साहित्याचे ललित आणि ललितेतर असे दोन प्रमुख प्रकार मानले तर वैचारिक साहित्याचा समावेश ललितेतर या प्रकारात करता येईल. वैचारिक साहित्य अनेक विषयांवर लिहिले जात असते. राजकारण हा त्यातील एक महत्त्वाचा विषय असतो. राजकारण या विषयाला धरून बऱ्याच उपविषयांवर लिहिले जात असतें. काही लेखन राजकारणावरील भाष्य म्हणून केले जाते तर काही राजकारणाचे विश्लेषण या पद्धतीने येते. राजकीय विचारप्रणालींमुळे या भाष्यात अथवा विश्लेषणात फरक पडत असतो. लेखकाचा ज्या विचारप्रणालीवर विश्वास असेल त्याप्रमाणे त्याचे भाष्य किंवा विश्लेषण बदलेल. परंतु राजकीय विचारधारेवरही स्वतंत्रपणे लिहिले जात असते. तसेच राजकीय सिद्धांतांचा ऊहापोह होत असतो. नवीन विचारधारांचा उगमही या लिखाणातून होतो व सिद्धान्तही नवे आकार घेत असतात. अशा राजकारणावरील विविध प्रकारच्या वैचारिक लेखनात राजकारणाचे प्रतिबिंब पडलेले असते हे साहजिकच आहे. परंतु असे म्हणताना आपण राजकारण आणि वैचारिक लेखन यांना वेगवेगळे मानतो. प्रत्यक्षात बऱ्यात वेळा वैचारिक लेखन हा राजकीय कृतीचाच भागं असू शकतो. ते काही राजकारणाचे . प्रतिबिंबच असते असे नाही. राजकारणात हस्तक्षेप करण्याचे वेगवेगळे मार्ग : असतात. लेखन हाही त्यातील मार्ग असू शकतो हे लक्षात घेतले पाहिजे. राजकीय. कृती करण्याऐवजी राजकीय . लेखन करणे हेही काहींच्या बाबतीत शक्य आहे. राजकारणाचा एक भाग म्हणूनही लेखन. केले जात असते.
राजकीय कृतीला जोड देण्यासाठी या लेखनाचा उपयोग होत असतो. आपली राजकीय भूमिका मांडण्यासाठी किंवा स्पष्ट करण्यासाठी लेखन करावे लागते. ' राजकारणातील प्रतिस्पर्ध्याला उत्तर देण्यासाठी, त्याच्यावर टीका कंरण्यासाठी लेखनाचा आधार घ्यावा लागतो. कार्यकर्त्यांना उपयोगी पडावे, त्यांना स्पष्टता ' यावी किंवा मार्गदर्शन व्हावे यासाठीही राजकीय लेखन होत असते. राजकीय चळवळींचे मूल्यमापन करणे किंवा राजकीय पक्षांच्या कामगिरीचा आढावा घेणे हाही हेतू लेखनामागे असू शकतो. तसेच राजकीय इतिहास हा वैचारिक लेखनाचा एक प्रांत आहेच. राज्यशास्त्र हे एक महत्त्वाचे सामाजिक शास्त्र आहे. त्यातील अभ्यास हा राजकारणाचा अभ्यास असतो, त्यामुळे राजकीय विषयांवर पाठ्यपुस्तकात्मक किंवा. संशोधनात्मक लेखन होत असते. प्रस्तुत निबंधात महाराष्ट्रातील राजकारणाचे प्रतिबिंब मराठी भाषेतून होणाऱ्या वैचारिक लेखनात कसे पडते याची सूत्ररूपाने चर्चा करायची आहे. मराठीमध्ये आजवर झालेल्या या. प्रकाराच्या लेखनाचा आढावा घेणे हा या निबंधाचा हेतू नाही. वैचारिक लेखनावर चर्चा करताना व उदाहरणे देताना सर्वसाधारणतः. १९६० नंतरचा कालखंड ब विशेषकरून गेल्या २०-२५ वर्षांचा काळ लक्षात घेतला आहे. म्हणजेच चर्चा मुख्यतः सद्यःस्थितीवर _ आहे असे म्हणावे लागेल. वैचारिक लेखन ही व्यापक संज्ञा आहे. त्यामध्ये धर्म, शिक्षण, अर्थकारण, समाजकारण, तत्त्वज्ञान, विज्ञान यांसारख्या सर्वच विषयांवरील लेखनाचा समावेश होतो. या विषयांवरील लेखनात राजकारणाचे प्रतिबिंब अप्रत्यक्षपणे पडत असते, पण त्याचा या निबंधात विचार केलेला . नाही. या विषयांवरील लेखनातील भूमिका तुमच्या राजकीय भूमिकेवरून ठरत असत्ते, पण त्याची चर्चा करणे या निबंधात शक्य नाही. परंतु, महाराष्ट्राच्या राजकारणात वरीलपैकी जे विषय महत्त्वाचे ठरले, त्याबाबत रजकीय अंगाने लिहिले गेले त्याचा विचार सूत्ररूपाने का होईना, आपल्याला करावा लागेल.
