महाराष्ट्रात उदारमतवादी विचारांची परंपरा एकोणिसाव्या शतकामध्ये सुरू झाली. या परंपरेचा काळजीपूर्वक अभ्यास केल्यावर लक्षात येते की, महाराष्ट्रात उदारमतवादाचे दोन प्रवाह होते. पहिला प्रवाह होता महात्मा फुले आणि लोकहितवादींचा. या प्रवाहाला क्रांतिकारक किंवा जहाल उदारमतवाद असे म्हणता येईल. कारण या प्रवासातील विचारवंतांनी मवाळ धोरण स्वीकारले नव्हते. आणि अभिजन वादास विरोध केला होता. महात्मा फुलेंच्या लिखाणामध्ये ब्राह्मणांच्या नेतृत्वामुळे या समाजाची व शूद्रांची परिस्थिती कशी केविलवाणी व हलाखीची झाली आहे याचे चित्रण आढळते. लोकहितवादींनी जवळजवळ २८ निबंधांतून ब्राह्मणांचे नेतृत्व, ज्ञान, त्यांचा धर्म, सामाजिक व्यवहार, परंपरा व चालीरीती यावर कडक टीका केली आहे. हिंदूसमाजाच्या अवनतीस ब्राह्मणी नेतृत्वच कसे जबाबदार आहे हे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. प्रतिनिधिक शासनव्यवस्थासंबंधी लिहिताना सर्व जाती-जमातींना प्रतिनिधित्व द्यावे व ब्राह्मणांना त्यांच्या संख्येच्या प्रमाणातच या शासनात प्रतिनिधी पाठवता यावेत असा विचार त्यांनी मांडला आहे.
याउलट न्या. रानडे, आगरकर व गोखले यांनी अभिजनवादी उदारमतवादाचा पुरस्कार केला होता आणि मोबाइल धोरण स्वीकारले होते. या समाजाची प्रगती अगदी हळूहळूच होणार, उदारमतवादावर आधारित संस्थांची उभारणी करण्यामध्ये किंवा उदारमतवादी चळवळीमध्ये नेतृत्व वरिष्ठ जाती व वर्गाकडेच जाणार असे विचार न्या.रानडे यांच्या परंपरेने मांडला होता.
या दोन प्रवाहातील फरक या प्रवाहावर पाश्चिमात्य विचारांचा जो प्रभाव पडला होता त्यावरून जी लक्षात येतो. अभिजात उदारमतवादामध्ये पहिला टप्पा आहे क्रांतिकारक उदारमतवादाचा. टप्प्याची सुरुवात इंग्लंडमधील १६८८ साली झालेल्या रक्तहीन राज्य क्रांतीमध्ये झाली. अमेरिकन व फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये या उदारमतवादाची तत्वे पक्की झाली. जॉन लॉक (१६३२-१७०४) यास या क्रांतिकारक तत्वज्ञानाचा प्रमुख विचारवंत मानले जाते. त्याच्या 'सामाजिक करार' आणि 'नैसर्गिक हक्क' या दोन संकल्पनांवर क्रांतिकारक उदारमतवाद आधारलेला आहे. लोकहितवादी आणि महात्मा फुले यांच्या विचारांवर या क्रांतिकारक उदारमतवादाचा प्रभाव पडलेला होता. युरोप व अमेरिकेत झालेल्या राज्यक्रांत्यांचे वर्णन करून हिंदुस्थानात ही अमेरिकेसारखी क्रांती व्हावी असे प्रतिपादन लोकहितवादींनी केले आहे. महात्मा फुले यांच्या विचारावर क्रांतिकारक उदारमतवादाचा एक प्रमुख शिल्पकार थॉमस पेन(१७३७-१८०९) याच्या लिखाणाचा परिणाम झाला होता.
