हिंसेचे उदात्तीकरण :


आज आपल्या सामाजिक व्यवहारावर, परस्पर संबंधांवर हिंसेची छाया पडली आहे. तसे पाहिले तर पूर्वापार चालत आलेल्या जातिसंस्थेत छुपी हिंसा असतेच. 'प्रसंगी ती उघड व तीत्र रूप घेत असे. कर्मसिद्धांताच्या प्रभावामुळे कनिष्ठ व दलित जाती त्या हिंसेला आपल्या कर्माचे फळ मानीत. स्त्रियाही आपण स्त्री जन्माला आलो हा नशिबाचा खेळ व गेल्या जन्मीच्या पापाचे फलित मानीत. त्यामुळे छुपी व उघड हिंसा प्रतिकाराविना हजारो वर्षे चालू राहिली. प्रस्तुत लेखात मात्र सद्यकालीन समाजात हिंसेचे उदात्तीकरण कसे केले जाते आहे, याचे विश्लेषण करायचे आहे.

आज हिंसेचे उदात्तीकरण करण्याची प्रथा पडत चालली आहे. प्रत्यक्ष हिंसा करणारे लोक थोडेच असतील पण हिंसा करण्यात काही वाईट नाही असे मानणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. हिंसक कृती करण्यात गुंतलेल्यांची संख्या छोटी असेल पण भीती घालणारे, धाक दाखविणारे, दमदाटी करणारे, मारण्याची धमकी देणारे बरेच लोक दिसू लागले आहेत. त्यांना समाजात मान्यताच नव्हे तर प्रतिष्ठा मिळू लागली आहे. त्यांच्याकडे नेतृत्व आपोआप येऊ लागले आहे. शारीरिक इजा करू शकतील व त्याआधारे आपले काम करून देऊ शकतील अशांचा प्रभाव वाढू लागला आहे. मुख्य म्हणजे हिंसेचे समर्थन करणाऱ्यांची संख्या वाढते आहे. समोरच्याने हिंसा केली म्हणून आपणही केली पाहिजे असे मानले जाते. प्रत्यक्ष हिंसक कृती नेहमी होतेच असे नव्हे किंवा धमकीचाही वापर काही वेळा होत नसेल पण गप्पा मारताना, चर्चा करताना, दुसऱ्याचा उल्लेख करताना कळत-नकळत हिंसक भाषा वापरली जाते. हिंसेची भावना भाषेतून व्यक्‍त होते. हिंसा करण्याची तयारी आक्रमक व भडक शब्दांतून दिसते.

दडपशाहीची सध्या चलती आहे. दडपशाहीचा मार्ग सोपा व ताबडतोबीचा मार्ग म्हणून पुढे येऊ लागला आहे. धमकी देण्याने काम फत्ते होते असे लक्षात आल्याने धमकी देणाऱ्यांची सत्ता वाढते आहे. त्यांच्याकडे आपले काम घेऊन जाणारेही वाढत आहेत. स्वत:चा वेळ न घालवता, स्वत: त्यात न गुंतता जर परस्पर काम होत असेल तर पैसे मोजायला लोक तयार आहेत. कुमार्गाने मिळविलेला पैसा त्यांच्याकडे मुबलक आहे. कामे करून घेणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने कामे करून देणाऱ्यांचीही वाढते आहे. क्रमांक दोनचा व्यवहार असेल तर त्यात हिंसक पद्धतीचा किंवा धमकीचा अवलंब होण्याची शक्‍यता. जास्त असते. या व्यवहारात जितकी मोठी रक्‍कम गुंतली असेल तेवढी धमकीची शक्‍यता जास्त असते असे म्हणता येईल.  प्रत्यक्ष हिंसक कृती करणाऱ्यांबद्दल आपण बऱ्याच वेळा बोलत असतो. त्यांना शिक्षा होते किंवा त्यांचा कधी तरी बळी पण जातो. पण, या हिंसक व्यवहारामागे दडलेल्या शक्‍तींकडे आपण दुर्लक्ष कस्तो. अगणित संपत्ती हावरटपणे जमा केलेल्या मातब्बर मंडळींचा या व्यवहाराला आधार असतो. काळा धंदा करणाऱ्यांचा त्याला पाठिंबा असतो. गोळीबाराला बळी पडलेले, तुरुंगवासाची शिक्षा भोगणारे खरे तर टोळी प्रमुखांच्या तालावर नाचणारी प्यादी असतात. बऱयाच वेळा ते बिचारे बळी जातात. खरे सूत्रधार सहीसलामत राहतात. स्वत:च तयार केलेल्या वर्तुळात प्रतिष्ठेने वावरतात. त्यांना कुर्निसात करणारे मरायला तयार होतात ही त्यातली विचित्र गोष्ट आहे.

