बेळगावंला भरणाऱ्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून य. दि. फडके यांची निवड करून महाराष्ट्राने इतिहासाचार्य राजवाडे आणि रियासतकार सरदेसाई यांच्या परंपरेतील एका इतिहास संशोधकाचा यथोचित गौरव केला आहे. रूढार्थाने साहित्यिक नसणाऱ्या किंवा ललित साहित्याची निर्मिती न करणाऱ्या परंतु वैचारिक साहित्यात मोलाची भर घालणाऱ्या किंवा इतिहासकार म्हणून मान्यता पावलेल्या व्यक्तीची संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्याची प्रथा फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. दत्तो वामन पोतदार, न. र. फाटक, लक्ष्मणशास्त्री जोशी, शं. द. जावडेकर इत्यादींनी हे अध्यक्षपद भूषविले आहे. या नामावलीत य. दि. फडके यांचे नाव सार्थपणे बसते. पोतदारांनी ऐतिहासिक कागदपत्रे गोळा करण्याचे जे प्रचंड कार्य केले त्यासारखेच कार्य फडके आधुनिक कालखंडाबाबत 'शास्त्रीबुवांनी वैदिक संस्कृतीचा अभ्यास करीत असतानाच तत्कालीन राजकारणात रस घेतला तसाच काहीसा प्रकार फडके करीत करताना दिसतात. राजकीय इतिहासाचे निबडणुकांचे विश्लेषण करण्यातही रस घेतात. न. र. फाटक हे तर फडक्यांचे इतिहास संशोधनातील सुरवातीच्या काळातील वाटाडे. आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास लिहिणे किती महत्त्वाचे आहे हे फाटकांनी जमविलेल्या कागदपत्रांवरून फडक्यांच्या मनावर एका अर्थाने ठसले. आचार्य जावडेकरांचा ‘आधुनिक भारत’ हा ग्रंथ आधुनिक कालखंडावरील. उत्कृष्ट संदर्भग्रंथ म्हणून फडक्यांच्या समोर आहे. मात्र य. दि. फडके यांनी ललित साहित्य लिहिलेलेच नाहीं असे नाही. तरुणपणी त्यांनी काही ललित लेखन केलेले आहे तसेच समीक्षापर लेखनही केलेले आहे संशोधन करीत असतानाच ते लोकसभेच्या ज्ञानपीठ पुरस्कार समितीचे सभासद म्हणूनही फडक्यांनी बरीच वर्षे काम केले आहे. परंतु त्यांची खरी ओळख ही वैचारिक व इतिहासपर लेखन करणारे लेखक म्हणूनच केली जाऊ शकते.
सुरवातीस म्हटल्याप्रमाणे राजवाडे व सरदेसाई या इतिहासकारांचे फडके हे आजचे खरे वारस आहेत. राजवाडे व सरदेसाई यांचे पंथ वेगवेगळे होते. फडकेंनी या दोन्ही पंथांचा सुरेख मिलाफ केलेला दिसतो. कमीत कमी सोयी व साधने वापरून संशोधंन साहाय्यक न घेता पदरमोड करून गावोगाव फिरून आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासाची कागदपत्रे गोळा करणारे फडके हे आजचे राजवाडेच वाटतात. पण राजवाड्यांनी अनेक अचाट कामे एकदम हाती घेतल्यामुळे. एकाचीही व्यवस्थित तड ते लावू शकले नाहीत त्यांनी एकदोनशे वर्षावर लक्ष्य केंद्रित करून सलग इतिहास लिहिला असत तर फलप्राप्तीच्या दृष्टीने जास्त उपयोगी ठरले असते असे रियासतकारांचे मत होते. फडकेंचंही हेच म्हणणे आहे महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाचा बृहतप्रकल्पहाती घेताना फडक्यांनी सरदेंसाईंचें उद्गार लक्षात घेतलें आहेंत व सरदेसाईंनी जसं रियासतीचे खंड प्रसिद्ध केले. तसे खंड आधुनिक महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाचे तयार करायचे हे. ठरवून आजवर ५ खंड प्रसिद्धही. केले आहेंत. आपली आवड, आपलीं शक्ती, परिस्थिती याचा पूर्ण अंदाज घेऊन य. दिं. नी एक प्रकल्प हाती घेतला व तों आता पुरा होत आला आहे. आणिं तोंही एकट्याच्या प्रयत्नाने पुरा होत आला आहे. राजकीय इतिहासाच्या प्रकल्पाची १९८० सालीं सुरुवात करताना त्यांना असें वाटत होते कीं काही तरुण संशोधकांचा एक. गट तयार करून ही योजना तडीस न्यावी. फडक्यांनी ५-६ खंडांत इतिहासाची मांडणी करावी व आनुषंगिक विषयांवर गटातील इतरानी लेखन करावें. परंतु तसे होऊ शकले नाही. प्रा, फडक्यांनी मात्र आपले काम मूळ योजनेपेक्षाही जास्त खंड प्रसिद्ध करून पूर्ण केले. विसाव्या शतकाच्या प्रारंभापासून महाराष्ट्र निर्मितीपर्यंतच्या कालखंडाचा राजकीय इतिहास लिहिण्याच्या या योजनेतील: १९३७ पर्यंतचे. खंड प्रसिद्ध झाले आहेत. स्वातंत्र्यप्राप्तीपासून १९६० पर्यंतच्या सहाव्या खंडाचे बहुतेक लेखन संपले आहे. याच काळात संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीची चळवळ होऊन गेली. फडकेंचा पीएच. डी.चा प्रबंध याच विषयावर आहे. (१९७३) या संशोधनाच्या निमित्तने त्यांनी १९५७ पे १९६० या कालखंजवरील अगणित कागदपत्रे जमा केली होती. त्याचा उपयोग, करून: संयुक्त बृद्द्इतिहास लिहिण्याचा संकल्प त्यांनी सोडला आहे. लौकरच हा ग्रंथही तयार होईल मूळ प्रबंध इंग्रजीतून प्रसिद्ध झाला आहे व तो संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील. कॉग्रेस पक्षाची काय भूमिका होती यावर मुख्यत: भर देतो. मराठीतील ग्रंथ मात्र या चळवळीचा समग्र इतिहास मांडण्यासाठी फडके तयार करीत आहेत आधुनिक महाराष्ट्राचा राजकीय इतिहास लिहिणे हे जीवीत कार्य मानलेल्या य. दि. नी ही इतिहासाच्या साधनांची जमवाजमव करीत असतानाच या कालखंडात विशेष कामगिरी. बजावणाऱ्या इतिहासाला कलाटणी देऊ पाहणाऱ्या: व्यक्तींची चरित्रे लिहिली आहेत. एका नेत्याच्या कार्यला मध्यविंदू मानून इतिहास उलगडून दाखविण्याचे अवघड कार्य फडक्यांनी या चरित्र लेखनातुन केले आहे. चरित्र लिहायचे म्हणजे विभूतीपूजन करायचे या मराठीत रूढ असलेल्या पद्धतीस सोडून फडकेंनी आपला चरित्र नायक परिस्थितीच्या चौकटीत व काळाच्या बंधनात राहून कोणती कामगिरी करीत होता हे दर्शविले आहे. इतिहासाच्या अभ्यासकाने महापुरूषाविषयी भक्तिभावाने लेखन करू नये. माणसे कितीही मोठी झाली तरी अखेर ती माणसेच असतात हे त्याने विसरू नये, असे फडकेंचे मत आहे. आणि त्याप्रमाणेच त्यांनी चरित्रलेखन केले आहे.