न्या. रानडे , आगरकर, गोखले यांच्या विचारांवर अभिजात उदारमतवादाच्या दुसऱ्या टप्प्यातील विचारवंतांचा प्रमुख्याने जॉन स्टुअर्ट मिल(१८०६-१८७३) आणि हर्बर्ट स्पेन्सर(१८२०-१९०३) यांचा परिणाम झाला होता. धीमेपणाने होणारी उदारमतवादाची प्रगती व अभिजनवाद या दोन्ही संकल्पनांवर मिल व स्पेन्सर यांच्या विचारांचा प्रभाव पडला होता. महाराष्ट्रातील उदारमतवादमध्ये हे जे दोन प्रवाह दिसून येतात, त्याचे विवेचन महात्मा फुले यांच्या विचारांचा सविस्तरपणे आढावा घेऊन व त्यामागे दोन प्रवाहातील फरक दर्शवणे हे या लेखाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
प्रथमतः महात्मा फुले यांच्या विचारावर क्रांतिकारक उदारमतवादाचा कसा प्रभाव पडलेला होता हे पाहूया. थॉमस पेन यांच्या पुस्तकांचा परिणाम फुले यांच्या विचारांवर झाला होता. विशेष करून 'राइट्स ऑफ मॅन' (१७९१-९२) या पुस्तकाचा उल्लेख करता येईल. महात्मा फुले यांच्या समग्र वाङ्मयाचे संपादक असे म्हणतात की, या पुस्तकाने फुले यांच्या जीवनाची दिशा जवळपास ठरली. फुलेंच्या लिखाणात थॉमस पेन चा उल्लेख बरेच ठिकाणी येतो. त्या वाक्यातून त्यांच्याबद्दलचा आधार स्पष्ट होतो. महात्मा फुलेंच्या तत्त्वज्ञानाचे खरे सार 'सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक' (१८९१) या पुस्तकात सापडते. त्यांच्या विचारांची मूलभूत तात्विक बैठक कोणती होती हे या पुस्तकावरून समजते. मनवा बद्दलची त्यांची संकल्पना आणि आदर्श समाज व्यवस्थेबाबतचा त्यांचा विचार याच पुस्तकात नीटपणे मांडलेला आहे. नवा समाज पण त्या तत्त्वांवर आधारलेला असेल याचे सविस्तर विवेचन याच पुस्तकात त्यांनी केलेले आहे. या पुस्तकावर यांच्या विचारांचा प्रभाव पडलेला दिसतो. म्हणून या प्रभावाचा अभ्यास करणे जरूर आहे.
या पुस्तकाची तत्त्वे सांगितलेली आहेत त्यातील पहिल्या तत्वात फुले म्हणतात की, या जगातील सर्व प्राणिमात्रांची निर्मिती ही निर्मिकाने केली आहे. यातील सर्व स्त्री-पुरुष आणि सर्व हक्क उपभोगण्यास समर्थ आहेत. पेन यांच्या मते 'मेकर' ने सर्व प्राण्यांची निर्मिती केली आहे. हक्क नैसर्गिक व दैवी आहेत. फुलेंनी पेन यांच्या 'मेकर' या इंग्लिश शब्द ऐवजी निर्मिक किंवा निर्माण करता हा शब्द वापरला आहे असे वाटते. सर्व मानव जन्मतः स्वतंत्र व समान आहेत या तत्त्वावर त्यांचे तत्वज्ञान आधारलेले आहे आणि या तत्त्वाचा पुरस्कार फुलेंनी केलेला आढळतो.
निर्माणकर्त्याने सर्व स्त्री-पुरुषांना सर्व मानवी हक्कांचे धनी केले आहे. त्यातून एखादा मानव किंवा गट व्यक्तीवर जबरी करू शकत नाही. निर्माण कर्त्याने सर्व स्त्री-पुरुष यांस धार्मिक व राजकीय स्वतंत्रता दिली आहे. आपल्या योग्यतेनुसार सर्वांना शासकीय सेवेत जागा मिळाली आहे. निर्मिकाने निर्माण केलेल्या सर्व वस्तूंचा उपभोग घेण्याचा सर्वांना हक्क आहे. कायद्यासमोर सर्वजण समान आहेत अशी इतर जी उदारमतवादी तत्वे फुल्यांनी सत्यधर्माची अंगे म्हणून सांगितली आहेत त्यावर 'राइट्स ऑफ मॅन' मधील नैसर्गिक हक्क व प्रतिनिधिक शासन व्यवस्था या दोन महत्त्वाच्या सिद्धांताचा प्रभाव पडलेला स्पष्टपणे निदर्शनास येतो.
