समतेचा लढा व मध्यम वर्गाची संस्कृती :


आगामी पंचवीसं वर्षांत समतेच्या लढ्यापुढील आव्हान व त्याला तोंड  देण्यासाठी करावयाच्या संघर्षाचे स्वरूप स्पष्ट करण्यापूर्वी समाजवाद व समता हे जे समीकरण आपल्याकडे रूढ झाले आहे, त्याची मर्यादा नोंदली गेली पाहिजे.

बंधु भाव

समाजवाद म्हणजे जणू काही फक्त समतावाद असेच गृहीत धरले जाते... समाजवादाचा प्राण आहे बंधुता. समता प्रस्थापित होणे ही बंधुभाव निर्माण होण्यासाठी आवश्यक अट आहे. समाजवाद म्हणजे समता. असे म्हटल्याने एका अर्थाने आपण उदारमतवादी व व्यक्तिवादी चौकटीत जातो. प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र आहे व सर्व व्यक्ती समान आहेत हे उदारंमतवादाचे तत्त्वज्ञान झाले. 'समाज 'वाद हा 'व्यक्ति'वादाला छेद देण्यासाठी जन्मलेला विचार आहे. उदारमतवादाला पर्याय म्हणून निर्माण झालेला आहे. उदारमतवाद हा भांडवलशाहीचा तात्त्विक आधार म्हणून पुढे आला. समाजवादाला भांडवलशाही नष्ट करून समाजवादी समाज आणायचा आहे, त्याने उदारमतवादी मूल्यांच्या चौकटीची मर्यादा ओलांडलीच पाहिजे. समाजवाद सामूहिकतेचे तत्त्वज्ञान आहे. त्याला व्यक्तिवादी दृष्टिकोन अमान्य आहे. त्याला सार्वजनिकतेकडे, समुदायांकडे, सामूहिकतेकडे, एकोपा व सहजीवनाकडे वाटचाल करायची आहे. व्यक्तिवादी उदारमतवाद व्यक्तीला समाजापासून तोडतो. त्याला स्वयंभू व स्वतंत्र अस्तित्व देतो व स्वार्थवादाला प्रोत्साहन देतो. व्यक्तिवादी उदारमतवादी, जो स्वातंत्र्य व समता या तत्त्वांना मानतो, तो व्यक्तीच्या हितास प्राधान्य देतो व व्यक्तीला. इतरांपासून अलग. करतो व स्वतःचा रस्ता आखायला प्रवृत्त करतो. प्रत्येकाने स्वार्थ पाहणे हेच त्यांचे तत्त्वज्ञान आहे. 'प्रत्येकाने आपापला हितसंबंध जपला तर समाजाचे आपोआप भले होईल' असे उदारमतवादाचे मूलभूत मूल्य आहे. समाजवादाला यातठे काहीच मान्य नाही. एवढेच नव्हे तर, नेमके या सर्व विचाराच्या आणि हा विचार ज्या परिस्थितीमुळे जन्म घेतो त्या परिस्थितीच्या विरोधात समाजवादाला निर्णायक कृती करायची आहे. परिवर्तन जे समाजवादाला अपेक्षित आहे ते हेच. समाजवाद हे उच्चतम तत्त्वज्ञान आहे. त्याला स्वातंत्र्य व समता या जोडीच्या पुढे जायचे आहे. बंधुभाव निर्माण करायचे उद्दिष्ट पुढे ठेवणारी विचारप्रणाली म्हणजे समाजवाद. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी उदारमतवादी विचाराची व त्यातील स्वातंत्र्य समता या तत्त्वांची मर्यादा जाणूनच बहुधा बंधुभावाला उद्दिष्ट मानणाऱ्या बौद्धधर्माचा स्वीकार केला असे म्हणता येईल. समाजवादात सामूहिकरीत्या केठेले उत्पादन व त्याचे सर्वांनी केलेले आपापसातले वाटप हे अगदी सुरुवातीपासून अभिप्रेत आहे. कम्युन ही रचना या विचारातूनच जन्म पावलेली आहे. सहकार्य व सहजीवन, सामूहिकता, जोडलेपण यांची स्थापना होऊन प्रत्येकजण जेव्हा स्वतःचे माणूसपण शोधायला लागतो, त्याला इतरांशी असलेल्या आंतरिक नात्याचा प्रत्यय यायला लागतो, तेव्हा व्यक्तिवाद नष्ट होऊन 'समाज'वादाचा प्रारंभ होतो. हे खरेच आहे कौ सामूहिकता व परस्परसहकार्यावर आंधारित व्यवस्था प्रत्यक्षात अवतरण्यासाठी, बंधुभावावर आधारलेल्या समाजरचतेची स्थापना होण्यासाठी सामाजिक व आर्थिक समता निर्माण व्हावीच लागेल. मैत्रीभाव . किंवा कॉंम्रेडशिपची सुरवात समतेपासून होते. समता स्थापन झाली तरच समाजघटकांमध्ये परस्परसंवाद होऊ शकतो. परस्परसंवादासाठी किंवा संवाद करण्याची क्षमता निर्माण होण्यासाठी समाजघटकांमध्ये किमान समता स्थापन व्हावी लागते. मैत्रीभावासाठीही समतेची पूर्व अट आहेच. विषमतेने ग्रस्त असलेल्या समाजात बंधुभाव निर्माण होण्याची शक्यता नसते. सर्वांच्या किमान गरजा भागणे, सर्वांना सुखसोयी प्राप्त होणे यासाठी समानता- समान वाटप-- याची आवश्यकता तर अंसंतेच, पण त्याचबरोबर बंधुतेचा उदय होण्यासाठी या समतेचा आधार लागतो.