पूर्वी या टोळ्यांचे राज्य मर्यादित असे. बहुत करून भूमिगत राहून त्यांचा कारभार चाले. आज परिस्थिती बदलली आहे. या टोळ्या आता उघडपणे काम करू लागल्या आहेत. पूर्वी या मंडळींच्या साहाय्याने राजकारणाचा खेळ चालत असे.  बऱ्याच वेळा राजकीय नेत्यांचा वचक या टोळ्यांवर असे. आज या टोळींचे प्रमुख डोके वर काढीत आहेत. ते स्वत:च सत्ता ताब्यात घेत आहेत. निवडणुकीत भाग घेत आहेत. आमदार, खासदार व विशेषत: नगरसेवक होत आहेत. हिंसक मार्गाने उघडपणे आपले साम्राज्य स्थापन करून राजकीय सत्ता संपादन करीत आहेत. एखाद्या बड्या नेत्याचे नेतृत्व मान्य करून स्वत:चे साग्राज्य अबाधित ठेवीत आहेत. अतोनात संपत्ती बाळगून असलेल्या टोळी प्रमुखांच्या साम्राज्यात सरकारी व पोलीस अधिकारी मंत्री व तत्सम लोक याना त्या नात्याने विहार करीत असतात. त्यांची कामे चटकन व बिनबोभाट करून देतात. कोठे बांधकाम करून घ्यायचे आहे, कोणता भूखंड हडप करायचा आहे कोणत्या, .गिरणीची जागा विकायची आहे याची या अधिकारी वर्गास नीट माहिती असते. टोळी प्रमुखाच्या आज्ञेप्रमाणे सर्व व्यवहार सुरळीतपणे पार पाडून देतात

राजकीय पक्ष व गुंडांची टोळी यातील सीमारेषा फिकट होत चालली आहे. भ्रष्टाचाराचे प्रमाण फार वाढले आहे व प्रशासन कुचकामी बनले आहे ते या प्रकारामुळेच!

हिंसेवर व धमकीवर आधारलेल्या या साम्राज्याच्या सीमारेषा ठरविणे फार अवघड आहे. या साम्राज्याचे लागेबांधे फार दूरवर जाऊन पोहोचलेले असतात. कारखानदार, व्यापारी कंत्राटदार आणि बडे अधिकारी याच्यापैकी काहीजण या ना त्या प्रकारे टोळीच्या वर्तुळाशी निगडित असतात. मोठ्या शहरातील जमिनीचे व्यवहार, बांधकाम व्यवसाय, चित्रपट क्षेत्र, गर्दचा व्यापार व तत्सम धंदे या हिंसक मार्गाने वेढले जाऊ लागले आहेत. त्यांना आशीर्वाद देणारे राजकारण उभे राहते आहे. जीवघेणी स्पर्धा, संपत्तीची हाव, क्रमांक दोनच्या व्यवहाराचा वाढता जोर, झोपडपट्टीतील असंघटित उद्योग एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला कमालीची गरिबी, बेकारी, असहायता, विषमता व भणंगपणा यातूना हिंसेचा वापर करण्याची तयारी वाढते आहे. भ्रष्ट भांडवलशाही हिंसेला प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या आश्रय देते आहे. मालमत्ताधारक व गरीब यांच्यातील दरी इतकी वाढत चालली आहे की, मा्थेफिरूपणा वाढला नाही तरच नवल, श्रीमंत मंडळींनी पैसा कसा मिळविला आहे याचे जीतेजागते चित्र समोर दिसत असताना पैसा मिळविण्याचा कोणताही मार्ग त्याज्य मानला जात नाही. सुपारी देणारे व घेणारे त्यातूनही वाढले आहेत.

ही सामाजिक व आर्थिक परिस्थिती हिसेंचे उदात्तीकरण करणाऱ्या नवफॅसिस्ट विचारास बळ देते. त्याच्या प्रसारास उपकारक पार्श्वभूमी तयार करते. तसेच अनुयायी मिळवून देते. धर्मांधता, परधर्मियांबद्दल शत्रुत्व, एकाधिकारशाही व लोकशाहीविरोध या तत्त्वावर विश्‍वास असणारी नवफॅसिस्ट चळवळ फोफावते व टोळ्यांच्या हिंसेला राजकीय परिमाण प्राप्त होते. हिंसेचे पद्धतशीर तत्त्वज्ञान तयार होते. या प्रकारात जसा हिंदुत्ववाद्यांचा समावेश होतो तसाच मुस्लीम मूलतत्त्ववाद्यांचाही होतो.. त्यांच्यासारखे एकमेकांवर अवलंबून असलेले राजकारण दुसरे सापडणे अवघड आहे. हिंसा, तिचे उदात्तीकरण, धर्मासाठी प्रसंगी प्राणार्पण घ्यायला तयार असलेले तरुण, भावनेच्या आहारी जाऊन सामूहिक हिंसा करण्यास तयार असणारा कार्यकर्त्यांचा संच ही या संघटनांची वैशिष्ट्ये असतात.

