिझमचा आविष्कार एका विचारप्रणालोच्या रूपाने होतो. ही विचारप्रणाली अनुयायांच्या रोमरोमात भिनलेली असते व तो लोकसमृहांना भाकषित करून घेते. हिंदुत्ववाद या विचारप्रणालीच्या आधारे येथोल हिंदुसंघटनांची चळवळ उभो राहिलेली आहे. या बावतीत खोमेनीच्या मुस्लिम मूल- तत्ववादी चळवळोशी या चद्धवळोचे साम्य आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. हेडगेवार व गोळवलकर गुरुजी यांनी त्याची मांडणी केली आहे. आक्रमक हिंदुत्व हा राष्ट्रवादाचा आधार मानन चातुवण्यं व्यवस्थेअंतगंत स्व जातींमध्ये एको प्रस्थापित करणे व हिंदु परंपरेचा अभिमानी व सामथ्येवान समाज निर्माण करणे हे ध्येय त्यांनी समोर ठवळे आहे. गोळवलकर गुरुजींचा पारंपारिक हिंदुत्ववाद व सावरकरांचा नव हिंदुत्ववाद असा फरक करता येतो. बाळासाहेब देवरस यांच्याकडे रा. स्व. संघाचे धरिणत्व आल्यापासुन (१९७३) कनिष्ठ जातींना बरोबर घेऊन राजकोय हस्तक्षेप करण्याची नव- हिंदुत्ववादी भूमिका संघ परिवाराने घेतली आहे. हिंदृत्त्व« वाद्यांच्या विचारात चातुवष्य व्यवस्थेची तरफदारी स्पष्टपणे आढळते. सामाजिक डाविनवादाचा प्रभावही दिसून येतो. त्यातूनच वंश व वणंश्रेष्ठत्त्वाचे समर्थन आलेले आहे. लायक- प्रबळ असेल तोच तरेल. (सरव्हायव्हल ऑफ फिटेस्ट) हा निसर्गातील नियम समाजास लागू करणार्या विचाराला सामाजिक डाविनवाद असे म्हणतात. यातूनच विषमतेचे समथन केले जाते. त्याला नकली-विज्ञानाचा आधार दिला जातो व शास्त्रीय सत्य म्हणन ते खपवले जाते. हिंदुत्ववादाने हा प्रकार केलेला आहे. हिटलर व मुसोलिनी. यांच्याबद्दल त्यास कमालीचे आकषण असते ते यासाठीच. खरे तर हिंदु- धर्माची रचना एकाधिकारशाहीला साथ देणारी नाहो याचे - अग्रलेखाचे शोषेक होते ' देशद्रोह्यांना चिरडा. ' शिवर्सनिकांना दिलेला आदेश तर होताच पण वाचकांनाही हिदुत्ववाद्यांना मनापासून वाईट वाटत असावे. हिदू धम हा संघटित धम नाही. त्याच्यामध्ये अंतिम अधिकार असलेले एक केंद्र नाही. धमंगुरूची उतरंड नाही. पंथ-उपपंथ संप्रदाय- उपसंप्रदाय, जाती-उपजाती यांच्यामध्ये विभागलेला, अनेक उपासना पद्धती असलेला, स्वायत्त गटांचे कडबोळे असलेला एक धार्भिक समाज आहे. त्यामुळे एकछत्री हिंदुत्त्व प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात अडथळे निर्माण होतात. मृसलमानांचा, ख्िचनांचा, ज्यंचा व शिखांचा हिंदुत्ववाद्यांना हेवा वाटतो. कारण हे सर्वे संघटित धर्म आहेत व त्यांच्या अनुयांयावर धमंगुखूंचा अंमल चालतो. याच कारणासाठी हिंदुत्ववाद्यांनी या धर्मांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न चालविला आहे. पारंपारिक एकछत्री संघटना नाही म्हणून त्यानी हिंदुधर्मी- यांच्या विश्व हिंदु परिषदेसारख्या संघटना बांधल्या आहेत.' साध-संतांच्या संघटनांशी संधान जोडले आहे. असे जर केले नाही तर या समाजात काय होईल हे एका उदांहरणावरून स्पष्ट होते. उत्तरेत रामलीलेत रावणाच्या प्रतिमेचे दहन होते तर द्रविड कझगमच्या चळवळीत रामाच्या प्रतिमेचे. कारण राम हा उत्तरेचा, आर्यांचा, हिंदी भाषिकांचा देव, दक्षिणेतील द्रविड हिंदूंना चालत नाहो. ( अण्णा द्रपुक व भाजप यांचे सध्याचे सख्य म्हणजे काळाने त्यांच्यावर उगवलेला सूड आहे, असे म्हणावे लागल. )
हिसा आणि धाकदपटशा
थोडक्यात सांगायचे तर हिदुधर्माची व समाजाची रचना लोकल्ञाहीस व स्थानिक स्वायत्ततेस जळणारी आहे. अशा समाजात एकछत्री एकारलेळे राजकीय हिंदूत्व लादणे तसे भवघड आहे आणि बहुधा त्यामुळेच प्रचारासोबत बळाचा वापर करावा लागतो. तुमच्या समाजात अंतगत एकत्त्व नसेल तर तुम्ही परधर्मीयांना शत्र करता व त्याला पापाचे धनी बनवन या समान शत्रशी तुमच्या अनुयायांना संघर्ष करायला उद्य्त करता.. फॅसिझमचे विशेषतः नाझीझमचे वशिष्ट्य होते ज्यंना देशद्रोही ठरवायचे व त्यांचा छळ करायचा. असाच प्रकार हिंदुत्त्ववादी मुस्लिमांबाबत करू पाहतात. रथयात्रेनंतर झालेल्या दंगलींमध्ये व मशिद पाडल्यानंतर झालेल्या दंगलो- मध्ये याचे उग्र स्वरूप आपण प्रत्यक्षात पाहिलेले आहे. सात डिसेंबर १९९२च्या.' सामना ' मधील बाळासाहेब ठाकऱ्यांच्या - अग्रलेखाचे