विचारप्रणाली :


विचारप्रणालीचा उगम

निसर्गाशी संबंध प्रस्थापित करून मानव आपल्या भौतिक अस्तित्त्वाची साधने निर्माण करतो. या प्रक्रियेतून जसे निसर्गाचे परिवर्तन होते, तसे मानवाचे स्वत:चेही परिवर्तन होते. मानवाचे संपूर्ण अस्तित्वच या व्यवहारातून घडते. भौतिक साधनांबरोबरच मानवाचे सामाजिक जीवनही या व्यवहारातून निर्माण होते. हे भौतिक व सामाजिक जीवन एकमेकांपासून अलग करता येत नाही. विशिष्ट सामाजिक संबंधांच्या चौकटीतच भौतिक जीवनाची निर्मिती होत असते. या सामाजिक संबंधांच्या चौकटीत मानवी व्यवहार चालू असतो आणि उत्पादनाचे तेच संबंध मानव पुनःपुन्हा निर्माण करतो. हे संबंध परस्पर विरुद्ध हितसंबंधांवर आधारलेले असतात; कारण, मानवी व्यवहाराच्या इतिहासाच्या ओघामध्ये, खाजगी मालमत्ता व श्रमविभागणीचा उदय होतो. श्रम विभागणीची परिणती, सामाजिक वर्ग निर्माण होण्यात होते. समाजाचे विभाजन परस्परविरुद्ध हितसंबंध असलेल्या वर्गामध्ये होते; शिवाय उत्पादकशक्‍्तींच्या मर्यादांमुळे, केवळ मूठभर लोकांच्याच (प्रबळ वर्ग) गरजा भागू शकतात (उत्पादन साधनांची मालकी असलेल्या वर्गांच्या गरजा भागतात) व बहुसंख्य लोकांना वंचित राहावे लागते. त्यामुळे श्रमविभागणीतून अटळपणे अंतर्विरोधी वर्गच तयार होतात व त्यातील प्रबळ वर्गाचे वर्चस्व प्रस्थापित होते. 


अशा प्रकारे, श्रमविभागणीमुळे व उत्पादनशक्तीच्या मर्यादांमुळे सामाजिक वास्तव अंतर्विरोधी बनते व ते मानवाच्या नियंत्रणाबाहेर जाते. आपल्या व्यवहारात. मानवास हे अंतर्विरोध सोडविता येत नाहीत. म्हणून तो ते जाणिवेच्या पातळीवर विचारप्रणालीच्या रूपात मांडतो. प्रत्यक्ष व्यवहारात, ज्या अंतर्विरोधवर मात करता येत नाहीं, त्यांची मनामध्ये केलेली सोडवणूक म्हणजे विचारप्रणाली. विचारप्रणाली म्हणजे व्यावहारिक दुर्बलतेचे जाणिवेच्या पातळी वरील रूप. प्रत्यक्ष व्यवहारात ज्यांच्यावर मात करता येत नाही अशा अंतर्विरोधांवर जाणिवेच्या पातळीवर मात करण्याचा प्रयत्न करताना, विचारप्रणाली ते अंतर्विरोध नाकारते आणि लपविते. अशा प्रकारे विचारप्रणालीचे मूळ मार्क्सच्या मते मानवी उत्पादनव्यवहारात सापडते. हा व्यवहार मयादित असतो. तो अंतर्विरोधी संबंध व त्याचा परिणाम म्हणून त्याची विपर्यस्त मांडणी निर्माण करतो म्हणजेच, विचारप्रणालींचा उगम मानवी उत्पादनव्यवहाराच्या विशिष्ट स्वरूपामुळे होतो. या व्यवहारातून अंतर्विरोधी सामाजिक संबंध व विचारप्रणाली या दोहोंचा उगम होतो.

 

विचारप्रणालीचे स्वरूप :

मानवी उत्पादनव्यवहार, प्रबळ वर्गाचे वर्चस्व असलेल्या परिस्थितीत चाललेला असतो.. त्यामुळे, अंतर्विरोध जेव्हा विचारप्रणालींच्या स्वरूपात  दडविले. जातात, तेव्हा या प्रबळ वर्गाचे हितसंबंध सांभाळले. जातात. विचारप्रणालीचा उदय श्रमविभागणी व अंतर्विरोधी वर्ग निर्माण करणाऱ्या मानवी व्यवहारातून होतो हे खरे आहे, पण त्याचबरोबर हेही लक्षात घेतले पाहिजे की, प्रबळ वर्गाचे वर्चस्व चालू राहण्यासाठी  विचार प्रणालीची आवश्यकता असते. वर्गीय विभागणी झालेल्या समाजास लोकांकडुन अधिमान्यता मिळवावी लागते. मानवाकडे व समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सामाजिक मूल्ये, यांवर सर्वांची सहमती मिळवावी लागते, मूल्यांबाबतचे ऐक्य असे असावे लागते की, ज्यायोगे प्रवळ वर्गाच्या अस्तित्वास धक्का पोहोचणार नाही. सर्वे लोकांना मान्य असलेला, तरीही प्रवळ वर्गाच्या बाजूस पद्धतशीर पणे झुकलेला मूल्यांचा संच, या समाजासाठी आवश्यक असतो. दुसर्‍या शब्दांत सांगायचे, तर त्यास विचारप्रणालीची गरज असते. वर्गांमधील संबंधांचे खरे स्वरूप लपवून ठेवून, म्हणजेच वर्चस्व व गोणत्वाचे संबंध लपवून ठेवून विचार प्रणाली वर्गव्यवस्था कायम राखण्यास मदत करते. विचारप्रणालीमळे सामाजिक संबंध ऐक्यावर आधारित आहेत असे भासते व लोक आपला नेहमीचा व्यवहार चालू ठेवतात. या अर्थाने, विचारप्रणाली वर्गीय रचनेस व एकंदरीत समाजरचनेस अधिमान्यता मिळवून देते. ही रचना चालू राहण्यासाठी, विचार प्रणालीचे अस्तित्व अपरिहार्य बनते. आणि. याच कारणांमळे विचारप्रणाली प्रबळ वर्गाच्या हितसंबंधांची जपणूक करते. व समाज त्या वर्गाचे वर्चस्व स्वीकारून, त्यात बदल करता येणार नाही असे मानतो. 

अंतर्विरोध लपवून ठेवून, प्रबळ वर्ग हा वर्ग नसून सर्व समाजाचा प्रतिनिधी आहे, असा भास विचारप्रणाली निर्माण करते. भांडवलशाही समाजात वर्गावर्गातील फरक नाकारले जातात व॑ स्वातंत्र्य व समतेचे विश्‍व जाणिवेच्या पातळीवर रचले जाते. तर भांडवलशाहीपूर्वी समाजात वर्गांमधील फरकाचे समर्थन समाजातील उच्चनीच संकल्पनेवरून केले जाते. या दोन्ही समाजांत, विचारप्रणाली अंतर्विरोध नाकारते आणि प्रबळ वर्गाच्या वर्चस्वास अधिमान्यता मिळवून देते. म्हणून मार्कसच्या मते, विपर्यस्त जाणीव म्हणून विचारप्रणालीस विशिष्ट नकारात्मक अर्थ आहे. त्याची दोन परस्परसंबंधित वैशिष्ट्ये आहेत.

