समीक्षक:
रानडेप्रणित सामाजिक सुधारणेची तत्वमीमांसा
प्रकाशक: कुलसचिव, पुणे विद्यापीठ, पुणे
सेनापती बापट स्मारक व्याख्यानमाला,
प्रथमावृत्ती १९७३
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे याचे नाव महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे, ते एक महान समाजसुधारक म्हणून. रानडे यांनी समाजजीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये मोलाचे कार्य केलेले आहे. हे समाजसुधारणेच्या चळवळीमध्ये नेतृत्व करीत असतानाच अर्थकारण आणि राजकारण या क्षेत्रातही महत्त्वाची कामगिरी बजावत होते. आणि एक सर्वस्पर्शी तत्त्वज्ञान देण्याचा प्रयत्न करीत होते. लोकमान्य टिळकांचा उदय होण्याआधीच्या कालखंडामध्ये या देशात ज्या सामाजिक, राजकीय आणि धार्मिक चळवळी चालू होत्या त्यामागील तत्वज्ञान न्यायमूर्ती रानडे यांनी सांगितलेले होते. म्हणूनच त्यांच्या कार्याचा आणि विचाराचा अभ्यास होणे आवश्यक आहे; किंबहुना त्याशिवाय एकोणिसाव्या शतकातील भारताचा विचार करणे शक्य नाही.
न्यायमूर्ती रानडे यांच्यावर झालेले लिखाण दोन प्रकारात मोडते. पहिला प्रकार आहे चरित्राचा. त्यांच्या पत्नी रमाबाई रानडे यांनी ' आमच्या आयुष्यातील काही आठवणी' या नावाने लिहिलेल्या पुस्तकात रानडे यांचा खाजगी व सार्वजनिक आयुष्यातील काही प्रसंग अत्यंत सोप्या व सहजसुंदर भाषेत सांगितले आहेत. परंतु रमाबाईंचे हे पुस्तक म्हणजे न्यायमूर्ती रानडे यांचे संपूर्ण चरित्र नव्हे. मराठीतील रानड्यांचे प्रसिद्ध चरित्र आहे न. र. फाटक यांनी लिहिलेले. परंतु रानड्यांच्या महान कार्याचा, गुंतागुंतीच्या आयुष्याचा आणि समस्त तत्त्वज्ञानाचा खोलवर विचार नाटकांच्या या चरित्रामध्ये झालेला नाही. इंग्रजीमध्ये रानडे यांची एकूण चार चरित्र उपलब्ध आहेत. त्यातील १९०२ सालचे मानकर यांचे चरित्र त्यांच्या लेखनावर जास्त प्रकाश टाकते. जेम्स केलॉक यांनी १९२६ साली रानड्यांचे चरित्र प्रसिद्ध केले, पण ते फारच त्रोटक आहे. व्यं. वि. पर्वते यांनी लिहिलेले चरित्र (१९६३) केलॉक यांच्या चरित्रापेक्षा जास्त सविस्तर आहे; परंतु ते घटनांचे आणि विचारांचे विश्लेषण करीत नाही. रिचर्ड टकर यांचे " रानडे अँड दि रूट ऑफ इंडियन नॅशनॅलिझम" हे पुस्तक १९७२ साली प्रसिद्ध झाले. यामध्ये टकर यांनी रानडे यांच्या सार्वजनिक आयुष्याचे सुसंगत आणि सखोल विवेचन केलेले आहे. महाराष्ट्रातील एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील समाजजीवनाच्या पार्श्वभूमीवर रानड्यांच्या कार्याचे आणि विचाराचे विश्लेषण टकर यांनी केलेले आहे. रानडे यांची जी काही चरित्रे मराठीतून व इंग्रजीतून उपलब्ध आहेत, त्यामध्ये टकर यांचे चरित्र विशेष लक्षणीय आहे.
