ग्रंथ परीक्षण :


लोकहितवादीज थॉट : क्रिटिकल स्टडी
लेखक: वसंत के. क्षिरे, प्रकाशक- पुणे विद्यापीठ, पुणे - १९७७

 

लोकहितवादींच्या कार्याचा आणि विचाराचा  अभ्यास गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात होऊ लागला आहे. त्यापूर्वी लोकहितवादींची शतपत्रेच  अभ्यासली गेली होती. शतपत्रांतील प्रवर भाषेने व जहाल विचाराने महाराष्ट्रातील मध्यमवर्ग गोंधळून गेला होता. त्या धक्क्यातून तो आता सावरला आहे. शतपत्रांपलीकडेही लोकहितवादी गेले होते हे त्याला जाणवले आहे. त्यांच्या सर्व लिखाणाचा काळजीपूर्वक अभ्यास करणे किती जरूर आहे हे त्याला आता मनोमन पटले आहे. महाराष्ट्राच्या सध्याच्या समस्यांना सामोरे जाण्यासाठी लोकहितवादींचा विचार किती मार्गदर्शक ठरू शकतो, हे सुशिक्षित वर्गातील निदान एका गटाला तरी निश्चितपणे उमजले आहे. गोवर्धन पारोखांचे लोकहितवादी : गोपाळराव हरि देशमुख ' (१९७१), निमंलकुमार फडकुले यांचे € लोकहितवादी : काल आणि कतंत्व (१९७३), आणि सरोजिनी वैद्य यांचे ' गोपाळराव हरी ' (१९७८) ही पुस्तके त्याचीच द्योतक आहेत.


प्रा. वसंत क्षीरे यांचे ' लीकहितवादीज थॉट: ए.  क्रिटिकल स्टडी ' (१९७७) हे पुस्तक याच मालिकेत बसते. प्रा. क्षीरे यांनी राज्यशास्त्र विषयातील पीएच्. डी. पदवीसाठी पुणे विद्यापीठास सादर केलेला प्रबंध विद्यापीठ अनुदान मंडळाच्या आथिक मदतीने पुस्तकरूपाते प्रसिद्ध झालेला आहे. लोकहितवादींवरील आजपर्यंत प्रसिद्ध झालेले लिखाण एखाद्या-दुसऱ्या लेखाचा अपवाद वगळल्यास मर!ठोतच आहे. प्रा. क्षीरे यांनी लोकहितवादींच्या विचारांवरील आपला अभ्यास इंग्रजीतून प्रसिद्ध केल्याने या द्रष्ट्या व जहाल विचारवंताची ओळख इतर राज्यांतील व परदेश्यांतील अभ्यासकांना व समाजसुधारकांना होईल. लोकहितवादी यांना एक समाजसुधारक म्हणून मान्यता आहे. त्यामुळे त्यांच्या राजकीय व आथिक विचारांकडे म्हणावे तसे लक्ष देण्यात आले नव्हते. प्रा. क्षीरे यांच्या पुस्तकाने ही उणीव भरून काढली आहे. या पुस्तकात लोकहितवादींच्या सामाजिक विचाराबरोवरच राजकोय व आर्थिक विचारांचा टीकात्मक अभ्यास लेखकाने केलेला आहे.


प्रथमत: लोकहितवादींच्या काळातील सामाजिक परिस्थिती कशी होती, कोणत्या काळात त्यांनी आपली जहाल मते मांडली हे सांगून त्यांचे थोडक्यात चरित्र दिलेले आहे. कारण या दोन्ही गोष्टींचा त्यांच्या विचारावर परिणाम झालेला होता. दुसर्या भागात लोकहितवादींच्या सामाजिक विचारांचे विश्लेषण केलेले आहे. यात त्यांचे समाजजीवन, ज्ञानसाधना, स्त्रियांचे प्रश्न आणि धर्मं यांवरील. विचार स्पष्ट करून ब्राह्मणांचे नेतृत्व यावर एक: स्वतंत्र प्रकरण खर्ची घातले आहे. पुस्तकाच्या तिसऱ्या भागात लोकहितवादींच्या राजकीय व आथिक विचारांचा आढावा घेतला आहे. ब्रिटिश साम्राज्य भारतात का आले याची लोकहितवादीकृत मीमांसा देऊन साम्राज्यातील दोषांवर त्यांनी कसा प्रकाश टाकला होता हे लेखकाने दाखवून दिले आहे. राजकोय सुधारणांविषयीचे लोकहितवादींचे विचार फारसे ज्ञात नाहीत. प्रा, क्षीरे यांनी त्यावर एका: प्रकरणात चर्चा केली आहे.