राजकीय लेखन कोण करते
एवढे प्रास्ताविक केल्यानंतर व निबंधाच्या विषयाची व्याप्ती ठरविल्यानंतर आपल्याला मराठीतून राजकारणावर कशा प्रकारचे लेखन होते या प्रश्नाची उकल करता येईल. पण तत्पूर्वी या प्रकारचे लेखन कोण करते, या लेखनाचे माध्यम कोणते आहे वब हे लेखन प्रकाशित कोण करते याची प्राथमिक माहिती. थोडक्यात का. होईना, घ्यावी लागेल. वरील प्रकारचे वैचारिक लेखन साहजिकच पत्रकार करीत असतात. संपादकीय लेखात महाराष्ट्रातील राजकारणावरील भाष्य आढळेल, तर इतर सदरांमध्ये विश्लेषण आढळेल. ' महाराष्ट्र टाइम्स 'मध्ये ' महाराष्ट्र देशी ' या शीर्षकाचे सदर नियमितपणे प्रसिद्ध होते. त्यामध्ये बातम्यांमधून जे हाती लागत नाही ते कळते. ' युनिक फिचर्स ' या संस्थेतर्फे प्रसिद्ध होणारी ' लोकसत्ता 'सारख्या वृत्तपत्रातील सदरेही महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रकाश टाकीत असतात. राजकीय नेते आपले म्हणणे मांडण्यासाठी . लेखनाचा आधार घेताना दिसतात. सर्वात जास्त लेखन करणारा महाराष्ट्रातील राजकीय नेता म्हणून शरद जोशींचे नाव घ्यावे लागेल. समाजवादी व साम्यवादी पक्षांचे नेतेही महाराष्ट्राच्या राजकारणावर लिहितात. काँग्रेसची मंडळी यात मागे आहेत. अलीकडे बाळासाहेब विखे-पाटील लिहू लागलेत. यशवंतराव मोहिते पूर्वी लिहीत असत. विठ्ठलराव गाडगीळांच्या लेखनाचा विषय सामान्यतः महाराष्ट्र हा नसतो. जयंतराव टिळक ' केसरी 'त पूर्वी बरेच लिहीत असत. सामाजिक व राजकीय चळवळीतील कार्यकर्ते मंडळीही त्यांच्या चळवळींच्या विचारधारेविषयी अथवा त्यांच्या राजकीय शत्रूंविषयी त्रोटक स्वरूपात लिहितात. लेख व पुस्तिकांच्या रूपाने त्यांचे लेखन होते. विचारवंत इतर विषयांप्रमाणे राजकारणावरही लिहितात. मराठीतील विचारवंतांच्या लेखनाकडे दृष्टिक्षेप टाकला तर असे दिसते की, या लेखनात राजकीय विचार, तत्त्वज्ञा, राजकीय इतिहास व चरित्रे यांवर जास्त जोर दिलेला आहे. महाराष्ट्राच्या सद्य:स्थितीतील राजकारणावर भाष्य फारसे आढळत नाही. गं. बा. सरदार किंवा शेषराव पोरे यांचा उदाहरणादाखल उल्लेख येथे करता येईल. विचारवंतांनी स्वातंत्र्यपूर्व काळावर जास्त लेखन केले आहे, असे सर्वसाधारणत: म्हणता येईल. राजकारण हा राज्यशास्त्राच्या प्राध्यापकांच्या अभ्यासाचा व संशोधनाचा विषय आहे, पण त्यांची कामगिरी फारशी स्पृहणीय नाही. हाताच्या बोटावर मोजता येतील, एवढेच राज्यशास्त्राचे प्राध्यापक महाराष्ट्राच्या राजकारणावर लेखन करताना दिसतात. यामध्ये य. दि. फडके, भास्कर भोळे, रावसाहेब कसबे, अशोक चौसाळकर यांसारख्यांचा समावेश होतो. महाराष्ट्राच्या राजकारणावर इंग्रजीतून पुस्तके लिहिली गेली आहेत व लेखही प्रसिद्ध झाले आहेत, पण मराठीतून फार कमी लिहिले गेले आहे. महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये अलीकडे .महाराष्ट्रातील राजकीय प्रक्रियेवर अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत, पण त्यांवर मराठीत अद्यापही ' एकहीं प्रमाण ग्रंथ उपलब्ध नाही. एखाद दुसरे पाठ्यपुस्तक प्रसिद्ध झाले आहे. एकूणच महाराष्ट्रातील विद्यापीठांत महाराष्ट्राच्या राजकारणाचा व समाजकारणाचा . अभ्यास करण्याचे प्रमाण फार कमी आहे. मग मराठीतून लिहिण्याचे बाजूलाच राहते. रशिया वा अमेरिका किंबा युरोपच्या राजकारणाचा अभ्यास करणारी केंद्रे महाराष्ट्रात स्थापन करण्यात आली आहेत, पण महाराष्ट्राच्या राजकारणाचा अभ्यास करणे हा प्रकार फारसा आढळत नाही. परदेशात मात्र महाराष्ट्राच्या राजकारणावर अभ्यास करणारे बरेच प्राध्यापक आहेत. त्यांनी मराठी भाषा शिकूने किंवा दुभाषांमार्फत येथील राजकीय प्रक्रियेवर संशोधन केले आहे.