पेनने असा विचार मांडला आहे की, कोणत्याही पद्धतीच्या राज्याचा उद्देश सार्वत्रिक सुख निर्माण करणे हाच असला पाहिजे. याउलट एखादे राज्य समाजाच्या एखाद्या भागात जेव्हा हा दैन्य निर्माण करते किंवा वाढविते तेव्हा सुधारण्याची जरुरी असते. शासन व्यवस्थांचे उमरावशाही, राजेशाही हे प्रकार गरीब जनतेवर कर लादून स्वतःच गब्बर होतात. खरे तर शासनाने सर्व जनतेच्या भल्यासाठी पैशांचा विनियोग केला पाहिजे या आणि अशा शब्दात पेनने प्रचलित शासन संस्थेवर टीका केली आहे व प्रजासत्ताक लोकशाही किंवा प्रातिनिधिक पद्धतीचा पुरस्कार केला आहे. महात्मा फुले यांच्या विचारांवर याचा परिणाम झालेला दिसून येतो. हिंदूसमाजव्यवस्था एका वर्गाचा, ब्राह्मण वर्गाचा हितसंबंध पाहते. हिंदू पुराणे व इतिहास म्हणजे ब्राह्मणी वर्चस्व यांचा इतिहास आहे. शासकीय सेवा, सामाजिक संस्था, शिक्षण संस्था व सामाजिक सुधारणा संघटना यांच्यामध्ये ब्राह्मण वर्गाचे वर्चस्व आहे. सामान्य जनतेकडून कररूपाने पैसे घेऊन ब्राह्मण वर्गाच्या हितासाठी किंवा राज्य करता वर्गाच्या चैनीसाठी वापरणे अनैतिक आहे, असे विचार फुल्यांनी त्यावेळच्या शासन संस्थेबद्दल मांडले होते. पेन शिवाय जॉर्ज वॉशिंग्टन, बेंजामिन फ्रेंक्लिन यांसारख्या फ्रेंच व अमेरिकन क्रांतीच्या इतर शिल्पकारांच्या बद्दल हि फुल्यांनी आदरपुर्वक लिहिले आहे. अमेरिकेतील निग्रोंच्या मुक्तिसंग्रामबद्दलही त्यांना आकर्षण होते. यावरून असे निश्चितपणे म्हणता येते की, महात्मा फुले क्रांतिकारक उदारमतवादाचा पुरस्कार एकोणिसाव्या शतकामध्ये या देशात करीत होते व तत्त्वज्ञानाची महत्त्वाची तत्त्वे येथील समाज व समाजव्यवस्थेला या देशात करीत होते व या तत्त्वज्ञानाची महत्वाची तत्वे येथील समाज व शासन व्यवस्थेला लागू करण्याचा प्रयत्न करीत होते.
महाराष्ट्रातील उदारमतवादाची वैशिष्ट्ये तपासून पाहिली तर असे लक्षात येते की, जवळजवळ सर्व वैशिष्ट्यं मध्ये रानडे व फुले यांच्यात मूलभूत मतभेद होता व त्यांनी एकमेकांना विरोधी जाणारे सिद्धांत मांडले आहेत. त्यातून फुल्यांचा जहाल किंवा क्रांतिकारक दृष्टिकोन व रानड्यांच्या मवाळ अथवा अभिजनवादी विचार प्रतीत होतो.
धार्मिक सुधारणा आहे येथील उदारमतवादाचे एक प्रमुख वैशिष्ट्य होते. रानड्यांनी प्रार्थनासमाजामार्फत तर फुले यांनी सत्यशोधक समाजामार्फत एकेश्वरवादाचा पुरस्कार केला होता. परंतु या दोघांच्या भूमिकेतील साम्य वरवरचे आहे. रानडे हिंदू धर्माच्या चौकटीत राहूनच धर्म सुधारणा करू पाहत होते. त्यांना हिंदू परंपरेचा अभिमान होता. प्रार्थना समाज म्हणजे संतांच्या प्रॉटेस्टंटवादाचा नवा अवतार आहे असे त्यांना वाटत होते. या उलट फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना हिंदू धर्माची जागा घेण्यासाठी केली होती. हिंदू परंपरेपासून पूर्णपणे सुटलेला समाज त्यांना निर्माण करावयाचा होता.