न्यायमूर्ती रानडे यांच्या विचाराचा अभ्यास प्रथम कै.द.गो. कर्वे यांनी केला व व मराठीतून आणि इंग्रजीतून १९४२ साली तो प्रसिद्ध केला. परंतु परवे यांच्या पुस्तकाचा हेतू रानडे यांच्या विचारांचा आढावा घेणे, त्यांच्या विचारांची ची रूपरेषा स्वतःच्या भाषेत सांगणे एवढाच होता. त्यानंतर रानड्यांच्या विचाराचा अभ्यास करणारे पुस्तक १९६३ साली प्रसिद्ध झाले. ते म्हणजे जागीरदार यांचे ' स्टडीज इन द सोशल थॉट ऑफ एम. जी. रानडे' या पुस्तकात जागीरदार यांनी रानड्यांच्या लिखाणा मागील सिद्धांताचा शोध घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. न्यायमूर्ती रानडे हे उदारमतवादी व व्यक्तिस्वातंत्र्यवादी विचारवंत होते; त्यादृष्टीने एकसंघपणे त्यांच्या विचारांचे विश्लेषण करणे जरूर होते. उदारमतवादी तत्वज्ञानाच्या चौकटीमध्ये रानडे यांचे विचार कसे बसतात, जर ते काही बाबतीत वेगळे असतील तर त्याची कोणती कारणे आहेत; भारतातील व मुख्यतः महाराष्ट्रातील उदारमतवादीच्या विचारप्रवाहात त्यांचे कोणते स्थान आहे या गोष्टी जागीरदार यांनी सांगितलेल्या नाहीत.
वरील ग्रंथांच्या पार्श्वभूमीवर प्रा.गं.बा.सरदार यांचे 'रानडे प्रणित सामाजिक सुधारणेची तत्वमीमांसा' हे ११७ पानी पुस्तक रानड्यांच्या विचाराची व कार्याची तात्विक बैठक नेमकी कोणती होती, ते सांगण्यात यशस्वी झालेले आहे.
पुणे विद्यापीठातर्फे होणारी सेनापती बापट स्मारक व्याख्यानमाला ही सरदारांना सुयोग्य संधी वाटली. १९७३ मध्ये या व्याख्यानमालेत सरदारांनी न्यायमूर्ती रानडे यांच्या सामाजिक सुधारणेमागील विचाराचा मागोवा घेतला. तीच व्याख्याने पुणे विद्यापीठाने पुस्तक रूपाने प्रसिद्ध केली आहेत. आपल्या प्रस्तावनेतच सरदारांनी या पुस्तकांच्या मर्यादा स्पष्ट केलेल्या आहेत. या पुस्तकात रानड्यांच्या विचारांचे समग्र व सांगोपांग विवेचन आलेले नाही. फक्त काही महत्त्वाच्या मुद्द्यांचा उहापोह सरदार यांनी थोडक्यात केलेला आहे. त्यातही परत धार्मिक आणि सामाजिक विचारांना त्यांनी प्राधान्य दिलेले आहे. आर्थिक व राजकीय विचार रानड्यांनी मांडलेले होते; परंतु या पुस्तकात त्याची दखल फक्त विषयाच्या पूर्ततेसाठी, जरुरीनुसार घेतलेली आहे. या सर्व मर्यादा लक्षात ठेवूनच सरदारांच्या पुस्तकाचा विचार करावयास हवा.
