महात्मा फुले यांच्या कार्याची आणि विचारांची माहिती जेव्हा मराठी माणसाला नव्हती. एकोणिसाव्या शतकातील त्यांच्या कर्तबगारीचा विसर जेव्हा महाराष्ट्राला पडला होता तेव्हा त्यांच्या असामान्य कर्तृत्वावर प्रकाश टाकण्याचे मोलाचे कार्य करणाऱ्या मोजक्या विचारवंतात रा.ना. चव्हाण यांचा समावेश होतो. ज्या काळात समाजसुधारणा म्हणजे रानडे व. आगरकर आणि राजकीय सुधारणा म्हणजे टिळक असे समीकरण रुढ झाले होते तेव्हा महात्मा फुले यांच्या भूमिकेचा परिचय करुन देणाऱ्यामध्ये चव्हाणांचा पुढाकार होता जातिसंस्थेला हात न लावता समाजसुधारणा करायची अशी कल्पना जेव्हा प्रस्थापित होत होती तेव्हा फुल्यांनी आपल्या समाजाच्या मुळाशीच हात घातला . व जातिसंस्थेला निपटून काढल्याशिवाय सुधारणेच्या गप्पा व्यर्थ आहेत हे स्पष्ट केले. त्या फुल्यांचे विसाव्या शतकातील वारस म्हणजे रा.ना. चव्हाण म्हणून त्यांनीच फुले यांच्या कार्याचा शोध घ्यावा व त्यातून काय बोध घ्यायचा याचे. दिग्दर्शन करावे हे साहजिकच वाटते.
इतर सत्यशोधकी विचारवंत व रा.ना. यांच्यातील मुख्य फरक म्हणजे रा.नां.ना लाभलेला विठ्ठलरामजींचा सहवास. रानांच्या विचाराची बैठक शिंदे. यांच्या तालमीत तयार झाली होती त्यामुळे रानांचे विचार कधीही एकारलेले, आक्रस्ताळेपणाचे किंवा आगपाखड करणारे झाले नाहीत. ब्राह्मण्य व ब्राह्मण यात ते फरक करु शकले. ब्राह्मणेतरातील दोषावर बोट ठेवू शकले. त्यांना फुल्यांच्या तत्त्वप्रणलीची आठवण करुन देऊ शकले. इतर ब्राह्मणेतर विचारवंतांमध्ये न आढळणारी गोष्ट रानांमध्ये आढळते ती म्हणजे ब्राह्मो किंवा प्रार्थनासमाजाचा त्यांच्या विचाराला लाभलेला पाया..तोही वारसा त्यांना शिंदेंकडून मिळालेला होता. किंवा त्यांहीपूर्वी त्यांच्या वडिलांकडून मिळालेला होता. त्यामुळे रानांच्या विचाराला एक व्यापक धार्मिक चौकट प्राप्त झाली ब्राह्मण-ब्राह्मणेतर अशा दुहीपासून ते दूर राहू शकले. प्रार्थनासमाजाला समतावादाच्या जवळ नेण्याचे मंहान कार्य विठ्ठल रामजींनी केले. प्रार्थना समाजाला उच्चभू वर्तुळातून बाहेर आणण्याचे अवघड काम शिंदे करु शकले रा.ना. यांनी त्यांची गादी यथार्थपणे पुढे चालवली व फुले यांच्या सत्यशोधकी विचाराच्या जवळ ब्राह्मो विचार नेला. भांडारकर-चंदावरकर यांच्यामुळे प्रार्थना समाजात जातिसंस्थेतील विषमतेची चर्चा तरी सुरु झाली. शिंदे-चव्हाणांमुळे ती पुढे गेली. शिंदेंचे वैशिष्ठ्य हे की त्यांनी प्रार्थनासमाजा विचाराचा समन्वय _ सत्यशोधकी विचाराशी केला व नवा अध्याय महाराष्ट्रात सुरु केला. राना यांनी _ तो पुढे नेला असे त्यांच्या एकूण लिखाणावरुन व विचारांवरुन दिसते.