(१) विचारप्रणालीमुळे सामाजिक अंतर्विरोध दडविला जातो. (२) विचारप्रणालीमुळे प्रबळ वर्गाचे हित साध्य होते.
विचारप्रणालीस समाजाचे अंतर्विरोधी स्वरूप दडवून ठेवून वर्गामधील कलह अंधुक व अस्पष्ट करावा लागतो. असे करण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. सर्वांना आपले हितसंबंध सारखेच आहेत व प्रस्थापित समाजरचनेतच सर्वांचे हित साधणार आहे असे भासवणे. दुसरा मार्ग म्हणजे प्रस्थापित समाजरचना नैसर्गिक आहे अशी मांडणी करणे. समाजरचना मानवी स्वभावाशी जुळणारी आहे आणि म्हणून ती नैसर्गिक आहे, असे सांगितल्यामुळे पर्यायांची चर्चा होत नाही व समाजाचा पाया पक्का होतो.

प्रबळ वर्गाच्या अस्तित्वासाठी विशिष्ट परिस्थिती आवश्यक असते. उदाहरणार्थ, भांडवलशाही समाजाच्या अस्तित्वासाठी व्यक्‍्तीबरलची संकुचित संकल्पना आणि व्यक्‍तीची प्रतिष्ठा, स्वातंत्रय, समता, न्याय, हक्‍क, इत्यादींची यथायोग्य व्याख्या करणे जरुरीचे असते. जेव्हा या पद्धतीने विचार करणे मान्य होते व प्रत्येकजण स्वत:चे मूल्यमापन त्याच चौकटीत करू लागतो, तेव्हा भांडवलशाही समाजास अधिमान्यता मिळते व लोकांवरील भांडवलशाहीचा नैतिक व भौतिक पगडा पक्का होतो. जेव्हा लोकांच्या इच्छाआकांक्षांना भांडवलशाही स्वरूप येते, तेव्हा भांडवलशाही समाजास धक्का म्हणजे स्वतःसच धक्का, असे त्यांना वाटते. अशा तर्‍हेने जेव्हा भांडवलशाही विचारप्रणाली लोकांच्या मनात व हदयात खोलवर रुजते, तेव्हा तिचा नैतिक प्रभाव पूर्णत्वास पोहोचतो व भांडवलशाहीच्या अस्तित्वाची हमी मिळते. 
अशी विचारप्रणाली केवळ मूल्यकल्पनांचा संच म्हणून राहात नाही; तर ती सर्व सामाजिक संबंधांमध्ये झिरपते. आर्थिक, सामाजिक, राजकीय व इतर व्यवहार व संस्था यांना ती आकार देते. मालक व मजूर, शासनसंस्था व नागरिक, पालक व पाल्य, शिक्षक व विद्यार्थी इत्यादींचे परस्परसंबंध विचारप्रणाली ठरविते. सामाजिक व सार्वजनिक संवादाच्या व चर्चेच्या भाषेला ती आकार. देते. अशा तर्‍हेने विचारप्रणाली लोकांच्या जीवनाचा एक भाग बसते. केवळ मूल्यविचार न राहता ती जीवनाचा मार्ग, जीवनवृत्ती बनते.
त्यामुळे विचारप्रणाली म्हणजे पद्धतशीरपणे बेतलेला विचार असेलच असे नाही. विचारप्रणालीत वेगवेगळ्या प्रकारचे व वेगवेगळ्या पातळीवरील आणि  वेगवेगळे ऐतिहासिक संदर्भ असलेले विचार असू शकतात. लेखक, तत्त्वज्ञ, वृत्तत्रकार व प्रबळ वर्गातील इतर लोकांनी त्यामध्ये भर घातलेली असते. अर्थात या सर्वांत एक प्रकारची तार्किक संगती असते. हे सर्वे विचार प्रस्थापित सामाजिक व्यवस्थेचे समर्थन करीत असतात. वेगवेगळ्या प्रकारांत व शैलीत विचारप्रणाली व्यक्‍त होताना दिसते उदाहरणार्थ, भांडवलशाही समाजात ती नैसर्गिक हक्‍क, उपयुक्‍्ततावाद, चिद्वाद, इत्यादि पद्धतीने व्यक्त होते. परंतु यांच्यात वेगवेगळेपणा असूनही हे विचार काही समान गृहीतकृत्यांवर आधारलेले आहेत. ते सवे विचार भांडवलशाही विचारविश्वाच्या क्षितिजामध्ये बंदिस्त झालेले असल्यामुळे, भांडवलशाही विचार होतात. त्यांची भाषा व आशय जरी बदलत असला, तरी त्यांच्या सामाजिक जाणिवा एकच आहेत.

 

गाभा आणि बाहचरूप :

भांडवलशाहीमध्ये विचारप्रणाली बाहयरूपाचे महत्त्व वाढविते. त्यासं त्याच्या मूळ गाभ्यापासून अलग करते. वास्तवाच्या फक्त बाह्यरूपाचे महत्त्व वाढवून, विचारप्रणाली बाह्यरूपासं फसवे, स्वतंत्रे व स्वायत्त अस्तित्व देते. भांडवलशाहीमध्ये विचारप्रणाली उत्पादनपद्धतीला गूढ स्वरूप देऊन, खरेखुरे संबंध दिसणार  नाहीत याची काळजी कशी घेते, याचे सविस्तर वर्णन मार्क्सने केले आहे. मार्क्सच्या मते, गाभा आणि बाह्यरूप यांत भांडवलशांहीपूर्व समाजातही फरक होता. पण तो भांडवलशाही समाजाइतका अस्पष्ट नव्हता. उदाहरणार्थ, सरंजामशाहीत भूदास संरंजामदाराच्या जमिनीवर विशिष्ट काळापुरता काम करीत असे. आपण केव्हा स्वतःसाठी व केव्हा दुसऱ्यासाठी काम करतो, हे त्याला माहीत असायचे. म्हणजे या समाजात जास्त पारदर्शकपणा होता. भांडवलशाहीमध्ये सत्त्व व बाह्यरूप यांच्यात फारच तफावत किंवा फारकत झालेली असते. फसव्या बाह्यरूपामुळे, अंतर्गत वास्तव दिसेनासेच होते. भांडवलशाही उत्पादनपद्धतीमधील काही उदाहरणे घेऊन हे स्पष्ट करता येईल.