प्रस्तुत पुस्तकाची विभागणी ढोबळ मानाने तीन भागात करता येते. पहिली दोन प्रकरणे रानडेपूर्व काळातील समाज व समाजसुधारक यांच्यावर लिहिलेले आहेत. प्रकरणे तीन ते सात रानड्यांच्या विचारांचा उहापोह करणारी आहेत. आठव्या म्हणजेच शेवटच्या प्रकरणात रानड्यांच्या विचाराचे समालोचन करण्यात आलेले आहे; आणि त्यांच्या यशापयशाची चर्चा केलेली आहे. न्यायमूर्ती रानडे यांच्या विचारामागील पार्श्वभूमी सांगणे जरूर होते. त्यादृष्टीने पहिल्या प्रकरणात मध्ययुगीन समाजाची वैशिष्ट्ये त्यात सांगितलेली आहेत. अशा समाजामध्ये इंग्रजी राजवट आली; आणि तिने एक प्रकारचे स्थित्यंतर घडवून आणले. इंग्रज राज्यकर्त्यांनी भारताबद्दल जे धोरण आखले, त्यामध्ये खुल्या व्यापाराचे तत्व, ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या विचार आणि उपयुक्ततावाद यांचे प्रतिबिंब उमटले होते. इंग्रजांनी या देशात जी आधुनिक शासन व्यवस्था प्रस्थापित केली, तिचा योग्य तो परिणाम झाला; व त्यातून समाजसुधारणेला पोषक असे वातावरण तयार झाले; हे सरदारांनी दाखवून दिलेले आहे. इंग्रजी राज्याच्या धोरणा बरोबरच येथे उदारमतवादी विचारांची बीजे रोवण्यात इंग्रजी शिक्षण देणाऱ्या शासनाचा आणि ख्रिस्ती धर्मप्रसारक यांचा हात होता, म्हणून इंग्रजांनी आपले शिक्षण विषयक धोरण कसे आखले, त्यामध्ये कोणते प्रवाह होते, यांचा ऊहापोह सरदारांनी केलेला आहे. इंग्रजीचा अभ्यास व त्याचबरोबर संस्कृतचा व्यासंग या इंग्रजांच्या शिक्षण विषयक धोरणामुळे महाराष्ट्रातील सुधारणावादावर चांगला परिणाम झाला, असे प्रतिपादन त्यांनी केलेले आहे. ख्रिस्ती धर्मप्रसारक यांच्या कार्यामुळे सुधारणेची चळवळ कशी सुरू होऊ शकली याचा विचारही त्याचबरोबर केलेला आहे.
अशाप्रकारे नवी शासनव्यवस्था, इंग्रजी शिक्षण आणि ख्रिस्ती धर्मप्रसार यातून महाराष्ट्रात समाजसुधारणेच्या युगाचा उदय झाला. इंग्रजी शिक्षण घेतलेल्यांची पहिली पिढी निर्माण झाल्यावर येथे सुधारण्याचे प्रयत्न झाले, त्यांचे विवेचन दुसऱ्या प्रकरणांमध्ये केलेले आहे. त्यात बाळशास्त्री जांभेकर, विष्णूबावा ब्रह्मचारी, दादोबा पांडुरंग, महात्मा फुले आणि लोकहितवादी या समाजसुधारकांच्या कार्याचा आढावा घेतलेला आहे. महात्मा फुले यांचे खरे कार्य १८६९-७० नंतरचे असल्याने त्यांचे सविस्तर विवेचन याठिकाणी केलेले नाही. परंतु जगन्नाथ शंकरशेठ यांच्या कार्याचा विचार याठिकाणी करायला हवा होता. जगन्नाथ शंकरशेठ यांनी स्त्रीशिक्षण, विधवाविवाह, सतीची चाल बंद करणे, बालविवाह विरोध करणे, कनिष्ठ जातींच्या शिक्षणाची सोय याबाबतीत कार्य केले होते. त्याचप्रमाणे ग्रँट मेडिकल कॉलेज, लॉ कॉलेज, जे.जे.स्कूल ऑफ आर्ट यांसारख्या संस्था स्थापन करण्यात पुढाकार घेतला होता. शिवाय १८५२ साली मुंबईमध्ये 'बॉम्बे असोसिएशन' नावाची राजकीय संघटना स्थापन करण्यात आली त्यामध्येही जगन्नाथ शंकर शेठ यांनी नेतृत्व केले होते. १८६२ मध्ये ते कायदे मंडळाचे सभासद म्हणून नेमले गेले होते. विष्णूबावा ब्रह्मचारी यांच्या कार्याचा विचार करताना त्यांनी १८६७ मध्ये लिहिलेल्या 'सुखदायक राज्य प्रकरणी निबंध' या निबंधांचाही विचार होणे जरूर होते. कारण हा निबंध म्हणजे स्वप्नाळू समाजवादी विचारांचा एक नमुना होता. लोकहितवादी यांच्या लेखनाचे विवेचन पाच पानाचा केलेले आहे. त्यामध्ये शतपत्रे यांचा इत्यर्थ सांगितला आहे. परंतु लोकहितवादी यांनी आपल्या निबंध संग्रहातील जवळजवळ अठ्ठावीस निबंधांमध्ये व पत्रांमध्ये ब्राह्मणांवर जी टीका केलेली आहे, तिची चर्चा करायला पाहिजे होती. याबाबतीत लोकहितवादी रानड्यांपासून वेगळे पडतात व काही ठिकाणी महात्मा फुले यांच्या जवळ जातात.