हिंदूधर्म, त्याची पुराणे, इतिहास, पवित्र ग्रंथ यांच्यावर त्यांनी टोकाला जाऊन टीका केली आहे. हिंदू धर्माचा व समाजाचा इतिहास म्हणजे ब्राह्मणी वर्चस्व चा व शूद्रांच्या गुलामगिरीचा इतिहास आहे हे सिद्ध करण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला. हिंदूंच्या पवित्र ग्रंथांमधून खऱ्या धर्माच्या ऐवजी त्यांना कावेबाजपणा, स्वार्थ व धूर्तपणा आढळला. त्यांनी 'सार्वजनिक ईश्वरप्रणित सत्याची' तुलना वेदांशी करून वेदांवर टीका केली आहे. जातिव्यवस्थेवरचे त्यांचे हल्ले एकोणिसाव्या शतकात फक्त लोकहितवादींची तुलना करता येण्यासारखे होते. त्यांच्यामध्ये जातिव्यवस्था आहे शूद्रांना फसविण्यासाठी व गुलामीत ठेवण्यासाठी ब्राह्मणांनी रचलेले षड्यंत्र आहे. ज्या संतांविषयी रानड्यांना आदर होता त्यांच्यावरही फुल्यांनी बऱ्याच ठिकाणी टीका केली आहे. रानडे प्रणित प्रार्थना समाजावर त्यांनी धूर्तपणा व कावेबाजपणा चे आरोप केले आहेत. शूद्र अतिशूद्र यांच्यावर कर लावून तो पैसा गोळा झाला त्यातून त्यांचे शिक्षण झाले त्यांनी स्थापलेले हे समाज म्हणजे त्यांच्या पूर्वजांनी धर्माच्या नावाखाली राजकीय हेतूने प्रेरित होऊन निर्माण केलेल्या रचना लपविण्याचा मार्ग आहे. हे समाज ब्राह्मणांनी स्वसंरक्षणार्थ व शूद्रांना फसविण्यासाठी स्थापन केले आहेत.
शिक्षणामुळे व्यक्ती व समाजाची प्रगती होते. इंग्लिश शिक्षणामुळेच येथे उदारमतवादी चळवळ सुरू झाली असे रानडे यांचे मत होते. महाराष्ट्रातील उदारमतवादाचे शिक्षणावरील विश्वास हे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य होते. या मुद्द्यावर फुल्यांनी आपले विरोधी मत मांडले होते. रानडे यांसारखे सुधारक जेव्हा उच्चशिक्षणाची तरफदारी करीत होते तेव्हा फुले यांनी शूद्र व अतिशूद्र यांच्या शिक्षणाची बाजू कळकळीने मांडली होती. सामान्यांच्या शिक्षणाकडे सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे ब्राह्मणांच्याकडे सर्व मक्तेदारी आली आहे. त्यामुळे त्यांना सरकारी नोकरीत जागा मिळवता आल्या आहेत. शेतकऱ्यांकडून आलेल्या करांतून ब्राह्मणांचे शिक्षण केल्याबद्दल त्यांनी सरकारला दोष दिला होता.
राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या त्याकाळात व त्या टप्प्यावर विचार न करता ब्रिटिश साम्राज्य मोरया येथे उदारमतवादासपोषक वातावरण कसे निर्माण झाले याचे विवेचन महाराष्ट्रातील रानडे प्रभूती विचारवंतांनी केले होते. मानव यांनी जी भूमिका घेतली ती वरील भूमिकेपेक्षा वेगळी होती. ब्राह्मणांच्या वर्चस्वाला खालून किंवा भट शाहीच्या जुलमातून ब्रिटिशांनी शूद्रांना सोडविले व त्यांनी जे शिक्षण दिले त्यामुळे शूद्र आपल्या हक्काबद्दल जागरुक झाले. ब्रिटिश अंमल आहे त्याचा फायदा घेऊन शूद्रांनी भट शाहीतुन व गुलामगिरीतून आपली सोडवणूक करून घ्यावी असा विचार फुल्यांनी जागोजाग मांडले होते. ब्राह्मणांच्या वर्चस्वापेक्षा ब्रिटिशांचे राज्य शूद्रांना हितकारक आहे असे त्यांना वाटत होते.