१) भांडवलशाही उत्पादन प्रक्रियेतून उपभोग्यवस्तूंचे उत्पादन होते. या श्रमा तून तयार झालेल्या वस्तूंमध्ये जेव्हा विनिमय होतो, तेव्हा त्यांच्याबद्दल चुकीची कल्पना केली जाते. उत्पादन आणि विनिमय या मानवी क्रियेमध्ये त्यांना विनाकारण महत्त्वाची भूमिका प्राप्त होते. खरे तर या वस्तूंचे मूल्य माणसाच्या श्रमातून निर्माण होत असते. पण मानव व त्याचे श्रम, अशा प्रकारे महत्त्वाचे असताना निर्जीव वस्तूंना महत्त्व प्राप्त होते. त्यांना मानवी गुण चिकटवले जातात. वस्तूवस्तूंमध्ये परस्पर संबंध असतात, असे वाटते. मूल्य जरी श्रमातून तयार होत असले व या. मूल्यातून अशा श्रमामध्ये गुंतलेल्या व्यक्तींचे संबंध प्रत्यक्षात व्यक्‍त :होत असले, तरी ते वस्तूवस्तूंमधील संबंध म्हणून प्रतीत होतात. माणसामाणसांमधील संबंध वस्त्‌ंमुळे प्रस्थापित होतो व वस्तूंमधील संबंध मात्र माणसाशिवाय प्रस्थापित होऊ शकतो असे वाटते. वस्तूचे विनिमयमूल्य पैशाच्या माध्यमातून व्यक्‍त होत. असल्यामुळे, श्रम करणाऱया लोकांचे संबंध झाकलेले राहतात. लोकांमधील संबंध अशा प्रकारे झाकून. राहि ल्याने, ते वस्तूमधील संबंध. वाटत राहतात व मूल्याचे बाह्यरूप म्हणजेच त्याचा गाभा असे वाटते. वस्तूचे विनिमयमूल्य ही सामाजिकरीत्या निर्माण झालेली संपत्ती न वाटता तिचे ते नैसगिक मूल्यच आहे असे वाटते. उदाहरणार्थ, सोने, बटाट्यापेक्षा मूलतःच जास्त मूल्यवान वाटते. इतर क्षेत्रातही असा प्रकार होतो. जमिनीमधून खंड निर्माण होतो, असे भासते. भांडवल नफा मिळविते व पैसा व्याज मिळवितो, असे वाटते. यंत्राला संपत्ती निर्माण करण्याची अदभुत शक्‍ती आहे असे वाटते.

२) भांडवलदार व कामगार यांच्यातील वेतनाबहलच्या करारामध्येही बाह्यरूप व वस्तुस्थिती यांतील तफावत दृष्टीस येते असे मार्क्सने म्हटले आहे. भांडवलदार व कामगार यांच्यातील वेतनाबद्दलचा संबंध स्वतंत्र व स्वत; निर्णय घेणाऱ्या दोन व्यक्तींमधील संबंध वाटतो. त्यातील प्रत्येक जण, स्वत.च्या हितासाठी दुसऱ्याशी संबंध ठेवतो व ते दोघांचे देवघेवीचे संबंध आहेत असे भासते. त्यांच्यातील संबंधांत कोणी एकतर्फी फायदा घेतला आहे, असे वाटत नाही; प्रत्यक्षात मात्र हे दोन पक्ष समान नसतात. त्यांतील एकजण कफल्लक असतो. त्याला उपाशी राहायचे नसल्याने तो पूर्णतः दुसर्‍याच्या दयेवर अवलंबून असतो. त्यांच्यातील देवघेव, विनिमय, सारख्या प्रमाणात नसतो. मालकाने श्रमाची पूर्ण किमत दिली, तर मालक काहीच फायदां मिळवू शकणार नाही. म्हणजेच भांडवलदार व कामगार यांच्यातील विनिमय मूलतः असमान असतो. त्यात कामगाराकडून भांडवलदाराकडे मूल्ये संक्रमित होत असते. शिवाय भांडवलदार व कामगार यांच्यातील संबंध स्वेच्छेवर अवलंबून नसतात. ते संबंध दोन व्यक्‍तीमधीलही नसतात. प्रत्यक्षात ते वर्गांच्या माध्यमाद्वारे प्रस्थापित झालेले असतात. उत्पादनसाधनांची मालकी असणारा वर्ग आणि ज्यांच्याकडे श्रमाशिवाय काहीच नसते, यांच्यातील ते संबंध असतात.

३) कामगार आणि भांडवलंदार यांच्यामधील वेतन संबंध दुसऱ्याही एका प्रकारे वास्तव दडवितात . भांडवलदार स्वत:च्या पूर्वीच्या बचतीमधून काम गाराला वेतन देतो असे वाटते; पण प्रत्यक्षात तो ज्या भांडवलामधून वेतन देतो, ते कामगाराच्या पूर्वीच्या श्रंमातूनच निर्माण झालेले असते. “ आपण एक भांडवल'दार किंवा "एक कामगार असा विचार न करता, भांडवलदारांचा वर्ग व कामगार वर्ग, असा विचार केला, तर पैशामुळे निर्माणझालेला भ्रम लगेच नष्ट 'होती.


मार्क्सच्या सिद्धान्ताप्रमाणे मूल्य श्रमातून निर्माण होते, जितके श्रम खर्च झाले असतील, त्या प्रमाणात मूल्य निर्माण होत असते, पण कामगारांना त्यांनी निर्माण केलेले सर्वे मूल्य मिळत नाही. त्यांनी जे श्रम खर्च केलेले असतात, त्या सर्वांसाठी त्यांना वेतन मिळत नाही. असे' प्रत्यक्षात स्वरूप असताना, कामगाराला त्याने जेवढा श्रमवेळ खर्चे केला असेल, तितके वेतन त्याला मिळते, असे भासते, वास्तवात त्याला जे वेतन मिळते त्यामुळे त्याने केलेल्या श्रमाच्या एका भागापुरता मोबदला मिळतो व उरलेल्या श्रमातून भांडवलदार नफा घेतो. कामगाराला सर्वं श्रमाचा मोबदला मिळाला आहे असे भासल्याने; “नफा कामगाराच्या श्रमाऐवजी दुसर्‍या कशातून तरी निर्माण होतो असे वाटते. अर्थशास्त्रज्ञांना वाटते को, नफा भांडवलदाराने केलेल्या गंतवणकीतुन आणि यंत्रातून निर्माण होतो; कारण हे अर्थतज्ञ बाह्यरूपाचाच विचार करीत असतात.


भांडवलशाही समाजाचे बाह्यरूप अशा रीतीने सत्य स्वरूप दडविते त्यामुळे या समाजात उपजीविकेसाठी काम करणाऱ्या अलग अलग व्यक्‍ती आहेत असे भासते व वर्गाचे अस्तित्व दिसेनासे होते. तसेच भांडवलदार व कामगार, समान गोष्टींचा विनिमय करतात असे वाटते व त्यामळे पिळवणक दिसत नाही. कामगारास आपले श्रम भांडवलदारास विकण्याशिवाय खरे तर पर्यायच नसतो; पण स्वतःचे श्रम न विकण्याचे त्यास स्वातंत्य आहे, असे सांगितले जाते.. भांडवलशाही उत्पादनपद्धत अशा तर्‍हेने खोटे व भ्रामक जग निर्माण करते.. त्यामुळे अंतर्गत वास्तव दडविले जाऊन बाह्घरूप लोकांच्या कल्पनाशक्‍तीत प्रतिबिबित होते व चुकीचे विचार निर्माण करते.


यातून समाजाचे अभ्यासकही सुटत नाहीत. जो अभ्यासक भांडवलशाही समाजाच्या पृष्ठभागावर आपले लक्ष कोंद्रित करतो, तो फक्त बाहयरूपाचा अभ्यास करतो व गाभा त्याच्या नजरेतून  निसटतो. बांहघरूपे कशामळ ६ निर्माण होतात, कायम राहतात व त्यावर कसे नियंत्रण ठेवले जाते. याची माहिती नसल्याने त्याला त्याचा खरा अर्थ उलगडत नाही. परिणामत: असा अभ्यासक भांडवलशाही समाजाचा समर्थक होतो.