जांभेकर, दादोबा पांडुरंग आणि लोकहितवादी यांचे कार्य विद्यापीठ पूर्वकाळातील होते. त्यांचे विचार मुख्यतः स्फुट आणि प्राथमिक स्वरूपाचे होते. एक प्रकारे ते उस्फुर्त व प्रतिक्रियात्मक होते. त्यांच्यानंतर सामाजिक प्रबोधनाचे नवे पर्व सुरू झाले. त्याचे विवेचन तिसऱ्या प्रकरणात सुरुवातीस दिलेले आहे. तेथेच या नव्या पर्वाची वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत. न्यायमूर्ती रानडे हे नव्या पदवीधर सुशिक्षितांच्या पिढीचे प्रतिनिधी आणि प्रवक्ते होत, असे सरदार यांनी म्हटले आहे. येथून पुढे रानडे यांच्यावरच सर्व विवेचन केंद्रित झालेले आहे. प्रथमतः रानडे यांच्या व्यक्तित्वाची ओळख वाचकांना थोडक्यात करून दिलेली आहे. त्यानंतर त्यांचे जीवितकार्य काय होते, हे नेमक्या शब्दात स्पष्ट केलेले आहे. प्रत्यक्षात रानड्यांनी आपल्या आयुष्यात जे प्रचंड कार्य केले, त्याचे विवेचन सरदारांनी सविस्तरपणे करण्याचे टाळले आहे. कारण तसे करायचे ठरविले असते तर ते या व्याख्यानांच्या विषयाच्या मर्यादेबाहेर गेले असते. शिवाय पुस्तकांमधील बरीच जागा त्याने अडवली असती. म्हणूनच तत्वमीमांसेची चर्चा करताना कार्याची व घटनांची जेवढी ओळख करून दिली पाहिजे, तेवढेच विवेचन करून लेखकाने वैचारिक विश्लेषण याकडे आपले लक्ष वळविले आहे.
सुधारक हा समाजाच्या अवनतिची जी कारणमीमांसा करतो, तिच्यावर त्याच्या कार्याची दिशा ठरते. चौथ्या प्रकरणात, सुरुवातीस राहणाऱ्यांनी केलेली सामाजिक अवनतिची कारणमीमांसा दिलेली आहे. मागासलेल्या भारतीय समाजात कोणत्या दिशेने प्रगती करावी लागेल याचा रानड्यांनी सर्वांगांनी विचार केला होता. त्यांच्या लेखनातून, भाषणांमधून व कार्यातून तो प्रतीत झालेला होता. त्या सुधारणावादी विचारांचे मूलगामी विवेचन या प्रकरणात आलेले आहे. जो आदर्श समाज या देशात निर्माण करावयाचा, त्यासाठी कोणत्या मार्गांचा अवलंब केला पाहिजे, कोणते मार्ग त्याज्य मानले पाहिजेत हे राहणाऱ्यांनी वेळोवेळी सांगितले होते. त्याची सविस्तर चर्चा या प्रकरणाच्या शेवटी दिलेली आहे.
