इंग्रजी राज्यामुळे झालेले भौतिक बदलः
वसाहतवादामुळे एकोणिसाव्या शतकात महाराष्ट्रात ऑर्थिक व सामाजिक स्थित्यंतर घडून औले. नव्या उत्पादन पद्धतीची सुरवात होऊन हळूहळू अर्थव्यवस्थेत परिवर्तन होऊ लागले. आगगाड्या, टपाल, तारायंत्र कापडाच्या गिरण्या, वीजेवर व वाफेवर चालणारी छोटी मोठी यंत्रे यांच्या आगमनामुळे येथील उच्चभ्रू समाजास आधुनिक विज्ञानाची तोंडओळख झाली. नैसर्गिक शक्तींना नियंत्रित करून त्यांचा आपल्याला उपयोग करून घेता येतो हे ध्यानात आले. आधुनिक औषधपद्धतीचा वापर करून रोगराई-साथी आटोक्यात आणता येतात हे लक्षात आले. मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये हे बदल फारच झपाट्याने झाले. नव्या उंच इमारती, धरणे, नाले, रस्ते, नवी शस्त्रास्त्रे, शिस्तबद्ध प्रशासन यामुळे माणूस काय करू शकतो हे सुशिक्षितांना समजले.
धार्मिक व आध्यात्मिक ज्ञानापेक्षा पूर्णपणे निराळे ऐहिक ज्ञान व विज्ञान असू शकते वर वते संपादन केले तर त्याचा व्यवहारात उपयोग होऊ शकतो हे येथील वरिष्ठ जातींना पटले. आधुनिक शिक्षणपद्धतीमध्ये मुख्य भर होता तो सामाजिक शास्त्रांच्या व भाषांच्या अभ्यासावर. त्यामुळे इंग्रजी शिक्षण घेतलेल्या पिढीला समाजात कसा विकास होत असतो त्याच्या स्थित्यंतराचे काय नियम असतात याचे ज्ञान झाले. अभिजनांनी पुढाकार घेतला तर समाजपरिवर्तनास योग्य दिशा. देता येते यावर या पिढीचा विश्वास बसला. आपल्या वर्गाच्या ताकदीची त्यांना कल्पना आली. इतिहास,सामाजिक शास्त्रे व पाश्चात्य तत्त्वज्ञान यांच्या अभ्यासामुळे व्यक्तीची प्रतिष्ठा, समता यासारखी आधुनिक सामाजिक मूल्ये व वैज्ञानिक दृष्टिकोनाचा या वर्गाला परिचय झाला. आपल्या समाजाच्या मध्ययुगीन अवस्थेतून आधुनिक अवस्थेत होणाऱ्या स्थित्यंतराची त्यांना कल्पना आली.
वसाहतवादाचे एक अंग होते ख्रिश्चन धर्मोपदेशकांचे कार्य. त्यांनी स्वतःच्या धर्माची तरफदारी करताना हिंदुधर्मातील वेडगळ समजुती, अमानुष चालीरीती, मूर्तिपूजा आणि विषमता यावर प्रकाश टाकला. त्यांच्या धर्मप्रसाराचा परिणाम होऊन कनिष्ठ जातीतील मंडळी व काही उच्चवर्णीय ख्रिश्चन धर्माकडे आकृष्ट झाले. या प्रकाराने परंपरागत हिंदू चौकटीस धक्का बसला. धर्मसुधारणा केल्याशिवाय हिंदुधर्म तग धरून राहू शकणार नाही याची जाणीव उच्चवर्णीयांना झाली.
अशा प्रकारे बदलती उत्पादन पद्धती, आधुनिक ऐहिक शिक्षण धर्मोपदेशकांचे कार्य यासारख्या गोष्टींमुळे मराठी हिंदू समाजात एक नवी संस्कृती, नवी मूल्यव्यवस्था उदयाला आली. त्याचा एक अपरिहार्य भाग म्हणून वैज्ञानिक दृष्टिकोनाचा हळूहळू प्रसार झाला.
पहिल्या पिढीतील सुधारक :
या नव्या संस्कृतीचा स्वीकार केला नव-मध्यवर्गाने सुशिक्षितांची ही पिढी या नव्या विचाराची पाईक ठरली. या पहिल्या पिढीचे प्रतिनिधी म्हणून आपण जगन्नाथ शंकरशेट (१८०३-१८६५) बाळशास्त्री जांभेकर (१८१२-१८४६) व दादोबा पांडुरंग (१८१४-१८८ २) यांचा उल्लेख करू शकतो. त्यांनी नव्या ज्ञानाचे स्वागत केले व नव्या विचाराचा प्रसार करण्याचा प्रयत्न केला. अंधश्रद्धा व अमानुष रूढींवर हल्ला चढविला. जगन्नाथ' शंकरशेट यांनी सतीची चाल बंद करण्यास साहाय्य केले. तर बाळशास्त्रींनी आपल्या 'दर्पण' (१८३ २-१८४०) मधून आधुनिक ज्ञानाचा व नव्या दृष्टिकोनांचा पुरस्कार केला. दादोबांनी परमहंस सभेच्या (१८४९) स्थापनेत पुढाकार घेऊन विषमता, मूर्तिपूजा व वाईट चालीरीतींना फाटा.देणाऱ्या धर्मसुधारणेची मुहूर्तमेढ रोवली.
