समाजामध्ये ज्या व्यक्ती विचारवंत म्हणून ओळखल्या जातात त्या प्रत्यक्ष कार्य करण्यामध्ये मागे असतात. ज्या व्यक्ती कार्य करण्यामध्ये मग्न असतात त्यांना सखोल. चिंतन करण्यास वेळ मिळत नाही. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या जीवनाचा अभ्यास केल्या नंतर असे लक्षात येते की, रानडे यांनी एकोणिसाव्या शतकातील हिंदुस्थानातील समाजाविषयी एक निश्चित वैचारिक आकृतिबंध मांडला होता आणि त्याचबरोबर समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये बहुमोल कार्यही केले होते वैचारिक क्षेत्रात महान कामगिरी आणि समाजात सातत्याने कार्ये करणारे रानडे हे एक नावाजलेले सरकारी अधिकारी व न्यायमूर्ती होते
सुरुवातीस मुंबई विद्यावीठ व एलिफन्स्टन महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केल्यावर ते सरकारी नोकरीमध्ये रुजू झाले, आणि १८९३ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती झाले. एकूण तीन वर्षे त्यांनी कायदेमंडंळाचे सभासद म्हणू हीं महत्वाचे कार्य केले व तेथे भारतीयांच्या मागण्यांचा पाठपुरावा केला. समाजाच्या विविध अंगांमध्ये एकाचवेळी प्रगती होत असते हे तत्त्व स्वीकारून त्यांनी आपल्या जीवनामध्ये शकय तितक्या विविध क्षेत्रांमध्ये सुधारणेसाठी प्रयत्न केला. सामाजिक राजकीय, आर्थिक, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रांत त्यांनी विविध संस्था स्थापन केल्या किंवा अशा संस्थांच्या कार्यात पुढाकार घेतला आणि नेतृत्व केले. बॉम्बे असोसिएशन, ईस्ट इंडिया असोसिएशन, सार्वजनिक सभा, डेक्कन असोसिएशन, डेक्कन सभा, आणि इडियन नॅशनल काँग्रेस या विविध राजकीय संघटनांच्या स्थापनेत व कार्यात त्यांनी पुढाकार घेतला होता. काँग्रेसची स्थापना होण्यापूर्वी सार्वजनिक सभेसारख्या संघटनांमाफेत त्यांनी लोकांमध्ये. राजकीय व आर्थिक प्रश्नांवर जागृती घडवून आणली. काँग्रेसची स्थापना व कार्य यामध्ये पडद्यामागील प्रमुख सूत्रधार न्या. रानडे होते हे संमकालीनांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होते. न्या. रानडे यांना समाजसुधारक म्हणन ओळखणाऱ्यांचे त्यांच्या या राजकीय कार्याकडे पूर्ण दुर्लक्ष होते
सामाजिक सुधारणेसाठी त्यांनी सामाजिक परिषद, डेक्कन सोशल रिफॉर्म असोसिएशन यांसारख्या संस्था व संघटना स्थापन केल्या व त्यामध्ये सतत कार्य केले शैक्षणिक क्षेत्रात मुलींची शाळा, हायस्कूल, न्य॒ इंग्लिश स्कूल, डेक्कन एज्युकेशन सोसायटी इत्यादी संस्थांमध्ये त्यांनी कार्य केले. त्याचप्रमाणे वक्तृत्वोततेजक सभा, वेदशास्त्रोत्तेजक सभा, साहित्य परिषद, ट्रान्सलेशन सोसायटी, या संस्थांमाफेत' साहित्य व ज्ञानसंपादनास उत्तेजन देण्यात महत्त्वाचे कार्य केले. धार्मिक सुधारणेशिवाय इतर सुधारणा निरुपयोगी ठरतील हे जाणून प्रार्थना समाजामाफेत व ऑल इंडिया थिअिस्टीक कॉन्फरन्स या संस्थेमधून हिंदू धर्मात सुधारणा करण्याचा - प्रयत्न केला. .हिंदुस्थानसारख्या मागासलेल्या अर्थव्यवस्थेस आर्थिक प्रगतीसाठी औद्योगिकीकरणाशिवाय तरुणोपाय नाही .हे लक्षात येऊन त्यांनी औद्योगिक परिषदेची स्थापना केली होती.