शोषक होते ' देशद्रोह्यांना चिरडा. ' हा त्यांनी शिवर्सनिकांना दिलेला आदेश तर होताच पण वाचकांनाही दिलेली चिथावणी होती. आपले राजकोय सत्ता संपादन करण्याचे ध्येय गाठण्यासाठी हिंसेचा वापर करणे, दहशतवादाचा वापर करणे हे फॅसिझमचे एक वेशिष्ठय आहे. पंजावातील खलिस्तानवाद्यांनी व॒कार्मीरमधील लिबरेशन फ़ंटने- या मार्गाचा अवलंब गेली काही वषें सातत्याने केलेला आहे. हिंदुत्त्ववादी संघटनांनीही दहशतवादाचा स्वीकार करायचे ठरवलेले दिसते. हिंदुराष्ट्राच्या स्थापनेसाठी केलेल्या हिसेचे उदात्तीकरण करणेही सोपे आहे. याचा अथे खलिस्तानवाद्या- प्रमाणे आधुनिक हिंदुत्त्ववादी हिसा करतील असे नाही परंतु परधर्मीयांवर दंगलीच्या काळात जी दहशत बसवली जाते तो आपण लक्षात घेतलो पाहिजे. दहशतवादाचा हा झाला.,एक अविष्कार. दुसरा प्रकार आहे हिंदुत्ववादी चळवळोला विरोध करणाऱ्यांवर जी जरब बसवलो जाते त्याचा. अखिल भारतोय विद्यार्थी परिषदेच्या. मुंबईतील कार्यकर्त्यांनी आनंद पटवधन यांचा चित्रपट दाखविण्यास गल्या महिन्यात जो विरोध केला त्याचे उदाहरण या संदर्भात घेता येईल. ब्रह्मदत्त शर्मा यांच्याशी मध्यप्रदेश भाजपच्या सरकारने जे असंस्कृत वतंत्त केले किवा शंकरगुहा नियोगी यांच्या हृत्त्येच्या वेळी जी भूमिका घतली त्याचा उल्ळेख येथे करता येईल.
संघटनात्मक बळ
लोकशाही संस्थांबद्दळ ६ डिपेंबरला हिंदुत्त्ववादी संघटनांनी जो अनादर दाखविला आहे, सर्वोच्च न्यायालय व राज्यघटना या भारतोय लोकशाहीच्या आधारस्तंभांचो जी अवहेलना केळी आहे आणि पत्रकारांवर जें हल्ले केळे आहेत त्यामुळे हे सिद्ध होते को हिंदुत्वाची घोडदौड चालू असताना जर वाटेंत लोकशाही संस्था व परंपरा आपल्या तर त्यांची पायमल्ली करण्याची हिंदुत्ववाद्यांची तयारी आहे. उच्च प्पेयाकडे,कूच करताना हे कृत्य झाले असल्ययामुळे त्याचे नेतिक समथेनही केले जाईल. पण अश्ली लोकश्ञाहीविरोधी कृती व दहशतीचा पद्धतशोर वापर करणे हिंदुत्ववादास शक्य होते याचे कारण त्यांच्याकडे लाखो प्रशिक्षित अनयायी, स्वयंसेवक किंवा सभा- संद आहेत व त्यांना सहाय्य करणारे त्यांच्याहन कितीतरी पटीने जास्त सहानभ्तीदार आहेत.
गांधीहृत्त्येच्या वेळो रा. स्व. संघात चाळीस हजार सभा- सद होते. आज संघाचे पस्तोौस लाखाहून जास्त सभासद आहेत व तीन हजार प्रचारक आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व जनता यवा मोर्चा यांचे पंधरा लाख सभासद आहेत. तर भारतोय मजदूर संघाचे तौस लाख कामगार व कमचारी सभासद आहेत. चोवीसशे कामगार संघटना त्याच्याशी संलग्न आहेत. वनवासी कल्याण संघाच्या शाखा एकतीस हजार आदिवासी वस्त्यांत पोहूचल्या आहेत. सेवाभारती या झोपडपट्टीत कार्य करणाऱ्या संघटनेची दहा हजार केंद्रे आहेत. विद्याभारती या संघटनेच्या. पाच हजार शाखा असून त्यात बारा लाख विद्यार्थी व चाळीस हजार शिक्षक आहेत. विश्व हिंदु परिषद ही जागतिक संघटना असून तिच्या देशोदेशी शाखा पसरल्या आहेत. एकट्या महाराष्ट्र राज्यात परिषदेची चारशे केंद्रे, चार लाख अनुयायी व हंभर पूर्णवेळ कार्यकत॑ कार्यरत आहेत. हिंदूंच्या वेगवेळ्या पंथांच्या कार्याचे सुसूध्रीकरण करणाऱ्या या संघटनेतफ एकशे साठ विकास प्रकल्प महाराष्ट्र राज्यात राबवले जात आहेत. याशिवाय संघ परिवारात भारतोय जनता पक्ष या अखिल भारतीय पक्षाचा समावेश होतो. लोकसभेत त्याचे ११९ खास- दार आहेत व उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश व. राजन स्थान या राज्यात त्याचे परवाच्या बरखास्तीपयेत सरकार होते. शिवाय बजरंग दल ही उत्तरेत काही वर्षापूर्वी स्थापन झालेली संघटना व शिवसेना हा महाराष्ट्रातील पक्ष हिंदुत्त्व” वादी संघटनांमध्ये मोडतो. शिवसेना व भाजप यांची युती असून त्यातील शिवसेना हा जास्त आक्रपक व भडक स्वरू- पाचा पक्ष आहे. हिदुत्त्ववाद्यांनी इंग्रजी हिंदी व प्रादेशिक भाषांमध्ये वत्तपत्र व साप्ताहिके चालवली आहेत. रा. स्व. संघाचे सहानुभतीदार इतर राजकोय संघटनांमध्ये महत्त्वाच्या जांगा अडवून आहेत. नोकरशाही, जनसंपर्क साधने, पोठीस व निमलष्करी दलांमध्ये हिंदुत्ववादावर विश्वास असलेली बरीच मंडळी आहेत.