रानांना विठ्ठल रामजीकडून लाभलेला दुसरा वारसा म्हणजे संशोधनाचा. सत्यशोधकी चळवळीचा व विचारांचा अभ्यास अत्यंत पद्धतशीर, कागदपत्रांच्या सहाय्याने ऐतिहासिक पद्धतीच्या शिस्तीने करण्याचा प्रयत्न _ चव्हाणांनी आयुष्यभर केला. डॉ. बाबा आढांव यांच्या पुरोगामी सत्यशोधक या नियतकालिकात त्यांच्या संशोधनाचे प्रतिबिंब वेळोवेळी पडलेले दिसते. बऱ्याच अभ्यासकांना त्यांनी स्वतःकडे असलेली कागदपत्र सहजपणे उपलब्ध करुन दिली कारण त्यांना त्या कामात रस होता व त्यांचे महत्व त्यांनी ओळखले होते. भाषणबाजी करुन आणि शाब्दिक कसरती करुन वेळ मारुन नेणारे किंवा पुढे पुढे करणारे कार्यकर्ते आपण बरेच पाहतो. रा.ना. हे त्यांच्यापासून फार वेगळे होते. ते जो विचार मांडीत किंवा जो प्रसंग उभा करीत त्याला संशोधनाची बैठक असे किंवा फुले-शिंदे यांच्या तत्वज्ञानाचा पाया असे. विठ्ठलरामजी व त्यांचे वडिल यांच्याकडून त्यांनी विचाराचा समतोलपणा घेतला होता. अहंकार त्यांना शिवला नाही याचेही कारण हाच वारसा असावा. फुले शिंदे व भाऊराव पाटील यांच्यावरील त्यांचे लेखन पुढील पिढ्यांना मार्गदर्शक ठरले ते याच समतोलपणामुळे. हे विसरता कामा नये. रा.ना. चव्हाणांचे पुस्तक व लेख इतके आहेत की त्याचे संपादन करुन ते वाचकांसमोर कार्यकर्त्यांसमोर आणणे कितीही गरजेचे असले तरी फार अवघड आहे. परंतु चव्हाणांच्या कुटुंबियांनी हे कार्य आपल्या खांद्यावर घेतले आहे. गेली जवळजवळ १० वर्षे ते स्वतः झीज सोसून ते करीत आहेत. हे अलिकडच्या काळात उठून दिसणांरे काम केल्याबद्दल चव्हाणांचे कुटुंबिय प्रशंसेस पात्र आहेत. चव्हाणांच्या विचारावर तरुण संशोधकांनी काम करायचे ठरविले तर त्यास सहाय्य होईल असे प्रकाशनाचे काम हे चव्हाणांची आजची पिढी करीत आहे.
प्रस्तुत पुस्तक एक छोटेखानी संग्रह आहे. त्यामध्ये रा.ना.चव्हाण यांनी लिहीलेले एकूण सांत लेख संग्रहित केलेले आहेत ते १९४९ते १९९० या मोठ्या कालखंडात लिहिलेले आहेत. त्यामध्ये विठ्ठलरामजी यांच्या भाषणाच्या सारांशापासून ते चर्चासत्रात सादर केलेल्या शोधनिबंधापर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे लेख एकत्रित केलेले आहेत. त्यामुळे फुल्यांच्या विचाराची व कार्याची थोडी बहुत पुंनरावृत्ती होते. पण प्रत्येक लेख स्वतंत्रपणे वेगळ्या वाचकवर्गाला समोर ठेवून लिहिला असल्याने तसे झाले आहे. मांडणीची पद्धत व भाषा मात्र बदलत गेली आहे. अगदी १९४९ सालाची भाषा व १९९० सालच्या भाषेत फरक पडलेला लक्षात येतो. पण जरी भाषा बदलली, मांडणी बदलली तरी विचाराची बैठक मात्र बदलेली नाही. ती पक्की आहे. फुले आणि शिंदे यांच्या विचारातून ती तयार झालेली आहे. आणि त्यामुळेच बहुधा बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत फुल्यांचा विचार कसा विकसित होत गेला याचे भान रा.ना. चव्हाणांना आहे. शिंदे यांचे दठिताबद्दलचे असामान्य कार्य व त्यांचा 'अस्पृश्यतेबाबतंचा विचार चव्हाणांनी मनात सतत बाळगलेला होता. परंतु पुढे आंबेडकरांचे अनुयायी व शिंदे यांच्यात जो भेद पडला तो चव्हाण सहजपणे बाजूला ठेवतात आणि फुले-आंबेडकर यांच्यातील दुवा दाखवून देतात. बौद्ध - धर्माचे भारतीय इतिहासातील असामान्य कार्य शिंदे यांनी प्रथमतः दाखवून दिले तेही चव्हाण जाणतात व आपल्या मांडणीत बौद्ध धर्माच्या वारस्याचा उल्लेख करतात. गौतम बुद्ध हा आद्य क्रांतिकारक होता याची नोंद ते घेतात व फुल्यांचे कार्य बुद्धाशी जोडून घेतात | | सत्यशोधक विचाराचे यश व अपयश या दोहोंचे विश्लेषण चव्हाण करताना दिसतात आणि अपयशाचे माप फुल्यांच्या आजच्या वारसांच्या पदरात - टाकतात. हे करीत असताना भीडभाड बाळगत नाहीत. (पा. ६१) मराठा-मराठेत्तर, बौद्ध व बौद्धेतर दलित असे भेद कसे चळवळीच्या अपयशाला कारणीभूत ठरू शकतील हे ते स्पष्टपणे सांगतात. बौद्ध धर्माला जसे पूर्वी सनातनशाहीने गिळून टाकले तसे आंबेडकरांच्या भीमयानाचे होऊ शकेल असा इशाराही ते देतात. (पा. ६४) आंबेडकरवादी ज्या प्रकारे हिंदुत्ववादाच्या आहारी सध्या जात आहेत त्यावरून चव्हाणांचा इशारा किती महत्वाचा होता हे ध्यानात येते.