समाजाचा टीकाकारही जोपर्यंत समाजाच्या पृष्ठभागावर लक्ष केंद्रित करतो, तोपर्यंत तोही त्या समाजाचा समर्थक बनायचे टाळु शकत नाही. असा समाजशास्त्रज्ञ व्यक्तिश: प्रस्थापित समाजरचनेचा टीकाकार असला. तरी . त्याचे संशोधन खोलवर जाणारे व खर्‍या अर्थाने टीकात्मक नसल्याने, तो खरी टीका. व भाष्य करू शकत नाही. समाजरचनेचे त्याचे विश्लेषण वरवरचे असते; त्यामुळे त्याची टीकाही वरवरची राहते आणि. त्या समाजरचनेला नकळत अधिमान्यता मिळते. 


या संदर्भात मार्क्सने अशास्त्रीय सिद्धान्त मांडणार्‍या स्वप्नाळू समाजवाद्यांचे उदाहरण घेतले आहे. या समाजवाद्यांना कामगारांच्या दैन्याबद्दल कळवळा वाटत होता. ते दैन्य संपविण्याचे मार्गही त्यांनी शोधले, भांडवलशाहीच्या समर्थकांनी भांडवलशाही दृष्टिकोनातून, तर या समाजवाद्यांनी कामगारांच्या दृष्टिकोनातून भांडवलशाही समाजाचा अन्वयार्थ लावला. प्रोधाँ या फ्रेंच समाजवादी विचारवंताने केलेली भांडवलशाहीची मीमांसा या प्रकारात मोडते. भांडवलशाही अर्थव्यवस्थेच्या सामाजिक दुष्परिणामाने तो व्यथित झाला होता. परंतु स्पर्धेमुळे स्पर्धकांवर मर्यादा येते किवा श्रमविभागणीमुळे सामाजिक सहकार्य वाढते व व्यक्‍तीच्या गुणांनाहीं वाव मिळतो, असे म्हणून त्याने भांडवलशाहीतील या संस्थांचे फक्त अमूर्त पातळीवर विश्लेषण केले.


स्पर्धा किंवा श्रमविभागणी या संस्थांचे प्रत्यक्षात विश्लेषण न करता, फक्त. त्या संकल्पत्तांचा विचार केला. उत्पादनाच्या गाभ्याची तपासणी प्रोधांसारख्या समाजवाद्यांनी केली नाही, भांडवलशाहीच्या समथंकांप्रमाणेच उत्पादनपद्धतीच्या फक्त पृष्ठभागापुरते लक्ष केंद्रित केले
मार्क्सच्या मते, या समाजवाद्यांना भांडवलशाहीच्या अंतगेत रचनेचे आणि गतितत्त्वाचे ज्ञानच नव्हते. त्यामुळे कामगारांच्या दैन्याच्या, खऱ्या कारणांची त्यांना कल्पनाच नव्हती. भांडवलशाहीवर टीका करण्याची भाषा त्यांना अवगत नव्हती; त्याचप्रमाणे पर्यायांची स्पष्ट कल्पनाही नव्हती. त्यामुळे भांडवलशाही समथेकांच्या गृहीतांच्या चौकटीत व त्यांच्याच भाषेत या समाजवाद्यांनी विचार केला व मांडला, यांत आश्चर्य नाही, परिणामत: ते भांडवलशाही क्षितिजाच्या मर्यादेत राहिले व त्यांची सर्व टीका संकुचित व मर्यादित राहिली.

 

ऐतिहासिक टप्पे :

परंतु समाजशास्त्रज्ञ किवा अर्थशास्त्रज्ञांचे विचार नेहमीच विचारप्रणालीच्या  स्वरूपाचे असतील असे नाही. भांडवलशाहोतील सामाजिक संबंधाच्या विकासाच्या पहिल्या टप्यात या विचारांना शास्त्रीय रूप असू शकते. दुसऱ्या टप्यात त्यांना विचारप्रणालीचे रूप येते.
कारण मार्क्सच्या मते विचारप्रणाली एक एऐंतिहासिक घटक म्हणन निर्माण होते व अंतर्विरोधात ज्याप्रमाणे बदल होतो त्याप्रमाणे तिचे स्वरूप बदलत जाते. अंतर्विरोध जितके तीव्र व स्पष्ट होतात, तितकी विवचारप्रणालीची पातळी विपर्यस्त व दांभिक बनत जाते.
भांडवलशाहीतील सामाजिक संबंधांच्या विकासाच्या पहिल्या टप्यात अंतर्विरोध पृष्ठभागावर येत नाहीत; ते सुप्त स्थितीत असतात. सामाजिक संबंध जसे प्रगत होतात, तसतसे अंतर्विरोध उघड स्वरूप धारण. करतात. अंतर्विरोध लपविणे, हे विचारप्रणालीचे मूलभूत वैशिष्टय असल्याने, भांडवल शाहीतील सामाजिक संबंधांच्या ऐतहासिक विकासातील हे दोन टप्पे महत्त्वाचे वनतात. जेव्हा अंतर्विरोध सुप्त स्वरूपात असतात, तेव्हा विचारप्रणालीस आधार नसतो. भांडवलशाहीतील विशिष्ट उत्पादनपद्धती अद्याप स्थिर झालेली नसते. पूर्वीची अथंब्यवस्था नष्ट होण्याच्या प्रक्रियेतून भांडवल निर्माण होत  असते; ते अद्याप भांडवलशाहीतील पुनरुत्पादनातून निर्माण होत नसते.