धर्मश्रद्धा हे भारतातील सुधारणावादाचे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. न्यायमूर्ती रानडे यांच्या सुधारणावादामध्येही आपणास धर्मश्रद्धेचे महत्त्व आढळते. सरदारांनी पाचव्या प्रकरणात भारतीय सुधारणावादाचे हे धार्मिक अधिष्ठान रानडे यांचे उदाहरण घेऊन स्पष्ट केले आहे. रानडे हे धर्मनिष्ठ असून उदारमतवादाचे प्रवक्ते कसे होतात, या प्रश्नाचे उत्तर सरदार यांनी याप्रकरणात दिलेले आहे. त्यासाठी धर्मनिष्ठा व उदारमतवाद यांचा परस्पर संबंध नेमका कोणता आहे, हेही त्यांनी स्पष्ट केलेले आहे. नैतिकता व धार्मिक श्रद्धा यांचेही विवेचन करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. या पुस्तकातील हे प्रकरण सर्वात चांगले उतरले आहे. प्रा. सरदार हे एकाच वेळी महाराष्ट्रातील संतवांग्मय आणि सामाजिक सुधारणा यांचा अभ्यास व चिंतन करणारे व्यक्तित्व आहे. त्यामुळेच रानड्यांच्या व्यक्तित्वातील धार्मिक आणि सुधारणावादी दृष्टिकोनांचा, सरदार मनापासून समरस होऊन वेध घेऊ शकले असावेत.
रानड्यांनी उदारमतवादी विचारांची ची बांधणी कशी केली आहे याचा ऊहापोह सहाव्या प्रकरणात आला आहे. रानडे यांच्यावरील इंग्रजधार्जिणेपणाचा आरोप खोडून काढण्याकरिता सरदारांनी रानड्यांच्या विचारातील विविध तपशिलाची चर्चा करून, त्यांच्या कार्यामागे व विचारांमागे एकूणच त्यांची राष्ट्रीय दृष्टीच कशी होती, हे सप्रमाण दाखवून दिले आहे. उदारमतवादी विचारांची बांधणी करताना रानड्यांनी समाज परिवर्तन याबद्दलचा जो नेमस्त दृष्टीकोन स्वीकारला होता, त्यामागील कारणांची मीमांसा या प्रकरणात शेवटी केलेली आहे.
व्यक्ती व समाज यांचे परस्परसंबंध कसे असावेत, स्वातंत्र्य व सुव्यवस्था यांची सांगड कशी घालता येईल, शासनाचे कार्यक्षेत्र कसे मर्यादित करावे, या प्रश्नांवरील रानडे यांचे मौलिक विचार सातव्या प्रकरणात सविस्तरपणे मांडले आहेत. शेवटच्या प्रकरणांमध्ये प्राण्यांची कार्यपद्धती कोणती होती हे सांगून रानडे यांचे यश व अपयश यावर चर्चा केलेली आहे. रानडे यांच्या विचाराने कोणते परिवर्तन झाले त्यांच्या विचाराच्या मर्यादा कोणत्या होत्या हे स्पष्ट करून सरदारांनी आपल्या या या लहानशा पुस्तकाचा समारोप केलेला आहे.