लोकहितवादी : अंधश्रद्धांवरील टीका
मुंबईमधील या तिघांनी दाखविलेल्या, वाटेवरून जाणारा पुण्यातील महत्त्वाचा समाजसुधारक म्हणून आपणास गोपाळ हरि देशमुख उर्फ लोकहितवादी (१८२३-१८९२) यांचे नांव घ्यावे लागेल. विद्यापीठपूर्व काळात शिक्षण होऊन सुद्धा नव्या औद्योगिक संस्कृतीचा, भांडवलशाही. मूल्यव्यवस्थेचा पुरस्कार करणारा लोकहितवादींसारखा द्रष्टा विचारवंत या काळात महाराष्ट्रात झाला नाही. त्यांनी खुल्या मनाने नव्या विचाराचे स्वागत केले आणि मध्ययुगीन चौकटीत वावरणाऱ्या मराठी समाजावर कोरडे ओढले. शतपत्रांतून (१८ ४८-१८५०) आणि 'स्वाध्याय' (१८८०) व 'आगमरप्रकाश' (१८४८) सारख्या पुस्तकांतून लोकहितवादींनी परंपरागत, साचेबंद, जुनाट कल्पनांना कवटाळून बसलेल्या हिंदुसमाजावर विशेषत त्यातील उच्चवर्णीय समाजावर टीका करून त्यास नव्या युगात पदार्पण करण्याचे आवाहन केले.
इहवादी दृष्टीने समाजरचनेकडे पाहण्याचा प्रारंभ लोकहितवार्दीनी केला. ग्रंथप्रामाण्याला विरोध करून त्यांनी बुद्धिवादाचा आग्रह धरला. पोथ्या-पुराणातील काल्पनिक गोष्टींवर विश्वास ठेवणाऱ्या आणि प्राचीन शास्त्रांपुढे मान तुकविण्याच्या वृत्तीला त्यांनी आव्हान देऊन सांगितले की “मनूचे वचन असो, याज्ञवल्क्याचे असो, कोणाचेही असो, बम्हदेवाचे का असेना, 'बुद्धिदेव बलीयसी' असे आहे. शास्त्रास एकीकडे ठेवा, आपली बुद्धी चालवा, विचार करून पहा. घातक वचनावर हरताळ लावा” (लो.नि.सं पा. १७४) लोकहितवादींच्या लक्षात आले की काही कारणास्तव एखादी चाल फ्डते.व तीच पुढे अंधपरंपरा म्हणून चालू लागते. चाल म्हणजे काय असे विचारले तर लोक म्हणतात धर्म.. परंतु लोकांना हे कळत नाही की धर्म, चाल व शास्त्र या गोष्टी वेगवेगळ्या आहेत.(लोनिसं पा. ८ व १४) लोकहितवादींनी अशा ४० 'मूर्खरपणाच्या' समजुतींची यादीच सादर केली आहे.
समाजातील स्त्रीच्या स्थानाविषयी त्या काळात ज्या अंधश्रद्धा रूढ होत्या त्यांचा उल्लेख लोकहितवादींनी शतपत्रात जागोजाग केला आहे. आजच्या काळातही दुर्दैवाने यातील बर्याच कल्पना तशाच स्वरूपात शिल्लक आहेत. मुलगा झाला तर संतोष होतो. मुलगी झाली तर नाही. मुलीचा पायगुण चांगला - वाईट असतो. कन्या जन्मली लर घरात अवदसा शिरली व कन्या मेली तर सुख होते. स्त्रियांनी केला तर व्यभिचार. पुरूषांनी व्यभिचार करणे हा पुरूषधर्म.आहे. स्त्रियांनी पुनर्विवाह केला तर धर्म बुडेल व ब्राम्हणांची अब्रू जाईल. मुलीचे लहानपणीच लग्न करावे. विधवेचे वपन करावे म्हणजे धर्म बुडणार नाह (लोनिसं पा. १६-१८.व २७) इत्यादि कल्पनांवर लोकहितवादींनी टीका केली आहे.
स्त्रियांना दुय्यम स्थान देणाऱ्या रुढीप्रमाणेच लोकहितवादी ज्योतिषावर विश्वास ठेवण्याच्या वृत्तीची आणि साधूबैराग्यांवरील श्रद्धेची रेवडी उडवली होती. नशीबाने सर्व गोष्टी घडतात. नवसाने देव पावतो. मनुष्याचे सुखदुःख्रावर नवग्रहांचा अंमल चालतो म्हणून त्यांचे नावाने ब्राम्हणास दान केले म्हणजे पीडा दूर होते. दु:शकुन मानणे, बैरागी वगैरे लोक घरेदारे, रोजगार धंदा सोडून फिरतात त्यास खाण्यास दिले तर पुण्य आहे. लग्न करताना ज्योतिषास विचारतात. गण, खडाष्टक व मुहूर्त पाहतात इत्यादी समजुतींची आणि वेडगळ कल्पनांची लोकहितवादींनी चेष्टा केली आहे (लोनिसं. पा. १६-१८, २७) साधू, बाबा मंडळीवरील अंधविश्वास माणसाचा घात करतो याबाबत त्यांना खात्री होती. अशा बाबांच्या कृष्णकर्मावर व अनैतिक वर्तनावर त्यांनी पुढील भाषेत टीका केली आहे. बाबांची कर्मे पाहिली तर उच्चार करवत नाही. कोणी व्यभिचारी, कोणी चोर, कोणी लबाड. त्यांचे चित्त सर्व काळ लोकांस लुटण्याकडे असते. ते साधू नव्हेत. ते भोंदू आहेत. स्नान-संध्याशील साधू असला म्हणजे मग तो तर दगडाप्रमाणेच समजावयाचा. त्यानं हे जग नाशवंत आहे असे ठरविलेले असते. या जगास आपला उपयोग होऊ नये हा त्याचा धर्म असतो. साधू म्हणजे आळशी, निरूद्योगीं, अज्ञानी पशूसारखे मूर्ख असतात. कोणी संध्याकाळ पर्यंत जप करतात. कोणी महिन्यात १५ दिवस उपवास करतात. एक दोन पुस्तके जन्मभर वाचत राहतात. गोणीभर दगड पुढे मांडून त्यांची पूजा करण्यात अर्धा दिवस घालवतात. अमुक एक बुवा थोर साधू आहेत असे म्हणतात तेव्हा आपण जर विचारले की ते काय करतात तर आपल्याला सांगितले जाते की, “किती थोर, कोठे जावयाचे नाही. यावयाचे नाही. नेहमी तोंडाने जप चालू. दुपारपर्यंत स्नानसंध्या, मग भागवत इत्यादी. कोणाशी बोलत नाहीत. लोकहितवादी विचारतात की अशा साधूंचा लोकांस काय उपयोग? हे तर ढोंगी, पोट भरणारे लोकांस फसवणारे साधू होत. (लोनिसं पा. ४५८-६०) 'आगमप्रकाश' या पुस्तकात लोकहितवादींनी आपल्या देशात 'असत्याचा बाजार कसा पसरला आहे याचे सुंदर वर्णन केले आहे. त्यात ते म्हणतात, ठिकठिकाणी धुन्या लावून बाबा बसले आहेत. कपाळी शेंदराचे पट्टे लावून मांत्रिक लोक भोळ्या लोकांस आपल्या कपटजालात अडकवण्याची वाट पहात आहेत. अवधूत, सिद्ध, योगी आपंल्या तपस्येचे देव्हारे माजवून अंगारा देण्याकरिता आपल्या मठातून बसले आहेत. किमयागार, जादूगार, मूठ मारणारे यांच्या टोळ्या ठिकठिकाणी भेटतात. रोग दूर करणारे, पुत्रकामेच्छा तृप्त करणारे साधुसंत आढळतात. गुरूपदेश करणारे, स्वर्गमार्ग दाखविणारे आणि मोक्षाची प्राप्ती करून देणारे रामदासी सापडतील, असे सांगून लोकहितवादी म्हणतात की हे सर्व लोक आंपल्याला लुबाडण्यास निर्माण झालेले आहेत हे ध्यानात घेऊन “मोठ्या सावधगिरीने व धूर्ततेने आपला बचाव आपण. केला पाहिजे. (आगमप्रकाश पा. १ १).