समाजाच्या विविध अंगांमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील असणारे न्या. रानडे हे एक महान विचारवंत होते. एकोणीसाव्या शतकामध्ये जी सामाजिक, राजकीय व आर्थिक सुधारणेची चळवळ चालू होती त्यास न्या. रानडेंनी तात्त्विक अधिष्ठान दिले, निश्चित दिशा दाखवली. रानडे यांच्यापुर्वी सुधारणेच्या चळवळीस वैचारिक आकृतिंबंध नव्हता. ब्रिटिश साम्राज्यास कसा प्रतिसाद द्यावा, हिंदुस्थाना तील समाजाने कोणत्या मार्गाने जावे, आपल्या परंपरेबाबत कोणता दृष्टिकोन स्वीकारावा याबाबत रानड्यांच्या काळातील समाजधुरीण संभ्रमात पडले होते. त्या सर्वांना न्या. रानड्यांनी निश्चित मार्गदर्शन केले व उदारमतवादाचे सम्यक् तत्त्वज्ञान मांडून दाखविले. एकोणिसाव्या शतकामध्ये या देशाची काय अवस्था होती, कोणत्या पार्श्वभूमीवर न्या. रानड्यांनी आपले उदारमतवादाचे तत्त्वज्ञान मांडले याचा विचार येथे न करता फक्त त्यांच्या तत्त्वज्ञानाचा आढावा घ्यायचे ठरविले आहे.
व्यक्तिस्वातंत्र्य
न्या. रानडे यांच्या विचाराचे अधिष्ठान म्हृणजे व्यक्तिस्वातंत्र्याचा त्यांचा सिद्धान्त. रानड्यांचे व्यक्तीस्वातंत्र्याचे तत्त्व मानवाच्या सदसद्विवेकवुद्धीच्या संकल्पनेवर आधारलेले आहे. मानवास संदसद्विवेकबुद्धी असते. ही बुद्धी इतर प्राण्यांकडे नसते त्यांचे वर्तन सहजप्रेरणांनी प्रेरित झालेले असते. चांगले व वाईट, योग्य व अयोग्य यांमध्ये निवड करण्याचे स्वातंत्र्य फक्त मानवाकडे असते. या सदसद्विवेक बुद्धीमुळे या विश्वात त्यास उच्च पातळी प्राप्त झालेली आहे. परमेश्वर या सदसद्विवेकबुद्धी द्वारेच प्रत्येक मानवामध्ये प्रकट होत असतो. म्हणूनच सदसद्विवेक बुद्धी म्हणजेच परमेश्वराचा आवाज जो मानवाने ऐकलाच पाहिजे व त्याप्रमाणे वर्तन केले पाहिजे, असा हा एकमेव आवाज आहे.
चांगले-वाईट, योग्य-अयोग्य हे इतरांनी कोणी सांगितले म्हणून ठरवू नये. परावलंबित्व आणि अगतिकपणा याऐवजी परमेश्वराच्य़ा आवाजास जबाबदार असणारे स्वातंत्र्य स्वीकारले पाहिजे. प्रत्येकाने स्वत:बद्दलचा आदर बाळगला व वाढविला पाहिजे अधिकाराबद्दलच्या आदरापोटी किवा एखाद्याबद्दलच्या भावनेपोटी कोणीही आंधळे- पणाने काहीही स्वीकारू नये. सदसद्विवेकबुद्धीच्या वाटेत कोणाहीबद्दलचा आदर येऊ नये. ती परमेश्वराची आज्ञा असते. म्हणून रानडे रूढी व परंपरेच्या मानवावरील बंधनाविरूद्ध होते. आपले वर्तन रूढीच्या बंधनातून मुक्त केले पाहिजे. रूढींच्या प्राबल्यामुळे मानव स्वत:च्या स्वाभाविक भावनांकडे दुर्लक्ष करतो आणि योग्य-अयोग्य. यात भेद करण्याची ताकद गमावून बसतो. धार्मिक ग्रंथ, रूढी, महान व्यक्तींच्या परंपर यांना शरण जाण्याऐवजी स्वत:च्या आतल्या संदसद्विवेक बुद्धीच्या आवाजास आपण शरण गेले पाहिजे.
सदसद्विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य होय. राजकीय व सामाजिक सोयीसाठी केलेल्या तात्कालींक विचारांपेक्षा सदसद्विंवेक बुद्धीचे प्रमाण अधिक महत्त्वाचे आहे. व्यक्तींचे स्वातंत्य म्हणजे या सद्सद्विवेकबुद्धीचे इच्छेचे स्वातंत्र्य उच्च इच्छेचे स्वातंत्र्य.