टोळ्यांच्या हिंसेला आता नवा रंग चढतो. नवे समर्थन प्राप्त होते. जेव्हा हिंसा राजकीय संघटनेच्या दावणीला बांधली जाते तेव्हा तिचा कमी-जास्त, जरुरीप्रमाणे वेळ पाहून, सत्तेच्या गणितात किती गरज आहे हे पाहून वापर होतो. त्यासाठी आक्रमक व लढाऊ शाखा निर्माण केल्या जातात. त्यांना हिंसक कृती करण्यास प्रवृत्त केले जाते; पण सतत हिंसेचे बातावरण ठेवले जाते असे नव्हे. स्वत:चा पक्ष सत्तेवर येईपर्यंत दंगली व हिंसेचा वापर जादा होतो. सत्तेवर आल्यावर सर्वांना अभय दिल्याचे नाटक केले जाते.
सुशिक्षित मध्यमवर्गात या हिंसेच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार वाढतो आहे. मूलतत्त्ववादी मुस्लीम संघटनांचा व हिंदुत्ववादाचा मध्यमवर्गीय समर्थक स्वत: हिंसक कारवायी कंरतील असे नव्हे पण मध्यमवर्गाचा या तत्त्वज्ञानावरील विश्‍वास वाढत चालला आहे. मुंबई, अंथोध्या, सुरतमधील १९९२ च्या दंगली किंवा दिल्लीतील १९८४ मधील हिंसेत जितके लोक प्रत्यक्षपणे सहभागी झाले होते त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त लोक त्यास संमती देत होते. वृत्तपत्रातील हिंसेची वर्णने आवडीने वाचत होते. संपादकही त्यांच्या वाचकांना आवडेल अशी भडक वर्णने करीत होते. भावनेचा उद्रेक होऊन एखादा अर्धशिक्षित बेकार विषारी प्रचाराला बळी पडून हिंसा करेलही. पण स्वतःच्या घरात वृत्तपत्र वाचणारा सुशिक्षित मध्यमवर्गीय जेव्हा हिंसेचं समर्थन करतो तेव्हा या हिंसेच्या तत्त्वज्ञानाने आपल्याला कसे घेरून टाकले आहे हृ आकर्षित करून घेतले आहे हे कळते.

धर्मांधता, मूलतत्त्ववाद, हिंदुत्व, शीख धर्माभिमान या विचाराचा जेव्हा हिंसेला आधार मिळतो तेव्हा ती हिंसा सामूहिक बनते, टोळीच्या वर्तुळाबाहेर जाते व सर्व समाजाला ग्रासून टाकते. म्हणूनच ती जास्त भयावह व त्याज्य असते. फुटकळ, व्यक्‍तिगत पातळीवरील, सुपारी घेऊन केली जाणारी आर्थिक फायद्यापोटी केली जाणारी हिंसा, गोळीबार, मारामारी, धाक-धमकीचा मार्ग यांची प्रत नव्फेसिस्ट तत्त्वज्ञानातील अंगभूत हिंसेपेक्षा वेगळी असते. सामूहिक, एखाद्या विशिष्ट समाजघटकांविरुद्ध वापरली जाणारी, राजकीय व सामाजिक हिंसा समाजाचा पाया अस्थिर करते, समाजात दुही माजवते, अविश्‍्वासाचे वातावरण तयार करते, असुरक्षितता वाढविते, सर्व समाजातील माणुसकी नष्ट करते आणि काही नेत्यांच्या वलयांकित नेतृत्वाला कलंकित पाठिंबा मिळवून देते. या हिंसेचे तत्त्वज्ञान सर्वत्र झिरपते व समाजाला स्वत:च इतिहास, संस्कृती व धर्म विसरायला लावते. हिंसेचे समर्थन धर्माच्या नावाने केले जाते त्यामुळे या हिंसेत धर्माचा बळी दिला जातो. हिंसेला पवित्र मानले जाते. लोकांच्या धर्मश्रद्धेचा दुरुपयोग करून घेतला जातो. त्यांना त्यांच्या परंपरा विससयला लावले जाते. हळूहळू त्यांची विवेकबुद्धी बोथट होते व ते अमानुष बनत जातात.