कारणमीमांसा:
हिंदु समाजांत अंधश्रद्धांचे व खुळचट चालीरितीचे जे प्राबल्य माजले आणि स्त्रियांना दुय्यम स्थान देणाऱ्या रूढीप्रमाणेच लोकहितवादींनी ज्योतिषावर न बुवाबाजीची बजबजपुरी सर्वदूर पसरली त्याचे मूळ लोकहितवादींच्या मते या समाजाच्या अज्ञानात सापडते. आपण परमेश्वराने दिलेल्या विचारशक््तींचा वापर करायचे सोडूर्न दिले. त्यामुळे अनेक 'निंद्य व तिरस्कार्य' चालीरितींचे महत्त्व वाढले. सार कोणते व असार कोणते हे पहाणे मनुष्याचे लक्षण आहे. विचारशक््तीच्या. सहाय्याने “सारासार पाहिला” तरच आपण मनुष्यपणाला पात्र होऊ, असे त्यांना वाटत होते. गाढनिद्वेत असलेल्या हिंदु लोकांत “बहुतग्रंथ' व “बहुतज्ञान' पसरले पाहिजे. एकोणिसाव्या शतकात आधुनिक शिक्षणाचा जो प्रसार होत होता त्यामुळे भोंदू साधू व वाईट चालीरिती या जोखडातून हिंदू समाजाची सुटका होईल अशी आशा लोकहितवादींच्या पिढीला वाटत होती
धर्मसुधारणा:
पण एवढ्याने भागणार नाही याचीही जाणीव लोकहितवादींना होती. कारण या सर्व रूढी, परंपरा, विषमता व अंधश्रद्धांना धर्माचा आधार होता. म्हणून शिक्षणाच्या प्रसाराबरोबरच धर्मसुधारणेचाही प्रयत्न करावा लागेल हे लोकहितवादींनी ओळखले होते. कालमाहात्म्येकरून”हिंदु धर्माची सुधारणा करणे जरूर आहे. असे सांगून त्यांनी यापूर्वीही आपल्या समाजाने धर्मसुधारणा केल्या होत्या, जुनी शास्त्रमते रद्द करून नवी. चालू केली होती हे दाखवून दिले आहे. ईश््वरासंबंधी जो धर्म आहे तो जरी अचल असला तरी “कालेकरून शास्त्रास चालन पाहिजे.” नीतिप्रधान धर्मकारणाचा त्यांनी आग्रह धरला होतो. निरर्थक कर्मकांड आणि ज्ञानशून्य व. ढोंगी आचारांना सोडचिठ्ठी देऊन सत्य, दया, नीती, समानता, व्यक्तिप्रेतिष्ठा व विद्यावृद्धी यांना प्राधान्य देणारा, ऐहिक जीचनात हस्तक्षेप न करणारा मानवहितकारक धर्म प्रस्थापित व्हावा अशी त्यांची इच्छा होती. प्राचीन काळी जेव्हा क्रषींच्याकडे सूत्रे होती तेव्हा हिंदुधर्माचा विकास झाला पण पुढे भाटांचा, दासांचा व बोवांचा काळ आल्यामुळे सर्वत्र संकुचित व दत नियम अद्भुत कल्पना व बालिश वर्तनाचा प्रसार झाला. पुन्हा एकदा हिंदुधर्मास उॅन्नत अवस्था आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे लोकहितवादींना वाटत होते आणि त्यासाठीच त्यांनी धर्मसुधारणेचा पुरस्कार केला होता. (आश्वलायन गृहधसूत्र पा. ५३-५४)
न्या. रानडे :
धर्मसुधारणेचा पद्धतशीर प्रयत्न करण्याचे श्रेय प्रार्थतासमाजास (१८६७) द्यावे लागेल. लोकहितवादींच्या नंतरच्या पिढीतील मुंबई विद्यापीठातून पदवी घेतलेल्या न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे (१८४२-१९०१) यांनी प्रार्थना समाजाच्या तत्त्वज्ञानाची मांडणी केली होती. अनिष्ट चालीरिती व अंधश्रद्धांचा हिंदुसमाजावरील पगडा नाहीसा करणे या उद्देशानेच रानडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रार्थना समाजाच्या विचाराचा प्रसार केला होता. सामाजिक परिषदेच्या (१८८७-१९००) व्यासपीठावरून रानडेंनी याच विचाराचा पाठपुरावा समाजसुधारणेच्या प्रांतात केला होता.