धार्मिक क्षेत्रामधील स्वातंत्र्याचा विचारही रानड्यांनी केला होता. सामाजिक क्षेत्रात त्याप्रमाणे कोणीही अंतिम सत्याचा दावा करू शकत नाही त्याप्रमाणे धार्मिक बाबतीतही असा दावा कोणी करू शकत नाही. कारण त्यांमुळे मानवाची. बुद्धी चालेनाशी होते व तो गुलामाच्या पातळीला जाऊन पोहोचतो. हिंदू लोकांनी कर्मसिद्धान्ताच्या प्रभावाखालून सुटका करून घेतली पाहिजे. या सिद्धांतास कोणीही शरण जाऊ नये कारण त्यामुळे मानवाची प्रगतीची इच्छा व वतेंनाचे स्वातंत्र्य नाश पावते. संतांच्या चळवळीचे महत्त्व रानड्यांनी याच संदर्भात पटवून दिले आहे. कारण संतांच्या धर्म सुधारणेच्या कार्यामार्ग धार्मिक क्षेत्रात व्यक्तिस्वातंत्र्य स्थापन करण्याचा हेतू होता. आणि म्हणून व्यक्ती व त्याचा आत्मा याचे महत्त्व प्रतिपादन करून संतांनी संस्कृत भाषा, धार्मिक चालीरीती, कर्मकांडं, योग, भटभिक्षूकांचा वर्ग यांच्या अधिकारास आणि प्राबल्यास सक्त विरोध केला. या संदर्भात यूरोपातील प्रॉटेस्टंट पंथात व संतांच्या कार्यात रानड्यांना खूपच साम्य आढळले.
व्यक्तिस्वातंत्यावरील मर्यादाही रानड्यांनी स्पष्ट केल्या आहेत. स्वत:च्या सदसदुविवेकबुद्धीचे अधिकार महत्त्वाचे आहेत असे मानणाऱ्याने इतर व्यक्तींच्या अधिकारावर मर्यादा येत नाहीत आणि सामाजिक नीतिमत्तेस धक्का पोहोचत नाही, हे पाहिले पाहिजे. जात, रूढी, परंपरा यांच्या बंधनांऐवजी स्वत:च स्वत:ला बंधन घालून घेतले पाहिजे.
समानता :
समाजातील इतर घटकांचे समान स्वातंत्र्य व अधिकार हे व्यक्तिस्वातंत्र्यावरील बंधन असते. स्वातंत्र्य समांनतेशिवाय नांदू शकत नाही इतरांना माझ्याइतकेच स्वातंत्र्य उपभोगण्याचा अधिकार आहे हे व्यक्तिस्वातंत्र्याच्या संकल्पनेत गृहीत असते, असे रानड्यांनी मानले होते. या दृष्टीने त्यांनी धर्मातील असमानता अमान्य केली योगमार्ग अणि ज्ञानमार्ग त्यांनी त्याज्य ठरविले आणि त्या ऐवजी भागवत धर्माचा पुरस्कार केला. कारण, योगमार्ग व ज्ञानमार्ग शूद्रांना अधिकार देत नाहीत. ज्ञान मार्ग काही निवडक लोकांसाठीच आहे आणि योगमार्ग सामान्यांना कठीण जातो. भागवतधर्मात समानता मानली आहे. जन्माधिष्ठित व वंशपरंपरेवर आधारित विषमतेस रानड्यांचा विरोध होता. भागवत धर्माने जातीपलिकडे जाऊन समानतेचा पुरस्कार केला होता. प्रत्येकास ज्ञान मिळवण्याचा अधिकार असला पाहिजे, नाहीतर बहुसंख्य लोक अंधश्रद्धा व अज्ञानाच्या अंधारात चाचपडत बसतात. लहानात लहान समूहाचा सभासद असण्याबद्दलचा अभिमान वाळगण्याच्या वृत्तीवर रानड्यांनी टीका केली जातिसंस्था प्रत्येक व्यक्तींचा रोटीबेटी व्यवहार लहानात लहान समूहात मर्यादित करते.. यातून अलगतेची भावना निर्माण होते. अलगतेच्या भावनेऐवजी भ्रातृभाव निर्माण केला पाहिजे. अलगता, वेगळेपणा, अस्पृश्यता याऐवजी भ्रातृभाव आणि परस्पर संबंध यांकडे समाजाची प्रगती व्हावी.