अशाप्रकारे तिसऱ्या प्रकरणापासून शेवटच्या प्रकरणात पर्यंत रानडे प्रणित सामाजिक सुधारणेची तत्त्वमीमांसा केलेली आहे. सरदारांनी या सर्व प्रकरणांमधून जे काही महत्वाचे मुद्दे मांडले आहेत, त्यातील सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे रानडे यांच्या विचाराची बैठक उदारमतवादी होती, हा होय. रानडे हे महाराष्ट्रातील उदारमतवादाचे श्रेष्ठ प्रवक्ते होते. त्यांनी भारतीय परिस्थिती आणि भारतीयांचा स्वभावधर्म यांच्या मर्यादा जाणून उदारमतवादी तत्त्वज्ञानाची बांधणी केली. उदारमतवादी तत्वे या समाजात कशी लागू करायची, याचा निर्णय आपल्या स्वयंप्रज्ञेने घेतलेला होता. रानड्यांनी हा जो उदारमतवाद स्वीकारला होता, त्याची प्रमुख तत्वे कोणती, या तत्त्वज्ञानाचा मुळगाभा कोणता हे सरदारांनी स्पष्ट केले आहे. " मानवाचे स्वतः सिद्ध पावित्र्य आणि प्रतिष्ठा हे आधुनिक उदारमतवादाचे प्राणतत्त्व आहे. भक्तीच्या प्रेरणा आणि आकांक्षा, कल्पकता आणि कर्तुत्व यातच सामाजिक प्रगतीची गुरुकिल्ली आहे." असे प्राध्यापक सरदार सांगतात.
रानडे यांच्यावर पाश्चिमात्य (विशेषतः आंग्ल) उदारमतवादी तत्त्वचिंतकांच्या विचारांचा परिणाम झाला होता. परंतु रानड्यांनी त्यांचे अनुकरण केले नाही. पश्चिमेकडील विचार जसाच्या तसा या देशात लागू पडणार नाही, याची रानडे यांना पुरेपूर जाणीव होती. म्हणूनच त्यांनी भारतीय परिस्थितीस अनुसरून त्यात योग्य ते बदल केले. जॉन लॉक यांचा अत्यंतिक व्यक्तिवाद किंवा फ्रेंच तत्वज्ञानातील व्यक्तिवाद रानड्यांनी त्याज्य मानला. त्याऐवजी स्वातंत्र्य व सुव्यवस्था यांची योग्य सांगड घालणारा उदारमतवाद रानड्यांना जवळचा वाटला. बेथम यांच्याकडून त्यांनी उपयुक्ततावाद जसाच्या तसा स्वीकारला नाही, किंवा ॲडम स्मिथ याच्याकडून स्पर्धात्मक अर्थकारण जसेच्या तसे स्वीकारले नाही. जॉन स्टुअर्ट मिल यांच्याकडून धर्मासंबंधीची भूमिका घेतली नाही, पण नाही नैतिक प्रेरणांचे, सुव्यवस्था राखण्यात महत्व व हा विचार त्यांनी केला. शासनाचे कार्यक्षेत्र काय असावे, हा उदारमतवादी विचारांमध्ये चर्चिला गेलेला एक महत्त्वाचा मुद्दा. प्राण्यांचे याबाबतीतील विचार इंग्लंडमधील उदारमतवादयापेक्षा कसे वेगळे होते, हे रानड्यांनी दाखवून दिले होते. याबाबतीत जर्मनीमधील ऐतिहासिक चिकित्सा पद्धतीचा त्यांनी कसा उपयोग केला व त्यामुळे उदारमतवादी तत्वज्ञानात रानड्यांनी कसे फेरफार केले, हे सरदारांनी आपल्या विवेचनात स्पष्ट केले आहे.
यासंदर्भात जॉन स्टुअर्ट मिल यांचे विचार राज्याने हस्तक्षेप करावा याच बाजूचे कसे होते, याचाही उल्लेख त्यांनी केला आहे. प्राण्यांच्या वर जॉन स्टुअर्ट मिल याचा परिणाम झाला होता हे सरदारांनी दर्शविले आहे; पण प्रातिनिधिक शासनव्यवस्था, स्थानिक स्वराज्य संस्था किंवा नेमस्तपणा यावरील मिलच्या विचाराचा राणेंवर कसा परिणाम झाला होता हे सरदारांनी सांगितलेले नाही.