जेव्हा अंतर्विरोध पृष्ठभागावर येतात, तेव्हा विचारप्रणालीचा उदय होतो. होण्यासाठी भांडवलाची पुननि्मिती वेतनश्रम व अतिरिक्‍त मूल्याच्या आधारा चर व्हावी लागते. त्यानंतर अतिरिक्‍त मूल्यांचे खरे स्वरूप लपविणारे बाहय रूप महत्त्वाचे बनते. पहिल्या टप्प्यात भांडवलदार कामगारांच्या प्रत्यक्ष विंरो धात नसून सरंजामदारांच्या विरोधात असतात. त्यामुळे भांडवलदारांचे वेचारिक उत्पादन (Spiritual Production) या टप्यात विचारप्रणालीच्या स्वरूपाचे नसते. ते सरंजामशाही विचारप्रणालीच्या टीकेच्या रूपातील असते म्हणूनच अँडॅम स्मिथ आणि रिकार्डो हे भांडवलशाहीच्या उदयाच्या काळातील अर्थशास्त्रज्ञ त्यांच्या काळात योग्य विश्लेषण करीत होते, असे मार्क्सने सांगितले आहे. ते दोघे सरंजामशाही समाजाच्या अवशेषांबरोबर लढत देणाऱ्या, सरंजामणाही आथिक संबंधांवर मात करणार्‍या, उत्पादन शक्तींची वाढ करणाऱ्या आणि उद्योग व व्यापार वाढविणाऱ्या भांडवलदारांचे प्रतिनिधित्व करीत होते. भांडवलशाही पद्धतीची उत्पादनपद्धती उत्पादनासाठी सर्वांत जास्त फायदेशीर आहे, असे सांगणारा रिकार्डो त्याच्या काळात वरो बरच होता. रिकार्डोचा विचार भांडवलदारांच्या हिताचा होता; ह्या कारणा  मळे तो विचारप्रणालीच्या स्वरूपाचा होत नाहो. सवेच वगंलक्षी . विचार विचारप्रणालीच्या स्वरूपाचा नसतो. विचाराने अंतर्विरोधे दडविले, तरच ते विचारप्रणालीचे रूप धारण करतात. ही प्रक्रिया भांडवलशाहीतील दुसर्‍या टप्यात होते. या टंप्प्यात भांडवलदार कामगारवर्गाच्या प्रत्यक्ष विरोधात असतो. अँडॅम स्मिथ व रिकार्डो यांचे लिखाण, वर्गकलह जेव्हा विकसित व उग्र झाला नव्हता तेव्हाचे आहे. त्यामुळे त्यांच्या अर्थशास्त्राला काहीसे , शास्त्रीय स्वरूप आले. परंतु एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस, जेव्हा वर्गकलह उग्र झाला, तेव्हा अर्थशास्त्राला विचारप्रणालीचे रूप प्राप्त झाले. फ़ेंचे व ब्रिटिश भांडवलदारवर्गाने सत्ता काबीज केली तेव्हा वर्गकलहाने प्रत्यक्षात व सैद्धा न्तिकदृष्टचा उघड स्वरूप धारण केले, त्यावेळी भांडवलशाही अर्थशास्त्राचे शास्त्रीय स्वरूप संपुष्टात आले आणि वस्तुनिष्ठ संशोधनाऐवजी भाडोत्री समर्थकांचे लिखाण पुढे येऊ लागले.

 

विचारप्रणालीवर मात करण्याचा मार्ग :

अशा प्रकारे विचारप्रणाली अंतर्विरोधी सामाजिक संबंधांवर आधारलेली असल्यामळे ती वैचारिक टीकेतून नष्ट करता येत नाही. विचारप्रणालीचे माया .जाल ज्या सामाजिक संबंधांतून निर्माण होते, ते संबंध प्रत्यक्षपणे उलथून लावण्यात्नेच विचारप्रणाली संपुष्टात येऊ शकते. ज्या अंतर्विरोधातून विचार प्रणाली निर्माण होते, ते सोडवूनच विचारप्रणालीवर मात करता येते व अंत विरोध सोडवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे क्रांतिकारी व्यवहार. दिशाभूल करणारे बाह्यरूप निर्माण करणारा मर्यादित उत्पादनव्यवहार ज्या परिस्थितीत मर्या दित राहतो,. ती परिस्थिती क्रांतिकारी व्यवहाराने बदलते. ज्या परिस्थितीतून संकल्पना व विंचार निर्माण झालेले असतात, ती परिस्थिती न बदलता, फक्‍त तार्किक युक्तिवादातून त्या संकल्पना व॒ विचार संपुष्टात येणार नाहीत. याचा अर्थ वैचारिक टीका करायचीच नाही असे नाही. परंतु ही . टीका पुरी पडत नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे. क्रांतिकारी व्यवहार जाणीवपूर्वक व सैद्धांतिक तयारीनिशी केलेला व्यवहार असतो. यातील सैद्धांतिक टीकेचा विचारप्रणाली वर परिणाम होतोच. एकदा समाजाचे खरे स्वरूप समजले की, सद्य:स्थितीच कायम .राहावी यावरील लोकांचा विश्‍वास उडतो. पण तेवढ्याने भागत नाही जोपयंत क्रांतिकारी व्यवहारातून सद्य:स्थिती पूर्णतः बदलत नाही, तोपर्यंत विचारप्रणाली संपुष्टात येत नाही. इतिहासाची प्रेरक शक्‍ती टीका नसून क्रांती आहे.

 

 

वर्ग

वर्ग ही संकल्पना मार्क्सच्या तत्त्वज्ञानात महत्त्वाची असतानाही तो त्यावर सविस्तरपणे लिहू शकला नाही. कॅपिटलच्या तिसऱ्या खंडामधील वावन्नावे प्रकरण वर्गाबहलचे आहे. परंतु ते पूर्ण होण्यापूर्वीच माक्संचा अंत झाला. त्यामळे वर्ग या कल्पनेवरील त्याचे विचार या अपुऱ्या राहिलेल्या प्रकरणातून व त्याच्या इतर लिखाणातून एकत्र करावे लागतात.  वर्ग ठरविण्याचा निकष कोणता, याचे जे उत्तर मार्क्सने दिले आहे त्यावर त्याची .वर्गे ही संकल्पना आधारलेली आहे. भांडवलशाही समाजातील भांडवलदार, जमीनदार व कामगार हे वर्ग कसे तयार होतात, याबद्दलचे काही दृष्टिकोन कसे चुकीचे आहेत, हे मार्क्सने प्रथम स्पष्ट केले आहे. उत्पन्न व उत्पन्न मिळविण्याच्या मार्गातील. साम्य हा निकष ठरविला, तर भांडवल दारांना नफा, जमीनदारांना खंड व कामगारांना वेतनातून उत्पन्न मिळते, असे म्हणता येईल. भांडवल, जमीन व श्रमशक्‍तीच्या आधारे हे तीन वग्रं आपले उत्पन्न: मिळवितात. परंतु या निकषाप्रमाणे डॉक्टर मंडळी आणि संरकारी अधिकारी यांनाही वर्ग म्हृणता येईल. भांडवलदार व जमीनदार वर्गातील काही गटांताही वर्ग ही संज्ञा लागू पडेल. काही जण वर्गातील. फरक म्हणजे मिळकतीतील फरक असे म्हणतात; पण हा तर पूर्णत: संख्यात्मक फरक झाला एका वर्गातील दोन व्यक्‍तींमधेही हा फरक असू शकतो. म्हणन हाही दष्टिकोनं चकोचा आहे