रानडे.एकेश्वरपंथीय होते. सर्व स्त्री-पुरुष परमेश्वराची लेकरे आहेत आणि त्याच्या नजरेत भेदाभेद नाही या तत्त्वावर त्यांचा विश्वास होता. सामूहिक प्रार्थनेमुळे सर्व लोक एका पातळीवर येतात व सर्वांन आपले भाऊ समजू लागतात म्हणून त्यांनी प्रार्थना समाजात अशा प्रार्थनेचा पुरस्कार केला होता व्यक्तिस्वातंत्र्याचं रानड्यांची संकल्पना संकुचित नव्हती. स्त्रियांच्या स्वातंत्र्याचाही विचार त्यांनी केला होता.स्त्रियांना व्यक्तिविकासास समान संधी मिळावी पुरुषमंडळी राजकीय हक्कासाठी भांडत असताना स्त्रियांच्या सामाजिक दर्जाबाबत दुर्लक्ष करतात, हे त्यांना तर्कविसंगत वाटले. स्त्रियांच्या हक्कांचा ऐतिहासिक आढावा घेऊन रानड्यांनी असे प्रतिपादन केले होते की प्राचीन काळी देशात धर्म, राजकारण, विवाह, शिक्षण यां क्षेत्रांत स्त्रियांना समान दर्जा होता. पुढे मध्ययुगात त्यांच्या हक्कावर मर्यादा आल्या. आधूनिक काळात स्त्रियांना समान स्वातंत्र्य व दर्जा मिळावा. विवाह्संस्था व कुटुंबसंस्था यामध्ये योग्य त्या सुधारणा करून स्त्रियांना हा दर्जा दिला पाहिजे, असे त्यांचे मत होते
राजकीय व्यवस्था :
व्यक्तिस्वातंत्र्य ज्या राजकीय व्यवस्थेत अबाधित राहू शकेल अशीच राजकीय व्यवस्था हिंदुस्थानात प्रगत व्हावी असा विचार रानड्यांनी मांडला होता. त्यादृष्टीने हुकूमशाही, राजेशाही यांसारख्या पद्धती त्यांनी त्याज्य ठरवल्या होत्या. मानवी स्वभावाच्या व व्यक्तिमत्त्वाच्या अंगभूत प्रतिष्ठेकडे पाहण्याच्या क्षमतेवर या पद्धतींचा वाईट परिणाम होतो. परकीय राज्यात तर राज्यकर्ते आपल्या नैसर्गिक व वांशिक वर्चस्वाच्या गप्पा मारू लागतात. उलट स्वराज्यात कायदा जनतेच्या संमतीनंतर होतो व न्याय योग्य पद्धतीचा अवलंब करून दिला जातो. कर संमतीने लावले जातात त्यावेळच्या ब्रिटिश राज्यात सत्तेचे विभाजन नव्हते. हिंदुस्थानातील पुर्वीच्या काळातील राज्यातही असे विभाजन नव्हते, परंतु धर्माचे तरी बंधन होते. सध्याच्या ब्रिटिश राज्यात तेही नाही. म्हणून सत्ता विभाजन झाले पाहिजे आणि न्यायसंस्था स्वतंत्र केली पाहिजे.. रानडे यांनी जबाबदार आणि प्रातिनिधिक शासनव्यवस्था आदर्श मानली होती. ब्रिटनमध्ये जी व्यवस्था होती ती त्यांना आदर्श वाटत होती. तशीच पद्धत इकडेही अवलंबावी अशी मागणी त्यांनी केली होती. हळूहळू लोकांचे प्रतिनिधित्व वाढवून या देशात अशी पद्धत अंमलात आणावी, त्याचप्रमाणे सत्तेचे, विकेंद्रीकरणही करावे, त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांचा रानंड्यांनी पुरस्कार केला होता. स्थानिक शासन-संस्थांना जास्तीत जास्त अधिकार द्यावेत. तांत्रिक ज्ञान केन्द्रातील सत्तेने पुरवावे पण सत्ता स्थानिक संस्थेकडेच राहावी. स्थानिक स्वराज्य संस्था राजकीय शिक्षणाच्या शाळा आहेत असे त्यांचे मत होते.