राजकीय लेखनाचे माध्यम
मराठीतून राजकारणावर जे लेखन होते त्याचे माध्यम वेगवेगळे असू शकते. वृत्तपत्रांतीन लेख व सदरे लिहिणे हे झाले पहिले माध्यम. ताज्या . घडामोडींचे विश्लेषण करणे यांवर त्यांचा जास्त भर असतो. महाराष्ट्र टाईम्स, लोकसत्ता, सकाळ, लोकमत, पुढारी या वृत्तपत्रांतील लेखन, त्यातल्या त्यात चांगले असते. दुसरे माध्यम आहे नियतकालिके. यांमध्ये साप्ताहिके व वैचारिक चर्चेला वाहिलेली नियतकालिके असा फरक करावा लागेल. सहाव्या आणि सातव्या दशकामध्ये ' माणूस ' या साप्ताहिकाने महाराष्ट्राच्या राजकारणात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला होता. समाजवादी, साम्यवादी व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना एकाच वेळी आपले व्यासपीठ उपलब्ध करून देऊन त्याने सामाजिक चळवळीत व विशेषेकरून विकासाच्या कामात वैचारिक मतभेद महत्त्वाचे नसतात अशी भूमिका पुढे रेटण्याचा प्रयत्न केला होता. गेल्या काही वर्षांत ' साप्ताहिक सकाळ 'ने उच्च दर्जा ब लोकांचे रंजन यांची योग्य सांगड घालून महाराष्ट्राच्या राजकीय स्थितीवरील लेखन सातत्याने प्रसिद्ध केलेले आहे. वैचारिक ' नियतकालिकांचा वाचकवर्ग मर्यादित असतो, पण त्यातील चर्चा दीर्घकाळ उपयोगी पडणाऱ्या व विश्लेषणात्मक स्वरूपाच्या असतात. यामध्ये ' समाज प्रबोधन पत्रिका ' ब * अनुभव ' यांचे उदाहरण घेता येईल. पुस्तिका | प्रसिद्ध करणे हा. प्रकार अलीकडे फारच वाढलेला आहे. नेते, कार्यकर्ते व॑ सहानुभूती असलेले अभ्यासक यांनी पुस्तिका लिहिण्याचा सपाटा चालविला आहे. पुस्तिका. लिहून त्या विकणे हे चळवळीचे काम मानले जाते. या प्रकारातून आपण राजकीय चळवळ करीत आहोत अशा भ्रमात राहता येते. अर्थात 'पुस्तिकांचा उपयोग हा निश्चितच होत असतो. नियतकालिकांमधील लेखांचे वाचक मर्यादित असतात, तर पुस्तिका जास्त लोकांपर्यंत जाऊन पोहोचतात. किंमत पण कमी असते त्यामुळे त्यांचा खपही फार होतो. परंतु कितीजण त्या वाचतात .हा एक त्रश्नच आहे. पुस्तिका घेणारेही आपण चळवळीत आहोत या भावनेने घेतात. शिबिरे, मेळावे, संमेलने, चर्चासत्रे या ठिकाणी त्यांची बऱ्यापैकी विक्री होते. पुस्तके हे जास्त टिकाऊ . स्वरूपाचे माध्यम आहे. महाराष्ट्राच्या राजकारणावर स्वतंत्र पुस्तके फारच कमी आहेत. आहेत ते. मुख्यत्वेकरून ' लेखसंग्रह. पत्रकार, संपादक, विचारवंत, नेते, कार्यकर्ते व अभ्यासक यांनी वेळोवेळी प्रसिद्ध केलेले लेख एकत्र करून ते संग्रह प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत. गोविंद तळवलकर, माधव गडकरी, अशोक जैन, मे. पुं. रेगे, मा. गो. वैद्य, बाळ ठाकरे, अरुण टिकेकर व प्रकाश बाळ यांच्या लेखसंग्रहांची उदाहरणे येथे देता येतील. ' शताब्दी ' किंवा गौरवग्रंथ ' यांचाही समावेश करावा लागेल. * आजचा महाराष्ट्र' हा ' विनायकराव कुलकर्णी गौरवग्रंथ ' महाराष्ट्राच्या विविध बाजूंवर प्रकाश टाकतो. त्यात राजकारणाचाही अंतर्भाव झालेला आहे. ' परिवर्तनाचे प्रवाह ' हा ' सकाळ 'ने काढलेला ग्रंथही महाराष्ट्राच्या राजकारणातील १९८९ पर्यंतच्या प्रवाहांचा ऊहापोह करतो. बर्याच विचारवंतांची, समाजसुधारकांची ब नेत्यांची चरित्रे मराठीत उपलब्ध आहेत. त्यातून त्यांच्या राजकीय जीवनावर व राजकीय तत्त्वज्ञानावर चर्चा होतेच, पण तत्कालीन राजकारणावरही होते. यशवंतराव चव्हाण, शरद पवार यांच्यावर चरित्रात्मक ' पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत.
या प्रकारचे साहित्य प्रसिद्ध करणाऱ्या काही खास प्रकाशनसंस्था आहेत. * सुगावा ', ' साधना ', ' लोकवाडूमय गृह ' व भारतीय विचार साधना यांचा निर्देश या ठिकाणी करता येईल. राजकीय पक्ष व संघटना स्वत:ही काही साहित्य प्रकाशित करीत असतात. उदाहरणार्थ, भाजप, शेतकरी संघटना, मराठा महासंघ या संघटना व पक्ष. विशिष्ट विचारधारेबद्दल बांधिलकी असणाऱ्या सामाजिक संस्थाही पुस्तिका, नियतकालिके ब पुस्तके .प्रसिद्ध करताना आढळतात. समाजवादी प्रबोधिनी, शंकर ब्रह्मे. ग्रंथालय, महात्मा फुले प्रतिष्ठान यांसारख्या संस्था असे साहित्य प्रकाशित करतात.
महाराष्ट्रातील राजकारणाचे वैचारिक साहित्यात जे प्रतिबिंब पडते, त्याचे ' स्वरूप कसे आहे याचा थोडक्यात शोध घेणे आता सोपे जाईल.