वरील दोन्ही दृष्टिकोनात मार्क्सच्या मते मुख्य मुद्दाच बाजला राहतो प्रत्यक्षात मालमत्तेवरून वर्ग ठरतो . पण फक्त * मालमत्ता? असे. म्हणन .भागत नाही. .कारण मग ती फक्त एक अमूते कल्पना राहते. प्रत्येक ऐतिहासिक काल खंडात मालमत्तेचा विकास वेगवेगळ्या प्रकारे व .वेगवेगळ्या सामाजिक परिस्थितीत झाला आहे. भांडवलदाराच्या मालमत्तेची व्याख्या करायची झालीं तर. भांडवली उत्पादनपद्धतीचे  सर्व सामाजिक परिस्थितीचे  वर्णन करावे . लागते. मालमत्तेची स्वतंत्रपणे व्याख्या करायची म्हटली, तर ती एकतर तात्विक कसरत होते किवा कायद्याचा शञ्दच्छल होतो मालमत्ता म्हणजे उत्पादन साधनांवरील खाजगी मालकी, असा अर्थ . घेतला त्रच आपण वर्गाची बरोबर व्याख्या करू शकतो. आपण भांडवलशाही समाजाच्या विशिष्ट संदर्भात (उत्पादनसाधनांवरील खाजगी मालकी ) मालमत्ता. समजावून घेतली, तरच आपल्याला सध्याच्या उत्पादनपद्धतीतील अंतर्विरोशाचा गाभा समजेल. (वर्गकलह निर्माण करणाऱ्या अंतर्विरोधाचे. स्वरूप समजेल) उत्पादनसाधनांवरील खाजगी मालकी म्हणजे मालमत्ता असा अर्थ धरला, तर भांडवलदारांची व्याख्या उत्पादनसाधनांचे मालक अशी होते; तर जे कोणत्याही उत्पादन. साधनाचे मालक नसतात व जे स्वत:चे श्रम विकून गुजराण करतात ' ते कामगार वर्गात मोडतात. वर्ग मालमत्तेवरून ठरतो हे बरोबर आहे, पण हो मालमत्ता संपत्तीच्या स्वरूपात पाहाता कामा नये. ती उत्पादनाची परिणाम कारक शक्‍ती, उत्पादनसाधनांची मालकी (जी इतरांना नाकारली जाते), या स्वरूपात पाहिली पाहिजे. 


या अर्थाने उत्पादनसंबंध हे वर्ग ठरविणारे घटक. ठरतात. "भांडवल ' दाराकडे कारखाने  यंत्रे यांची मालकी असते. कामगारांची एकमेव मालमत्ता *त्यांची श्रमशक्ति  ते विकत घेतात . भांडवलदार उत्पादनसाधनांच्या सहाय्याने अतिरिवत मल्य निर्माण करण्यासाठी . ब स्वत:चे भांडवल वाढविण्यासाठी कामगारांची श्रमशक्ती विकत घेतात.

 

अशा प्रकारे मालमत्तेचे संबंध हा वर्गे तयार होण्याच्या प्रक्रियेचा पाया आहे. पण वर्ग एकटा अलगपणे अस्तित्त्वात नसतो. तो ज्या वर्गाच्या विरोधी असतो, त्याच्यापासून स्वतंत्र नसतो. जेव्हा लोक दुसर्‍या वर्गाबरोबर समाईक लढ्यात सहभागी होतात, तेव्हा ते वर्गीय स्थरूपात संघटित होतात. जेव्हा स्वत:बद्दल जाणीव निर्माण झाली असेल, तेव्हाच वर्गे अस्तित्त्वात असतो. दुसऱ्या वर्गाशी आपले असलेले शत्रुत्व जेव्हा त्यास उमजते, तेव्हा त्यास खरे वर्गीय स्वरूप येते. स्वतःचे हितसंबंध ' दुस*या सामाजिक गटाच्या विरोधी आहेत, याची जाणीव निर्माण होणें वर्गीय स्वरूप येण्यासाठी अत्यावश्यक असते. अलग . अलग व्यक्ति जेव्हा दुसऱ्या वर्गावरोबर समाईक लढ्यात सहभागी होतात, तेव्हा त्यांना वर्ग म्हणता येते. नाहीतर त्या एकमेकांच्या विरुद्ध असतात. दुसऱया वर्गाबरोबर . कामगार वर्गाबरोबर  समाईक लढा द्यायचा असतो, त्यामुळे भांडवलदारांचा वर्ग होतो; अन्यथा ते स्पर्धक म्हणून एकमेकांविश्द्ध असतात. हेच कामगारवर्गासही लागू पडते. कामगार भांडवलदारांविरुद्ध असतात म्हणून त्यांचा वर्ग होतो . जेव्हा भांडवलदारांविष्द्धचा कलह उग्र बनतो, तेव्हा कामगारात एकसंघता व एकवाक्यता निर्माण होते. न मालमत्तेशी असलेले समान संबंध आणि समान हितसंबध वर्गनिर्मितीसोठी आवश्यक असतात. पण मार्क्सने असेही म्हटत़े आहे की, जोपयंन्त समान हितसंबंधातून राजकीय संघटना निर्माण होत नाही, तोपर्यन्त खऱ्या अर्थाने वर्ग तंयार झाला असे म्हणता येणार नाही. कामगारांचे वर्गाच्या रूपात संघटन होणे व राजकीय पक्षात संघटन होणे, मार्क्सने एंकत्र केले आहे. वर्गकलहाने राजकीय स्वरूप धारण केले, तरच या कलहांत भाग घेणारे घटक. वग म्हणून खऱया अर्थाते संघटित झालेले असतात
डॉक्टर भणि भांडवलदार यांच्यांतील फरक दाखविल्याने माकसंची वर्ग ही संकल्पना जास्त स्पष्ट होते. वर्ग होण्यासाठी भांडवलदाराकडे आहेत व डॉक्टरांकडे नाहोत. अशी वैशिष्ट्ये कोणती? उत्पादनपद्धतीशीं भांडवलदारांचे संबंध असतात, तसे डॉक्टरांचे नसतात. भांडवलदारांना वेगळा आथिक हित संबंध आहे (नफ्याचे प्रमाण) तो या उत्पादनसंबंधावर आधारलेला असतो.  तो त्यांना कामगारांविरुद्ध कलहात उभा करतोः भांडवलदारांना वर्ग म्हणून वेगळेपणाची जाणीव आहे. त्यांचे हितसंबंध इतर वर्गाहून विरोधी आहेत याची त्यांना जाणीव असते; याउलट डॉक्टरांना जरी गट. म्हणून जाणीव असली, तरी त्यांचे हितसंबंध इतर वर्गांच्या विरोधी आहेत, असे त्यांना वाटत नाही. भांडवलदार एका किवा अनेक पक्षांत संघटित झालेले असतात. ते पक्ष त्यांच्या हितसंबंधाला पाठींबा देतात. त्या हितसंबंधांचे रक्षण करतात. याउलट डॉक्टरांना त्यांच्या संघटनेशिवाय, दवबावगटाशिवाय इतर राजकीय संघटना नसते. हा जो आपण फरक पाहिला, त्यात एक सूत्र दिसते. ते म्हणजे विरोधी वर्गाशी असलेले शत्रुत्व, उत्पादत, राजकारण, संस्कृति या सवं क्षेत्रांत इतर वर्गाशी विरोध. मासं जेव्हा वग या शब्दाचा वापर करतो, तेव्हा शत्रू कोण आहे, हा प्रश्‍न त्याला अभिप्रेत असतो.