हिंसेचे हे तत्त्वज्ञान स्त्रियांच्या अस्तित्वाला आव्हान देते. पौरुषाचे गौरबीकरण केले जाते. स्त्री-पुरुष विषमतेवर हे तत्त्वज्ञान आधारलेले असते. पुरुषाने हिंसक' व आक्रमक' असले पाहिजे व स्त्रियांनीही शक्‍यतो पुरुषी बनावे असा आग्रह त्यात असतो. आपल्या स्त्रीत्वाची लाज वाटावी असे वातावरण निर्माण केले जाते. असामान्य शौर्य गाजविणाऱ्या स्त्रियांचे दैवतीकरण केले जाते. त्यांच्या नावाने स्त्रियांच्या स्वयंसेवी संघटना' काढल्या जातात. जे पुरुष हिंसेला नकार देतील त्यांनी बांगड्या भरल्या आहेत असे म्हणून हिणवले जाते. त्यांना हिंसा करण्यास प्रवृत्त केले जाते. अयोध्येच्या हिंसक कारवाईत स्त्री नेत्या हिंसेला प्रोत्साहन देत होत्या ते याच तत्त्वज्ञानापोटी! हिंसेचे उदात्तीकरण करणाऱ्या संघटनांच्या स्त्री आघाड्या जोरात चाललेल्या असतात. सरंजामशाही मूल्यव्यवस्थेचा वरचष्मा या आघाड्यात असतो. 'सती प्रथे'चे समर्थन त्या करतात. सभासद स्त्रियांना निमलष्करी पद्धतीचे प्रशिक्षण देतात. स्वसंरक्षण करण्याचे धडे देतात. प्रतिस्पर्धी संघटनामधील स्त्री-पुरुष कार्यकर्त्यांना घेराव घालून जेरीस आणतात. विरोधकांचा आवाज बंद करण्याचे सर्व मार्ग त्या अवलंबतात. हिंसेत नेहमी पहिला बळी स्त्रीचा पडतो. परधर्माची स्त्री आपल्या सारखीच स्त्री आहे याचा त्यांना विसर पडतो. पुरुष कार्यकर्त्यांनी दंगलीत पुढे राहावे, मागे पाहू नये असे आवाहन या स्त्रियांच्या नेत्या करतात. दंगलीचा जोर ओसरल्यावर, राजकीय व सामूहिक हिंसक कृती झाल्यानंतरच्या शांततेच्या काळात या स्त्री आघाड्या स्त्रीच्या समस्यांची चर्चा करतात. प्राचीन भारतात स्त्रीला कसे उच्चस्थान होते व हिंदु संस्कृती स्त्रीला देवी/ माता मानते या मुद्यांना धरून लेखन करतात. फक्त पुरुषांसाठी असलेल्या स्वयंसेवक संघटनेकडून आदेश घेऊन समाजात हिंदुत्ववादी दृष्टीकोनास अधिमान्यता मिळवून . देतात. संसदेत स्थान मिळविण्यासाठी प्रयत्न करतात; पण स्वयंसेवी संघटनेत स्थान मिळावे याबाबत अक्षरही काढत नाहीत. या संघटनेच्या हिंसाबादी व स्त्री-पुरुष विषमतावादी विचाराला त्या शरण जातात.

एकूणच तरुण वर्गात हिंसेच्या तत्त्वज्ञानाचे आकर्षण वाढत आहे. थोडेबहुत शिकलेल्या, थोडे बहुत कामधंदा असलेल्या किंवा बेकार असणाऱ्यांमध्ये, तसेच शिकल्या-सवरलेल्या निरनिराळ्या जातीतून व॑ जमातींतून आलेल्या तरुणांना हे तत्त्वज्ञान आकर्षक वाटू लागले आहे. हिंसक, आक्रमक, पाचट विनोद करणाऱ्या नेत्यांची भाषणे आणि त्यांनी चालवलेली भडक वृत्तपत्रे त्याला भावतात. नेत्याच्या भांषणात, मुलाखतीत व बातम्यातून प्रसारित केले जाणारे हिंसेचे विचार त्याला आपलेच वाटायला लागतात. तो सारासार विचार करेनासा होतो. वाहवत जातो. स्वत:चे अपयश, बेकारी, अपमान व रिकामेपण याचे खापर तो एखाद्या जाती-धर्मावर फोडतो व धर्मांध किंवा जातीय संघटनेच्या कच्छपी लागतो. स्वयंसेवकांना हिंसेचे उदात्तीकरण लहानपणापासूनच करायला शिकविले जाते. त्यांना आपला इतिहास रक्‍तरंजित करून सांगितला जातो. गांधींचा मार्ग 'सुताने स्वर्ग' गाठण्याचा म्हणून वेडेपणाच! होता असे त्याच्या मनावर ठसविले जाते. 'रणाविण स्वातंत्र्य्कोणा मिळाले' असा सवाल विचारला जातो. गांधींच्या मागे लाखो लोक होते म्हणून बोटे मोडायला शिकवले जाते. 'त्यांच्यामुळेच देशाचे तुकडे झाले असे सांगितले जाते. आपण अहिंसेचा मार्ग अनुसरला म्हणून दुबळे राहिलो. मुस्लीम कसे संघटित, एकचालकानुवर्ती आहेत त्यांच्याकडे धर्माज्ञा कशी मानतात याबद्दल मनात न्यूनगंड निर्माण केला जातो. मुस्लिमांसारखे बनायला सांगितले जाते. धर्मभोळेपणा व संतांचे तत्त्वज्ञान याचा त्याग करून 'हिंदुत्व' या राजकीय विचारप्रणालीला वाहून घेण्याचे आवाहन केले जाते. त्यातूनच हिंसेचे उदात्तीकरण होते. त्याचे तत्त्वज्ञान होते. युद्धखोरीचे धोरण मान्यता पावते. अणुबॉम्बच्या स्फोटानंतर आनंदाच्या उकळ्या फुटतात.