शासनसंस्थेचे कार्ये :
जबाबदार आणि प्रातिनिधिक शासन व्यवस्थेमध्ये लोकांचे राजकीय स्वातंत्य कायम राहते पंण याचा अर्थ असा नव्हे की, रानड्यांना शासनसस्थेचा समाजाच्या विविध अंगांमधील हस्तक्षेप अमान्य होता? या उलट त्यांनी असे म्हटले आहे की, राज्यसंस्था व्यक्तीचे जीवन सुखी व परिपूर्ण करण्यासाठी अस्तित्वात येते असते. तिच्या सामूहिक स्वरूपात उत्तम नागरिकांमधील सत्ता, शहाणपण, दया यांचे ती प्रतिनिधित्व करीत असते. हिंदू समाजामध्ये स्वयंशासनाची क्षमता नाही. अशा प्रकारच्या स्वयंशासनाच्या ऐवजी कायद्याची बंधने आणावी लागतात. कायद्याची बंधने बदलणे सोपे असते. रूढी बंद करण्यासाठी जेव्हा कायदा केला जातो तेव्हा जूनी बंधने नष्ट होतात आणि लवचिक बंधने आणली जातात. जेव्हा समाजात मोठया प्रमाणावर अन्याय होत असेल किंवा सामाजिक हानी होत असेल तेव्हा शासनाने हस्तक्षेप करावा. शासन परिणामकारकरित्या व द्रुतगतीने त्याचा नायनाट करू शकते. शासनसंस्थेच्या कार्याची मर्यादा फक्त शांतता व सुव्यवस्था राखण्यापुरतीच मर्यादित ठेवली तर सामाजिक संघटनेच्या फार मोठ्या फायद्यापासून समाज वंचित राहील.
शासन संस्थेचे कार्य फक्त सामाजिक क्षेत्रापुरतेच मर्यादित न करता आथिक बाबतीतही तिने महत्त्वाची कामगिरी बजवावी, या मताचा रानड्यांनी आपल्या अर्थशास्त्रविषयक लिखाणात पाठपुरावा केला आहे. रानडेंचा हा सिद्धान्त त्यांच्या अर्थशास्त्राबद्दलच्या संकल्पनेवर आधारलेला आहे. एकच अर्थशास्त्र सर्व काळात व सर्व ठिकाणी लागू पडत नसते. त्यातील सिद्धान्त राष्ट्राच्या प्रगतीच्या अवस्थेकडे पाहूनच लागू केले पाहिजेत. इंग्लंडमध्ये जी तत्त्वे लागू पडतात ती तशीच हिंदुस्थानासारख्या अर्थव्यवस्थेस उपयोगीं पडणार नाहीत. इंग्लंडमध्ये प्रगत झालेले अभिजात अर्थशास्त्र कारही गृद्दीत तत्वांवर आधारलेले आहे. परंतु तशी परिस्थिती इतरत्र असेलच असे नाही. . मुक्त अर्थव्यवस्थेची तत्त्वे येथील अर्थेव्यवस्थेस निरूपयोगी आहेत.येथीळ अर्थव्यवस्थेच्या वैशिष्ट्यांवर येथील अर्थविषयक सिद्धान्त निश्चित होतील. युरोपमध्येही मुक्त अर्थव्यवस्थेबद्दल पुनर्विचार सुरू झालेला आहे. इंग्लंडमध्येही शासनसंस्थेने हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली आहे. अशा प्रकारे भारतीय अर्थशास्त्राचा आकृतिबंध तयार . करून रानड्यांनी त्यावेळच्या शासनाने येथील मागासलेल्या अर्थव्यवस्थेत कशा प्रकारे हस्तक्षेप करावा हे दाखवून दिले आहे. त्यांनी औद्योगीकरणाशिवाय या देशात आथिक प्रगती .होणार नाही हा सिद्धान्त मांडला व शासनाने या औद्योगीकरणाच्या प्रक्रियेस सर्वतोपरी मदत करावी अशी मागणी केली. कारखानदारीची प्रगती होण्यासाठी पतपुरवठा, नव्या उद्योगधंद्यांची सुरुवात, कच्च्या मालाचा वापर, तांत्रिक ज्ञानाची वाढ या मार्गांचा अवलंब करावा. उद्योगधंद्यांच्या बरोबरीने शेतीव्यवसायातही शासनास बऱ्याच गोष्टी करता येण्यासारख्या आहेत असे त्यांचे मत होते. जमीन महसुल पद्धतीत सुधारणा, ग्रामीण पतपुरवठा व्यवस्था, उत्पादनाचे आधुनिकीकरण इत्यादी योजनांमाफेत ऐेतीव्यवसायात सुधारणा करावी असा विचार त्यांनी मांडला. त्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय व्यापारातील मुक्त व्यापार तत्त्वाचा त्याग शासनाने करावा अशी मागणी त्यांनी केली होती. नव्या अर्थव्यवस्थेतील उद्योगधंद्यांना संरक्षण देणे हे शासनाचे कतंव्य असते, असे तत्त्व या संदर्भात त्यांनी स्वीकारले होते.