 

अशा प्रकारे वग ही संज्ञा वापरण्यासाठी मार्क्सचे मुख्य निकष पुढीलप्रमाणे सांगता येतील : (१) उत्पादनपद्धतीतील स्थान (२) सामाजिंक गटाची स्वत: वर्ग आहोत अशी जाणीव व त्याची राजकोय संघटना.  या निकषांप्रमाणे प्रगत भांडवलशाही समाजात फक्‍त दोन वर्ग.असतात, असे मार्क्सने म्हटले आहे : (१) भांडवलदार उत्पादनसाधनांचे मालक व कामगारांना त्यांची श्रमशक्ती विकत घेऊन त्याचा मोबदला देणारे, (२) कामगार यांच्याकडे कोणत्याही उत्पादनसाधनांची मालकी नसते. आपली श्रमशक्ती विकून ते गुजराण करतात. परंतु ' भांडवलशाही समाज प्रगत अवस्थेला पोहो चल्यानंतर त्यांची अशी दोन वर्गांत विभागणी होते. संपूर्ण समाज दोन शतु गटात विभागला जातो. प्रत्यक्षात भांडवलशाही समाजात तीन मोठे वर्गे असतात. भांडवलदार, कामगार आणि जमीनदार. परंतु समाजाची वर्गीय विभागणी अशी शुद्ध काटेकोर स्वरूपात आढळत नाही. इंग्लंडमध्ये मार्क्सच्या काळात भांडवलशाही सर्वांत जास्त विकसित. झालेली असतानाही वर्गीय विभागणी काटेकोर स्वरूपात दिसत नव्हती; कारण मध्यम स्तर वर्गाच्या सीमा अंधुक करीत असतात. यंत्राच्या वाढत्या वापरातून व सेवा उद्योगातून नवीन मध्यम वर्ग उदयास येतो. रिकार्डोने एका बाजूस कामगार व दुसऱ्या बाजूस भांडवल दार व जमीनदार यांच्यामधील वाढत्या मध्यम वर्गाचा विचार केला नाही म्हणून मार्कसेने त्याच्यावर टीका केली होती.

 

याशिवाय छोटे भांडवलदार, छोटे दुकानदार आणि शेतकरी यांचा उल्लेख मार्क्सने केला आहे. या गटांकडे उत्पादनसाधनांची मालको अजिबात नसते. किंवा असलीच तरं अगदी लहान प्रमाणात असते. शेतकऱ्यांकडे जमिनीचे लहान तुकडे असतात. त्यावर ते स्वतःच शेती करतात. त्यांचे उत्पादनपद्धतीशी असलेले संबंध भांडवलदार, कामगार किवा. जमीनदार यांच्याप्रमाणे नसतात. किती कामगार ते कामावर ठेवतात किंवा. किती जमीन त्यांच्या मालकीची आहे यावरून छोटे भांडवलदार किंवा शेतकरी भांडवलदार किवा कामगार वर्गात सामावन जातात. अल्पभधारकांचा, शेतकऱ्यांचा समावेश, मार्क्सने काही वेळा कामगार वर्गात केला आहे. कर्जबाजारीपणामुळे व त्याची मालमत्ता गहाण टाकलेली असल्यामुळे प्रत्यक्षात तो दुसऱयासाठीच काम करीत असतो. शेतमजुरांचा उल्लेखही मार्क्सने केला आहे. ते शेतकरी व कामगार यांच्यांमध्ये कोठेतरी असतात. भांडवलशाही समाजातील बहुसंख्य लोक कामगार वर्गात असतात, असे मार्क्सने म्हंटले आहे. त्यामुळे कामगारांची नेहमीची व्याख्या कारखान्यातील कामगारांना लागू पडत असली, तरी शेतमजुरांचा समावेश कामगार वर्गात करायला हरकत नाही. शिवाय माक्‍्संने एके ठिकाणी शेतमज्रांना कामगार असे संबोधले आहे. जमिनी ची खरी मशागत करणारा मजूर शहरी कामगारा प्रमाणे वेतन घेणारा मजूर होतो व त्यामुळे त्याचे. व कामगारांचे हितसंबंध सारखे होतात, असे मार्क्सने म्हटले आहे. अशा प्रकारे शेतकरी व शेतमजूर कामगारवर्गात व जमीनदार भांडवलदारात भोडतात असे धरले, तर मग आपल्याला दोन वर्गांचा आकृतिबंध मिंळतो. या ठिकाणी हेही लक्षात ठेवले  थाहिजे की, राजकीयदृष्ट्या शेतकरी प्रतिगामी गट आहे व शहरी कामगारां बरोबर समाविष्ट होण्यास नाखुष असतो असे मातेने म्हटले आहे.

 

लुंपेनप्रोलेटेरिएट या नावाखाली मार्क्सने समाजात अत्यंत हालाखीचे .जीवन जगणाऱ्या, कमालीच्या गरिंबीत राहणाऱ्या लोकांचा समावेश केला आहे. त्यांच्यामधून गुन्हेगार तयार होतात. कोणताही निश्‍चित धंदाव्यवसाय नसलेल्या बेकारांचा हा वर्ग असतो.. भांडवलदार त्यांचा _ संपफोडे, कामगारातील हेर म्हणून किंवा क्रांतीच्या वेळो कामगारांशी लढताना. उपयोग करून घेतात. म्हणून मार्क्सने त्यांना धोकादायक वर्ग असे म्हटले आहे. त्यांना समाजाच्या प्रगतीत स्वारस्य नसते. त्यामुळे ते. कोंणतीही ऐतिहासिक भूमिका पार पाडीत नाहीत ते प्रतिगामी असतात

 

बुद्धिजीवी वर्गाचाही उल्लेख मार्क्सच्या लिखाणात आलेला आहे! त्यात डॉक्टर्स, वकील, पत्नकार, प्राध्यापक व धमंगुरूंचा समावेश त्यांने केलेला आहे हे लोक भांडवलदार वर्गाचे वेचारिक प्रतिनिधी. आणि प्रवक्ते आहेत, असे भार्क्सने म्हटले आहे. विचारवंतांचा बऱ्याचवेळा वैचारिक वर्ग, असाही उल्लेख त्याने केला ओंहे. भांडवलदार. वगग ज्या मर्यादेपलिकडे प्रत्यक्ष जीवनात जाऊ शकत नाहो, त्या मर्यादेपलिकडे हे पेटी वुर्श्वा राजकारणी.व लेखक मानसिकदष्ट्या जाऊ शकत नाहीत. स्वत:च्या हितसंबंधांमुळे व सामाजिक स्थानामळे भांडवल दार वग ज्या समस्या व उत्तरांकडे प्रत्यक्षात जातात, त्याकडेच पेटी बर्श्वा राजकारणी व लेखक संद्धांतिकदृष्ट्या येऊन पोहोचतात. बद्धिजीवी वर्ग व भांड 'वलदार वर्ग यांच्यांतील घनिष्ठ संबंध वर्गामधील बौद्धिक व शारिरिक कामाच्या श्रमविभागणीवर आधारलेले असतात. एका अर्थाने भांडवलदारांच्या विचार प्रणालीचे प्रचारक म्हणून विचारवंत. काम करतात, असे म्हणायला हरकत नाही वुद्धिजीवी व भांडवलदार भाऊ भाऊ असतात. गाभ्याशी ते एकच असतात  अशा तऱहेने बुद्धिजीवींचा वग भांडवलदार वर्गाच्या व्यापक छत्लाखाली असतो काहीवेळा मार्क्स बुद्धिजीवींचा भांडवलदार. वर्गात समावेश करतो. तर काहीवेळा त्यांना स्वतंत्र स्थान देतो. काही विचारवंत आपली वर्गीय पार्श्वभमी विसरून समाजाच्या. काही बाजूंबद्दल वस्तुनिष्ठ भूमिका घेऊ शकतात, असे मावसने म्हटले आहे. या संदर्भात रिकार्डो या अभिजात अर्थशास्त्रज्ञाचे उदाह्रण त्याने दिले आहे.