वास्तवाकडे दुर्लक्ष
महाराष्ट्रातील राजकारणाचे जे प्रतिबिंब वैचारिक साहित्यात पडते ते अगंदी वरवरच्या स्तरावरील राजकारणाचे असते, असे साररूपाने ब सर्वसाधारणत: म्हणता येईल. निवडणुका, राजकीय पक्ष, राजकीय चळवळी ब सर्वात तळाला सामाजिक व आर्थिक गट म्हणजेच जात ब वर्ग अशी राजकारणाची उतरंड असते असे मानले तर, मराठीतून होणाऱ्या लेखनात सामान्यतः या उतरंडीतील वरच्या स्तरांवर जास्त जोर दिलेला असतो, असे दिसेल. राजकारणाचे ' सामाजिक आधार कोणते आहेत याचा शोध घेण्याचा प्रयत्न कमी होतो, त्यामुळे राजकारणाचे खरे स्वरूप कळत नाही. राजकीय घडामोडींचे, जय-पराजयाचे, यश-अपयशाचे फक्त वर्णन होते. फारतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्तरापर्यंत जाण्याचा प्रयत्न होतो, पण खरे आधार कोणते याबद्दल ऊहापोह आढळत नाही. एकूणच कारणमीमांसा टाळण्याकडे कल दिसतो. काही प्रसंगी जातींच्या गणितापर्यंत गाडी जाते, पण अर्थकारणात. जे बदल होतात त्यांचा ब नव्याने उदयाला येत असलेल्या राजकीय शक्तींचा अन्योन्य संबंध काय याची उकल होताना दिसत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणाचे खरे सूत्रधार कोण किंवा येथील साधनसंपत्तीचे बाटप कोणाच्या आधिपत्याखाली होते याचा अंदाज घेण्याचा प्रयत्नही दिसत नाही. त्यामुळे जी भाषण करीत नाही, निवडणुकीला उभी राहात नाही, चळवळीत उतरत नाही अशी सूत्रधार शक्ती कोणती याचा मागोबा धेतला जात नाही. आता - आतापर्यंत मराठा नेते राजकीय सत्तास्थानांवर होते, म्हणून त्यांच्याच होतात सर्व सत्ता होती असे मानले जाते. पण वाटपाचे निर्णय घेताना त्यांना . कितपत स्वातंत्र्य होते यावर प्रकाश टाकला जात नाही. त्यामुळे राजकीय चळवळी करणारी मंडळीही रस्ते चुकतात आणि अपयशाचे धनी होतात. सामाजिक व राजकीय चळवळीवर लेखन करणारी मंडळी वैचारिक व्यूहरचनेच्या आहारी जाताना दिसतात किंवा आपली भूमिका काय आहे हे पुनःपुन्हा सांगत बसतात, पण राजकीय वास्तवाकडे व सामाजिक-आर्थिक परिवर्तनाकडे दुर्लक्ष करतात. महाराष्ट्राच्या अर्थकारणात गेल्या काही वर्षांपासून ग्रामीण क्षेत्राचे महत्व कमी होत चालले आहे व शहरी भागांचे प्राबल्य वाढत चालले आहे त्यामुळे राजकारणातही बदल होत आहेत. पण वैचारिक लेखनात त्याचे प्रतिबिंब पडलेले दिसत नाही. एकूणच राजकीय अर्थशास्त्रीय (Political Economy) लेखन कमी झालेले आहे. म्हणून कोणते सामाजिक गट आर्थिक ब सामाजिक दृष्ट्या प्रबळ होत आहेत ब त्यामुळे त्यांचे राजकीय. वर्चस्वही वाढते आहे याची प्रतिमा वैचारिक लेखनात. पडलेली दिसत नाही.
राजकीय विश्लेषणापेक्षा किंबा राजकीय वास्तवाचे स्वरूप समजावून घेण्यापेक्षा राजकीय विचार, राजकीय विचारवंतांची चरित्रे, विचारप्रणाली तसेच स्वातंत्र्यपूर्व काळातील सुधारक ब चळवळी यांवर जास्त लेखन झालेले आहे असे दिसते. या विचारधारांचे सामाजिक आधार, कोणते होते किंवा आज कोणते आहेत, त्यांचे आजच्या वास्तवात काय महत्त्व आहे, याकडे सामान्यतः दुर्लक्ष होते आहे असे वाटते. शिवाजी, महात्मा फुले, डॉ. आंबेडकर व बॅ. सावरकर यांची चरित्रे व विचार यांचा अभ्यास होताना दिसतो आहे, पण स॒द्य स्थितीत त्यांच्या कार्याचे काय महत्त्व आहे व बदलत्या परिस्थितीत त्यांचा बिचार कितपत लागू पडतो यावर फारशी चर्चा होत नाही. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचे प्रतिबिंब धूसर राहते. जोपर्यंत वैचारिक लेखन राजकीय वास्तवाला जाऊन थेट भिडत नाही तोवर महाराष्ट्राच्या राजकारणाचे खरे प्रतिबिंब त्यात दिसणार नाही हे लक्षात घेतले पाहिजे. विचारांच्या व विचारेप्रणालींच्या तत्त्वचर्चेतेने वब इतिहासातून थोडे बाहेर आले तरच हे वास्तब कळेल. . अर्थात ऐतिहासिक संदर्भ टाळता येईल असे नव्हे. पण जर आजच्या चळवळीचे मूळ कोणाच्या विचारात वब कार्यात आढळते यावरच जास्त वेळ ब शाई खर्च करीत राहिले तर वर्तमान वास्तवाला भिडणे अवघड जाते, हेही ध्यानात घेतले जावे. अर्थात ज्यांना राजकीय हस्तक्षेपच करायचा नाही, त्यांची गोष्ट वेगळी !