रानडे यांच्या उदारमतवादाची वैशिष्ट्ये
(१) धार्मिक सुधारणा : रानड्यांच्या तत्त्वज्ञानाच्या वरील विवेचनात एक गोष्ट जाणवते, ती म्हणजे रानड्यांनी धर्मसुधारणेस दिलेले असाधारण महत्त्व. त्यांच्या उदारमतवादामध्ये धर्मविचारास इतके महत्त्व दिले होते याचे कारण म्हणजे त्यांची धर्मावरील व परमेश्वरावरील श्रद्धा. धर्मसुधारणा झाल्याशिवाय इतर क्षेत्रांतील सुधारणा व्यर्थ आहेत असा त्यांचा विश्वास होता. शिवाय त्यांच्या काळात नास्तिक वादाकडे तरुणवर्ग वळू लागण्याची भीती वाटत होती. म्हणून धर्मात योग्य ते फेरफार करून या वर्गाचे धर्माचे आकर्षण कायम राखणे त्यांना जरूर वाटत होते. धर्मामध्ये व्यक्तिस्वातंत्र्य व समानता या तत्त्वाची स्थापना करणे, एकेश्वरवादाचा प्रसार करणे, मूतिपूजा, कर्मवाद, भटशाही यास विरोध करणे या गोष्टींचा समावेश त्यांनी धर्मसुधारणेच्या व्यापक संकल्पनेत केला होता.
(२) सर्वसमावेशकता -- रानड्यांच्या उदारमतवादाचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे सर्वसमावेशकता समाजाच्या काही भागांत उदारमतवाद आणता येत नाही. सर्वच भागांत एकाचवेळी स्वातंत्याची स्थापना करावी लागते? रानड्यांनी समाज सुधारणेस प्राधान्य देऊन राजकीय सुधारणेकडे दुर्लक्ष केले अशी टीका त्यांच्यावर करण्यात येते. पण त्यामध्ये तथ्य नाही. कारण तात्त्विकदृष्ट्या रानडे सर्वसमावेशक उदारमतवादावर विश्वास ठेवीत होते. समाज हा एक जणू काही प्राणी आहे की ज्याच्या अंगात प्रगती व्हायची ती एकाच वेळी सर्व अवयवांत. राजकीय हक्कांबाबत तुम्ही मागे पडला असला तर तुम्हाला चांगली समाजव्यवस्था उभी करता येणार नाही. समाजव्यवस्था जोपर्यंत विवेक व न्यायावर अधिष्ठित नाही तोपयंत तुम्ही राजकोय हक्क वापरण्यास लायक होऊ शकत नाही. जर तुमची समाजव्यवस्था ठीक नसेल तर तुमची अथेव्यवस्थेत प्रगती होऊ शकणार नाही व जर तुमची धर्मसंस्था रसातळाला गेली असेल तर सामाजिक, आथिक व राजकीय सुधारणेची आशाच सोडा असा विचार न्या. रानडे यांनी आपल्या लिखाणात ठिकठिकाणी मांडलेला आहे
(३) अभिजनवाद- रानड्यांनी असे मानले होते की उदारमतवादाची चळवळ हिंदुस्थानात जी उभी राहणार ती समाजातील अभिजनवर्गाकडूनच. त्यांनाच या चळवळीचे नेतृत्व करावे लागेल.?१ १) कोणत्याही समाजात काही निवडक लोकच नेहमी नेतृत्व करीत असतात. सामाजिक व धार्मिक दृष्ट्या हा वगे पुढारलेला असतो त्यांच्या- कडे वृद्धिमत्ता, संपत्ती, बचतीची सवय, ज्ञान आणि संघटन-कौशल्य असते. त्यामुळे त्यांच्याकडेच सर्व नेतृत्वाची जबाबदारी जाते. बहुसंख्य लोक अशिक्षित, अदूरदर्शी, अज्ञानी, असंघटित, खर्चिक, गरीब असतात. या दोन वर्गातील समतोल राखणे कोणत्याही रांजकीय डावपेचांना शक्य होणार नाही. हिंदुस्थानसारंख्या मागासलेल्या देशात जी उदारमतवादी समाजव्यवस्था आणावयाची आहे, धार्मिक, सामाजिक, राजकीय व आथिक क्षेत्रांत जी सुधारणा घडवून आणायची आहे, त्या कार्यात हा अभिजनवर्गे पुढाकार घेणार व असा पुढाकार घेण्याची क्षमत फक्त त्यांच्यातच आहे व असते अस पक््क्रा सिद्धान्त रानड्यांनी अगदी स्पष्ट शब्दांत सांगितला होता. या अभिजनवर्गत इंग्लिश शिक्षण घेतलेल्या सुशिक्षित वर्गाचा त्यांनी समावेश केला होता. परंपरावादी शक्तींच्या विरुद्ध कार्य करू शकणारा हा सुशिंक्षितांचा वर्ग म्हणजे भारतीय उदारमतवादाचा आत्माच होय अशी त्यांची धारणा होती. समाजात सुधारणा घडवून आणण्याची त्यांच्यावर