आपल्या या पुस्तकात सरदारांनी पाश्चात्त्य विचारवंतांची रानडे यांच्या विचारांचे साम्य दर्शविले आहे. त्यासाठी त्यांनी मिल, लोक इत्यादी लेखकांच्या पुस्तकातील दाखले दिलेले आहेत. त्यामुळे या सर्व विवेचनास एक प्रकारचे वजन प्राप्त झाले आहे.
रानडे यांच्या तत्वज्ञानाचे तिसरे वैशिष्ट्य म्हणजे नेमस्त पणा. सरदारांनी हा मुद्दा आपल्या पुस्तकांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मांडला आहे. या मुद्द्याच्या निरनिराळ्या बाजू दोन तीन प्रकरणांमधून आल्या आहेत. प्रकरण चार मध्ये 'सामाजिक सुधारणेचे विविध मार्ग' या विषयाचे विवेचन करताना कोणते मार्ग रानड्यांना पसंत होते, हे सांगितले आहे. या सर्वांचा गर्भितार्थ नेमस्त पद्धत त्यांना मान्य होती असाच होतो. सहाव्या प्रकरणात नेमस्तपणाबद्दलची चर्चा आहे त्यानंतर रानड्यांच्या राष्ट्रीय दृष्टीबद्दल चा मुद्दा येतो व नंतर ' समाजजीवनाचे सातत्य व परिवर्तन' आणि ' पुनरुज्जीवन, परिवर्तन व क्रांती' हा भाग येतो. यातील 'राष्ट्रीय दृष्टी' बद्दलची चर्चा मध्येच न आणता या चर्चेनंतर येणारा पुढील भाग नेमस्तपणाच्या चर्चेला जोडला आला असता. 'कायदा विरोधकांचे आक्षेप आणि त्यांचे निराकरण' (३) हा भाग व पृष्ठ 105 वरील नेमस्तपणाबद्दलची चर्चा या सर्व ठिकाणी रानडे यांनी नेमस्त मार्गाचा अवलंब केला होता, या एकाच मुद्याचे विवेचन येते. ते सहाव्या प्रकरणातील नेमस्त पणाच्या चर्चला जोडता आले असते. यासंदर्भात सरदारांनी असे प्रतिपादन केले आहे की, रानड्यांच्यावर एडमंड बर्क इंग्रज तत्वज्ञाच्या विचाराचा परिणाम झालेला होता. परंपरेचा अभिमान, नेमस्त वृत्ती, क्रांतिकारक मार्गाला विरोध, हळूहळू होणारी प्रगती या तत्वांवर बर्क रानडे यांचे एकमत होते, किंबहुना रानड्यांनी ही तत्वे बर्क डून स्वीकारली होती. यासंदर्भात, धर्मनिष्ठा, परंपराभिमान, सामाजिक जीवनाच्या सातत्याचा आग्रह, नेमस्तपणा व समन्वयशीलता याबाबतीत रानडे बाबतीत यांच्या भूमिकेचे बर्क यांच्या विचारसरणीशी बरेच साम्य आहे. हे सरदारांचे विवेचक विधान लक्षणीय आहे. आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ त्यांनी बर्क याच्या ' रिफ्लेक्शन्स ओन दि रेव्होल्यूशन इन फ्रान्स' या पुस्तकातील संदर्भ दिलेले आहेत.