राजकीय चळवळी
कोणत्या राजकीय विषयावर जास्त लेखन झाले आहे यावरून जर कोणी त्या विषयाचे महत्त्व ठरवू लागला तर ते फारच चुकीचे ठरेल. राजकीय चळवळींवर व त्यांच्या विचारवंतांवर मराठीत बरेच लिहिले गेले आहे. पण याचा अर्थ त्या चळवळी जोमात आहेत असे नव्हे. डॉ. आंबेडकरांवर जरा जास्तच लिहिले गेले आहे. म्हणजे आंबेडकरी चळवळ जोरात चालू आहे असे कोणाला वाटले तर त्याची फसगत होईल. काही पाश्चिमात्य अभ्यासकांची तशी समजूत झालेली आहेही. जेव्हा आंबेडकर व त्यांच्या चळवळीवर लिहिले जात होते तेव्हा रिपब्लिकन पक्षाच्या मतांची टक्केवारी कमी कमी होत जाऊन एक अंशाहून खाली आली होती. राखीव जागांबरही आंबेडकरी चळवळीतील उमेदवार निवडून येऊ शकले नाहीत. दलित चळवळीचे लेखक जेव्हा पुस्तिका व पुस्तके प्रसिद्ध करीत होते तेव्हा मातंग, चर्मकार व बरेच बौद्ध हिंदुत्ववादी पक्षांकडे आकृष्ट झाले होते. तसेच जेव्हा बहुजनवादी ब मंडलवादी मंडळी त्यांच्या तत्त्वज्ञानावर पुस्तिका लिहीत होती तेव्हा. धनगर, वंजारी, आगरी, माळी या जातींतील बरेच लोक भारतीय जनता पक्ष- व शिवसेनेकडे वळत होते आणि त्याचे चित्रण वैचारिक लेखनात कोठेच झाले नव्हते. कोणत्या चळवळीवर किती वैचारिक लेखन झाले आहे यावरून त्या चळवळीचा जोर. ठरविता येणार नाही. हे जसे जातीवादी चळवळींना लागू आहे, तसेच स्त्रीवादी चळवळींनाही लागू आहे. बऱ्याच मयी राजकारण करणे किंबा राजकीय कृती करणे हे पुस्तिका व लेख लिहि मर्यादित होताना दिसते आहे. पागा वैचारिक लेखनातील राज्याच्या राजकारणाचे चित्रण त्यामुळेच नका एकांगी राहिलेले आहे. आजपर्यंतचा राजकारणातील मुख्य प्रवाह म्हणजे काँग्रेसचा. परंतु त्यावर फारच कमी लेखन झाले आहे. इतर पक्ष वा संघटना व चळवळीकडून जसे लेखन प्रसिद्ध केले जाते तसे काँग्रेसकडून कचितच केले जाते. तिचा जोर आहे भाषणांवर. आधी म्हटल्याप्रमाणे एकदोन नेते सोडले तर कोणी काँग्रेस नेता लिहिण्याच्या भानगडीत: पडत नाही. नरूभाऊ लिमये किंवा अनंतराव पाटील हे त्यांचे विचारवंत. ते जे लिहितात तेवढेच. वृत्तपत्रांतून मात्र या पक्षावर बरेच लेखन प्रसिद्ध होते. पण पुस्तके व पुस्तिका या माध्यमांतून काँग्रेसबर कमी लेखन झालेले आहे. वृत्तपत्र सोडून इतरत्र .वैचारिक लेखन करणारी मंडळी बहुधा असे समजतात की, वृत्तपत्रातून हे आलेच आहे, ते पुन्हा कशाला सांगायचे. त्यामुळे काँग्रेसच्या, सहकाराच्या, जिल्हा परिषदांच्या राजकारणावर अभ्यासपूर्ण किंवा विश्लेषणात्मक लेखन होत नाही. जगन फडणीसांचे महाराष्ट्राच्या राजकारणावरील पुस्तक किंवा वर उल्लेख केलेल्या गौरवग्रंथातील आढावे व साप्ताहिकांमधील लेख याशिवाय महाराष्ट्राच्या राजकारणातील या मुख्य प्रवाहाचे चित्रण होताना दिसत नाही. म्हणूनच ते एकांगी झालेले आहे. चव्हाण, नाईक, पवार यांच्यावरील पुस्तकातून थोडासा ऊहापोह होतो, पण तोही पुरेसा नाही. त्या मानाने इंग्रजीत काँग्रेसवर तर लिहिले गेले आहेच, पण मराठ्यांच्या एकूण राजकारणावरही लिहिले गेले आहे. .