मुस्लिमांमधील धर्मवेड कसे वाढेल, त्यांच्यात हिंदुंबद्दल शत्रुत्वाची भावना कशी तयार होईल? यासाठी मूलतत्त्ववादी प्रयत्न करतात. या देशावर आपले राज्य होते असे सांगून त्यांना भडकवले होते. त्यांच्या सामाजिक व आर्थिक विचित्र परिस्थितीचा परिणाम म्हणून ते अशा आवाहनांना बळी पडतात व हिंसक कृत्यात सहभागी होण्यास तयार होतात किंवा त्या कृत्याचे समर्थन करतात.

असाच काहीसा प्रकार पंजाब, काश्मीर किंवा उत्तरपूर्व राज्यातील अतिरेक्यांच्या चळवळीत होताना दिसतो. परंतु, त्यांच्या चळवळीत व हिंदुत्ववादी किंवा मुस्लीम मूलतत्त्ववाद्यांच्या चळवळीत एक महत्त्वाचा फरक केला पाहिजे. अतिरेक्यांच्या चळवळी सतत व सर्वत्र दहशतीच्या व हिंसेच्या रस्त्यानेच जाताना दिसतात. सशस्त्र कारवाया करण्यावर त्यांचा जोर असतो. राजकीय सत्ता प्रत्यक्ष ताब्यात घेण्यापेक्षा त्या सत्तेवर वचक ठेवण्यात त्यांना स्वारस्य असते. परदेशातील शक्‍ती किंवा स्वधर्मीय श्रीमंतांच्या मार्फत या अतिरेकी कार्याला पैसा व शस्त्रांचा पुरवठा होतो. पंजाब व मुख्यत्वे करून काश्मीरमधील अतिरेक्यांना पाकिस्तानकडून फूस व प्रशिक्षण मिळते हे सर्वजण जाणतात. गर्दचा व्यापार हेही एक अतिरेक्यांच्या चळवळीचे अंग आहे. पंजाबमध्ये १९८० च्या आसपास सुरू झालेली खलिस्तानवादी हिंसक चळवळ यशस्वी झाली नाही. इतक्या वर्षांनंतरही त्यांना वाटला तितका पाठिंबा मिळाला नाही. खरे तर हे सर्वच दहशतवादी राजकारणाला व अतिरेकी हिंसक चळवळीला लागू पडणारे आहे. जर तुमच्या चळवळीला बहुसंख्य जनतेचा खंबीर पाठिंबा असेल तर तुम्हाला जमिनीखाली राहावे लागत नाही किंवा शस्त्रांचा वापरही करावा लागत नाही. उत्तरपूर्व राज्यात किंवा पंजाबात जरं दहशतवाद व हिंसा चालू असेल तर त्याचा अर्थ जनसामान्यांचा त्यांच्या चळवळीला म्हणावा तसा पाठिंबा नाही. आसाममधील विद्यार्थ्यांच्या चळवळीला जनतेचा इतका प्रचंड पाठिंबा होता की, सर्व आसामचा कारभार ठप्प पडला होता. त्यामुळे त्यांच्या चळवळीला यश मिळाले. अहिंसक सत्त्याग्रही मार्गाने त्यांची चळवळ गेली म्हणून त्यांच्या मागण्यांना नैतिक बळ आले, जनसामान्यांचा समर्थ पाठिंबा मिळाला व केंद्रसरकारला नमते घ्यावे लागते. याउलट परिस्थिती पंजाब, काश्मीर किंवा उत्तरपूर्वेतील राज्यातील अतिरेकी चळवळीची आहे.