या हिंदुत्त्ववादी संघटनांची अंतर्गत रचना विशेषतः रा. स्व. संघाची रचना एकाधिकारशाहीवर आधारलेली आहे. या संघटना कडक शिस्त ब निमलष्करी रचना या तत्त्वावर उभारण्यात आलेल्या आहेत. त्यांच्या लाखो सभासदांना वरून आलिल्या आदेशाप्रमाणे कृतो करण्याचे प्रशिक्षण दिठेले आहे. म्हणनच सहा डिसंबरचो षड्यंत्र रचून केलेली कृती शक्य झाली. निश्याणाचे, भगव्या झेंड्याचे असाधारण महत्त्व, संच लत, गणवेष, बंदिस्त विचार, मिथ्या कल्पनांवरील अंध विश्वास, आज्ञापालन, परधर्मीयांबद्दल दष, विरोधकांबद्दल अनादर, संसूचनाचे घट्ट विणलेले जाळे आणि लहान वया पासून झालेले. दिंदुत्त्ववादी संस्कार या सव घटकांमुळे हिंदुत्त्व वादो संघटनांचे व विशेषत: संघ परिवारातील संघटनांचे लाखो सभासद व स्वयंसेवक संपूर्ण देशातील राजकारणावर प्रभाव टाकू शकणारो व त्याला हिंदुत्त्ववादी वळण देणारी पूर्वः नियोजित कृती करू शकतात.
लोकशाही यंत्रणेचा वापर
भाजप व शिवसेना हे पक्ष आणि संघ परिवारातील संघटना आपल्या प्रचारात, लेखनात, भाषणात सातत्याने प्रस्थापित संसदीय पक्षांवर व राजकौय नेत्यांवर कडवट भाषत टीका! करोत असतात. सवजण सत्तेचे राजकारण करोत आहेत असा त्यांचा ठरलेला आरोप असतो. राष्ट्रहिताला प्राधान्य देणारा आपलाच काय तो पक्ष आहे. फॅसिस्ट संघटनांचे सवंदूर हे एक वैशिष्ट्य राहिलेले आहे. तेच आपल्याकडेही दिसते. उघड- पणे दिसणारा नेतिक दंभ व विरोधकांना राष्ट्रविघातक ठरविणारा प्रचार हे अशा संघटनांचे तंत्र असते. त्याचाही अव लंब हिंदुत्त्ववाद्यांनी अत्यंत खुबीने करून आपले वैचारिक प्रभत्त्व प्रस्थापित करण्याचा अलिकडच्या काळात यशस्वी प्रयत्न केला आहे. हिंदधर्माचे आपणच काय ते रक्षक आहोत आपल्यावर टीका जंदी म्हणजे हिंदुधर्मीयावर टीका व त्यांच्या धर्मावर बंदी असे खोटे समीकरण प्रसृत करण्यास संघ परि- ऱवाराने सुरवात केली आहे. लोकांच्या भावना भडकवून त्यांच्यात उन्माद निर्माण करून त्यांना कृतोप्रवण करणे हे फेसिस्टांचे तंत्र त्यास अवगत आहे. प्रस्थापित राजकोय रचनेवर हल्ला करत व इतरांना सत्तापिपासूं म्हणत म्हणत स्वतःच्या सत्ता- -संपादनासाठी त्याच प्रातिनिधिक लोकशाहीचा उपयोग करणे हाही त्याच तंत्राचा भाग आहे. दक्षिण अमेरिका किवा आफ्रिकेतील लष्करी हुकूमशाही राजवटोंना जनतेचा पाठिबा नसतो. ततेच यातील बऱ्याच राजवटी बंड करून, उठाव करून सत्तेवर आलेल्या असतात. या उलट फंसिस्ट पक्षांच्या राजवटी लोकांच्या पाठिब्यावर उभ्या असतात व त्यांनी सत्तः वर येण्यासाठी प्रतिनिधिक लोकशाहीचा मार्ग अनुसरलेला .असतो. हे पाहता भारतातील हिंदुत्ववाद जनतेचा पाठिबा 'व निवडणुकातील विजय यावरच अवलंबून राहणार आहे असे लक्षात ठेवले पाहिजे. जनसमृहांचा पाठिंब्याच्या बावतोत येथील हिंदुत्त्ववादी व मुस्लीम मूलतत्त्ववादावर आधारलेली खोमेनीची राजवट यात साम्य आढळते. परंतु अलौकिक नेतृत्वाच्या बाबतीत मात्र हिंदुत्त्ववादी संघटना काहीशा वेगळ्या आहेत. खोमेनींची लोकप्रियता ःत्यांच्या भोवतीचे वलय व धर्मंगुरूची प्रतिष्ठा या गोष्टी 'हिंदुत्त्ववादी संघटनांच्या नेत्यांमध्ये आढळत नाहीत. अर्थात लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाची जी झलक गल्या एक- दोन वर्षांत दिसली आहे. त्यावरून “असामान्य ' नेतृत्व -हिंदुत््ववादी संघटनांना मिळणारच नाही असे: म्हणता येणार नाही. पडद्यामागोळ प्रमुख सूत्रधार व सर्वोच्च अधिकार याबाबतीत सरसंघचालकांचे. महत्त्वही लक्षात घ्यावे लागेल. ठाकऱ्यांनोहो असाधारण नेतृत्त्वाची झलक दाखविली आहे. . हिटलर वा मुसोलिनी, फ्रेको किवा पेरा, सालाझार अथवा खोमेनी यासारखे नेतृत्व मात्र आता तरी हिंदुत्तववादाकडे आहि, असे ठामपणे. म्हणता येणार नाही. याबाबतीत तो. युरो< पीय फंसिझमपासून थोडा वेगळा होईल. सावरकर भाज असते व त्यांचा स्वीकार संघपरिवाराकडून झाला असता तर ते अलौकिक नेतत्वाचा अभास निर्माण करू शकले असते असे काहीजण म्हणतील. निदान कट्टर सावरकरवादी म्हणतील.