जबाबदारी आहे. याच कारणासाठी रानड्यांनी उच्च्च शिक्षणावर भर दिला होता. या समाजातील अभिजनवर्गास उपयोगी शिक्षण देणे हे. साम्राज्याच्याच हिताचे आहे असे त्यांनी सांगितले. प्राथमिक शिक्षणावर फार पैसा खर्च न करता उच्च शिक्षणावर तो खर्च करावा. वंशपरंपरेने ज्या वर्गाकडे शिक्षणाचे कार्ये होते त्यांनाच शिक्षण देण्यावर जोर द्यावा आणि या सुशिक्षितांना सरकारी नोकरीमध्ये जागा द्याव्यात, या स्वरूपाच्या त्यांच्या मागण्यांवरून लक्षात येते की ब्राह्मण व ब्राह्मण जातीच्या जवळील इतर जातींच्या शिक्षणावर त्यांनी जोर दिला होता. ब्राह्मण लोकच नेतृत्व करू शकतील असा विश्वास औद्योगिक परिषदेच्या पुढे केलेल्या भाषणातही त्यांनी स्पष्ट केला आहे.
मतदानाचा हकक कोणास द्यावा हे सांगत असताना रानड्यांनी हे पुनःपुन्हा स्पष्ट केले आहे की जो वर्ग पुरेसा शिकलेला आहे व श्रीमंत आहे त्यांनाच मतदानाचा हक्क द्यावा. पदवीधर व विशिष्ट कर देणाऱ्यामाफेत प्रतिनिधी निवडावेत. त्याचप्रमाणे जमीनदार व वतनदार लोकांकडूनही त्यांचे प्रतिनिधी कायदेमंडळावर पाठवावेत, असा विचार त्यांनी मांडला होता. जमीनदार व वतनदारांचा वर्ग समाजाचा पारंपरिक नेतृत्व करणारा वर्ग आहे व तो समाजाच्या उपयोगाचाही आहे. म्हणून अभिजनवर्गात सुशिक्षित वर्गाबरोबरच श्रीमंत व जमीनदारांचा रानड्यांनी समावेश केला होता जमीन सुधारणे बद्दलचे त्यांचे विचार जमीनदारांच्या बाजूचे होते. संपत्ती असलेल्या लोकांचा पुढाकार शेतीसाठी जरूर आहे. असे त्यांना वाटत होते. आधूनिक तत्त्वांचा वापर करणारा श्रीमंत शेतकरी शेतीची प्रगंती करू शकेल असेही त्यांनी म्हटले होते. यावरून असे लक्षात येते की रानड्यांचा असा विश्वास होता की अभिजनवर्गाकडूनच या देशाची सर्वांगीण प्रगती होऊ शकेल. त्यांच्या नेतृत्वानेच या समाजात उदारमतवाद प्रत्यक्षात येऊ शकेल.
(४) मवाळ धोरण - रानड्यांचा राजकीय पक्ष मवाळ पक्ष म्हणूनच ओळखला जात होता, इतके हे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. उदारमतवादाची प्रगती हळूहळू होणार आहे व ती तशी हळूहळूच व्हावी असे त्यांनी अनेक ठिकाणी म्हटले आहे. फार दुरच्या आणि अशक्य कोटीतल्या कल्पनांच्या मागे लागण्याऐवजी जवळच्या भासणाऱ्या ध्येयाकडे रोज थोडीथोडी वाटचाल करावी खरी वाढ, खरी प्रगती व्हावयाची असेल तर ती हळूहळूच व्हावी लागते. एक टप्पा पूर्ण करून पुढच्या टप्प्याकडे जावे. एक सुधारणा पदरात पाडून घ्यावी व पुढील सुधारणेच्या मागे लागावे. उठाव, क्रांती या पद्धती त्यांनी त्याज्य ठरवल्या होत्या. समाजापासून फटकून राहून, दूर जाऊन सुधारणा करणे त्यांना मान्य नव्हते. उदारमतवादाचा नवा विचार परंपरावादी समाजास एकदम पचनी पंडणर नाही, रुचणार नाही याची कल्पना असल्यामुळे रानडे नेहमी मवाळ धोरणाचा अंगीकार करीत असत. भारतीय इतिहासाची साक्ष काढून त्यांनी असे म्हटले होते की शतकानुशतके या समाजाची प्रगती.होत आली आहे पण' एकदाही सातत्य व परंपरा मोडली गेली नाही. साखळी तुटली नाही. आपल्या महान परंपरेचा सनड्यांना रास्त. अभिमान होता. हिंदू समाजामध्ये असलेला स्थितिवाद (conservatism) नेहमी त्याच्या उपयोगीच पंडला आहे. त्याने नवीन, कल्पना रुजण्यास विरोध झाला नाही. हळूहळू प्र गती झाल्यानेच समाजाची घडी विस्कटणर नाही, शांतता भंग पावणार नाही. म्हणून त्यांनी घटनात्मक पद्धतीने व कायदेशीर मार्गाने जावे असे जागोजाग सांगितलेल आहे.