सत्ताधारी वर्ग, असाही शब्द मार्क्सने वापरलेला आहे. . देशाच्य़ा राज्य कारभारात भागं घेणाऱ्या किंवा राज्यकारभार कसा करावा. याचा. निर्णय घेण्यात मदत करणाऱ्यांचा समावेश त्याने या वर्गात केला आहे. त्या काळातील इंग्लंडमधील सत्ताधारी वर्गात गिरणीमालक (Millocracy) सावकार, धनिक (Moneyocracy) व जमीनदार (Aristocracy) यांचा, म्हणजेच भांडवलदार व जमीनदारांचा समावेश होत होता. असे मार्क्सने म्हटले आहे.

वरील विवेचनावरून असे वाटेल की, वर्ग ठरविण्याचे आपण सुरुवातीस . पाहिले, . त्यापेक्षा इतरही काही निकष. मार्क्सने वापरले आहेत की काय. पण याचा. फार वाऊ करण्यात अर्थे नाही. मार्क्सच्या एकण तत्त्वज्ञानाशी जुळणारे वर्गीकरण तीन वर्गांतील वर्गीकरणाचे आहे. इतर वर्गांचा जो उल्लेख आला _ आहे, तो या तीन वर्गांतील विभागणीशी कमीजास्त प्रमाणात सुसंगतच आहे. त्याने जाता जाता जे सूचकपणे लिहिले आहे पण. हे सविस्तरंपणे सांगितले नाही, त्यावरून असे म्हणता येते की, या इतर वर्गापेकी बरेच वर्ग, म्हणजे उत्पादनपद्धतीशी असलेल्या संबंधांवर आधारलेल्या तीन वर्गामधील. व्यवसाय 'वउत्पन्न यामुळे निर्माण झालेले उपविभाग आहेत. (ंगिरणीमालक, सावकार, जहाज बांधणारे, औद्योगिक भांडवलदार व आथिक भांडवलदार हे भांडवलदार वर्गातील उपविभाग आहेत. तसेच कुशल व अकुशल कामगार हे कामगार वर्गातील उपविभाग आहेत, असे म्हणता येईल.
मार्क्सने संक्रमणावस्थेतील वर्ग असा एक शब्दप्रयोग केला आहे. इतर वर्म म्हणजे छोटे भांडवलदार, दुकानदार, कारागीर, व्यावसायिक, शेतमजूर, शेतकरी हे काळाच्या ओघात अद्श्य होत जाणारे वर्ग आहेत. तुम्ही किती काळ विचारात घेता, यावर हे अवलंबून आहे. पूणपणे विकसित झालेल्या भांडवलशाहीत फक्त दोनच वर्ग उरतात. ही अवस्था विचारात घेतली, तर इतर सर्वे वर्ग संक्रमणावस्थेतील वर्ग म्हणूनच राहतात. म्हणजेच हे वर्ग हळुहळू संख्येने कमी होतात. संमाजाची रचनां ठरविणाऱ्या कलहावरील, त्यांचा प्रभावही कमी होत जातो. भांडवलदार व कामगार जास्तीतजास्त प्रमाणात सामाजिक प्रक्रि येच्या.. मध्यबिदूपाशी येतात. त्यांच्यातींल, कलहाचे भांडवलशाही समाजावर वर्चस्व प्रस्थापित होते. इतर सर्वे गटांना ते त्यांच्या वर्तुळात ओढतात किंवा त्यांना पुर्णपणे नगण्य करतात. मालमत्तेचे मालक व जे मालक नाहीत, यांच्यांतील अंतर्विरोधांचे समाजावर वर्चस्व असते. मालक नसलेले मालमत्तेबद्दलचे संबंध बदलण्याची मागणी करंतातः भांडवलशाही समाजात अशा प्रकारे वर्गीय ध्र्वीकरणाची प्रक्रिया चालू अंसते. संपूणे समाज दोन शब्रूगटांत विभागला जातो, असे म्हणावयास हरकत नाही. कनिष्ठ मध्यम वर्ग, कामगारवर्गात रूपांतरित होतो. मध्यम वर्गातील खालचा स्तर, छोटे व्यापारी, हस्तकला करणारे कारागीर, शेतकरी, हे सवे हळुहळ कामगार वर्गात येतात. आधुनिक कारखानदारी ज्या प्रमाणात चालते, त्याला त्यांचे छोटे. भांडवल. पुरे पडत नाही. त्यामुळे स्पर्धेत मोठ्या भांडवलदारांकडून त्यांचा पराभव होतो. उत्पादनाच्या नव्या पद्धतोमुळे त्यांचे कौशल्य निरुपयोगी. ठरते. अशा तर्‍हेने समाजातील सर्व वर्गातून कामगार वर्गाची भरती होते. जमिनदारवर्गही भांडवलदार किंवा कामगार वर्गात सामावून जातो. प्रगत भांडवलशाही समाजात दोनच वर्ग व त्यांच्यातील कलह उरतो. हा कलह भांडंवलंशाहीस कालांतराने. नष्ट करतो. कामगारांच्या क्रांतीनंतर भांडवालदार वर्गही ही नष्ट होतो. शत्रू नसल्याने कामगारवर्गाचं वर्ग हे स्वरूप नष्ट पावते.
मार्क्सचा वर्गाबद्दलचा हा सिद्धांत समाजातील उभ्याआडव्या छेदांचा कालबद्ध सिद्धान्त नाही. तो सामाजिक स्तरीकरणाचा सिद्धांत नव्हे. स्थिर समाजाचे चित्रण व विश्लेषण आपण करत आहोत, असे मार्क्सला वाटत नव्हते. संपूर्ण समाजात होणाऱ्या ऐतहासिक बदलाचे विश्लेषण करणारा सिद्धांत मार्क्सने पांडला आहे. विशिष्ठ समाज एका विशिष्ठ काळात कसा होता, या प्रश्‍नाचे उत्तर देण्यासाठी हा सिद्धांत नाही; तर समाजाची रचना कशी बदलते, याचा शास्त्रीय शोध घेणारा हा सिद्धान्त आहे. म्हणून मार्क्सच्या गतिमान सिद्धान्ताच्या मुळाशी दोन वर्गांचा आकृतिबंध आहे, असे आपण. ठामपणे म्हणू शकतो. समाजाचे छायाचित्राइतके बिनचूक वर्णन करायचे, हा मार्क्सचा उद्देश नव्हता. भांडवलदार व कामगार या दोन वर्गाशिवाय जे इतर वर्ग काही. समाजात विशिष्ट काळात दृष्टीस पडतात, ते मार्क्सच्या मते अस्थिर घटक आहेत. लवकरच ते भांडवलदार किंवा कामगार वर्गात सामावले जाणार आहेत आणि जरी असे झाले नाही, तरी त्यांची ऐतहासिक भूमिका व कार्ये भांडवलशाही समाजातील दोन महत्त्वाच्या वर्गांच्या तुलनेत अगदी नगण्य असेल.  

 

--------------------------------------------------
कार्ल मार्क्सचा विचार   ( ) मध्ये प्रकाशित