नवा मध्यम वर्ग
बंधुभाव निर्माण करण्यासाठी समतेचा आधार घ्यायचा म्हटले तर आज आपल्या समाजात दीर्घकाळ संघर्ष करावा लागेल. फार पुढचा विचार न करता फक्त येत्या पंचवीस वर्षांचे चित्र उभे करायचे ठरविले तर समाजवादापुढील सर्वात मोठे आव्हान “नवा मध्यमवर्ग! हे असेल. गेल्या दोन दशकांत, सामान्यतः आठव्या दशकाच्या मध्यापासून, आपल्या देशाने जे नवे आर्थिक धोरण आखले व त्यातून जे उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरणाचे प्रवाह निर्माण झाले त्याचा एक परिणाम म्हणजे नव्या मध्यमवर्गाचा उदय. पूर्वीच्या मध्यम वर्गाचे लोकसंख्येतील प्रमाण फार छोटे होते. तो खराच मध्यमवर्गीय किंवा कनिष्ठ मध्यमवर्गीय होता. त्याच्याकडे फारशी सुबत्ता आली नव्हती. त्याचे व वरिष्ठ वर्गाचे संबंध ताणतणावाचे होते. तो वरिष्ठ जातींपुरता व मोठ्या शहरांपुरता मुख्यतः मर्यादित होता. तो बचत करणारा पापभीरू समाजघटक होता. त्याच्या आधीच्या पिढीने राष्ट्रवादी व त्याच्या पोटातील इतर चळवळी अनुभवल्या होत्या. स्वातंत्र्योत्तर काळात विकासाचा व नियोजनाचा जो प्रयोग सुरू झाला होता त्याकडे तो आशेने बघत होता. त्याला पाठिंबा देत होता. त्यातील विषमतावादी हिंदुत्ववादी गटांची ताकद व जोर फारच कमी होता. राजकारणापासून हा 'मध्यमवर्ग फारच दूर असे. कमी वस्तूवर गुजराण करणारा, इतरांच्या : प्रगतीकडे पाहत बोटे मोडणारा तो वर्ग होता. नवा मध्यम वर्ग संख्येने फारच .- मोठा आहे. वेगवेगळे अंदाज करण्यात आलेले आहेत, तसेच सर्वेक्षणेही झालेली आहेत. त्यातून असे दिसते की या वर्गाची संख्या २० ते २५ कोटीच्या घरात गेली आहे. तो छोट्या शहरांत व गावांतही आढळतो. मोठ्या शहरांत त्याचे प्रमाण फुगले आहे. तो सर्व जातींत वाढत चालला आहे, मागास जातींचे या वर्गातील प्रमाण चाळीस टक््क्यांहूनही जास्त झाले आहे, असे सेंटर फॉर स्टडीज ऑफ डेव्हलपिंग सोसायटीजच्या देशपातळीवरील एका सर्वेक्षणात आढळले आहे. नव्या मध्यम वर्गाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची सुबत्ता. त्याच्या खिशात पैसा खुळखुळतो आहे. तो पूर्वीच्या मध्यम वर्गासारखा बचत न करता पैसे खर्च करतो आहे. वस्तू विकत घेतो आहे. पूर्वीचा वर्ग कर्ज घ्यायला 'घाबरायचा व कर्ज घेणे शक्यतो टाळायचा. नवा मध्यम वर्ग कर्ज घेतो, फेडतो, पुन्हा नवे कर्ज घेतो. एवढेच नव्हे तर, कर्ज घेण्यात मोठेपणा मानतो. ताठ मानेने कर्ज घेतो. पूर्वीच्या मध्यमवर्गात शेअर हा शब्द फक्त ऐकून माहीत होता, त्याचा नवा अवतार शेअर बाजारात रमतो शेअर घेतो, विकतो, त्याची चर्चा करतो, शेअरबाजाराला वाहिलेली वृत्तपत्रे वाचतो.