रानड्यांच्या मते रूढींचा प्रभाव गुंगी आणतो आणि आपण आपल्या खऱ्या मानवी स्वभावास पारखे होतो. बरे-वाईट यातील फरक करण्याच्या शकतीस आपण गमावून बसतो. उच्चतर जींवनाकडे होणाऱ्या प्रगतीस त्यांच्या प्रभावामुळे खीळ बसते व आंपल्यावर अवलंबून असणाऱ्या व अवतीभोवतीच्या लोकांचे जीवन आपण असह्य करतो. आपल्या आतील सद्सदविवेक बुद्धीस शरण जाण्याऐवजी आपण बाह्य शक्तीस शरण जातो. या. रूढी व परंपरांमुळे आपण जन्मामुळे झालेल्या फरकास महत्त्व देतो . त्यातूनच (MWपा. १२४, १९२) स्त्रीदास्य, कनिष्ठ जाती - वरिष्ठ जाती असा भेद निर्माण होतो. आणि आपला मानवतेबद्दलचा आदर कमी होतो. ऐहिक जीवनाकडे दुर्लक्ष होऊन आपण नशीबावर हवाला ठेवायला शिकतो. दैववादी बनतो. आपला आपल्यावरील विश्वासच उडतो. अंधश्रद्धा व रूढींच्या नियंत्रणाखाली जाऊन आपण लहान मुलांसारखे वागू लागतो. स्वयंनियंत्रणाऐवजी बाह्य नियंत्रणाचे विषय बनतो आपण मुले आहोत पण परमेश्वराची, माणसाची नाही - हे लक्षात ठेवले पाहिजे. म्हणून आपण फक्त देवाचाच आवाज ऐकला पाहिजे. म्हणजेच आपल्यामध्ये असलेल्या विवेकबुद्धी प्रमाणे आपण वर्तन केले पाहिजे. सतत बाह्यमदतीवर अवलंबून राहिल्याने परंपरा, चालीरितींप्रमाणे वागल्यामुळे आपल्यातील विवेकशक्ती क्षीण झाली आहे. त्यावर अंधविश्वास, रूढींची सावली पडली आहे. आपण एखादी गोष्ट खरी-खोटी, चांगली-वाईट, योग्य-अयोग्य अशी मानतो. का? तर पूर्वी कोणीतरी तसे म्हटले होते म्हणून.. आपण त्यामुळे अगतिक व असहाय्य बनलो आहोत. आता आपण या अंधविश्वासाच्या व चालीरितींच्या पासून स्वतंत्र बनले पाहिजे व आपल्या विवेक बुद्धीप्रमाणे वागले पाहिजे. (MWपा. १९३)
प्राचीन काळी आर्यावर्तात योग्य समाजरचना होती असे सांगून रानड्यांनी तिची अचनती कशी झाली याची ऐतिहासिक मीमांसा करण्याचा प्रयत्न केला आहे. आर्यांनी शत्रूंवर विजय मिळविल्यानंतर ते आपापसात लढू लागले आणि त्यानंतर जीवन दुःखकारक वाटू लागले, स्त्रिया पाश वाटू लागल्या. माणूस दैववादी बनला. तो स्वतःला कर्माचा गुलाम समजू लागला. ते त्याला भोगावेच लागते असे त्याला वाटू लागले. पुढे . मध्य आशिया, मंगोलियाकडून आक्रमणे झाली आणि रानटी समाजाचा व त्यांच्या कल्पनांचा प्रसार येथे झाला. आर्येतरांच्या मागास चालीरितींचा प्रभाव वाढला. स्त्रियांना कनिष्ठ दर्जा मिळाला. सतीची चाल चालू झाली. अशा वेळी समाजातील चांगले लोक संन्यासाकडे वळले. समाज अंधविश्वास, वाईट चालीरितींच्या आहारी गेला. स्त्रालच्या पातळीवर आला. उच्चवर्णीय लोक क्रषी, मुनी, 'कवी' तत्त्वज्ञ या पातळीवरून पुरोहित . भट व भिक्षुकाच्या पातळीवर आले. देव-देवतांचे गुरव व पुजारी या नात्याने त्यांनी अंधश्रद्धा जोपासण्याचे काम केले. आपल्या फायद्यासाठी पुराणे रचली. कलीयुगाची कल्पना मांडून पूर्वीच्या चांगल्या चालीरितींना फाटा दिला. ब्राम्हणधर्म भ्रष्ट झाला, अज्ञान व अंधविश्वासाच्या, पाशवी शक्तींच्या आहारी गेला. (MWपा. २०६-७)
धर्मसुधारणा:
पण यातूनही पुढे ,मार्गदर्शक्त करणारे संत महात्मे जन्मले. त्यांनी भक्तिमार्गाचा पुरस्कार करून हिंदू समाजास पुन्हा. एकदा उन्नत अक्स्थेत आणण्याचा प्रयत्न केला रानड्यांच्या मते प्रार्थना समाज अशाच.प्रकारचा प्रयत्न एकोणिसाव्या शतकामध्ये करत होता. धर्मसुधारणा केल्याविना अंधश्रद्धा, दैववाद आणि अमानुष सामाजिक रूढी नष्ट होणार नाहीत अशी रानंड्यांची धारणा होती. धर्मसुधारणा भक्तिमार्गाने दाखविलेल्या वाटेने व्हावी' असे त्यांनी निक्षून सांगितले होते. योगमार्ग व ज्ञानमार्ग हे जनसामान्यांना स्थुले नाहीत. कर्मकांडांचा मार्ग तर त्यांनी पूर्णपणे त्याज्य मानला होता. (ध. व्या. पा १२-१३) कर्मकांडांनी जडता वाढते. काहीजण आजन्म तीर्थयात्रा करतात. त्यामुळे जडता व अभिमान वाढतो. अशा लोकांना येथचे पाणी तेथे नेले, तिकडची वाळू इकडे आणली यातच