स्थितिवादाकडूत नव-फसिझमकडे
सर्दैकष राज्यसंस्था भारतात आणण्याचा प्रयत्त हिंदुत्त्व. वादी करतोल का, याचे उत्तर नाहो भसे आहे. एकतर भारता- सारख्या खंडप्राय देशात व अनेक सामाजिक गटात विभाग- लेल्या समाजात सर्वकष राज्य आणणे अशक्य आहे. महायुद्धा- नंतर राज्यसंस्थेचा व अर्थसंस्थेचा ज्या प्रकारे विकास झालेला आहे व सामाजिक नियंत्रणाच्या सुप्त पद्धतोंचा जो अवलंब करण्यात येतो त्यामुळे सवंस्पर्शी राज्य निर्माण करण्याची गरज भासत नाही व ते विकसनशील देशात परवडणारेही नाही. आणिवाणीतील हुकूमज्ञाहीचा अवंलंबही किती मर्यादित होता हे आपण पाहिले आहे. परंतु याचा अर्थ भा. ज. पक्ष हस्तक्षेपवादी राज्य आणणार नाही असे नाही. उत्तरेतील चार घटक-राज्यात या पक्षाच्या सरकारने जे धोरण अंगिकारले होते त्यावरून हा पक्ष स्थितीवादी पक्षाच्या मर्यादा ओलांडतो आहे असे दिसते. राज्यसंस्थेचे काय सोमित करणे, कु शाळा, धम या सारख्प़ा सामाजिक संस्थांची ताकद वाढविण, सामाजिक संस्थांची स्वायत्तता राखणे, राजकोय व धार्मिक परंपरा जपणे, कायदा व सुव्यवस्था राखणे अशी त्थितींवादी पक्षाची विचारसरणी असते. भा. ज. पक्षास व शिवसेनेस या अर्थाने स्थितीवादी म्हणता येईल असे आज तरी वाटत नाही. कारण आक्रमक एकछत्री हिंदुत्ववादाचा बडगा हातात घऊन हे पक्ष आज समाज जीवनाच्या विविध क्षेत्रात हस्तक्षेप करू लागले आहेत. राजकीय परंपरा पायदळी तुडवित आहेत. धमंसंस्थेची स्वायत्तता! नष्ट करोत . आहेत. तिचे राजकोयी करण करून आपल्या दावणीस बांधत आहेत. मध्यप्रदेश व उत्तरप्रदेश मधील भा. ज. पक्षाच्या सरकारांनी पाठय- पुस्तके शेक्षणिक संस्था, इतिहास, धमं, संगीत, संस्कृती, कला _ या क्षेत्रात जो हस्तक्षेप केला .त्यावरून या पक्षास स्थितीवादी अजिबातच म्हणता येणार नाही. आदर्श समाज व त्याकडे
जाण्याचा निश्चित मागे यावर स्थितिवाद्यांचा विश्वास नसतो. याउलट भा.ज.पक्षास हिंदुराष्ट्र या आदर्शाकडे जाण्याचा भाग सापडला आहे असे नजरेस येते आहे. सवकष व सवेस्पर्शी .नसलो तरी हस्तक्षेपवादी, स्वायत्तताविरोधी राज्यसंस्था आणून हा पक्ष स्थितिवादाची मर्यादा ओलांडतो आहे. तो फॅसिस्ट मार्गाचा वापर करताना दिसतो आहे. भांडवलशाही व मुक्त अथं व्यवस्थेचा पुरस्कार ही स्थितीवादी तत्त्वे भाजपस मान्य आहेत. परतु नवीन आथिक धोरणास त्याने एका बाजूने पाठिंबा दिलेला आहे तर दुसऱ्या बाजूने रा. स्व. संघामाफत स्वदेशीचे दुकानही उघडून ठेवले आहे, हेही घ्यानात ठेवले पाहिजे. त्याचबरोबर भाजप भांडवलझाहीचाच पुरस्कर्ता राहणार आहे हेही ओळखले पाहिजे. स्थितीवादी पक्षास 'जेसे थे' अवस्था कायम ठेवायची असते. त्यास मिळणारा सामाजिक पाठिंबा व अतिउजव्या पक्षाला (फॅसिझमकडे झुकलेला) मिळणारा सामाजिक पाठिंबा सारखाच असतो. दोन्हीही समाजवाद विरोधी असतात. दोघेही त्यांच्या मध्यमवर्गीय पाठिराख्यासाठो फार काही करत नाहीत. पण त्यांच्यात एक महत्त्वाचा फरक असतो. स्थितीवादो कितीही उजवे असले तरी कायद्याची व प्रस्थापित राजकोय चौकटीची मर्वांदा सांभाळतात या उलट फॅसिस्ट विरोधकां- विरुद्ध दहशतीचा वापर करतात. या दृष्टोने विचार केला तर असे'दिसते को, हिदुत्त्ववाद्यांनी परवा कायद्याची व प्रस्थापित राजकोय चौकटीची मर्यादा ओलांडली होतो. परतु सत्तेवर आल्यावर ते नेहमीच असे करतोल व त्यांना तसे करण्याची गरज पडंलच असे म्हणता येणार नाहो, पण गरज पडली तर मर्यादांचे उल्लंघन करण्यास ते कचरणार नाहीत, हे त्यांनी ' स्पष्टपणे दाखवन दिले आहे