मवाळ धोरणाचाच एक भाग म्हणजे परंपरेची पद्धत. नव्या सुधारणा प्राचीन ग्रंथांप्रमाणे, धमशास्त्राप्रमाणे कशा बरोबर आहेत हे सांगणे, आपल्या समाजाच्या इतिहासात तत्कालीन सुधारणेच्या चळवळीस काही समांतर उदाहरणे, पाठिंबा मिळतो का याचा शोध घेणे इत्यादी गोष्टींतून परंपरेची पद्धत राखण्याचा रानडे यांचा प्रयत्न दिसतो. स्त्रीसुधारणेबाबत किंवा प्रार्थना समाजाच्या. तत्त्वज्ञानाबाबत त्यांनी परंपरेचे दाखले दिले. भागवत धर्माचा आधार घेऊन नव्या धर्मसुधारंणा लोकांच्या पचनी पडतील असे त्यांना वाटले. (५) इतर वैशिष्टे - वरील महत्त्वाच्या वैशिष्ट्यांशिवाय रानडे यांच्या उदारमतवादाची इतरही काही वैशिष्ट्ये नमूद करणे जरूर आहे. त्यातील पहिले वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा शिक्षणावरील विश्वास. शिक्षणामुळे व्यक्तीची प्रगती होते. त्यामुळे तो रूढी व परंपरेच्या बंधनातून बाहेर पडतो: नवे विचार ग्रहण करू शकतो. व्यक््ति- स्वातंत्र्याचे महत्त्व त्याला पटू शकते. त्याशिवाय शिक्षणांमळेच व्यक्तीला राजकारण . समजू शकते, असा विश्वास रानड्यांच्या लिखाणात सर्वेत्र व्यक्त झालेला आढळतो सुशिक्षित वर्गच उदारमतवादाचा वाहक होईल याबद्दल त्यांना खात्री होती .हे आपण वर नमूद केले आहेच. राष्ट्रस्वातंत्र्यावरील मर्यादा हे रानड्यांच्या उदारमतवादांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणून सांगता येईल. उदारमतवादाच्या सिद्धान्तात राष्ट्रांचे स्वांतंत्र्य अंतभूत केलेले आहे. परंतु रानड्यांनी हे तत्त्व जसेच्या तसे स्वीकारले नव्हते. ब्रिटिश साम्राज्यामुळे शांतता प्रस्थापित होऊन सुधारणा घडून आल्या व उदारमतवादाची सुरूवात झाली हे त्यांनी जाणले होते. ब्रिटिश साम्राज्य ही परमेश्वराचीच योजना आहे, असे सांगून त्यांनी या संबंधाचा जास्तीत जास्त फायदा उंठवावा असे प्रतिपादन केले होते.
रानड्यांच्या उंदारमतवादाचा वरीलप्रमाणे आढावा घेतल्यानंतर असे जाणवते की त्यांच्या राजकीय विचारांवर पा्श्चिमात्त्य विचारांचा सखोल परिणाम झाला होता. विशेषत: जॉन स्ट॒अटं मिल, उदारमतवादी परंपरा, हुर्बेट स्पेन्सर आणि इंग्लड- मधील चिद्वादी विचारवंत यांच्या तत्त्वज्ञानाचा परिणाम त्यांच्या उदारमतवादावर झालेला स्पष्टपणे लक्षात येतो. परंतु हा परिणाम दर्शविण्यास एंका स्वतंत्र लेखाचीच जरूरी भासेल म्हणून येथे रानड्यांच्या विचाराचे पाश्चिमात्त्. विचारांचा त्यांच्यांवर झालेला प्ररिणाम हे एक वैशिष्ट्य होते, एवढेच नमुद करावयाचे आहे.
--------------------------------------------------
म ( ) मध्ये प्रकाशित