कृतकृत्यता वाटते. खरा लाभ मात्र होत नाही. जप-तप, होम-हवने यांचीही हीच दशा असते. ५६ लक्ष जप झाला असे म्हणतात. पण पहावे तर इतका वेळ मणी ओढण्याखेरीज काही झालेले नसते. लक्ष अवर्तने झाली असे सांगतात. पण त्यांच्या मनावर काय संस्कार झाला हे पहावे तर भोपळ्याएवढे पूज्य दिसते. अहंपणा मात्र प्रबळ हातो. ब्रतवैकल्यांनी कर्माभिमान वाढत जातो. देव एकीकडे राहून पंत्रासच लोक देव मानू लागतात. मंत्रयुक््त आहुती दिल्या असता देवता खेचून आणिता येतात असे कर्ममार्ग्याला वाटते. चातुर्मासात तर कर्मकांडांचे बंडच होते. व्रते, उपवास, उद्यापने यामुळे व्यर्थ अभिमान वाढतो. मी थोर पुण्यशाली व तो लहान पापी असा फरक केला जातो. अशा कर्मांचा व कर्मठपणाचा अभिमान वाढू दिला म्हणजे शेवटी त्यातून लढाया, मारामाऱ्या, रक्तस्त्राव होऊन धर्माची वृद्धी न होता उलट द्वेष वाढतो व प्राणहानी होते. कर्मकांडातील वते, उद्यापने, सोवळेओवळे यातून विनाकारण अडाणीपणा वाढतो व त्रास होतो. हातावर पाल पडली तर काय होते, बोटावर, पायावर, उजव्या स्व्रांद्यावर पडली तर काय होते अशा शेकडो असंमजस समजुती आहेत. कर्मकांडातील अशा जडतेमुळे मनुष्याची प्रगती होत नाही. उलट तो पुनः पुनः भोवऱ्यात सापडून अडखळतो. आणि पडतो. ानड्यांच्या मते योगमार्गात निष्ठुरता व कठोरपणा जास्त आहे तर ज्ञानमार्गात अभिमान प्रबळ होतो. कर्मकांडयुक््त कर्ममार्गाने जडता वाढते. अशा कर्ममार्गात मनुष्य एकदा गढून गेला म्हणजे सारा जन्म त्यातच गुंतून पंडतो. जडतेची मजल येथपर्यंत जाते की वर्ष-वर्षपर्यंत एकच यज्ञ चालतो. पण त्याचा फायदा काय याचा कोणी विचार करीत नाही. एकादाशीच्या दिवशी एकजण निराहार राहतो तर दुसरा शैव असेल तर.तो दोनदा जेवतो. एकजण आडवे भस्म व गंध लावेल तर दुसरा उभी रेख कोरितो. (ध. व्या. पा.
२६-४६)
स्वर्ग व नरक या भ्रामक कल्पनांवर रानड्यांनी अशीच टीका केली आहे. आत्मा शरीराच्या पाशाने बद्ध होऊन कामक्रोधादिकांच्या आधीन झाला म्हणजे नरकाची अथवा अधोगतीची सुरवात झाली व तो दुष्टप्रवृत्तींपासून परावृत्त होऊन शांतीच्या-समाधानाच्या . मार्गास लागला तर स्वर्गास वा परागतीस प्रारंभ झाला असे न मानता आपण भ्रष्ट कल्पनांवर विश्वास ठेवतो. त्यामुळे धर्माचे अतिशुद्ध स्वरूप बदलून जाते. स्वर्गनरकासंबंधी बरेच ग्रंथ झाले आहेत. खरे तर स्वर्गनरक आपल्या परिवारात, आचरणात व नेहमीच्या वृत्तीत असतात. स्वर्गनरक बीजरूपाने येथेच व आपल्या ठिकाणी आहेत ही अनुभवांची गोष्ट आहे, श्रद्धेची नव्हे असे रानडे सांगतात. काम, क्रोध व लोभ ही नरकाची तीन दारे आहेत त्यातून जो मुक्त होतो त्याचे कल्याण होऊन त्याला परा म्हणजे उत्तम गती प्राप्त होते - हे आपण लक्षात घेत नाही. (ध.व्या. पा. १३५-८)
खऱ्या हिंदुत््वास जातिभेद, मूर्तिपूजा, स्पर्शस्पिर्शाचा बाजार यापैकी कोणत्याही गीष्टीची आवश्यकता नाही असे रानड्यांचे मत होते. त्यांचा धर्मसंस्थेच्या विकासक्रमावर विश्वास होता. त्यामुळेच उन्नत धर्म अवस्था येईल याची त्यांना स्त्री होती. प्रथमतः: मानव भूतपिशाच्चांची पूजा करतो. पुढच्या अवस्थेत तो मूर्तिपूजा करतो. अनेक देवतांची पूजा करतो. नंतर समाज एकेश्वरीमतापर्यंत येऊन पोहोचतो. सुधारणांचा असा क्रम सतत चालू आहे असे रानडे मानीत (ध. व्या. पा. ३०८-३१०) त्यांचा प्रार्थना समाज एकेश्वरमतावर विश्वास ठेवणारा होता. म्हणजेच उच्च अवस्थेस नेणारा होता. मूर्तिपूजा, .. पुनर्जन्म, विषमता, अंधश्रद्धा, चमत्कार, कर्मकांड यांना फाटा देऊन ती साध्या, सरळ, _ सोप्या, सर्व जातींना खुला असणाऱ्या भक््तीमार्गी धर्माचा पुरस्कार करीत होता. या धर्माप्रमाणे प्रत्येक व्यक्ती त्याच्या विवेकबुद्धीप्रमाणे वर्तन करण्यास स्वतंत्र असेल. कोणत्याही बाह्य नियंत्रणापासून ती मुक्त असेल. योग्य-अयोग्य, नैतिक-अनैतिकतेचा निर्णय ती स्वतः घेऊ शकेल.