हा वर्ग समतेच्या चळवळीपुढील सर्वात मोठा अडथळा बनलेला आहे. येत्या पंचवीस वर्षात समतावादाला विरोध करण्यात पुढाकार घेणारा कोणता समाजघटक असेल तर हा नवा मध्यम वर्ग आहे. हा वर्ग पूर्वीच्या त्याच्या पिढीसारखा राजकारणाला बिचकून राहणारा नाही. तो  र्र  अर्थकारणात पुढे गेलाच आहे पण, किंवा त्यामुळेच, राजकारणातही पुढे.  जाऊ इच्छितो. तो विषमतावादी आहे. तो. समतावादाची- समाजवादाची - आदर्श समाजाच्या कल्पनेची रेवडी उडवितो. त्याला या सर्व कल्पना जुनाट, गुळगुळीत झालेल्या व टाकाऊ वाटतात. तो प्रत्येकाने काहीही करून पैसा मिळवावा, स्वतःच्या पायावर उभे रहावे, स्पर्धेत उतरावे, प्रतिस्पर्ध्याला मागे टाकावे, लांड्यालबाड्या अशा काही नसतात, या गोष्टी करणे योग्यच आहे, असे मानणारा आहे. त्याला दारिद्याची घृणा वाटते. त्यापासून तो दूर राहू इच्छितो. त्याला गरिबांनी कष्ट करावेत व पैसे मिळवावेत असे वाटते. समाजात विषमता असणारच. जे बलिष्ठ ते पुढे सटकणार, जे कमकुवत ते मागे पडणार, हा सृष्टीचाच नियम आहे, त्याला आम्ही काम करणार, आम्ही आज या श्रीमंतीत लोळतोय कारण आम्ही बलिष्ठ आहोत, आम्ही बऱ्याच करामती केल्या आहेत, तुम्ही करा, असे तो उघडउघड म्हणतो. प्रसंगी हिंसेचा वापर करण्यास हा वर्ग मागेपुढे पहात. नाही. खरे तर भ्रष्ट भांडवलशाहीने निर्माण केलेल्या हिंसक संस्कृतीचा नवा मध्यमवर्ग पाईक आहे. तो इतरांना स्वतःचे स्पर्धक मानतो, त्यांना हरविण्याची भाषा करतो. वेळ पडल्यास भाडोत्री मारेकरी वापरतो. गांधीजींचे विचार आणि बाबासाहेबांचे तत्त्वज्ञान त्याला झूट वाटते. त्याला खोट्या अभिमानाने घेरले आहे व पोकळ राष्ट्रवादाने भारले आहे. तो युद्धखोर झाला आहे. स्पर्धात्मक अर्थव्यवस्थेतून येणारी अस्वस्थता व सततचे असमाधान त्याला हिंसावादी हिंदुत्वाकडे किंवा मूलतत्त्ववादाकडे घेऊन जाते. हव्यासापोटी तो अतिरेकी विचाराच्या आहारी जातो. परधर्मीयांची कत्तठ करणे त्याला योग्य वाटते. त्याच्यातील धार्मिकता नष्ट होऊन तो धर्मांधतेच्या विळख्यात सापडतो. तो स्वभावाने सआक्रमक बनतो. त्याचे 'खरे-खोटे' याचे भान