मग कोणत्या विषयावर जास्त लेखन झालेले आहे ? पुस्तिके, पुस्तिका, वृत्तपत्रे अणि नियतकालिके या माध्यमांतून कोणत्या विषयावर, विचारवंतांवर, विचारप्रणालींवर व नेत्यांवर जास्त लेखन झालेले दिसते ? या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी फक्त. दोन विषय, विचारवंत, विचारप्रणाली ब नेते काढायचे ठरविले तर चित्र असे दिसते. धर्म ब जात या विषयावर, फुले ब आंबेडकर या विचारबंतांवर, हिंदुत्व ब समतावाद या विचारप्रणालींवर आर्णि चव्हाण व पवार या नेत्यांवर सर्वात जास्त लेखन झाले आहे असे ढोबळमानाने म्हणता येईल. अर्थात आपण पूर्ण आढावा घेतलेला नाही हे लक्षात ठेवले पाहिजे. एकुणात विचार करता सामाजिक व राजंकीय चळवळींवर जास्त लेखनं झालेले आहे. राजकीय पक्षांवर, सार्वत्रिक निवडणुकांवर आणि प्रस्थापित राजकीय रचनेवर कमी लेखन झालेले आहे. राजकीय सत्तेचे वाटप व राजकारणाची दिशा ज्यांना बदलायची आहे अशा चळवळींतील लोकांकडून व त्यांच्या सहानुभूतीदारांकडूनच जास्त लेखन होणार हे एका अर्थाने साहजिकच आहे. कारण त्यांना नवीन सांगायचे, पटवून द्यायचे असते व प्रस्थापिताला धक्का द्यायचा असतो; पण या प्रकारात, या लेखनव्यबहारात आपली चळवळ जोमाने चालू आहे, अशा भ्रमात मंडळी राहतात हे धोक्याचे आहे. शिवाय चळवळीत सहभागी होणाऱ्यांना आपल्या भूमिका ब डावपेच तपासून पाहणे नको असते. त्यामुळे कार्यकर्त्यांचे नीतिधैर्य कायम राहात असेल, पण चळवळ पुढे जाण्याच्या दृष्टीने त्याचा उपयोग होत माही. दलित, स्त्री, बहुजन व पर्यावरण यांबाबतच्या चळवळींना हे म्हणणे लागू पडते. म्हणूनच वैचारिक लेखनात वास्तवाचे भान दिसणे, महत्त्वाचे आहे. चुकीच्या प्रतिबिंबामुळे सहभागी होणाऱ्यांची, सहानुभूतीदारांची व निरीक्षकांची फसगतच जास्त होते. स्वयंचिकित्सेतेनच चळवळ प्रगल्भ होते, याचा विसर पडून देता कामा नये. स्वयंचिकित्सेप्रमाणेच बाहेरून केलेल्या टीकेलाही समर्थपणे उत्तर देण्याची क्षमता यावी लागते व प्रसंगी दुरुस्तीची तयारी ठेवावी लागते. असो.
हिंदुत्ववादी ब समतावादी
मराठीतील या प्रकारच्या वैचारिक लेखनाचे दोन मुख्य विभाग करता पैतात. - काँग्रेसचा प्रवाह सोडला तर हिंदुत्ववादी आणि समतावादी असे दोन 'विभाग या लेखनात दृष्टीस पडतांत. हिंदुत्ववाद्यांकडून गंभीर वैचारिक लेखन त्या मानाने कमी झालेले दिसते. एक तर स्थितीवाद्यांना नवा विचार मांडायचा नसतो. खिल्ली उडविणे, चेष्टा करणे आणि अंफवा पसरविणे यांवरच त्यांचा जास्त जोर असतो. विचाराच्या देवाणघेवाणीवर त्यांचा फारसा विश्वास नसतो. स्थितीवादाची मर्यादा ओलांडून. जमातवादी वब नवफॅसिस्ट प्रकारात जाताना घोषणा, यात्रा ब कॅसेटस् यांचाच खरा वापर होतो. जास्तीत जास्त वृत्तपत्रीय लेखन केले जाते. यामुळेच वैचारिक चर्चेला वाहिलेले नियतकालिक नियंत्रित करणे त्यांना तितक्या निकडीचे वाटत नाही. अशा . प्रकारच्या लेखनाला बाजूला टाकूनच त्यांचे राजकारण पुढे जात असते त्यामुळे त्याचे प्रतिबिंब गंभीर वैचारिक लेखनात पडतेच असे नाही. आणि जे पडते ते त्यांच्या विरोधकांच्या लेखनातून समतावाद्यांच्या लेखनातून. पुस्तके, पुस्तिका व नियतकालिके या माध्यमांतून हिंदुत्ववाद्यांकडून समतावाद्यांपेक्षा कमी लेखन होते, पण वृत्तपत्रांतून त्यांनी आपली माणसे नेमून घेऊन ती नियंत्रणाखाली आणण्याचा प्रयत्न केला आहे. ' जुनी वृत्तपत्रे बंद पडली किंवा क्षीण . झाली तर त्यांऐवजी एक तर नवी वृत्तपत्रे त्यांनी सुरू केली आहेत अथवा प्रस्थापित वेत्तपत्रे ताब्यात घेण्याची तयारी केली आहे. अन्यंथा जमातवादाचा मध्यमवर्गात एवढा प्रसार झाला नसतां. हिंदुत्ववादी विचार व राजकारण याची तरफदारी करणारे लेखन बहुधा त्यांच्या संघटना व पक्षांकडून व कार्यकर्त्यांकडूनच होताना. दिसते. भारतीय विचारसाधना ही प्रमुख प्रकाशनसंस्था हे काम करीत आहे. तिने आजवर बरीच पुस्तके व. पुस्तिका प्रसिद्ध केल्या आहेत. द. बा. ठेंगडी, भि. रा. इदाते, व रमेश पतंगे यांसारख्यांच्या पुस्तिका व पुस्तके तिने प्रसिद्ध केली आहेत डॉ. हेडगेवार, गोळवलकर गुरुजी, देवरस यांचे विचार व कार्य यांचा प्रसार करणे, तसेच सामाजिक समरसतेची भूमिका मांडणे या हेतूने व हिंदुत्वाची पाठराखण करणे यासाठी हे लेखन झालेले आहे. संघाच्या व भाजपच्या बाहेर असलेले हिंदुत्वाचे सहानुभूतीदार विचारवंत जे सातत्याने लिहीत आहेत त्यात सं. ह. देशपांड्यां- सारख्यांचा अंतर्भाव होतो. हिंदुत्ववादी व समतावादी .' या दोन प्रवाहांत जे मतभेद, जे वादविवाद आहेत, याचे प्रतिबिंब वैचारिक लेखनात पडत नाही असा अनुभव आहे. बाळ गांगलांच्या महात्मा फुल्यांवरील लिखाणाला हरी नरके यांचे उत्तर किंवा शेषराव मोरे यांच्या लेखनाचा रावसाहेब कसबे यांनी घेतलेला परामर्ष, अशी फार थोडी उदाहरणे या संदर्भात देता येतील. या दोन्ही परस्पर- विरोधी. विचारप्रवाहांचे प्रतिबिंब 2 बब आ एकमेकांपासून अलग असलेल्या राहुट्यांतील लेखनात दिसते. .पण ह्यातही .- वादाची खुमखुमी ब वैचारिक संघर्ष . करण्याची तयारी दिसत नाही. या दोन राहुट्यांतील वाचकवर्ग वेगवेगळा आहे. त्यामुळे एकमेकांचे लेखन वाचले जाते की नाही याचीच शंका आहे. परंतु गंभीर वैचारिक प्रकारचे कमी लेखन करूनही हिंदुत्ववादी चळवळ पुढे गेली आहे याची कारणमीमांसा समतावाद्यांच्या लेखनात केलेली दिसत नाही.