शेवटच्या भागात प्रा. क्षीरे यांनी सामाजिक व राजकोय विचारवंत म्हणन लोकहितवादीचे मूल्यमापन केले आहे. त्यात ते असे म्हणतात, को लोकहितवादींनी लोकशाहीचा एक जीवनमागं म्हणन पुरस्कार केलेला होता. म्हणून त्यांनी सामाजिक घटकांचे व समाजसुधारणेचे महत्त्व प्रतिपादन केले: होते. ते एक श्रेष्ठ उदारमतवादी विचारवंते होते. त्यांनी सुचविलेल्या वेगवेगळ्या सुधारणांमधून ते स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव ही आधुनिक तत्त्वे पुढे मांडीत होते. लोकहितवादींनी हिंदुसमाजावर जोराचे हल्ले केले, कारण या समाजाचा रोगच इतका मुर- लेला होता, की त्यास औषधही तितकेच जालीम हवे होते. परंतु त्यांच्या टीकेला रचनात्मक बाजूही होती. त्यांनी सुधारणाही सुचविल्या होत्या. हिदुसमाज- व्यवस्थेचे पद्धतशीर विश्लेषण करण्याचा पहिला मान प्रा. क्षीरे यांच्या मते लोकहितवादींकडे जातो. त्यांचे धर्मावरील विचार क्रांतिकारक होते. त्यांनी लोकांचे सुख वाढविणारा घर्म असावा असे तत्त्व मांडले होते.


स्वत: ब्राह्मण असून त्यांनी ब्राह्मणांवर टीका केली, कारणं ब्राह्मणवर्ग प्रतिगामी शक्ती बनून प्रगतीच्या प्रवाहात अडथळें निर्माण करीत होता. बदलत्या परिस्थितीप्रमाणे सुधारणा करण्याऐवजी त्यास त्याने उलटा विरोधच केला. ब्रिटिश साम्राज्याचे लोकहितवादीनी स्वागत केले; पण तेही आंधळेपणाने नाही. अमेरिकेत अठराव्या शतकात जे घडले. ते येथे होईल असे सांगणारा, पार्लमेंटची मागणी करणारा राजकीय विचारवंत म्हणून लोकहितवादींचे महत्त्व आहेच; पण त्याचबरोबर राज्याची उत्पत्ती, राज्यक्रांती, संसदीय पद्धत, प्रतिनिधित्व, स्थानिक  स्वराज्य इत्यादी संकल्पनांचा उल्लेखही त्यांच्या लिखाणात आढळतो. एकोणिसाव्या शतकातील लोकशाही व राष्ट्रवाद यांचा पुरस्कार करणाऱ्या काही मोजक्या विचारवंतांमध्ये लोकहितवादींचा समावेश होतो असे प्रतिपादत प्रा. क्षीरे यांनी केले आहे.
प्रा. क्षीरे यांनी हा अभ्यास करताना लोकहित- वादींच्या धर्म, इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र इत्यादी विषयांवरील जवळजवळ चाळीस पुस्तकांचा परामर्शे तर घेतला आहेच; पण त्याशिवाय लोकहितवादींवरील काही गुजराती लेख व पुस्तकांचाही अभ्यास त्यांनी केलेला दिसून येतो. त्याचप्रमाणे त्यांच्यावर चिपळूणकर इत्यादींनी जी टीका केली, त्याचीही चर्चा स्वतंत्रपणे त्यांनी केली आहे.


फुले, आगरकर, रानडे यांसारख्या समकालीन सुधारकांच्या व लोकहितवादी यांच्या विचारांतील व दृष्टिकोनांतील फरक किंवा साम्य यांवरील चर्चा पुस्तकात त्रोटक स्वरूपात भाली आहे. त्याचप्रमाणे पाशचिमात्त्म विचाराचा लोकहितवादींवर नेमका कोणता परिणाम झालेला होता हेही दाखवून द्यायला हवे होते. बहुधा पुस्तकाच्या व प्रबंधाच्या मर्यादिमध्ये ते शक्य झाले नसावे. एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्राच्या वैचारिक, सामाजिक व. राजकीय आंदोलनांचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना हे पुस्तक उपयोगी पडेल यात शंका नाही.

 

 

--------------------------------------------------
म  ( ) मध्ये प्रकाशित