सुटते. तो खर्याचे खोटे व खोट्याचे खरे करणे यातच अभिमान बाळगायला लागतो. सर्वांचा वापर साधन म्हणून करावा हे त्याचे तत्त्वज्ञान बनते. समाजातील शांतता व सुव्यवस्था, सार्वजनिक सुखसोयी व लोकांचे काबाडकष्ट यांचा फायदा घेऊन हा गब्बर होतो व नंतर मात्र राज्यसंस्थेच्या नावाने बोटे मोडतो. खाजगीकरणाचे गोडवे गायला लागतो. सरकारने उड्डाणपूल, रुंद रस्ते, वातानुकूलित आगगाड्या व मोठमोठे विमानतळ यांसारख्या गोष्टी उपलब्ध करून द्याव्यात, पेट्रोलचे भाव कमी करावेत, आयकराचा दर कमी करावा, विक्रीकर कमी करावा, कारखान्यांना जमीन, पाणी, वीज स्वस्तात द्यावी, परंतु कल्याणकारी योजना बंद कराव्यात, राखीव जागांचे स्तोम माजविणे बंद करावे, सरकारी पैशावर गरिबांचे लाड करणे थांबवावे, सरकारने गरिबांच्या शिक्षणामधून तसेच त्यांना आरोग्याच्या सोयी देण्यामधून काढता पाय घ्यावा असे एकूण या वर्गाचे मत आहे.
नव्या मध्यमवर्गाला सामाजिक व सीमान्त घटकांच्या आंदोलनाबद्दल मनस्वी राग आहे. आदिवासी, कामगार, दलित, भूमिहीन, विस्थापित, हमाल, कष्टकरी यांच्या चळवळीबद्दह तिटकारा आहे. याच वर्गाचे नियंत्रण प्रसारमाध्यमांवर आहे, वृत्तपत्रे, नियतकालिके व दूरदर्शन वाहिन्या चालविण्याचा मक्ता या वर्गाकडे आहे. चित्रपट व नाटक, तसेच इतर करमणुकीची साधनेही याच वर्गाच्या ताब्यात आहेत. या सर्व माध्यमांमधून हा वर्ग एक काळजी घेतो आहे, ती म्हणजे जनसामान्यांच्या आंदोलनांच्या - बातम्या लोकांपर्यंत पोहोचणार नाहीत, पोहोचल्याच तर त्या विपर्यस्त स्वरूपात पोहोचतील. बंद, रास्ता रोको, घेराओ, उपोषण, संप, मोर्चा, सत्याग्रहाचे सर्व मार्ग या वर्गाने मोडीत काढले आहेतं. हे आता फार झाले, बंद करा हे सर्व, असे त्याचे मत आहे. नाहीतर हा वर्ग त्याच्या दूरदर्शन संचाचे बटन बंद करतो. म्हणून आता आंदोलनांच्या बातम्या दूरदर्शन वाहिन्यांवर सर्वसाधारणपणे दाखवत नाहीत व दाखवल्या तर काहीतरी नकारात्मक परिणाम होईल असे त्याचे दर्शन दिले जाते. या वर्गाच्या भावना इतक्या बोधट झाल्या आहेत की, गुजराथमधील नरसंहारात त्याने चक्क नेतृत्व केले.