मध्यमवर्गाची मर्यादा
मराठीत राजकीय वास्तवाकडे दुर्लक्ष करणारे व राजकारणाच्या फक्त पृष्ठभागाकडे पाहणारे लेखन होते, तेही एकांगी होते. ते धूसर राहते.. आर्थिक व सामाजिक बदल झाल्यामुळे राजकीय परिस्थितीत काय फरक पडतो याची या. लेखनात दखल घेतली जात नाही. एकूण मराठी वैचारिक साहित्यातून महाराष्ट्रातील राजकारणाचा अंदाज करणे अवघड आहे. अशी निरीक्षणे आपल्या वरील चर्चेत आली आहेत. शेवटी त्याची कारणमीमांसा केली पाहिजे. त्यासाठी सुरुवातीस जो प्रश्न विचारला त्याकडे परत जाऊं या. राजकीय लेखन कोण करते, हा तो प्रश्र. त्याचे उत्तर आता वेगळ्या प्रकारे द्यावे लागेल. मध्यमवर्ग हे लेखन करतो असे उत्तर दिले, तर आपल्याला - कळेल की, मराठी वैचारिक लेखनास इतक्या मर्यादा का पडतात किंवा महाराष्ट्रातील राजकारणाचे त्यातील प्रतिबिंब इतके धूसर का? असे वैचारिक साहित्य जो मध्यमवर्ग निर्माण करतो त्याच्या मर्यादा या साहित्यनिर्मितीस पडतात. . हा वर्ग सामाजिक वास्तवाकडे, राजकीय परिस्थितीकडे सम्यक ब सूक्ष्म नजरेने पाहू शकत नाही. त्याला खोलवर जाऊन खरी उत्तरे शोधण्याची सवय नाही. त्याला उथळ व चटपटीत आणि चुरचुरीत वर्णने आवडतात. आणि हे निरीक्षण जितके निर्माणकर्त्यांना लागू पडते तितकेच या साहित्याच्या वबाचकवर्गासही लागू पडते. भानगडी, भ्रष्टाचार, कुलंगडी यांकडे दुरून पाहण्याची, त्याची रसभरीत चर्चा करण्याची सवंग पद्धत मराठी समाजातील या वर्गात रूढ झाली आहे. वैचारिक साहित्याचे निर्माते, वाचक या दोघांनाही वास्तवाचे _ दर्शन घ्यायचेच नाही. त्याची दाहकता त्यांना सहन होणारी नाही. स्वतःचे नाकर्तेण उघडे पडेल अशा गोष्टींपासून दूर पळण्यात हा. वर्ग वाकबगार झाला आहे. एखाद्या छिद्रातान आत काय चालले आहे हे मिटक्या मारीत पाहणाऱ्या मध्यमवर्गाकडून मराठी राजकारणाच्या सामाजिक व आर्थिक पायाकडे पाहण्याची, त्याची गुंतागुंत समजावून घेण्याची अपेक्षा करणेच व्यर्थ आहे. पत्रकार, प्राध्यापक, वकील व साहित्यिक या .सर्वबांनाच हे लागू पडते. ग्राहकोपयोगी वस्तू खरेदी करण्यास चटावलेला व समाजातील विषमतेपासून व दैन्यदारिद्रयापासून द्र जाऊ इच्छिणाऱ्या या वर्गास वास्तवाचे दर्शन नकोसे. झाले आहे. वैचारिक साहित्य आपण क्षणभर बाजूला ठेवूया. ललित साहित्यात तरी महाराष्ट्रातील. राजकारणाचे प्रतिबिंब कसे आहे हे पाहिले तर आपल्याला पटेल की, वरील वर्णन त्यालाही जुळते. कारण प्रश्न वैचारिक की ललित साहित्याचा नसून हा साहित्यनिर्मिती करणाऱ्या ब त्याचा आस्वाद घेणाऱ्या मध्यमवर्गाचा आहे. ललित साहित्याच्या प्रांगणात रंजनात्मक साहित्यासच जास्त मागणी आहे. वैचारिक साहित्य तर तुमच्याकडून थोड्या जास्तच अपेक्षा करते. त्यामुले एकूण वैचारिक साहित्यास वाचकवर्ग मर्यादित असतो. गंभीर राजकीय लेखनाची तर बातच सोडा. मराठी समाजातील उच्चंभ्रूेंना राजकारणात तितके स्वारस्य उरलेले नाही. एकूण समाजाकडे पाहणे हा प्रकार ज्यांना नको असतो. त्यांना राजकीय स्थिती बाबतची चर्चा नकोशी असते. या सुखवस्तू वर्गाला जागतिकीकरणाच्या अर्थकारणाचे आकर्षण निर्माण झाले आहे. त्याला राज्यसंस्था ब तिच्यामुळे येणाऱ्या राजकारणाचा बीट येऊ लागला आहे. राज्यसंस्थेने आपला ' गाशा हळूहळू गुंडाळावा असे त्याला अलीकडे वाटू लागले आहे. पुण्यात दूरदर्शनसमोर . बसून हॉलिवूडच्या नव्या चित्रपटाची - चर्चा चविष्टपणे करणे त्याला जास्त आवडते. मराठी समाजातील विषमतेमागे कोणते घटक आहेत याची चर्चा त्याच्या अंगलट येण्याची शक्यता असल्याने तो ती शक्यतो टाळतो व त्यावरील- लेखनही .