चरित्रनायकाने परिस्थितीवर मात करण्याचा किंवा काळाच्या पुढे जाण्याचा किती प्रयत्न केला हे. दाखवून देण्यानेच खरे चरित्र उतरते. अशी त्यांची तर्ककठोर भूमिका आहे. परंतु . अशी भूमिका घेतल्यामुळे त्यांना बऱ्याच वेळा संबंधित लोकांना दुखवावें लागले आहे. पण त्याची तमा त्यांनी बाळगली नाही. इतिहासाची प्रतारणा अपण करायची नाही. अशी खूणगाठ बांधून त्यांनी अस्सल कागदपत्रांच्या . आधारे चरित्रांची रचना केली व त्यांच्या या पद्धतीमुळेच जरी काही लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या तरी अंतिमतः त्यांना माघार घ्यावी लागली. फडकेंचा प्रतिवाद करणे त्यांना जमण्यासारखे नव्हते. प्रा: फडकेंच्या लेखनाचा प्रतिवाद करणें नेहमीच अवघड असतें. शोधून काढून त्यांच्या भक्कम आधारावर इतिहासाची रचना करण्याची त्यांची भूमिका टीकाकारांना नेहमीच गैरसोयीची ठेरली. आहे. कारण प्रतिवाद करणाऱ्याला. मूळ कागदपत्रे धुंडाळावी लागतात. मूळ कागदपत्राबाहेर फडके जात नाहीत. मोघाम लिहीत नाही. अंदाजपंचे, ढिसाळ व एखाद दुसरे पुस्तक हाताशी धरून एखाद्या कालखंडाचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न त्यांना भावत नाही. अशा विचारवंतांचे व त्यांचे जमत नाही. त्यांची: भूमिका अभ्यासकाची असते. फार मोठे-दावे करणे, भली मोठी प्रमेये मांडणे . ब अवास्तव चौकटी तकार करून लोकांना: कप्प्यात बसविणे याचा त्यांना राग आहें. हा प्रकार त्यांना दिखाऊव तकलादू वाटतो विचार आणि कृती याद कृतीला जास्त भर देऊन इतिहास लेखन करू इच्छितात. प्रत्यक्षात: कृती कशी झाली याकडे त्यांचे लक्ष आधी जाते. कृतीच्या कसोटीवर उतरलेला नेता आदर्श वाटतो. महात्मा फुलें आणि आगरकर किंवा सेनापती बापट व र. धों. कर्वे यांच्याबद्दल त्यांना कमालीचा आदर आहे. याचे कारण ते कृतीच्या कसोटीला उतरले म्हणून यां व्यक्तींची चरित्रे त्यांनी मनापासून दिली आहेत आणि त्यांच्या लेखनाचे संपादन केले आहे.
य. दिं. फडक्यांना स्वतःची भूमिकाच नाही का? इतिहासाच्या पुराव्यावरून जे दिसते. ते मांडणे एवढेच त्यांचे कार्य आहे का ? असा प्रश्न विचारला जाऊ शकतो व त्याचे उत्तर नाही असे आहे प्रा. फडकयांना स्वतःची सामाजिक व राजकीय भूमिका आहे व ते ती फार खंबीरपणे न डगमगता मांडतात. सामाजिक समता, बंधुता व लोकशाहीवर त्यांचा गाढा विश्वास आहे आणि म्हणून.समतेच्या व लोकशाही हक्कांच्या चळवळीत आपला वाटा ते उचलतात ब्राह्मणेतर चळवळ व दलित. चळवळ या दोन सामाजिक चळवळींच्या इतिहासाची साधने गोळा करण्याच्या कार्यात डॉ. बाबा आढावांना सहकार्य करण्यात ते पुढे आहेत तसेच या चळवळीतील नेत्यांची चरित्रे लिहिणे लेखनाचे संपादन करणे यातही ते पुढाकार घेतात. महात्मा फुले, केशवराव जेधे, दिनकरराव जवळकर, शाहू महाराज, अण्णासाहेब लठ्ठे, बाबासाहेब आंबेडकर इत्यादी नेत्यांच्या कार्यावंर व विचारावर फडक्यांनी लेखन करून कार्यकर्त्यांना बरीच महत्त्वाची सामग्री उपलब्ध करून दिली आहे. आज महाराष्ट्राला या चळवळींची व नेत्यांची जी माहिती झाली आहे त्यात फडकेंचे योगदान सर्वात मोठे आहे. परंतु हे करताना ते आपल्या मूळ इतिहासकाराच्या भूमिकेला विसरत नाहीत. नेमकेपणावर त्यांचा कटाक्ष आहे व इतिहासाचे लेखन करताना कोणावरही अन्याय होणार नाही याची ते काळजी घेतात पण त्याचबरोबर कोणाचा वृथा गौरवही होणार नाही याबद्दलही ते दक्ष असतात.