राजकारणावरची पकड

याच वर्गातून आपठे आजचे राजकोय नेतृत्व अभे राहिले आहे. देशाची धोरणे ठरविणारा राजकोय वर्ग नव्या मध्यमवर्गातूनच आलेला आहे असे नीट पाहिल्यास आपल्या ध्यानात येते. त्यामुळे या वर्गाचे हित पाहणारे धोरण सरकारकडून आखले जाते आहे. जेव्हा नव्या मध्यमवर्गाचा आकार वाढला, त्याच्याकडील संपत्ती वाढली, त्याचे वर्चस्व वाढले, त्याच्या हिंसक संस्कृतीचा प्रभाव निर्माण झाला, तेव्हा या वर्गाने राजकीय क्षेत्र पादाक्रांत केले. राज्यसंस्थेने माघार घ्यावी असे तत्त्वज्ञान सांगणाऱ्या या वर्गाने स्वतः मात्र राज्यसंस्थेकडून सर्व फायदे तर उपटलेच, पण या संस्थेचे काम करणाऱ्या सरकार व. नोकरशाहीत शिरकाव केला. राजकीय पक्षांवर आपली पकड बसवली. एका बाजूने प्रस्थापित राजकीय पक्षांवर जबरदस्त टीका करीत असताना स्वतः मात्र. भारतीय जनता पक्षामार्फत जनविरोधी धोरणांचा पाठपुरावा केला. राज्यसंस्थेच्या दमनकारी यंत्रणेचा वापर करून जनआंदोलनांना चिरडून टाकण्यात धन्यता मानली. भ्रष्टाचारी राजकीय नेत्यांवर तोंडसुख घेत असताना स्वतः मात्र भ्रष्टाचारी अर्थकारण व राजकारण केले. दुतोंडीपणा व निर्लज़पणा याचा कळस गाठला. विषमतावादी हिंसक संस्कृतीचे वर्चस्व निर्माण करून भारतीय राजकारणाला हीन पातळीवर नेऊन ठेवले.

धर्मही या वर्गाच्या तावडीतून सुटला नाही. त्याने धर्मालाही स्वतःच्या पातळीवर नेले. .त्याला भ्रष्ट केले. स्वतःच्या बाजारपेठीय खरेदी-विक्रीच्या गराड्यात खेचले. त्याला चक्क विकायला ठेवले. साधू-साध्वी- संत-महंत यांना काही ठिकाणी विक्रेते म्हणून नेमठे, तर काही ठिकाणी स्वतःच ते काम हाती घेतले. या धर्माच्या बाजारपेठेत परधर्मीयांना पराभूत केले. व जेव्हा त्यांनी पराभूत होण्यास नकार दिला तेव्हा त्यांना कापून काढले.

समतेच्या लढ्याचा मार्ग
विषमतावादी हिंसक संस्कृतीचा पुरस्कर्ता असणारा हा नवा मध्यम वर्ग या सर्व कारणांमुळे समतेच्या लढाईत सामील झालेल्यांचा म्हणूनच शत्रू बनला आहे. सत्याग्रही मार्गाने त्याचे मतपरिवर्तन कसे करायचे व ते जर जमले नाही तर त्याचा पराभव करून समाजवादाला पुढे कसे न्यायचे हा प्रश्न येत्य़ा पंचवीस वर्षांत सारखा आव्हान देणारा ठरणार आहे. अर्थकारणावर या वर्गाची पकड आहे, राजकारण यांच्या इशार््याप्रमाणे चालते आहे, माध्यमांवर याची पूर्ण पकड आहे, धर्मसंस्था त्यांच्या आहारी गेली आहे, समाजापुढे तो व त्याची विषमतावादी हिंसक संस्कृती आदर्श म्हणून उभे आहेत. अशा परिस्थितीत समतेचे आंदोलन पुढे रेटणे फारच जिकीरीचे व गुंतागुंतीचे झाठे आहे. अपयशांनी आपले नीतिधैर्य कमी होऊ न देता समतेची लढाई चालू कशी ठेवायची याचे उत्तर देणे फारच अवघड झाले आहे.