या सव चर्चचे सार थोडक्यात पुढीलप्रमाणे सांगता येईल हिंदुत्त्ववादात स्वातंत्र्यपुव॑ काळापासूनच लोकश्ञाहीविरोधी घटक होते. आयोध्या प्रकरणापासून मात्र. फॅसिस्ट चळवळीची बरीच वदिष्टये' हिंदुत्त्ववादाने उघडपणे स्वीकारल्याचे दिसते. परंतु त्यामुळे या देशात फॅसिझमच येतो आहे किवा येईल असे म्हणता येणार नाही. काही हिंदुत्त्ववादी चळवळोने ते जास्त आक्रमक, जहाल व व्यापक स्वरूप धारण केले आहे. त्यामुळे त्यास नव-फंसिझम नावाने ओळखावे लागेल व त्याचा मुकाबला त्या अनुषंगाने करावा लागेल अंसे वाटते, स्थितीवादी पक्ष व संघटना आपली मर्यादा ओलांडत जास्त जहाल व सोकधाहीविरोधी मार्गाचा वापर करीत आहेत. निवडणुकोत बहुमत मिळावे हाच त्यांचा उद्देश आहे. सत्तेवर आल्यावर लोकशाही परंपरांचे पालन ते करतीलच असे नाही. हस्तक्षेपवादी स्वायत्तता विरोधी धोरणाचा ते अंगिकार करतील व विरोधक व अल्पसंख्यांक यांच्याविरुद्ध धमकी व प्रसंगी दहशतीचा वापर करतील. हिंदुत्त्ववादी विचारसरणीचे वचंस्व निर्माण करण्यावर ते जोर देतील व त्यासाठी जन-- संपर्काची साधने, शेक्षणिक संस्था, सांस्कृतिक संस्था व धामिक कार्यक्रम यावर प्रथमतः नियंत्रण मिळवले जाईल. एकारलेली एकछत्री हिंदुत्त्वाची कल्पना लोकांवर लादली जाईल. हिंदूंच्या धर्म परंपरेला, धर्म भावनेला व संमाज पद्धतीला धक्का पोहोचेल. नजरेत भरतील जसे वरवरचे चिन्हात्मक बदल ताबडतोब करण्यात येतील आणि हिंदुत्त्ववादाचा विजय झाला. अशी भावना सरकारतफं फेलावण्यात येईल. सुस्थिर, शिस्तबद्ध, व खंबीर झासन देण्यावर जोर असेल, संघपरिवारातील संघटनांचे शासकीय पातळोवरील महत्त्व वाढविण्यात येईल.. हळूहळू सवे यंत्रणा ताब्यात घेण्याकडे कल असेल. आजची काँग्रस व भाजप काहींचे म्हणणे आहे की, लोकझ्ञाहीविरोधी मार्गाचा वापर वगरे काही गोष्टी तर काँग्रेसमध्येही आढळतात. काँग्रेसनेही प्रसंगी जमातवादी भूमिका घेतली आहे. एकदा ठर आणि- बाणीही आणली होती. तसेच दिल्लीत शिखांची कत्तल घडवून आणली होती. जातीय दंगलीमध्येही त्यांचा हात असे. हे सर्वे मुद्दे बरोबरही आहेत. काँग्रेस काय व भाजप काय दोघेही सत्ताधारी वर्गाचे पक्ष आहेत, हे प्रथमतः ध्यानात ठेवले पाहिजे. त्यामुळ जनहितविरोधी धोरण आखण्यात त्यांच्यात साम्य असेलच. पण संपूर्ण देश!