सर्वसाधारणत: ब्राह्मणेतर किंवा दलित चळवळीचा इतिहास लिहिणारा अभ्यासक क्रांतिकारकांच्या वाट्याला जात नाही. पण फडके यास अपवाद आहेत. त्यांना क्रांतिकारकांच्या कार्याचे मूल्यमापन झाले पाहिजे असे वाटते. त्यांच्या कामगिरीचींही योग्य नोंद झाली पाहिजे असे त्यांचे मत आहे. हौतात्म्य व त्यागाबद्दल त्यांना आकर्षण आहे, आदर आहे म्हणून अशा व्यक्तींच्या ऐतिहासिक कार्याची दखल ते घेताना दिसतात. स्वातंत्र्यवीर . सावरकर, बाबाराव सावरकर, सेनापती बापट, सुभाषचंद्र बोस व इतर क्रांतिकारकांवर त्यांनी चरित्रात्मक लेखन केले आहे, ते याच दृष्टिकोनातून ब्राह्मणेतर चळवळीवर लिहिताना शाहू महाराजांच्या भक्तांचा रोष जसा त्यांना ओढवून घ्यावा लागला तसाच रोष सावरकरांवर लिहिताना सावरकर भक्तांचा घ्यावा लागला.
कालानुक्रमे इतिहास लिहिणारे, काटेकोरपणे चरित्रलेखन करणारे म्हणूनच फडके जास्त माहीत आहेत. परंतु त्यांचे सर्व लेखन पाहिले तर असे आढळेल की ते राजकीय व सामाजिक विचारांचे परिशीलन करणारे अभ्यासकही आहेत. अगदी सुरुवातीच्या काळातच . (१९७९) त्यांनी ‘व्यक्ती आणि विचार' हे पुस्तक प्रसिद्ध केले होते त्यामध्ये ज्ञानकोशकार केतकर किंवा पां. वा. गाडगीळ यांच्या विचारांचा परामर्श घेणारे लेख एकत्रित केलेले आहेत. केतकर व गाडगीळ यांच्या विचारांवगील आजही हे लेख वाचले जातात कारण दुसरा संदर्भ उपलब्ध नाही एवढेच नव्हे तर ते लेख खरेच वस्तुनिष्ठ चिकित्सा करणारे आहेत. लेखनाचे संपादन करण्यात तर फडक्यांचा हातखंडा आहे. महात्मा फुले, सावरकर, जवळकर, केतकर यांच्या लेखनाचे संपादन करून त्यांनी एक आदर्शच घालून दिला आहे ‘तत्त्वज्ञ सावरकर' या संपादित पुस्तकाची प्रस्तावना म्हणजे सावरकरांच्या विचारांवरील आजवर लिहिला गेलेला सर्वोत्कृष्ट लेख होय. बळी तो कान पिळी व हिंसेचा पुरस्कार या दोन मुद्यांना धरून सावरकरांच्या विचारविश्वाचा उलगडा करून दाखवून फंडकेंनी सावरकरांच्या तत्त्वज्ञानामागील मुख्य सूत्र कोणते होते याचे फक्त वीस पानांत जे विवेचन केलेले आहे ते मुळातून वाचण्यासारखे आहे.