या लेखात मी या गुंतागुंतीच्या समस्येमधील काही बाबींचाच परामर्श घेणार आहे. पहिला मुद्दा आहे समतेच्या चळवळीतील होणारी वाढती सरमिसळ. या चळवळीत आणि बिगरशासकीय संघटना (४७७0) व स्वयंसेवी ' संघटना यांच्यात काही प्रमाणात सरमिसळ होताना दिसते आहे. चळवळीतील कार्यकर्ता सध्या एक बिगर-शासकीय संघटना स्वतः तरी काढतो,किंवा एखाद्या समविचारी संघटनेशी संधान जोडतो. चळवळीच्या धामधुमीत नसतो तेव्हा तो या संघटनेत स्वतःला गुंतवून घेतो. त्यामुळे बिगर-शासकौय संघटना व सामाजिक चळवळी यांच्यात सरमिसळ होऊ लागली आहे. पूर्वी चळवळीतील मंडळी अशा संघटनेपासून फटकून रहात असत, आता तसे कमी होते आहे. बिगर-शासकीय संघटना व स्वयंसेवी संस्था अलीकडे आंदोलनांचे प्रत्यक्ष- अप्रत्यक्षरीत्या संघटन करताना आढळतात. गुजराथ हत्याकांडानंतर या. संघटनांनी बर्यापैकी पुढाकार घेऊन मोर्चा काढला होता. साम्यवादी पक्ष पूर्वी या संघटनांवर आरोप करीत व त्यांच्या कार्याला 'जैसे थे वादी' म्हणत. आज हे पक्ष तितका विरोध करताना दृष्टीस पडत नाहीत. त्यांची बिगर-शासकोय संघटनांबद्ददची भूमिका मवाळ झाली आहे. जातींचे संघटन करणारे व वर्गीय लढे लढणारे यांच्यात फार दंद असे, तसे ते राहिलेले नाही. काही प्रमाणात का होईना, ते कमी झाले आहे. डावे नेते व बहुजनवादी नेते एकत्र येतात व एकत्र कृती करतात. खाजगीकरणाने संघटित कामगारांच्या चळवळीची वाताहत झाली आहे, त्यामुळे त्यांचा असंघटितांच्या लढ्याशी सांधा जुळला जातो आहे. जागतिकीकरणाच्या शेतीविरोधी धोरणाची झळ बसलेला शेतकरी समतेच्या . व्यापक लढ्यात येण्यास तयार होऊ शकेल असे ' वाटते. पर्यायी विकासनीतीवरील एकमतामुळे पर्यावरणवादी व जनआंदोलने यांच्यात जवळीक स्थापन झाली आहे. स्त्रीपर्यावरणवादाच्या मांडणीमुळे स्त्रीवाद व पर्यावरणवाद यांच्यात समान धागा दिसू लागला आहे. हिंदुत्ववाद्यांच्या हिंसेला बळी पडणाऱ्या गरीब मुसल्मानांचाही, जर व्यापक राजकीय कृती होत असेल तंर, त्यात सामील होण्यास विरोध असण्याचे कारण दिसत नाही. विस्थापनामुळे व जंगलांवरील इतर घटकांच्या आक्रमणामुळे गांजलेल्या आदिवासींना दे शातील राजकोय व आर्थिक बनाव नकोसा वाटू लागला आहे. ते काही प्रसंगी जनआंदोलनांबरोबर जातानाही दिसतात.