रानडे, गोखले आणि आगरकर यांच्या उदारमतवादी विचार प्रवाहाचे एक वैशिष्ट्य होते अभिजनवाद. कोणत्याही समाजात सामाजिक व धार्मिकदृष्ट्या पुढारलेला, हुशार, बचत करण्याची सवय असलेला, संपत्ती, ज्ञान व संघटन कौशल्य असलेला जो गट असतो त्याच्याकडेच नेतृत्व जाते. बहुसंख्य लोक अशिक्षित, खर्चिक, गरीब, अज्ञानी, असंघटित असतात. कोणतेही राजकीय डावपेच या दोन वर्गातील समतोल राखू शकत नाहीत अशी वैचारिक मांडणी रानडे यांनी आपल्या अभिजन वादळाची केली होती. रानडे, गोखले आणि आगरकर यांच्या लिखाणातून हा अभिजनवाद स्पष्टपणे दिसून येतो. त्यांच्या मते त्यावेळी ब्राह्मण, सुशिक्षित, जमीनदार वर्गाकडे सुधारणेच्या चळवळीचे नेतृत्व असणार व प्रातिनिधिक संस्थांमधून, सरकारी सेवा मधून याच वर्गाला अधिकाराच्या जागा मिळणार. सामाजिक, आर्थिक, राजकीय सुधारणा समजणे, याच वर्गाला, उच्च अभिजन वर्गाला शक्य आहे. याउलट महात्मा फुल्यांनी ब्राह्मणी नेतृत्वावर, भटशाहीवर, ब्राह्मण नोकरशाहीवर सतत जोराचे हल्ले केले आहेत. ब्राह्मणांचे राज्य म्हणजे शूद्रांना व अतिशूद्रांना गुलामगिरी म्हणून यांचे राज्य जावे, नष्ट व्हावे. सर्वत्र शूद्रांना संधी मिळावी, जागा मिळाव्यात. सरकारने सुधारणा करताना किंवा पैशाचा विनियोग करताना सूत्रांच्या कल्याणाचा विचार करावा, त्यांना शिकवावे व नोकऱ्यांमध्ये संधी द्यावी, ब्राह्मणी शिक्षक नेमण्याऐवजी शेतकरी वर्गातील शिकलेल्या व्यक्तींची शिक्षक म्हणून नेमणूक करावी, कारागीर आणि कामगार यांच्या मुलांसाठी खास शाळा उघडून त्यांना त्यांच्या कामगिरीचे व तांत्रिक शिक्षण द्यावे. ब्राह्मणांच्या सरकारी नोकरीतील जागा कमी करून त्यांना लोकसंख्येतील प्रमाणावर ठरवाव्यात, ब्राह्मणांनी सार्वजनिक सभांसारख्या सभा स्थापन केल्या आहेत पण खऱ्या अर्थाने सार्वजनिक नाहीत. ब्राह्मणांची मक्तेदारी तेथे आहे. कुणबी, माळी, धनगर, कोळी, या जातीतील लोक या सभांमध्ये आढळत नाहीत. ही सभा हिंदुसाठी जास्त जागा, प्रतिनिधित्व मागते पण हिंदू हा शब्द फसवा आहे. सरकारी सवलतींचा फायदा फक्त ब्राह्मणांनाच होतो. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसबद्दलही फुलेंचे हेच म्हणणे होते. शूद्रांनी काँग्रेसमध्ये जाऊ नये कारण केव्हा ब्राह्मण त्यांना फसवतील याचा नेम नाही. जोपर्यंत कनिष्ठ जाती शिकत नाहीत, विचार करण्यास लायक होत नाहीत संघटित होत नाहीत तोपर्यंत 'राष्ट्र' या संकल्पनेचा काहीच अर्थ नाही. अशाप्रकारे रानडे यांच्या नेतृत्वाखालील उदारमतवादी प्रवाहातील दोन प्रमुख राजकीय संघटनांवर फुले यांनी प्रखर हल्ले केले आहेत व त्यायोग आपले वेगळे अस्तित्व दाखवून दिले आहे.
रानडेंनी उदारमतवादी सुधारणा लोकांसमोर मांडताना त्यांचा परंपरेशी संबंधित दर्शवला होता. धार्मिक पुस्तकांमधून त्यात दाखले दिले होते. नव्या सुधारणा म्हणजे फार क्रांतिकारक नाहीत. पूर्वीच्या काळी स्त्रियांना स्वातंत्र्य होते अशा पद्धतीची मांडणी त्यांनी केली होती. आगरकरांनी ही या पद्धतीचा अवलंब केला होता. परंतु महात्मा फुले यांनी परंपरांना नाकारून परंपरेची पद्धत सुधारणेसाठी पूर्णतः त्याज्य ठरवली होती. इतिहास काळात हा समाज समता व स्वातंत्र्यावर आधारित नव्हता. उलट्या काहीही ब्राह्मणी जुलूमशाहीच होती असे बजावून परंपरेकडे पूर्ण पाठ फिरवून नव्या समाजाची उभारणी करावी असे प्रतिपादन त्यांनी केलेले होते.
वरील विवेचनावरून आपण निश्चितपणे म्हणू शकतो की, महाराष्ट्रात जो उदारमतवादी विचार मांडला गेला त्यामध्ये रानडे व त्यांचे सहकारी यांचा मवाळ व अभिजनवादी आणि महात्मा फुले यांचा क्रांतिकारक असे दोन विचार प्रवाह दिसून येतात.
---------------------------------------------------------
महात्मा फुले गौरवग्रंथ () मध्ये प्रकाशित