त षडयंत्र रचून संघटितपणे दहशतीच्या व उठावाच्या जोरावर राजकीय कृती करणे, त्यासाठी संपूण. देशात निमलष्करी प्रश्रिक्षण घेतलेला, शिस्तबद्ध, एकाच ध्येयाने प्रेरित झालेला, एकचालकानुवर्ती, संघाचा आदेश प्रमाण मानून राजकोय कृती करण्यास सिद्ध असलेला लाखो अनुयायांचा संच तयार असणे या गोष्टी भाज फक्त भाजपकडे आहेत आणि (याची सविस्तर चर्चा आपण वर केलेलीच आहे ) म्हणूनच मर्यादांचे उल्लंघन करणाऱ्या हिंदुत्ववाद्यांच्या कृतीकडे संशयानेच पहावे लागेल. त्यांच्या कृतीतून, राजकारणातून नव-< फंसिझम येण्याची शक्यता सर्वात जास्त आहे. आजच्या काँग्रेसर कडे त्यासाठी लागणारे असामान्य नेतृत्वही नाही. शिस्त बद्धताही नाही, खंबीर झ्ासन देण्याची ताकदही नाही. ती वेगवेळ्या हितसंबंधाची, गटबाजीवर आधारलेली, अत्यंत सैल अशो एक संघटना आहे. इंदिरा गांधी व राजीव नंतरचे काँग्रेसचे चित्र कसे दिसते ? अनिडिचितता, अस्थेर्ये, दुल नेतृत्त्व गटबाजी आणि संपूर्णे देशाला व गटांना आकर्षून घईल अशा 'विचारसरणीचा अभाव, घोषणांचा अभाव, अज्ञा या पक्षावर विसंबून राहणे सत्ताष्ारी वर्गाला महागात पडण्याची शक्यता .जास्त आहे आणि बहुधा म्हणूनच आजच्या घडीला या वर्गाने भाजपकडे आहोने बघाय्रला सुरवात केली आहे. अखिल भार- तीय स्वरूपाची विचारप्रणाली, एकवाक्यता, शिस्त, खंवीर नेतत्त्व, जनतेचा व्यापक पाठिंबा, कनिष्ठ जातींचाही पाठिवा, समतावादाला विरोध व सुस्थिर ज्ञासन देण्याची शकयंता हे 'घटक भाजपकडे आहेत
खरे तर काँग्रेसने १९८० पासूनच खुल्या आथिक व्यवस्थे- कडे हळूहळू वाटचाल सुरू केलो होती. १९८४ नंतर राजीवने त्यास मोठा पाठिंबा दिला. आंतरराष्ट्रीयीकरण करण्यास सुरवात केलो. येथे उपभोक्ता संस्कुती शहरी नव-उच्च-मध्यम चर्ग तयार केला. उच्च तंत्रज्ञान आणि रोजगार विरोधी उत्पा- “दन तंत्राची कास धारली. समाजवादाला सोडचिठ्ठी दिलो. १९९१ ला आलेल्या राव-मनमोहन सिंग यांनी नवे आथिक धोरण आणून भारतीय अ्थकारणाचे आंतरराष्ट्रोयकरण वःर- ण्यास जोराचा हातभार लावला आहे. येथोल भांडवलदार वर्गाला हवे असणारे धोरण स्वीकारले आहे. शेतकरी वर्गाचे प्रवक्ते शरद जोशींनीही या धोरणास संपूर्ण पाठिंबा दिला आहे म्हणजेच येथील सत्ताधारी वर्गाला पोषक असे धोरणच काँग्रेसने आखले असताना भाजपकडे वळण्याची गरज बहुधा वरील कारणामुळेच पडली असती असे ढोबळ मानाने म्ह॒गता येईल. भाजपने नव्या आथिक धोरणाला विरोध्य केलेला नाही. आंतरराष्ट्रोयीकरणाबाबतचे त्याचे धोरण पाहिजे तितके स्पष्ट नाही. रा. स्व संघाने स्वदेशीचा उच्चार करून ठेवला आहे. शिवाय असेही मांडण्यात आले आहे को, भाजपला पाठिबा मुख्यत' व्यापारी, कंत्राटदार, सावकार, छोटे भांडवलदार, व्यावड -सायिक व पांढरपेशांचा आहे. परंतु तो जर आता काँग्रेसची जागा घेण्यासाठी सिद्ध झाला असेलतर त्याला बड्या भांडवल. -दारांचाही पाठिंबा मिळेल. कनि७ जातोंचा पाठिंबा काही प्रमाणात का होईना मिळविण्यात तो यशस्वी झाला आहे. आणि तो जर केंद्रात सत्तेवर येणार असेल तर त्याचो भूमिका पद्धतशीरपणे सत्ताधारी वर्गाच्या हिताची होईल. आंतरराष्ट्री- 'यौकरणासही तो पाठिंबा देईल. अर्थात त्याला ते करावेच ऱछागेल, पण त्याच्या मध्यमवर्गीय पाठिराख्यांसाठी त्याला स्वदेः “शीचा नावापुरता. व घोषणेपुरता उच्चार निदान सत्तेवर येण्यासाठी एखादेवेळो करावा लागल.