नवफॅसिस्टांचे धर्माधेतेवर आधारलेले जे हिंसेचे तत्त्वज्ञान आहे त्याचा प्रभाव असंख्य लोकावर पडला होता आणि हेच त्यांच्या चळवळीतील हिंसेचे तत्त्व व अतिरेक्यांच्या चळवळीतील हिंसेचे तत्त्व यात फरक होण्याचे महत्त्वाचे कारण आहे. अतिरेक्यांच्या कारवाया वर नोंद केल्याप्रमाणे सतत हिंसेवरच आधारलेल्या असतात, त्यामुळे त्याच्यात सहभाग घेणाऱ्यांची संख्या मर्यादित असते, याउलट नवफॅसिस्ट हिंदुत्ववादी व मुस्लीम मूलतत्त्ववाद्यांच्या चळवळीत हिंसा फक्त काही वेळीच व काही प्रसंगीच, परंतु मोठ्या प्रमाणांवर वापरली जाते. त्यांच्या चळवळी या राजकीय पक्ष व संघटना यांच्यामार्फत उघडपणे चालविल्या जातात. त्यांच्यावर कधीतरीच बंदी घातली . जाते. अन्यथा इतर पक्षांप्रमाणे त्यांचे कार्य चालू असते. सत्ता काबीज करणे हे त्यांचे प्रमुख उद्दिष्ट असते. अतिरेक्यांच्या चळवळीत प्रचार केला जातो. लोकांना भडकविले जाते पण संघटना सशस्त्र कृती करणाऱ्या काही मंडळींनाच महत्त्व देते. अर्थात्‌ त्यांच्या अतिरेकी भूमिकेस मूक पाठिंबा देऊन किंवा त्यांचा बागूलबुवा करून स्वत: राजकीय सत्ता घेऊ पाहणारे पक्ष वाढू शकतात. जसा अकालीदल वाढला आहे.

पण नाही म्हटले तरी शीख, काश्मिरी किंवा उत्तर पूर्वेतील अतिरेकी चळवळ व हिंदुत्व व मुस्लीम मूलतत्त्ववादी चळवळ यांच्या हिंसेच्या तत्त्वज्ञानात साम्य असू शकते. हिंसेला पवित्र मानणे हे तर फार महत्त्वाचे साम्य त्यांच्यात आढळते. हिंसेच्या वापरापेक्षा धमकीचा वापर करून आपला प्रभाव वाढविण्याकडे नवफॅसिस्टांचा कळ असतो तर अतिरेक्यांना सतत हिंसेचा अवलंब करण्यावर विश्‍वास असतो. शस्त्र घेऊनच वावरणारी मंडळी हिंसा सोडून दुसरे काही फारसे करू शकत नाहीत. परंतु त्याचबरोबर हेही खरे की, या अतिरेक्यांचा राज्यसंस्था, लष्कर व पोलिसांमार्फत ठरविले तर बंदोबस्त करू शकते किंवा मर्यादा घालू शकते. पण, समाजाच्या वेगवेगळ्या स्तरात झिरपलेल्या, मध्यमवर्गाने प्रतिष्ठा मिळवून दिलेल्या, नवफॅसिस्ट स्वरूपाच्या हिंसेच्या तत्त्वज्ञानाला आळा घालणे, राज्यसंस्थेला बऱ्याच वेळा, जवळ जवळ अशक्यप्राय होऊन बसते. म्हणून हे तत्त्वज्ञान जास्त भयानक बनते.