गोपाळ गणेश आगरकर (१८५६-१८९५) :
रानड्यांप्रमाणे आगरकरांचा विकासक्रमावर विश्वास होता. धर्मसंस्था काय किंवा समाजातील इतर संस्था काय त्यांच्यात हळूहळू स्थित्यंतर होत असते. व समाज कनिष्ठ अवस्थेतून उन्नत अवस्थेत जात असतो या उत्क्रांतिवादी तत्त्वावर आगरकरांचा विश्वास होता. याच दृष्टिकोनातून आगरकरांनी हिंदुधर्माकडे पाहिले व त्यातील अंधश्रद्धा, रूढी व दुराग्रहांवर आपल्या .अल्पायुष्यात सातत्याने टीका केली. आणि मराठी हिंदु समाजाची विवेकशक्ती जागृत करण्याचा प्रयत्न केला. मनुष्य थोडा विचार करू लागला म्हणजे निसर्गातील बहुतेक गोष्टींबाबत एक प्रकारची भीती उत्पन्न होऊन त्याच्या मनात धर्मकल्पनेचा उद्भव होतो. व पुढे तिचा विकास होत जाऊन ती जास्त जास्त शुद्ध बनत जाते. वारा, पाऊस, पूर, चंद्रसूर्याच्या गती या गोष्टींची कारणे नीट कळू लागली म्हणजे त्यांच्यावरील धर्मश्रद्धा हळूहळू उडू लागते. असाच प्रकार देव मानलेल्या वनस्पती व जनावरांसंबंधी घडून येतो. कार्यकारणाचे ज्ञान झाले म्हणजे असे विचारान्तर होण्यास मदत होते. (आ. वा. खंड १ पा. २६) पण हे परिवर्तन होण्यास बराच काळ जावा लागतो. श्रद्धाळू धार्मिकास आपल्या धर्मसमजुती व आचार यांना “बुद्धिवादाच्या प्रखर मुशींत” घालण्याची छाती होत नाही. पण आगरकरांच्या मते असले भित्रेपण फार दिवस चालावयाचे नाही. पूर्वी विवेक जागृत झाला नव्हता तोपर्यंत विश्वासाने व श्रद्धेने प्रत्येक . वर्तनाचे नियमन होत होते हे ठीक. पण आता श्रेष्ठ तत्त्व अवतरले आहे. आता .“वविश्वासावलंबी कल्पनांस आणि आचारास विवेकाची आंच देऊन झाळून पाहणे” हे कर्तव्य बनले आहे. (आ. वा. खं. १ पा. ५६-५७)
जोपर्यंत विचारशक्ती विकास पावलेली नसते तोपर्यंत मानवास कार्यकारणाचा निश्चय करता. येत नाही; प्रालीचे कुचकुचणे, घुबडाचे रडणे, मांजराचे आडवे येणे, विधवांचे दर्शन होणे, ताऱ्यांचे पडणे, चंद्राभोवती खळे होणे या गोष्टीतील 'अनिष्टत्व' आणि स्वप्नात साप दिसणे संवत्स स्त्री किंवा गाय समोर येणे, भारदाजाचे दर्शन होणे, व्यक्तिभेदाप्रमाणे उजवा. किंवा डोळा. लवणे, ज्याचे नाव निघत असते ती व्यक्ती येणे यातील 'इष्टत्व' हे काही विचाराने ठरलेले नाही. पण त्यांचा अनेक वर्ष अंमल चालू राहतो. पुढे ज्ञान वाढल्यावर या प्रकारातील खोटे कार्य-कारणसंबंध लक्षात येऊन ते मागे पडतात. (आ. वा. खंड १ पा. २३१)
धर्मकल्पनेचेही तसेच आहे. देवाची कल्पना पिशाच्च कल्पनेपासून निघाली आहे. या हर्बर्ट स्पेन्सरच्या सिद्धान्ताला अनुसरून आगरकरांनी आपल्याकडील देवदेवतांची उत्पत्ती पिशाच्यकल्पनेतून कशी झाली आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. आहे. महादेव हा एक महापिशाच्च आहे असे म्हणण्यास त्यांना काहीच हरकत दिसत नव्हती. आत्मा ही मानवाने केलेली एक कल्पना आहे. निर्गुण, निराकार प्रमेश्वर, अशरीरी मृतात्मा आणि पिशाच्च यांच्या स्वरूपात काहीच फरक नाही. परमेश्वर स्तुती ऐकून प्रसाद दाखविल्यावर प्रसन्न होतो, किंवा श्राद्धे केल्याने मृतात्मे संतुष्ट होतात ही खोटी समजूत आहे. आत्म्याला त्यांचे सूक्ष्म व स्थूल अशी दोन रूपे आहेत किंवा त्याचे देहबद्ध व देहातीत असे दोन प्रकारचे अस्तित्व आहे अशी कल्पना पक्की झाली की मेलेल्यांचे' आप्त जिवंतपणी त्यास ज्या गोष्टी प्रिय होत्या त्या त्याला मेल्यानंतर अर्पण करतात. मेलेल्या मुलाची ताळू भरणे, सवाष्ण स्त्रीच्या प्रेताला नहाण घालून नवीन लुगडे नेसवणे, कुकू लावून ओटी भरणे, पिंड देणे वगैरे गोष्टी त्यातच बसतात. आगरकरांच्या मते आमचा सारा प्रेतविधी व श्राद्धविधी याच कल्पनेचा