अथेव्यवस्थेचा संदभ | या संदर्भात एकूण भारतोय अर्थकारणाचा, भांडवलशाहीच्या विकासाच्या अवस्थेचा विचार करण्याचो गरज निर्माण होते. आपल्या देशात ओद्योगिक भांडवलाचा प्रभाव एका बाजूला वाढत असतानाच वित्तीय भांडवलाचे प्राबल्य कायम राहिले आहे. अलिकडे सट्टेंबाजीत प्रचंड गुंतवणूक होताना दिसते. या भाग-भांडंवलाच्या बाजारात स्वारस्य असलेला उपरा वर्गे, त्प़ांचे लागेबांधे, या बाजारातील घडवून आणलेले चढ-उतार, तेजी-मंदीचे प्रकार त्यामुळे ओद्योगिक भांडवलदार वर्गाचे होणारे फायदे-तोटे यांचा विचार करणे जरूर आहे. तसेच गेल्या काही वर्षापासून प्रस्थापित ओद्योगिक भांडवलाबरोबर् स्पर्धा करणारा उपटसंभ भांडवलदारांचा वर्गे उदयास आलां -' आहे. यातील काही उपटसंभांची तरं मोठी साम्राज्ये उभी राहिली आहेत. एकूणच उद्योगधंद्यातील घराण्यांचीही ताक दही वाढलो आहे. तसेच वित्तोय संस्थाचे महत्त्व वाढत गले आहे. वित्तोय संस्थाचे व्यवस्थापन व कंपन्यांचे व्यवस्थापन यातील संबंध प्रभावी ठरू लागले आहेत. उद्योगधंदे गिळंकृत करण्याचा प्रकारही गेल्या काही वर्षात वाढला आहे. या सव घटकांमुळे भांडवलशाहीचे स्वरूप हातचलाखी (0181101810) बनले आहे. समांतर अर्थकारणातही प्रचंड भांड्वल गुंतले आहे, (काळा पेसा) त्यातील काही भांडवल भाग-भांडवलातून क्रमांक एकच्या अर्थकारणात शिरकाव करते. तसेच बांधकाम ठपवसायात व शहरांतील जमितींच्या व्यवहारात जाते. खाजगी सावकारीत व चैनीच्या वस्तंची मागणी वाढविण्यात जाते शहरी भागांतील गुन्हेगारो टोळ्यांची काळ्या धंद्यातून व क्रमांक दोनच्या व्यवसायातून साम्राज्ये निर्माण झाली आहेत. यात गंतलेळे भणंग भांडवल व समांतर अर्थकारणातील भांडवल यांचे जवळचे नाते आहे. मुंबईत मध्यंतरी घडलेल्या गंडांच्या धर-पकडीवेळो यावर प्रकाश पडला आहे. याचबरोबर ठेकेदार, कंत्राटदार, व व्यापारी यांच्या व्यवहारात भांडवलाची प्रचंड उलाढाल होते आहे. व्यापारी भांडवल- दारांचे व औद्योगिक भांडवलदारांचे संबंध काही वेळा स्पधचे र काही वेळा सहकार्याचे असतात अंतर्गत अथंव्यवस्थेची स्थिती अश्ली असताना आंतरराष्ट्रीय भांडवलाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. बड्या राष्ट्रांना स्वतःच्या आथिक पेचप्रसंगावर मात करण्यासाठी अथंव्यवस्थेचे आंतरराष्ट्रोयकरण करणे जरूर बनले आहे आंतरराष्ट्रीय वित्तसंस्था त्यांना मदत करताना दिसत आहेत. मुक्त आर्थिक धोरणाचा यामुळेच सावंत्रिक पुरस्कार चालू आहे. भारताच्या अथंव्यवस्थेत परदेशी बॅंकांचा, नाणनिधीचा व एकूणच आंतरराष्ट्रोकरणाच्या धोरणाचा हस्तक्षेप यामु- ळेच वाढला आहे. येथील देशी भांडवलदारवर्ग परकीय भांड- वलाच्या तुलनेत स्वतःची स्वायत्तता कमी करून घेऊ लागला आहे.
थोडक्यात सांगायचे तर भारतीय अ्थकारणाने भांडवल- शाहीचे सध्याचे चित्र वरेचसे दिशाहोनतेचे व गोंधळलेले आहे. या गोंधळाचा परिणाम राजकारणावर झाला आहे. सत्ताधारी वर्गाच्या नियंत्रणाबाहेर गोष्टी जाऊ लागल्या आहेत. संसदीय राजकारण स्वत:च्या तकंशास्त्राप्रमाणे पुढे जाते आहे व त्यामुळेच त्यावरील सत्ताधारी वर्गाचा प्रभाव कमी झाला आहे. संसदीय राजकोय शक्ती सत्ता संपादनाच्या मोहिमेत स्वायत्तपेणे पुढे जात आहेत. भाजपची घोडदोड त्याचे प्रतिक म्हणता येईल काँ? याचे उत्तर शोधावे लागेल. बर्याच बड्या वत्तपत्रांनी व साप्ताहिकांनी कारसेवेचा . निषेध केला आहे. इंडिया टुडेने तर त्यास फॅसिस्ट म्हटले आहे. तर काही वृत्तपत्रांनी अंसा निषेध करणे टाळले आहे. गिरीलाल जेन सारख्यांनी त्याची तरफदारी केलो आहे. अरुण शोरो, सपन दासगुप्ता त्यांच्या जोडोला आहेतच. या सर्वांनी हिंदुत्ववादी भमिका घेतली आहे. हिंदुत्ववाद ही सत्ताधारी वर्गाची विचार- प्रणाली होऊ शकेर, अशा प्रकारे त्याची मांडणी करण्यात येत आहे.
इतर कारणे
हिंदुतत्ववादाचा प्रभाव वाढण्याच्या इतरही काही कारणांची नोंद घेतली पाहिजे र
१) गेरकांग्रेसवादाच्या राजकारणामुळे जनसंघ व नतर भाजपश्ली विरोधी पक्षांनी केलेलो हातमिळवणी. जनता दल व व्ही. पौ. सिंग यांनी केलेला निवडणुकोतील समझोता व त्यानंतर सत्तेवर राहण्यासाठी भाजपचा घेतलेला पाठिबा;
२) मुस्लिमांमधील मूलतत्त्ववादी राजकारण, या समाजा धर असलेले धर्माध नेत्यांचे नियंत्रण, मुस्लिम पुरोगामी चळ- वळोची झालेली पिछेहाट, काँग्रेस, जनता दल या तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्षातील मुस्लिम नेतत्त्वाचे जमातवादी राजकारण उदाहरणार्थ, शहाबुद्धोन; मुस्लीम राजकोय संघटना व पक्षांचे जमातवादी धोरण;
३) काँग्रेसने सोयिस्करपणे घेतलेली जमातवादी भूमिका धर्मनिरपेक्ष. धोरणाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आलेले अपयश, शहाबानो प्रकरणावेळो मुस्लिम जमातवादाशी जुळवुन घेणे व त्यानंतर अयोध्या प्रकरण सुरू झाले तेव्हा हिंदंच्या बाजूने वजन टाकणे हे राजीव गांधीनी केले. काँग्रे सच्या दोन्ही जमातींना चुचकारण्याच्या धोरणामुळे दोन्ही कडोल जमातवाद्यांना. विषारी प्रचारास मिळालेले मुद्दे.