नक्षलवादी : हिंसेचे तत्त्वज्ञान मानणारे नक्षलवादी हे गेली २५-३० वर्षे देशाच्या काही राज्यात कार्यरत आहेत. हिंदुत्ववाद्यांच्या किंवा मुस्लीम मूलतत्त्ववाद्यांच्या हिंसक तत्त्वज्ञानात जसा पहिला बळी धर्माचा पडतो तसा नक्षलवाद्यांच्या चळवळीत क्रांतीचा पडतो, हे लक्षात घेतले पाहिजे. डावपेच व व्यूहरचना या दोन्ही दृष्टीने चुकीचा मार्ग म्हणजे नक्षलवाद्यांची 'हिंसा' व दहशतवाद'. स्थानिक पातळीवर हिंसेचा मुक्‍त वापर करून तेथील प्रशासनास वा सत्तेस तसेच श्रीमंत वर्गाला नमविणे शक्‍य होते व काही मागण्या मान्य करायला लावले जाते. त्यामुळे बऱ्याच जणांचा अशा मार्गावर सुरुवातीस विश्‍वास बसतो. पण, दूरगामी क्रांतिकारक चळवळ चालविणे या नक्षलवादी गटांना अशक्य होते. त्यांना मूळ हेतूचा व उद्दिष्टांचा विसरही पडतो व आहे ती चळवळ चालू ठेवण्यातच नेत्यांना स्वारस्य निर्माण होते. नक्षलवाद्यांचे बरेच गट मुख्य समाजापासून दूर जाऊन तेथील अर्तविरोधांचा विचार करण्याचे सोडून देऊन, जंगलात किंवा आदिवासी भागात लपून राहून आपले साम्राज्य निर्माण करतात व मग हे साम्राज्य चालू ठेवणे एवढेच 'क्रातिकारक' कार्य शिल्लक राहते. हिंसक कारवाया व दहशतवादी मार्गांचा वापर करणाऱ्या, या स्वत:ला क्रांतिकारक म्हणवून घेणाऱ्यांचा, बंदोबस्त करणाऱ्या राज्यसंस्थेने जर अधिकाराचा कमी-जास्त वापर केला तर नक्षलवाद्यांच्या मानवी हक्कांवर आक्रमण झाले असे म्हणणारे महाभाग बरेच आढळतात. पंजाब व काश्मीर मधील पोलीस लष्कराच्या कारवायीबद्दलही अशीच टीका होत असते. खरे तर अतिरेक्यांना काय व नक्षलवादी अतिरेक्यांना काय राज्यसंस्थेच्या ताकदीची कल्पना कितपत असते याचीच शंका अलीकडे येऊ लागली आहे. हिंसेचे अधिकृत व अधिमान्य केंद्र म्हणजे राज्यसंस्था अशी व्याख्या केली तर फारशी चुकीची होणार नाही असे असतानाही स्वत:बद्दल, स्वत:च्या शक्‍तीबद्दल खोट्या कल्पनेपोटी अतिरेकी व नक्षलवादी स्वत: तर हिंसा करीत राहतातच पण गरीब, बेकार, सामान्य, अर्धशिक्षित लोकांनाही आपल्या चळवळीत, त्यांच्या खाण्या-पिण्याची सोय करून, त्याला खोटी प्रतिष्ठा मिळवून देऊन आकर्षित करतात. या अनुयायांची पोलीस गोळीबारात जेव्हा हत्या होते तेव्हा त्यांनी महान ध्येयासाठी प्राण दिला, असा गौरव केला जातो.

अशाप्रकारे महानगरातील व शहरातील गुन्हेगाऱ्यांच्या टोळ्यांकडून होणारी हिंसा, आर्थिक उलाढालीत व क्रमांक दोनच्या व्यवहारामुळे होणारी हिंसा, धर्मांध शक्‍तींकडून तयार केले जाणारे हिंसेचे तत्त्वज्ञान व समर्थन, अतिरेक्यांकडून तसेच नक्षलवाद्यांकडून केला जाणारा हिंसाचार यांचा विचार केल्यानंतर या लेखाच्या शेवटी दमणयंत्रणेच्या खासगीकरणाबाबतच्या मुद्यांची चर्चा करणे क्रमप्राप्त आहे.

दमणयंत्रणेचे खासगीकरण : सध्याचे दिवस खासगीकरणाचा गौरव करण्याचे  आहेत. राज्यसंस्थेकडून कमीत कमी हस्तक्षेप व्हावा, राज्यसंस्थेने पुढाकार घेऊ नये, बाजारपेठेच्या न्यायाने सर्व काही सुरळीत होईल अशी खात्री दिली जाते. म्हणून पूर्वी जी कामे राज्यसंस्थेची म्हणून ओळखली जात ती आता खासगीक्षेत्राकडे जाऊ लागली आहेत. पण, हे सर्व होत असताना सर्वांना दमणयंत्रणा म्हणून 'राज्यसंस्था' हवी आहे. खासगीकरणाचा आग्रह धरणारे लोक राज्यसंस्थेने कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम चोख बजावावे असे म्हणत असतात. बाजारपेठेचा न्याय असा असतो की, त्यायोगे गरीबांना, दलितांना, आदिवासींना, असंघटितांना बाजारपेठेबाहेर फेकले जाते. त्यांच्या पारंपरिक व्यवसायावर जागतिकीकरणामुळे आक्रमण होते. यातूनच 'लोक- चळवळींचा उगम होतो. आज आपण पाहतो की, देशाच्या विविध भागात वेगवेगळे वंचित गट-समूह-लोक, व्यवस्थेविरुद्ध चळवळीत उतरण्यास सिद्ध होत आहेत. एन्रॉन विरुद्ध किंवा नर्मदा प्रकल्पाविरुद्ध असे आंदोलन उभे राहते आहे. लोकांच्या या स्थानिक वा काही प्रमाणात व्यापक चळवळी दडपण्यासाठी राज्यसंस्था खासगीकरणाच्या समर्थकांना हवी असते. भारतीय राष्ट्राच्या सार्वभौमत्वाला धोका पोहोचविणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांना भारतीय राज्यसंस्था स्वत:चे संरक्षण करण्यासाठी पाहिजे असते. त्यामुळे दमणयंत्रणा आणि अधिमान्य व अधिकृत हिंसेचे केंद्र म्हणून राज्यसंस्था जास्त कृतीशील बनते आहे.