परिणाम आहे. आम्ही भूताखेतांना जी देणी देतो त्यात आणि मेलेल्यांच्या तृप्तीसाठी जी श्राद्धे करतो त्यात वास्लविक पाहता काहीएक फरक नाही. आगरकर हेचं तर्कशास्त्र पुढे चालवून आपल्याला सांगतात की देवळे थडग्यांपासून तयार झाली आहेत. किंवा समाधीपासून तयार झाली आहेत. मशिदी कबरस्तानापासून व चर्चे चर्चयार्डापासून निघाली आहेत. म्हणजेच आकाशातून देव येथे कधी आले नाहीत व येथून कधी गेले नाहीत: आम्हीच त्यांना निर्माण करतो त्यांच्या गुणाचे पोवाडे गातो. जो जो बुद्धीचा विकास होत जाऊन कार्यकारणाचा संबंध चांगला कळू लागतो तो तो प्राथमिक व पौराणिक कल्पना मिथ्या भासू लागतात. भूत, पिशाच्च, देवदानव वगैरे असत्य वाटू लागतात. पूजेस व प्रार्थनेसही ओहोटी लागते. आणि “काही वेळ-ब्रम्हांडास उत्पन्न करून त्याचे परिपालन व नाश करणार्या एका परमात्म्याच्या कल्पनेचा उदय होतो. पण पुढे वेदांत-विचाराच्या कुंडात पेटलेल्या अग्नीत हे दैतही खाक होऊन जाते आणि अहं ब्रम्हास्मि येवढा अनिर्वचनीय विचार मागे राहतो. धर्मविचाराचा हा कळस आहे. (आ. वा. खंड २ पा. १७६-२१०) |
ज्या थोड्यांना कार्यकारण संबंध कळून चुकतो, सत्य नजरेस पडते व ज्यांच्या पूर्वीच्या अंधश्रद्धा गळून पडतात त्यांनी क्षुद्र लोकांच्या अवकृपेला, रागाला किंवा उपहासाला न भिता मनास योग्य वाटेल ते लिहावे व सांगावे. त्यामुळेच जगाचे कल्याण होईल. नव्या पद्धतीने वागण्याचे धैर्य आल्याशिवाय फक्त ज्ञान वाढून फायदा म्हणावा तसा होत नाही. युरोपात ग्रहणे कशी होतात, चंद्रसूर्यास खळी कशी पडतात या गोष्टी ज्यांना कळाल्या त्यांनी पूर्वापार चालत आलेल्या रूढींना न जुमानता आधी स्वतःचे वर्तन बदलले व नंतर दुसऱ्याचे वर्तन बदलण्याचा प्रयत्न केला. युरोपची आपल्याशी तुलना करून आगरकर म्हणतात आपल्याकडे. “लोकापवादांचे भय” फार आहे. जोपर्यंत सूज्ञ लोक सामान्य लोकांचा गैरसमज दूर करण्याचे धैर्य दाखवीत नाहीत तोपर्यंत दुरोग्रह व दुष्ट चालीरीती चालूच राहतील. गॅलिलिओ व कोपरनिकस यांनी धैर्य दाखवले नव्हते तर युरोपातही अज्ञानाचा अंत झाला नसता. (आ. वा. खं. १ पा. ७२-७३) कोणासही न भिता आपल्या मनास जे प्रशस्त, योग्य वाटेल ते दुसऱ्याला सांगावे व त्याप्रमाणे आचरण करावे नाहीतर आपण अंधश्रद्धा व अमानुष रूढींपासून स्वतंत्र होणे अवघड आहे असे आगरकरांना वाटत होते. परंतु त्याचबरोबर त्यांना असाही विश्वास वाटत होता की आधुनिक ज्ञानाचा जसजसा प्रसार होत जाईल तसा तसा हा हिंदु समाज या अंधश्रद्धांच्या जोखडातून मुक्त होईल. पुढील शब्दात त्यांनी हा विश्वास व्यक्त केला होता. '“आमच्या. अर्वाचीन विचारास ज्या धार्मिक व सामाजिक गोष्टी अप्रशस्त वाटू लागल्या आहेत, त्यांस शेकडो मनूंचे व सहस्त्रावधी पाराशरांचे आधार दाखविलेत व त्यांचा प्रसार न व्हावा म्हणून त्यांच्या मार्गात कोट्यवधी लोकांचा मूर्खपणा, वृथा अभिमान आणि उठावणीचे आरडे यांचे अडथळे आणून घातलेत तरी ज्याप्रमाणे पर्वताच्या माथ्यावरील सरोवराच्या भिंती फोडून तुफान वेगाने कड्यावरून पडू लागलेल्या वारिवाहाची गति कुंठित करण्यास ' क्नोर्णेेही धजत नाही, त्याप्रमाणे आमच्या मूर्खपणाच्या सामाजिक व धार्मिक 'समजुतीस लागलेला वणवा कोट्यवधी अजागळ कीटकांच्या क्षुद पक्षवाताने किवा मोठ्या किड्यांच्या शुष्क श्वासवाताने विझण्याचा मुळीच संभव नाही. उलट हेच त्यांत होरपळले जाण्याचा संभव आहे. (आ. वा. खं. १ पा. १२८) अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करणार्या आजच्या कार्यकर्त्यास आगरकरांच्या या उद््गाराने आपले कार्य करण्यास जास्त हुरूप असे वाटते.
