रेखा ठाकूर यांनी माझ्या लोकानुरंजनवादावरील लेखावर, त्यामध्ये मी जे मुद्दे उपस्थित केले आहेत त्यावर, आपली प्रतिक्रिया व्यक्त करण्याऐवजी माझे मनोविश्लेषण केले आहे. मनोविश्लेषण तज्ञ आपल्याकडे आलेल्या रोग्यांना एकेका कप्प्यात बसवितात. त्यामुळे त्यांना उपचार करणे सोयीचे जाते. रेखा ठाकूर यांनी माझ्यासाठी 'ब्राह्मणी संस्कार पुसून टाकू न शकलेला पुरोगामी' हा कप्पा शोधून काढला आहे. हे निदान करण्यासाठी माझा 6 पानी लेख त्यांना फारच काळजीपूर्वक वाचावा लागला असणार. माझ्यावर कोणते संस्कार झाले आहेत, माझ्या मूल्य कल्पना कोणत्या हे शोधून काढण्यासाठी त्यांनी मी माझ्या लेखातील दोन ओळींच्या मध्ये काय म्हटले आहे किंवा मी ज्या ओळी लिहिल्या आहेत त्यामागे काय दडले आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्या मनात खोलवर काय लपले आहे हे पाहण्यासाठी रेखा ठाकूर यांनी जे परिश्रम घेतले आहेत त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो. परंतु हे मनोविश्लेषण करीत असताना त्यांनी माझ्या लेखात प्रत्यक्षात काय म्हटले आहे त्याकडेही काळजीपूर्वक लक्ष दिले असते तर बरे झाले असते. रेखा ठाकूर ब्राह्मणी संस्कार पुसून टाकू न शकलेल्या बऱ्याच जणांच्या संपर्कात येत असाव्यात असे दिसते. कारण त्यांच्या मनोविश्लेषणात्मक निबंधात शिखंडी, त्रिशंकू, यासारख्या भारतीय परंपरेतील प्रतिमा सहजपणे येतात. तसेच त्यांची भाषा ही परिस्थिती करणे अवघड वाटते. उदाहरणार्थ पुढील परिच्छेद पहा: " लेखकाचा लोकशाहीवरील विकास अनुकंपेपोटी दीनदुबळ्या बहुजनांना भिक वाढण्याची आहे की 'माणूस' म्हणून जन्माला आलेला प्रत्येक जण अनेक क्षमता (माणसाची बुद्धी) याबाबतीत खरोखर समान आहे व अनुभवाला येणारा फरक हा संस्कृतीजन्य (व म्हणूनच शोषणाने निर्माण झालेला तात्पुरता घटक) आहे अशी मनोमन खात्री असल्याने आहे?" माझ्यावर 'ब्राह्मणी पगडा' असल्याने मी त्यांचा अशा अवघड भाषेत लिहिलेला मनोविश्लेषणात्मक निबंध थोडाबहुत समजून घेऊ शकलो. पण खेड्यापाड्यातील कांशीरामवादी कार्यकर्त्यांचे काय? मनोविश्लेषण तज्ञ म्हणून रेखा ठाकूर यांनी माझे फक्त निदानच केलेले नाही तर उपचारही सुचविला आहे. त्यांच्यामते मी ब्राह्मणी पडल्यापासून मुक्त होण्याचा सतत जाणीवपूर्वक प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी रेखा ठाकूर यांचे लेखन सतत वाचावे असे म्हणावे तर त्यातील भाषा व प्रतिमांमुळे त्याचा फारसा उपयोग होईल असे वाटत नाही. असो. आता माझ्या लेखाचे मनोविश्लेषण करण्याच्या पद्धत पडल्यामुळे त्यांचे जे घोटाळे झाले आहेत त्याबद्दल थोडेसे.
१) मागास जातीच्या राजकारणास मी माझ्या लेखात कोठेही 'शिव्या' दिलेल्या नाहीत.
२) ते नवफॅसिस्ट हिंदुत्ववादी राजकारणासारखेच आहे असे मी कोठेही ध्वनितही केलेले नाही. उलट लोकानु रंजनवादी जातवादाने नवफॅसिस्टांचा पराभव केला ही त्याची ऐतिहासिक कामगिरी आहे असे म्हटले आहे. (पान ६७) हिंदुत्ववाद्यांना फक्त ब्राह्मणीधर्म हे विश्लेषण वापरणे राजकीय दूधखुळेपणाचे लक्षण ठरेल. त्यांना नवफॅसिस्टच का म्हटले पाहिजे यासाठी मी पत्रिकेत स्वतंत्र लेख लिहिला आहे.(जाने.मार्च १९९३) हिंदुत्ववाद वर्णवर्चस्ववादी आहेच. त्याच नवफॅसिस्ट म्हटल्यावर पुन्हा ते वेगळे सांगावे लागत नाही.
३) लोकांनुरंजनवादी जातवादाच्या मर्यादा मी स्पष्ट केल्या आहेत. परंतु मला या मर्यादा दाखविण्याचा अधिकार नाही असे एकूण ठाकुरांचे म्हणणे दिसते. कारण त्या स्वतः जात वादळाच्या मर्यादा दाखवून देतात. कांशीरामावरील त्यांची टीका याच अंकात इतरत्र 'मायावती, गांधी आणि हरिजन' या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेली आहे. तसेच माझ्या लेखावरील प्रतिक्रियेतही त्यांनी कांशीरामांना र्याच अटी घातल्या आहेत. पुढील वाक्य पहा. " जर लोकशाही आणि सामाजिक न्याय याबाबतीतील भूमिकेची स्पष्टता असेल तर प्रत्येक खालच्या स्तरांवरील संघटन ज्याचा जनाधार जिवंत व म्हणून वाढत आहे असे संघटन नेहमीच जास्त क्रांतिकारक असणार आहे." (ही भाषा अब्राह्मणी ठाकूरांची आहे) इतक्या हटे मीसुद्धा घातलेल्या नाहीत. या त्यांच्या अटी ठाकूरांनी कांशीरामान्ना कळवाव्यात, असे सुचवावेसे वाटते.
परिवर्तनवादाबद्दलचा एक घोटाळा मात्र स्पष्ट करावाच लागेल. कनिष्ठ जाती-जमातींचे संघटन हिंदुत्ववादी करीत आहेतच. त्यामुळे कनिष्ठ जातीजमातींचे राजकारण म्हणजे परिवर्तनवादीच असेल या भ्रमात राहणे योग्य नव्हे.
४) लोकांनुरंजनवादी राजकारणाचा एक प्रकार परिवर्तनवादी व जहाल असू शकतो. हे मी स्पष्ट केलेले आहे. (पान ६७) लोकानुरंजनवाद प्रत्येक वेळी असाच असेल असे नव्हे एवढेच मला म्हणायचे आहे.
'बहुजनांच्या सत्तेचा प्रश्न' या शेवटच्या भागात मी मांडलेले मुद्दे रेखा ठाकूर यांनी पुन्हा एकदा आपण मनोविश्लेषण तज्ञ आहोत हे विसरून वाचावेत. म्हणजे त्यांच्या चळवळीचे मित्र कोण आहेत याचा अंदाज त्यांना करता येईल. मागासलेल्या जातीच्या राजकारण आतूनच त्या ही वस्तुनिष्ठता कमवू शकतील असे वाटते.
---------------------------------------------------------------------------------
समाज प्रबोधन पत्रिका (जुलै-सप्टेंबर १९९४) मध्ये प्रकाशित