पण त्याचबरोबर या दमणयंत्रणेचेही खासगीकरण चालू झाले आहे. निदान तशी चिन्हे दिसत आहेत. उच्चवर्गाला, अतिश्रीमंत गटाला स्वत:च्या जीवाची व मालमत्तेची खात्री वाटेनाशी झाली आहे; ज्या प्रकारची बेबंद भांडवलशाही या वर्गाने येथे निर्माण केली आहे त्यामुळे आर्थिक व्यवहारात हिंसेचा मुक्‍त संचार होताना दिसतो आहे; पण ही पद्धत हाताबाहेरही जाते व उलटतेही. त्यामुळे बऱ्याच अतिश्रीमंतांना खासगी सुरक्षा व्यवस्थेची गरज वाटू लागली आहे. प्रतिस्पर्ध्याला या जगातून नाहीसे करणे हेच व्यवसायाच्या यशाचे गमक बनले तेव्हा या आर्थिक व्यवहारात भाडोत्री मारकांचा वापर वाढला. तसेच गुन्हेगारी जगताशी छुपा किंवा उघड संबंध येऊ लागला आणि त्यामुळे हे क्षेत्र असुरक्षित बनले. अशा परिस्थितीत अधिकृत दमणयंत्रणेवर म्हणजेच पोलिसांवर अवलंबून राहणे पुरे पडेनासे झाले. तेव्हा राज्यसंस्थेच्या दमणयंत्रणा या अंगाचेही खासगीकरण सुरू झाले असे म्हणता येईल. सरंजामशाही भागात जामीनदार व राजकीय नेते स्वत:च्या सेना बऱ्याच वर्षांपासून बाळगून. आहेत. त्याची लागण आता जास्त सफाईदार पद्धतीने शहरी भागातील उद्योगपतींमध्ये झाली आहे. परंतु, या प्रक्रियेत राज्यसंस्थेचे दमणयंत्रणा म्हणून असलेले महत्त्व कमी होत असले तरी दमण मात्र कमी होत नाही हे लक्षात ठेवले पाहिजे. लोकांच्या चळवळी, दडपशाही करून ठेवून काढण्यासाठी, आवश्यक ते दमन राज्यसंस्था करीत राहणारच. त्यांच्या जोडीला या खासगी क्षेत्रातील सुरक्षा व्यवस्था किंवा सेना असणार आहेत. ज्याप्रमाणे खासगीकरणावर आधारलेली अर्थव्यवस्था श्रीमंतांना धार्जिणी असते, तशीच खासगी. सुरक्षा व्यवस्थाही त्यांनाच उपलब्ध होऊ शकते.

अशा प्रकारे हिंसावादाचे प्राबल्य सर्वत्र वाढते आहे; पण याचा अर्थ आपले सामाजिक व्यवहार हिंसेवरच आधारलेले आहेत असे नव्हे! पण आपली संस्कृती, आपला विचार, आपली मनोवृत्ती, आपला दृष्टीकोन हे सर्व हिंसेच्या तत्त्वाने प्रभावित झाले आहे. हिंसेवर आपला विश्‍वास बसू लागला आहे. हिंसेचे समर्थन आपण करू लागलो आहोत. संस्कृतीचा ठेका ज्या मध्यमवर्गाकडे असतो. तो वर्ग विशेषत: हिंसाबादाच्या प्रभावाखाली गेला आहे व त्याच्या जीवनपद्धतीचा परिणाम सर्व समाजावर होतो आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. हिंसेचे उदात्तीकरण करण्यास सर्वच पुढे सरसावताना दिसत आहेत, ही काही चांगली चिन्हे नव्हेत. ही हिंसक संस्कृती आपल्या समाजाच्यया मूळावर उठली आहे. म्हणून चिंता करण्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे.

 

(युवाभारतीमध्ये पूर्वी प्रसिद्ध झालेल्या लेखाची ही सुधारित आवृत्ती.)

 

 

--------------------------------------------------
पुरुष स्पंदन ( दिवाळी २००० ) मध्ये प्रकाशित