जर अशी सरमिसळ होते आहे तर त्यातून या सर्व घटकांमध्ये, त्यांच्या आंदोलनांमध्ये एकोपा निर्माण होऊन एक व्यापक चळेवळ उभी राहणे हे वाटते तितके अवघड असू नये. हैदराबादला मध्यंतरी 'जागतिक सामाजिक व्यासपीठ' या नावाने जो व्यापक मेळावा भरला होता ते या एकोप्याचे चांगले उदाहरण मानता येईल. या व्यासपीठावर बिगर-राजकीय संघटना, डावे पक्ष, काही नक्षलवादी गट, जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय व इतर स्वयंसेवी संघटना व संस्था यांनी एकीचे जे दर्शन घडविले ते आशादायक होते.  परंतु अशा प्रासंगिक यशामुळे शत्रू वठणीवर येणार नाही. आणि तो सामाजिक चळवळी व जनआंदोलनांच्या रेट्यामुळे फार मागे हटेल असे नव्हे त्यासाठी शत्रूचा पराभव राजकीय क्षेत्रात, तेही निवडणुकीच्या राजकारणात, करणे याला पर्याय नाही. येत्या पंचवीस वर्षातील समतेच्या आंदोलनापुढील सर्वात मोठे आव्हान हे आहे. संघपरिवार-भाजपविरोधी सामाजिक व राजकीय आघाडी उभी करण्याचे हे कार्य चळवळीतील लोकांना व बिगर भाजप पक्षांना करावे लागणार आहे. लोकसभेच्या १९९६ पासूनच्या निवडणुकांमधून भाजपने हळूहळू आपल्या जागा. वाढविल्या व जेव्हा त्याची मर्यादा लक्षात आठी तेव्हा आघाडीचे संघटन केले. त्यामुळे समतावादी चळवळीत अस्वस्थता निर्माण झाली. मध्यम वर्गाच्या विषमतावादी हिंसक संस्कृतीचे राजकारणात प्रतिनिधित्व करणारे हत्यार म्हणून भाजप पुढे आला आहे. त्यामुळे भाजपचा पराभव करणे ही समतावादाला पुढे नेण्याची प्राथमिक अट बनली आहे. याचा अर्थ विषमतावादी हिंसक संस्कृती इतर पक्षांत आढळत नाही असे नव्हे. इतर पक्षांतही या संस्कृतीचे पुरस्कर्ते आहेतच. पण भाजप हा या संस्कृतीचा मुकुटमणी आहे, ही संस्कृती हा भाजपचा प्राण आहे, संघपरिवाराचा जीव आहे. म्हणून सामाजिक चळवळी व बिगर-भाजप पक्षांनी मिळून या परिवाराविरुद्ध व पक्षाविरुद्ध आघाडी उभी केली पाहिजे. हे करताना त्यांना सामाजिक व राजकीय हे आग्रह सोडून द्यावे लागतील आणि एकत्रित काम करण्याची तयारी  करावी लागेल. भाजपविरोधी पक्षांनी एकत्र येण्याची सुरुवात करताना ' तिसरी शक्ती' नावाचे पिल्लू दूर जंगलात सोडून यावे. कारण या आघाडीत काँग्रेसला महत्त्वाची भूमिका बजावावी लागणार आहे. सर्वात मोठा विरोधी पक्ष व अनेक घटक राज्यांतील सत्ताधारी पक्ष म्हणून त्याच्यावर ही जबाबदारी आहे. त्याने थोडे नमते घेऊन, मोठ्या मनाने काळाची गरज ओळखून इतिहासदत्त कामगिरी बजावावी व इतरांनी त्याला सहाय्य करावे. आता हे खरे आहे की काँग्रेसची धोरणे जागतिकीकरणास पोषकच होती व त्यातील काही नेते मवाळ हिंदू भूमिका घेताना दिसतात. पण भाजपचा पराभव करणे ही गोष्ट प्राधान्याने करणे गरजेचे आहे. एकदा का भाजपची स्वत:च्या ताकदीवर केंद्रात पुन्हा सत्ता आली तर समतेच्या चळवळीचे काही खरे नाही. काँग्रेसशी सहकार्य करण्यास सध्या नकार देणाऱ्यांनी विरोधी पक्षांनी जनसंघ व नंतर भाजपाचे कसे सहकार्य घेतले होते याची आठवण ठेवावी. काँग्रेसच्या सर्व मर्यादा लक्षात घेऊन हे सांगावेच लागेल की काँग्रेस व भाजपमध्ये मूलभूत फरक आहे. भाजप हा आधी म्हटल्याप्रमाणे विषमतावादी हिंसक संस्कृतीचा प्राण आहे. म्हणून त्याला पराभूत करणे व त्यासाठी काँग्रेसचे सहकार्य घेणे हे समतावादाला पुढे नेण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. येत्या पंचवीस वर्षात आपल्या देशातील समतावादी चळवळ व समाजवादी चळवळ पुढे जायची असेल तर सर्व सामाजिक चळवळी व सर्व बिगर-भाजप पक्षांनी एकत्र येऊन भाजपचा निवडणुकीत पराभव करणे याला पर्याय नाही. त्यासाठी कोणतेही समझोते केले व देवाणघेवाण केली तरी ती क्षम्य ठरेळ. हे करताना सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांनी एकदिलाने त्यात भाग घेतला पाहिजे. म्हणजेच सामाजिक कार्यकर्त्यांना 'आमचा निवडणुकीशी संबंध .नाही' असा आग्रह सोडावा लागेल व राजकीय नेत्यांना सामाजिक चळवळीतील मुद्दे पुढे रेटावे लागतील.

 

 

--------------------------------------------------
आव्हानांशी संघर्ष आणि परिवर्तनाची दिशा  ( ) मध्ये प्रकाशित