महादेव गोविंद रानडे यांच्या तत्वज्ञानाची व कार्याची तुलना त्यांच्या समकालीन समाजसुधारकांशी होणे क्रमप्राप्तच आहे. त्यादृष्टीने सरदारांनी रानडे आणि आगरकर, महात्मा फुले, तेलंग, भांडारकर इत्यादी सुधारक यांच्या तत्वप्रणाली व कार्यपद्धती यामधील साम्य व विरोध यांचा आपल्या पुस्तकात विचार केलेला आहे. पण तो मुद्द्यांच्या संदर्भामध्ये आणि चर्चेच्या ओघात केलेला आहे. त्यासाठी वेगळे प्रकरण खर्ची घातलेले नाही. रानडे व आगरकर यांच्यातील महत्त्वाचा फरक परंपरेकडे पाहण्याच्या दृष्टिकोनबद्दलचा आहे असे सरदार यांनी सांगितले आहे. परंपरेवर आगरकरांनी घणाघाती आघात केला. मात्र रानडे म्हणत की, आपला वारसा आपण जपला पाहिजे, महात्मा फुले संघर्षवादी होते, याउलट रानडे समन्वयवादी होते, याची समर्पक कारणमीमांसा सरदारांनी दिलेली आहे. त्यांच्यामध्ये फुले शूद्रातिशूद्रच्या बाजूने उभे ठाकले. त्यामुळे त्यांच्या कार्यात व विचारात संघर्षाची प्रेरणा प्रबळ होती. न्यायमूर्ती रानडे यांचा अनुयायी वर्ग उच्चवर्णीय होता. त्याचप्रमाणे सनातनी पक्षाचे लोकही उच्चवर्णीय होते. या कारणाने त्यांच्यातील मतभेद फार विकोपाला गेले नाहीत. संघर्षाचा मार्ग अनुसरण्याऐवजी सुधारकांनी समन्वयाचा संथ मार्ग अवलंबिला.
अशा रितीने रानडे आणि त्यांचे समकालीन इतर समाज सुधारक यांच्या विचारातील फरकांचे विश्लेषण सरदारांनी केले आहे. असे विश्लेषण करीत असतानाच त्यांनी रानड्यांच्या मर्यादा दर्शविल्या आहेत. सरदारांच्या मते रानड्यांनी धार्मिक कल्पनांवर व रुढींवर परखड टीका केली नाही. सुधारणेसाठी धर्मग्रंथांचा आधार घेतल्याने त्यांचे प्रामाण्य टिकून धरले जाते; आणि ते सुधारण्याच्या पुढील टप्प्यावर बाधक ठरते. त्याचप्रमाणे रानडे हे या मध्यम वर्गाचे प्रतिनिधी होते, तोच एक प्रकारे दुबळा होता. या वर्गाच्या हितसंबंधांच्या मर्यादा उदारमतवादी चळवळीला, म्हणजेच रानड्यांच्या कार्याला पडल्या. रानड्यांनी जरूरीपेक्षा जास्त सावधपणा बाळगला, त्यामुळे त्यांच्या चळवळीत इर्षा व अभिनिवेश निर्माण झाला नाही. त्यांचा नेमस्तपणा त्यांच्या चळवळीच्या आला असे म्हणावे लागते.
अशा तऱ्हेने प्रा.सरदार यांनी आपल्या या पुस्तकात रानडे यांच्या विचारांचे उदारमतवादी स्वरूप स्पष्ट करून रानडे यांच्यावर पाश्चिमात्य विचारवंतांचा कसा प्रभाव पडला होता आणि रानड्यांनी उदारमतवादी तत्वज्ञान भारतीय परिस्थितीस कसे लागू केले, ते सांगितले आहे. त्याचप्रमाणे रानड्यांच्या व इतर समाजसुधारकांच्या विचारातील फरक दर्शवून रानड्यांच्या उदारमतवादाच्या कोणत्या मर्यादा होत्या हेही ही स्पष्ट केले आहे.
म्हणूनच न्यायमूर्ती रानडे यांच्या विचाराचा आणि कार्याचा अभ्यास करणाऱ्या पुस्तकांमध्ये गं.बा. सरदार यांचे हे पुस्तक उठून दिसते.
-----------------------------------------------------
साहित्य समालोचन () मध्ये प्रकाशित