दुर्लक्षितो. त्यामुळे वैचारिक साहित्याला वाहिलेल्या नियतकालिकांना वाचकवर्ग मिळत नाही. डोक्याला त्रास न देणारे, रंजकतेची डूब दिलेले वैचारिक साहित्य फार तर तो वाचेल, अन्यथा नाही. आपल्या संकुचित परिघाबाहेर काय चालले आहे हे .न पाहता जागतिकीकरणाचे फायदे उपटणारा हा वर्ग जनसामान्यांच्या आर्थिक व राजकीय वंचिततेकडे पाहण्यास नकार देतो आहे. |
ब्राह्मण, सारस्वत, प्रभू वर्गैरै शिक्षणाशी निगडित जातींतील बरेच लोक या मध्यमवर्गात मोडतात. राजकीय सत्ता आपल्यापासून दूर गेली म्हणून या शहरी मध्यमवर्गाने काँग्रेसी राजकारणाकडे सत्ताकारणाचा घाणेरडा खेळ म्हणून पाहिले. राजकीय क्षेत्रातान् काढता पाय घेऊन सांस्कृतिक व औद्योगिक क्षेत्रांत प्राबल्य निर्माण करण्याचा यत्न केला. राजकारणाकड तुच्छतेने पाहण्यास प्रारंभ केला. या जातीतून येणाऱ्या पत्रकार, प्राध्यापक ब लेखक मंडळींना त्यामुळेच राजकीय वास्तब कळणे अबघड गेले किंबा ते कळून घेण्याची त्यांची इच्छा नव्हती. मराठा जातीतून आलेल्या सुशिक्षित मध्यमवर्गाने जणू काही स्वतःकडेच सत्ता आली आहे अशा थाटात श्रीमंत सहकार सम्राटांची हुजरेगिरी केली. या वर्गाला ब्राह्मणांच्या सांस्कृतिक मिरासदारीस धक्का लावणे शक्य झाले नाही. वैचारिक क्षेत्रात कर्तबगारी दाखविणे त्यांना । अवघड झाले. मराठी. समाजाचे राजकीय नेतृत्व करण्याच्या भ्रमात राहिल्यामुळे या गटास राजकीय वास्तवाचे विश्लेषण करण्याचे आव्हान पेललेले नाही. दलितांतून तयार झालेला शहरी मध्यमवर्ग वैचारिक लेखन करण्याऐवजी कथा- कवितांच्या नादी लागला. त्याने राजकारणापासून दूर पळण्यासाठी दलित साहित्यव्यवबहाराचा घाट घातला. ब्राह्मणांनी इंग्जीकडे वळून चटकदार रंगीत पाक्षिकांवव गुजराण करण्यास सुरुवात केली. परिणाम असा झाला की, महाराष्ट्रातील राजकारणाचे योग्य प्रतिबिंब पडेल असे वैचारिक साहित्य मंराठीत निर्माण होऊ शकले नाही
[टीप - राजकीय दृष्ट्या कोणत्या महत्त्वाच्या विषयांवर लेखन झालेले आहे व कोणत्या नाही, कोणत्या लेखकांनी काय लिहिले आहे, कोणती महत्त्वाची नियतकालिके मराठीत निघतात, त्यात राजकारणावर कोणती चर्चा येते, एकोणिसाव्या शतकातील स्थिती काय होती वब विसाव्या शतकात . या लेखनाचे स्वरूप कसे आहे, महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर कसे लेखन झालेले आहे, या मुद्यांचा ऊहापोह ब आढावा घेणे या लेखात शक्य झाले नाही. तरीही. गेल्या वीस-पंचवीस वर्षांत जे वैचारिक लेखन मराठीत झालेले आहे ' त्यात महाराष्ट्रातील राजकारणाचे प्रतिबिंब कसे पडले आहे याचा अगदी थोडक्यात विचार करणे हा हेतू या निबंधात सफल झाला आहे असे वाटते. येथे लेखकांचे व लेखनांचे, पुस्तकांचे व नियतकालिकांचे जे उल्लेख आले आहेत ते फक्त उदाहरणादाखलच होते. बहुसंख्य लेखन ब लेखक निबंधाच्या कक्षेबाहेर राहिले आहेत याची निबंधलेखकास जाणीव आहे.]
-------------------------------------------------------------------------------------------------
महाराष्ट्रातील राजकारणाचे वैचारिक साहित्यातील प्रतिबिंब ( ) मध्ये प्रकाशित