या तीन विचारवंतांच्या अंधश्रद्धांविषयक विचारांचा आढावा घेतल्यावर आपल्या असे लक्षात येते की एकोणिसाव्या शतकात अंधश्रद्धांचा विचार हिंदुधर्माच्या संदर्भात झाला. अंधविश्वास व वेडगळ समजूतींना धर्माचे अधिष्ठान असते व म्हणून अंधश्रद्धा घालवायच्या असतील तर प्रथम हिंदु धर्मात सुधारणा घडवून आणावी लागेल याची जाणीव .लोकहितवादी, रानडे व. आगरकरांना होती. अंधश्रद्धा अधांतरी टांगलेल्या नसतात त्यांना धार्मिक ग्रंथांचा, पुराणांचा व कर्मकांडांचा पाया असतो. या पायाला आपण जोपर्यंत हात लावत नाही तोपर्यंत अंधश्रद्धा नाहीशा करणे कठीण असते. तुम्ही जेव्हा चालीरीती, रूढी, कर्मकांड, अंधविश्वास यावर हल्ला करता तेव्हा तुम्ही धर्मावरच हल्ला करत असता असा.त्याचा अर्थ लावला जातो व तुमच्यावर हिंदुधर्माचे विरोधक, नास्तिक असा शिक्का मारला जातो. या कोंडीतून बाहेर पडण्याचा एक मार्ग लोकहितवादी, रानडे व आगरकर यांनी दाखवला होता. तो होता धर्मसुधारणा करण्यांचा. मूर्तिपूजा, कर्मकांड, उच्चनीचता यांना फाटा देऊन उच्चतम धर्माकडे वांठचाल करण्याचा. परंपरेतील क्रांतिकारक आशयावर जोर देऊन - भक्तिमार्गाचा पुरस्कार करून एकेश्वरवादी मानवतावादी धर्माचा अवलंब करण्याचा. लोकहितवादी व रानड्यांचा परमेश्वरावर - धर्मावर - पूर्ण विश्वास होता. ते आस्तिक होते. त्यामुळे धर्मकल्पनेचे . समूळ उच्चाटन करणाऱ्या सुधारणेला, परंपरेला नाकारणाऱ्या आधुनिकतेला त्यांचा सक्त विरोध होता. धर्मकल्पनेत हळूहळू परिवर्तन होत .असते. धर्मसंस्थेत विकास होत असतो. पिशाच्च कल्पनेतून निघालेल्या धर्मकल्पनेत एकेश्वरवादी टप्पा येतो वं त्याच्या पुढचा टप्पा असतो अज्ञेयवादाचा, अशी आगरकरांची धारणा होती. एकोणिसांव्या शतकातील रामडेप्रणित प्रार्थनासमाज हा जर एकेश्वरवादाचा अविष्कार मांनला तर त्यास आगरकरांचा पाठिंबाच असणार. कारण एकेश्वरवाद हा धर्मकल्पनेच्या विकासातील पुढचा टप्पा आहे, आणि समाजसंस्थेतं व धर्मसंस्थेत एकदम सुधारणा होत नसते असा आगरकरांचा विश्वास होता. त्यामुळे त्यांनां प्रिय असणारा अज्ञेयवादे लगेच येऊ शकेल असे त्यांना वाटत नव्हते. म्हणजेच एकोणिसाव्या शतकात आगरकरांची भूमिकाही धर्मसुधारणेचा पुरस्कार करण्याची होती हे आपल्यां लक्षात येते.
या तीन विचारवंतांच्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या विचाराकडे पाहिले तर आपल्या असेही लक्षात येते की त्या काळातील सुधारकांनी अंधश्रद्धा. निर्मूलन हा जसा धर्मसुधारणेचा एक भाग मानला होता. तसेच तो एकूण समाज परिवर्तनाचे एक अंग मानला होता. कारण त्यांच्या मते. समाजाचे परिवर्तन एकांच. वेळी संर्व भागात होत असते. आर्थिक, सामाजिक, राजकीय व धार्मिक परिवर्तन एकाच वेळी हातात हात घालून होत असते. त्यामुळे. त्यांनी कोणतीही चळवळ इतर परिवर्तनवादी प्रयत्नाहून वंगळी मानली नव्हती. सम्यक परिवर्तनाचाच आग्रह त्यांनी धरला होता. एकच विचारवंत आपल्या समाजाचा सर्व बाजूंनी विचार करून त्या सर्व बाजूत एकाच वेळी कसे परिवर्तन होईल याचा आकृतीबंध मांडण्याचा प्रयत्न करीत होता.
याउलट आज आपण पाहतो. की अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ धर्मसुधारणेशी जोडली गेलेली नाही. खरे. तर धर्मसुधारणेची अशी चळवळ आज चालूच नाही. अंधश्रद्धाविरोधी वैचारिक मांडणी. करणारी मंडळी आर्थिक परिवर्तनाचा विचार करताना दिसत नाहीत. सरंजामशाही व भांडवलशाहीच्या विळख्यात सापडलेल्या या समाजाच्या मूलभूत समस्येचे उत्तर शोधण्यास. आपण नकार देत आहोत. एकोणिसाव्या शतकातील रानड्यांसारख्या विचारवंतांनी त्या काळातील पारंपारिक समाजाचा वसाहतवादाच्या संदर्भात विचार करून सुधारणेचा, सम्यक परिवर्तनाचा एक आकृतीबंध मांडला होता. आज आपण माश्र वरवर दिसणार्या प्रश्नांचा सुटा सुटा विचार करून ते सोडवण्यासाठी अलग अलगपणे प्रयत्न करताना लोकहितवादी, रानडे, आगरकरांच्या ऐतिहासिक कामगिरीकडून काहीही न शिकता मुख्य लढाई लढण्यास नकार देत आहोत.
संदर्भ :-
अनंत काकबा प्रियोळकर (संपा.), लोकहितवादीकृत निबंधसंग्रह, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई १९६७.
लोकहितवादी,. स्वाध्याय, नाशिक, १८८०.
लोकहितवादी, आश्वलायन गृह्यसूत्र (अनुवाद) मुंबई 9८८०,
लोकहितवादी, आगमप्रकाश, मराठी भाषांतर, मुंबई १८८४.
निर्मलकुमार फडकुले, लोकहितवादी काल आणि कर्तृत्व, कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे १९७३.
The Miscellaneous Writings of the Late Hon'ble Mr. Justice M. G. Ranade, Ramabai Ranade, Bombay 1915
धर्मपर व्याख्याने -
T. N. Jagadisan (ed), The Wisdom of A Modern Rishi, Writings and Speeches M. G. Ranade, Rochouse and Sons. Ltd. Madras (Date of Publication not known)
म. गं. नातू आणि दि. य. देशपांडे, आगरकर वाडमय, खंड १ व खंड २, म॑. रा. सा.
आणि सं. मंडळ, मुंबई, १९८४ व १९८५
--------------------------------------------------
म ( ) मध्ये प्रकाशित