इतिहासात रमणारा अभ्यासक सहसा वर्तमानाकडे अभ्यास विषय म्हणून पाहत नाही. पण य. दि. फडकेंचे तसे नाही- ते आहेत राज्यशास्त्राचे प्राध्यापक. सद्यस्थितीतील राजकारण हा त्यांचा खास आवडीचा विषय आहें व त्यावर त्यांनी बरेच लेखन केले आहे. इतिहासातून त्यांनी उभा केलेला मराठी समाज आज कोणत्या अवस्थेत येऊन पोहोचला आहे हे जाणून घेण्यात त्यांना रस आहे. म्हणून ते सतत रोजच्या घडामोडींवर प्रतिक्रिया व्यक्त करणारे स्फुट लेखन करीत असतात. इतिहास संशोधन म्हणजे पुस्तकात व जुन्यापुराण्या कागदपत्रांत गढून ग्रेलेला संशोधक अशी त्यांची प्रतिमा नाही.. उलट संपर्कमाध्यमाबरोबर त्यांची चांगलीच जानपहचान आहे. निवडणुकीच. विश्लेषण ते दूरदर्शनवर करीत असतात तसेच 'महाराष्ट्र टाइम्स', *लोकसत्ता' यासारख्या मातब्बर वृत्तपत्रांत स्तंभलेखनही करीत असतात. सत्याची प्रतारणा करणाऱ्या लेखनाशी दोन हात करायला ते मागे, पुढे पाहत नाहीत. असे आव्हान ते मन:पूर्वक स्वीकारतात. अरुण शौरी यांच्या इंग्रजीतील' डॉ. आंबेडकरांवरील असत्य कथनाने भरलेल्या व निंदानालस्ती करणाऱ्या पुस्तकाचा मुकाबला महाराष्ट्रात करण्याची तयारी फक्त फडके यांच्यासारख्या साक्षेपी संशोधकाने दाखविली व एक भले. मोठे ‘डॉ. आंबेडकरांचे मारेकरी : अरुण शौरी' नावाचे पुस्तक प्रसिद्ध, केले. तीच गोष्ट महात्मा गांधींची नालस्ती करणाऱ्या प्रसिद्ध करून सडेतोड उत्तर दिले आहे. अशा प्रकारे वर्तमानात घडणाऱ्या घटनांवर प्रतिक्रिया देणाऱ्या लेखनांमुळे त्यांचे लेखन वाढले आहे.
आजमितीला त्यांची एकूण ५७ च्या वर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. गेल्या दोन महिन्यात त्यांची 'आजकालचे राजकारणी' राजकीय दहशतवाद' आणि “नाही चिरा नाही पणती ही तीन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. एकूंग ५७ पुस्तकांतील फक्त ७ पुस्तके इंग्रजीत आहेत. बाकी सर्व मराठीत आहेत. मराठी भाषेत ठरवून लिहिणाऱ्यांमध्ये फडक्यांचा समावेश होतो. एका अर्थाने इतिहासकार राजवाड्यांचा वसा ते या बाबतीत पुढे चालवीत आहेत असे म्हणता येईल. त्यांच्या मराठी लेखनाचा फार मोठा फायदा इंग्रजीतून लेख लिहिणाऱ्या अभ्यासकांना होत असतो. इंग्रजीत लिहिणाऱ्यांना आयते संदर्भ मिळेतांत व घटनाक्रम आणि व्यक्तींचे स्थान कळते. त्यां जोरावर इंग्रजीत लेख बेतता येतो. प्रा. फडक्यांच्या अभ्यासातून स्फूर्ती घेऊन संशोधन करणारे बरेच संशोधक पुढे आले आहेत. त्यांना फडके सतत प्रोत्साहन देत असतात व शक्यतो सर्व मदत करत असतात. मराठीतून व. इंग्रजीतून संशोधन करणाऱ्या देशी-विदेशी अभ्यासकांना मार्गदर्शन करण्यामध्ये फडके बराच वेळ घालवित असतात. त्यांच्या आगामी योजना पाहिल्या तर अचंबा वाटेल. राज्यघटनेला ५० वर्षे झाली म्हणून एकं मालिका प्रसिद्ध करण्याचा घाट त्यांनी घातला आहे. वर नोंद केल्याप्रमाणे आधुनिक महाराष्ट्रच्या राजकीय इतिहासाचा सहावा खंड येऊ घतला आहे . आहे. तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीवरील ग्रंथाची जुळवाजुळव चालू आहे. आरक्षण व सामाजिक न्याय या विषयावरील सामग्री जमा झाली आहे. व. पुस्तकाची: योजना तंयार होते. आहे. नव्यां शिवचरित्राची योजनाही त्यांनी आखली आहे. म. श्री. माटे, गं. त्र्यं. कुलकर्णी व एम. आर. कंटक या तीन मातब्बर इतिहास संशोधकांनी लेखन करावे असे ठरले आहे. य. दि. फडके हे एका प्रकारे या प्रकल्पाचे सूत्रसंचालक-संपादक आहेत असे म्हणता येईल. सत्तरीत एवढ्या योजना आखणे व त्या शेवटास नेण्याची उमेद बाळगणे हे फक्त य. दि. फडके यांच्यासारख्या राजवाडे-सरदेसाईंच्या वारसालाच शक्य आहे.
--------------------------------------------------
ललित ( मे २०००) मध्ये प्रकाशित