चव्हाणाच्या फुल्यांवरील या लेखसंग्रहाचे एक वैशिष्ठ्य म्हणजे चव्हाण यात फुल्यांची कार्लमार्क्सच्या कार्याशी तुलना करतात. मार्क्सने जसा इतिहासाचा अन्वयार्थ लावण्याचा सिद्धांत मांडला तसाच एक प्रयत्न फुले करतात असे चव्हाणांनी स्पष्टपणे दाखवून दिले आहे. (पा.९१) चव्हाणांच्या मते 'इतिहासाचा कार्लमार्क्स यांनी एक नवा अर्थ शोधून काढला तसाच जोतीरावांनी भारतीय धर्मेइतिहासाचा एक अर्थ केला फुल्यांच्या भारतीय इतिहासाच्या अन्वयांर्थाक्रडे या दृष्टीने कोणीच पाहिलेले आहे असे वाटत नाही चव्हाणांनी ते ओळखले यातच त्यांचे मोठेपण सामावलेले आहे _ फुल्यांच्यावर जे लेखन झाले आहे त्यांत फुल्यांनी शूद्रअतिशूद्रांनी उठाव | करुन भटशाही उलथून लावली पाहिजे असा विचार त्यांचा होता असे सांगितले जाते परंतु अतिशूद्रांवर (दलित) शूद्र (ब्राह्मणेतर) अन्याय व जुलुम करतात त्यांना केव्हा केव्हा काठीने मारतात' हे सत्य जोतीबांनी प्रथमच उघडंकीस आणिले आहे. हे चव्हाण आपल्याला दाखवून देतात. मला वाटते हा भाग फार . महत्वाचा आहे. चव्हाण. फुल्यांच्या काळापुरते हे निरिक्षण मर्यादित ठेवीत नाहीत ते आंबेडकरांच्या काळापर्यंत ते पुढे आणतात आणि. दलित-दलठितेतर हा भेद कसा चळवळीला मारकं ठरणार आहे हे'स्पष्ट करतात (पा. १०२) . यालेख संग्रहातील शेवटच्या लेखात चव्हाणांनी आपल्या देशात नैतिक . पेच निर्माण झाला आहे असे म्हटले आहे. मला वाटते आजच्या संदर्भात त्यांचा हा विचार महत्वाचा ठरणार आहे. ते म्हणतात की नैतिक प्रेरणा देण्याचे कार्य करील तोच खरा धर्म. बुद्धाने धर्म याचा अर्थ नीति (धम्म) असा केला होता डॉ. आंबेडकरांनाही हाच अर्थ अभिप्रेत होता. जोतीरावांनीही नैतिकतेला | वरिष्ठत्व दिले होते. हिंदुत्ववादामुळे धर्माला जे बेगडी बाजारु व हिंसक स्वरुप येऊ घातले आहे. त्यासंदर्भात र्भात चव्हाणांचा हा विचार आपले डोळे उघडणारा आहे. ब्राह्मणेतरांमधील व दलितांमधील जी नेतेमंडळी आज हिंदुत्ववाद्यांच्या. कह्यात जात आहेत त्यांनी रा.ना. चव्हाणांचे हे पुस्तक वाचले तर त्यांची कोठे . फसगत होत आहे हे त्यांना उमजेल रा.ना. चव्हाणांच्या महत्वाच्या लेखसंग्रहांला प्रस्तावना लिहिण्याची संधी मला चव्हाण कुटुंबियांनी दिली याबद्दल मी त्यांचे व विशेषत: श्री. रमेश चव्हाण यांचे आभार मानतो व ही प्रस्तावना संपवतो.
--------------------------------------------------
म ( ) मध्ये प्रकाशित