४) स्वतःच्या राजकारणासाठी व्हो.पी. सिंग यांनी मंडल आयोगाच्या शिफारशी स्वीकारल्या त्यावेळी उच्च जातींमध्ये निर्माण झालेला असंतोष, त्याला हिसक वळण लावण्यात भालेले यदा, . त्यामधील काँग्रेस व भाजपचा सहभाग, फक्त नोकऱ्यात नव्हे तर राजकोय सत्तेतही मागास जाती येणार या भितीने वरणववंस्ववादाला मिळालेले खतपाणी, भाजपने घेतलेली दुटप्पी भूमिका, मागास जातींना दिलेले पक्षाच्या संघटनेतील स्थान, त्यामुळे भाजपचा वाढलेला पाठिबा;
५) मुख्यतः मतविभागणीमुळे भाजपच्या विधानसभा व लोकसभेतील जागांमध्ये झालेली वाढ, त्यामुळे चार राज्यात: मिळालेलो सत्ता. या सत्तेचा हिंदुत््ववादास पोषक धोरण: आखण्यात करून घतलेला उपयोग;
६) स्थानिक पातळीवर व्यापारी, दिणकर, कारागीर, मजूर, छोटे व्यावसायिक यांच्यातील स्पर्धेला मिळालेला धामिक रंग व त्यामुळे वाढलेली तेढ व त्याचा जमातवाद्यांना मिळालेला फायदा;
७) आक्रमक, खोट्या, विषारी व भावना चेतवणार्या. घोषणांना बळी पडलेला कनिष्ठ मध्यम वर्ग, तसेच बेरोजगार व भणंग तरुण, राजकारणाचे झालेले गुन्हेगारीकरण, गंडांना' मिळालेलो सत्ता व मान्यता.
८) काँग्रेसचे ६ डिसेंबरच्या दरम्यानचे कचखाऊ अनि- शिचित व मऊ धोरण, सत्तेची पोकळो.
९) पुरोगामी शक्तींना पर्यायी अखिल भारतीय चळवळ: उभी करण्यात आलेले अपयश आथिक लढ्यांची झालेलो पिछहाट
या सवं चर्चेचे सार म्हणन असे सांगता येईल को, आपल्या देशात नव-फॅसिझम उदयाला आला असून नव-फेॅसिस्ट चळ« वळींना पाय रोवता येईल अशी षोषक भाथिक, सामाजिक व राजकीय परिस्थिती अस्तित्त्वात आहे. हिंदुत्त्ववादाचे आव्हान केवळ जमातवादाचे नसून या नव-फॅसिझमंच्या स्वरूपाचे आहे.
१. पहा : मे. प्. रेगे, सावरकरांचे तत्त्वज्ञान, पा. २५-३५ आणि वसंत पळशोकर, जात्युच्छेदक निबंध व सावरकरांचे . अस्पृश्यता-निवारक कार्य, पा. ८४-१०७ हे विलास खोले, (संपा) सुरयंबिवाचा शोध (पुणे) यातील लेख.
२. समग्र सावरकर वाडमय, खंड, ४ पा. ४१२, ४१९-२० ५२९.
३. इंडिया ट्डे, जाने. १५, १९९३ पा. ५५ आणि टाइम्स ऑफ इंडिया, १८ डिसें. १९९२.fff
४. हो तुलना करताना हे लक्षात ठेवले पाहिजे को इराण- मधोल भांडवलशाहीचे स्वरूप व खोमेनींना मिळणारा वर्गीय पाठिबा भारतीय परिस्थितीपेक्षा वेगळा होता.
५. फॅसिस्टांचा विषमतेवर विश्वास असतो. त्यामुळे ते सवच प्रकारच्या समतावादाला व समाजवादाला विरोध करतात. वगेलढ्याची संकल्पना नाकारतात सवे आथिक सिद्धान्त त्याज्य मानतात. आधिक प्रश्नांकडे राष्ट्रोय दृष्टि- कोनातून पाहण्याचा आग्रह धरतात. भांडवलदार व मजूर या दोघांवरही नियंत्रण आणण्याची कल्पना मांडतात. त्या दोघांमध्ये समन्वय साधण्याची इच्छा बाळगतात. यातोल बहुतेक गोष्टी हिंदुत्त्ववादात सापडतात, असे म्हणावे लागेल. विशेषतः समाजवाद विरोध व प्रस्थापित आथिक विचारांना नकार ही लक्षणे त्यांच्या सिद्धान्वात स्पष्टपणे आढळतात. पाश्चिमात्य अथेपद्धती म्हणून भांडवलशाही व समाजवाद यांचा धिक्कार दीनदयाळ उपाध्याय यांच्या लेखनातून दिसून आलेला आहे.
आक्रमक व विस्तारवादी परराष्ट्र धोरण हे हिदुत्त्ववादाचे एक महत्त्वाचे अंग राहिलेले आहे. लष्करीकरणाचा आग्रह सावरकरांनी धरलेला होता. अणुबाँब व अण्वस्त्रांचा आग्रह. भाजपने धरलेला आहे. पाकिस्तान संदर्भातील त्याचे धोरण नेहमीच आक्रमक असते.
---------------------------------------------------------------------
समाज प्रबोधन पत्रिका (जाने. - मार्च १९९३) मध्ये प्रकाशित